Wednesday, August 31, 2022

श्रमिक आणि वैदिक संस्कृती

#श्रमिक_आणि_वैदिक_संस्कृती.

आदिम काळापासून पाहता भारत हा एक कृषिप्रधान देश आहे या देशात अधिक काळापासून शेतीवर चालणारी व्यवसाय व शेतीवर काम करणारी मजूर कामगार यांची सत्ता होती कालांतराने शेती व्यवसाय हा मागे पडला गेला .श्रमिक नडला आर्थिक दुर्बल झाला.

 या शेतीप्रधान  देशांमध्ये  नंतरच्या काळात श्रमिक आणि वैदिक अशा दोन संस्कृती निर्माण झाल्या. शेतामध्ये काम करणारे मजूर आणि भूमिहीन  शेतमजूर, शेतकरी हे अतीव श्रम , श्रमिक म्हणून हा श्रमिक देश चालवतात देशातील करोडो लोकांना खाद्य पुरवतात मग महत्त्वाचे की नाही ? हो हे महत्त्वाचे नंतरच्या काळामध्ये वैदिक संस्कृतीचा उगम झाला आणि वैदिक संस्कृतीने या श्रमिक वर्गावर वर्चस्व लादून त्यांना गुलाम करून त्यांची सत्ता काबीज करून व त्यांना देशोधडीला  लावत वैदिक संस्कृती मोठ्या प्रमाणावर भारतात विकसित झाली .
मग ही विकसित झालेली संस्कृती गरीब , पीडित आणि अशिक्षित मजूर शेतकरी शेतीत काम करणारे लोक होती त्यांच्या गळ्यात घातली .

आता प्रश्न असा उठतो  की दैनिक लोक हे शेती करत नव्हते त्यांच्याकडे शेती होती पण शेतीवर राब  राबणारा वर्ग हा मजूर होता त्याला आपण श्रमिक म्हणून त्या शेतीवर कामाला लावले.हा सर्व वर्ग कालांतराने हळूहळू अर्थहीन झाला . हा वर्ग पूर्णतः खचला.

" महात्मा फुले यांनी सांगितले आहे की एवढा अनर्थ ' एका अविद्याने केला आणि अर्थाविन शुद्ध खतले."
याचे मूळ कारण हे ' अविज्जा होय.

शेतीचे कुळ कायदे निघाले शेतीपासून वेगवेगळे  आणि शेती वाटण्यात आली . या कायद्यानुसार ही शेती व कोणाला वाटण्यात आली ही शेती ज्यांच्या नावे होती त्यांच्या घरातील कुत्रा ,गाढव,मांजर  किंवा इतर नातेवाईक यांच्या नावे करण्यात आली आणि ती शेती त्यांच्याकडे वडिलोपार्जित कायम राहील.

पण तसे पाहता श्रमिक  संस्कृतीने या वैदीक संस्कृतीला मोठ्या प्रमाणात शह देण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू श्रमिक मागे पडले आणि वैदिक पुढे आले .

आता हे पूर्वश्रमीचे श्रमिक काय करतात ? श्रमिक हे रोज रोजंदारीवर काम करतात शेतीवर काम करतात कारखान्यात काम करतात आणि जिथे मिळेल तिथे काम करतात . यातून मिळालेली पुंजी हे धार्मिक विधी आणि देव देवळात खर्च करतात.

वैदिक लोक काय करतात वैदिक लोक देवळात किंवा इतरत्र पूजा पाठात मिळालेला पैसा हे शेअर मार्केटमध्ये लावतात त्यांना या श्रमिकांचे काही देणे घेणे नसते आणि अशा पद्धतीने देशात आज खूप मोठ्या प्रमावर श्रमिक लुटला जात आहे.

आज त्यांचे  उदनिर्वाहाचे साधन बंद केले गेले आहे.त्यामुळे श्रमिक खचला गेला आता वैदिक संस्कृतीत काय होते वैदिक लोक मंदिर आणि इतर पूजा पाठाच्या ठिकाणी आपले ठाण मांडून बसलेले त्यामुळे त्यांचे कडे श्रमिक वर्गाचा पैका चालून येतो आहे.
 
वैदिक हे  लोक श्रमिक लोकांच्या पैशावर किंवा श्रमिकांच्या बळावर आपले संपूर्ण कार्यक्रम अवैध पणे चालू आहे.  देव आणि देवापासून भीती या वर्गात निर्माण केली ,आज तागायत श्रमिक वर्ग या वैदिक वर्गाचा बळी पडलेला दिसतो आहे.

श्रमिक काय करतात?
श्रमिक आपला शेतीचा किंवा मजुरीचा व्यवसाय करतात आणि याच व्यवसायावर यांचे घर कुटुंब चालते पण हा वर्ग आपले पैसे कमवत असताना वैदिक लोकांच्या बळी पडून देवदिकांच्या किंवा इतर तत्सम देवाने भीती घातलेल्या अंधश्रद्धेला बळी पडतो. आज आपण बघतो आहे की बरीच बहुसंख्य बहुजन किंवा देशातील इतर समाजातील  बहुसख्ये लोक या वैदिक संस्कृतीला बळी पडलेले आहेत.

 वैदिक लोक काय करतात?
वैदिक लोकांना शिक्षणाची गरज नाही बाप दादा किंवा आजोबा पंजोबा या पिढीपासून चालत आलेला पूजा पाठाचा विधीचा प्रोग्राम यांच्याकडे चालून येतो आणि पुढे हे लोक देव किंवा देवळात किंवा इतर धार्मिक विधी मध्ये अग्रेसर असतात आणि बहुजन वर्गातील सर्व या लोकांत विविध पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गाचे भय भीती किंवा इतर कारणे दाखवत या लोकांना बळी करतात.

तसे पाहता या देशांमध्ये किमान ८० टक्के लोक   शेतमजूर,मजूर  भूमिहीन शेत मजूर किंवा इतर तत्सम काम करणारे देखील त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक साधने किंवा आर्थिक सुबत्ता असलेली पाहाव्यास मिळत नाही.

 वैदिक लोक हे एकदम उजव्या प्रमाणात हात पाय न मिळवता पैसा कमवतात. कमी असून किंवा त्यांचे टक्केवारी एकदमच कमी असताना ही हे लोक एकंदरीत ९० टक्के लोकांवर राज्य करत आहेत याचे उदाहरण म्हणजे आज आपल्या देशात सुरू असलेले राजकारण या राजकारणात अडकलेली जनता.

जनता कशी आहे बघा ?
 ही जनता मेलेली आहे मेलेली म्हणजे जसा मेलेला माणूस आवाज करत नाही हालचाल करत नाही तसेच हे लोक वैदिक लोकांच्या बळी पडलेले असून ते कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचार किंवा अंधश्रद्धा या गोष्टीवर आवाज उठवत नाहीत मग हे लोक मेलेले आहेत की नाही ? तर उत्तर असेल ,हो .

हे लोक मेलेले आहेत अशा लोकांपासून आपण काय अपेक्षा घ्यायची म्हणून श्रमिक लोकांनी जास्तीत जास्त या वैदिक लोकांचे डावपेच ओळखत वागण्याचा प्रयत्न करणे हीच आज काळाची गरज आहे.

प्रा बा र शिंदे,नेरूळ - ७०६.

Friday, August 19, 2022

डॉ नरेंद्र दाभोळकर

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर एक झंझावात !
.... मिनांडर*

संपूर्ण देशात या महाराष्ट्राला सत्यशोधकी चळवळीची एक मोठी परंपरा आहे . खऱ्या अर्थाने ही परंपरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली .  सत्यशोधकी समाजाची स्थापना  करून महात्मा फुले यांनी या महाराष्ट्राला एक अशी परंपरा दिली त्यातून अनेक सत्यशोधकी तयार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे  बुलंद उदाहरण होय .  या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक सत्यशोधक म्हणून जन्माला आले आणि ती परंपरा आजही कायम आहे.
त्या सत्यशोधकी चळवळीचे एक मोठं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील ते कणखर सत्यशोधकी होती अनेक ठिकाणी भाषणे द्यायचे. एक मजेदार हिस्सा एका गावात घडला तो असा,  एका गावामध्ये त्यांचे भाषण झालं त्यांच्या दुसऱ्या दिवशी गावाच्या देवळातले  चांदीचे डोळे चोरीला गेले त्यांच्या असे लक्षात आलं नानांच्या भाषणाचा प्रभाव म्हणून कोणीतरी ते डोळी चोरली असल्याची लोकांना खात्री होती मात्र ते देवस्थान अतिशय प्रखर आणि जागृत होते त्यामुळे देवाची डोळे  चोरलेला माणूस कोण ? याची एकत्र चर्चा झाली.  आता त्या तिकडून त्या ‘ची ची’ चर्चा सुरू झाली .आणि डोळे परत येतील  असा लोकांचा विश्वास होता एक महिना गेला दीड महिना गेला दोन महिने गेले पण डोळे काही परत आले नाहीत.  तीन -चार महिन्यांनी पुन्हा एकदा नाना पाटील यांचे भाषण गावात झालं त्याच देवळात उभे राहिले आणि म्हणाले, हा देव जागृत आहे, असं तुम्ही म्हणता त्याचे डोळे चार महिन्यापूर्वी चोरीला गेले.खरं तर ते चोरीला गेले नाहीत मीच काढून नेले होते असं म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातून डोळे काढून दाखवले ते पुढे म्हणाले जर तुमच्या देवाने माझे काही केलं नाही तर तो जागृत कसा काय असेल ? हे महाराष्ट्रामध्ये -६० -७०  वर्षांपूर्वीचे ‘कृतीशील विचार’ होते . पण शोधकथा आणि कृतिशीलता यांची आजची स्थिती काय आहे ?
तेच आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अनिस च्या मध्येमातून कृतीशील स्वरूपात कार्ये करीत होते .  सध्या चालू असलेली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे हे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य जागतिक दर्जाचे कार्य असून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या कृतीला अर्पण केलेला आहे.  बाबासाहेबांना हवे असलेली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली व्यवस्था त्यांनी या ‘अंधश्रद्धा निर्मूलनातून’ जगापुढे मांडली आहे ‘सत्ते ते सत्य, ‘असते ते असत्य’.  ‘काळा तो काळा गोरा तो गोरा’  ही खरी कृतीशील विचारसारणी  मांडण्याचे  धाडस केले आणि शिक्षित असो किंवा अशिक्षित असो यांच्यावर कसा घाला घातला हे जगाला माहीतच आहे.  आज त्यांचा शहीद दिन  असून आपण त्यांना आठवण करत आहोत . डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे दृष्टी होते त्यांचा खून करण्यात आला हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मारेकरी  कोण?  आत्तापर्यंत ते अजून तरी अधांतरी आहे त्याचा छडा लागला पाहिजे असं मलाही वाटलं तुम्हालाही वाटतं असेल ? आणि जगाला वाटते ,पण तसा अजून सरकार कडून प्रयत्न होत नाही हे सत्य आहे. हेच सत्य आपण जगापुढे मांडलं पाहिजे सत्याची कास धरली पाहिजे सत्याच्या मार्गावर असले पाहिजे असं डॉक्टर नरेंद्र नेहमी सांगत आणि हेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना खरी अर्पण पत्रिका होय . 
आज आठवतं २० ऑगस्ट हे मारेकरी यांनी मारल्याचा दिवस ९ वर्षपूर्ती होत आहे . डॉक्टर नरेंद्र हे कसे होते ,एखादा डॉक्टर एका पेशंटची नाडी बघून त्याला बरं करतो पण नरेंद्र दाभोळकर हे हजार लोकांच्या नाड्या ओळखत आणि त्या लोकांच्या मानसिकतेप्रमाणे त्यांना ते तश्या प्रकारचे  ज्ञान देत किंवा उपदेश देत असे.  डॉक्टर नरेंद्र यांना एकदा असा प्रसंगाला सामोरे जावे लागले की ,तेव्हा त्यांची  मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची भेट झाली.  ते तेव्हा ते मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांना त्यांनी असा एक प्रश्न केला की आपण राज्यकर्ते आहात आपण लोकांची सेवा करता आपण लोकात मिसळतात तेव्हा त्यांना बोलण्याचा योग आला ते म्हणाले , ‘म्हणाले ते सगळं ठीक आहे हो कायदा वगैरे करायला पाहिजे ते आम्हाला कळते .  पण लोक बाबा यांच्याकडे लक्षवेधी लोक  जातात आम्ही शेवटी राजकारणी आहोत ज्यांच्याकडे लोक जातात त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का ?  त्यांना वाटलं त्यांनी मला निवृत्तर करण्याचा प्रश्न  विचारला आहे मी म्हणालो हो माझ्याकडे याचे उत्तर आहे.  त्यांना जरा आश्चर्य वाटले विलासराव थोडे दचकले ते म्हणाले काय उत्तर आहे तुमच्याकडे ? मी म्हणालो याचे उत्तर म्हणजे या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे कसं आहे हे तुम्हाला समजावून सांगणं तर त्यांना काही कळलं नाही ते म्हणाले आमच्याकडे काय उत्तर आहे ?  आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय मी म्हणालो, साहेब तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाहीत तुम्ही राज्यकर्ते आहात तुमच्याकडे आज घडीला २०००० माध्यमिक शाळा आहेत. ८० हजार प्राथमिक शाळा आहेत २,२०० कॉलेजेस आहेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या सहा लाख आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या एक कोटी दहा लाख आहे कॉलेजमध्ये दहा लाख मुलं शिकतात आणि जवळजवळ एक लाख प्राध्यापक आहेत या सगळ्यांच्या अभ्यासक्रमात मूल्य शिक्षणात  तसंच भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा असे दिलेला आहे त्यातले तुम्ही काहीच करीत नाहीत म्हणून आम्हाला करावा लागतो.  असे डॉक्टर नरेंद्र यांनी माजी मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांना ठणकावून  सांगितलं होतं.  असे हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर.
त्यांची मातंग समाज यावर ही खूप आस्था होती .  एकदा असं झालं प्रसंग असा होता की एका मांगवड्यात गेले होते ,मांगवाड्यामध्ये त्याचा कार्यक्रम चालू असताना ते म्हणाले मातंग समाजाकडे सेंदर्यााच्या यात्रेमध्ये तुम्ही गळ का टोचून घेता ? गळ  टोचून घेणे हे अनेक अंगाने अंधश्रद्धा आहे कदाचित यातून एड्स होऊ शकतो किंवा कुठलाही रोग होऊ शकतो असे ते म्हणले . तेंव्हा समोरून कोणीतरी  ‘तुम्हाला फक्त आम्हीच  उरलोय का शहाण करायला ? असा बालिश सवाल केला होता .  
त्या समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन होणार कसं आता मला सांगा हे समाजातील लोक कार्यकर्ते प्राध्यापक, डॉक्टर चुलकीचे संदेश सांगतात.  आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील आहोत आता हे डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीत असलेल्या लोकांना अभिप्रेत आहे ? का कारण नाही कारण बाबासाहेबांनी कधी देवळात जाणे किंवा अशा अंधश्रद्धा बळकटीकरण होईल अशा प्रकारे कुठेच कार्य केलेले  दिसत नाही.यापुढे जाऊन  तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी घ्या, अण्णाभाऊ साठे यांनी एकंदरीत ८०  महामनवला  आपल्या लेखणीची  अर्पण पत्रिका वाहिली .८०  महात्म्यांचे त्यांनी आपल्या पुस्तकातून महात्मे गौरविले आहे.  पण त्यांनीही  कुठेही देवधर्म किंवा कुठेही एखाद्या धार्मिक विषयावर लिहिलेले दिसत नाही कारण अण्णाभाऊ साठेचे विचार आणि डॉक्टर नरेंद्र ,डॉक्टर  बाबासाहेबांचे विचार हे वेगळे न्हवते . 
याचीच परंपरा पुढे चालवत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या कार्याची परंपरा पुढे चालवली होती म्हणून ते लोकांना आवडत नव्हते.  लोकांना नको होते.  म्हणून त्यांचा खून करण्यात आला त्यांना दिवसाढवळ्या मारल्या गेले. आज मी  त्यांना त्यांच्या विचारला अर्पण पत्रिका सादर करत आहोत. 

डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा २० अगस्त २०१३ रोजी पुण्यामध्ये मॉर्निंग वापरताना काही धर्मांध शक्तीकडून निर्गुण खून करण्यात आला या घटनेला आज नऊ वर्ष पूर्ण होत आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे डॉक्टर कुलबर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारांचेही खून केले गेले .
या चारही खूनामागे एकच संघटना आहे असे तपासा अंती पुढे येत आहे.

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे असे पर्वा बेलापूर येथे झालेल्या सभेत त्यांच्या मुलीने सांगितले. याचाही कुणाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र वेदना खटकत आहे.

 याप्रसंगी खालील मागण्याचा ते पाठपुरावा  करत आहोत . डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या गुन्हा मागच्या मुख्य सूत्रधारचा शोध घ्यावा या खूना मागच्या धर्मांध संघटनेवर कठोर शिक्षा व्हाव्यात

हा खून खटला जलद गतीने चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी #अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकर करायचे म्हणून त्यांचा खून प्रतिगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यक्रमातून करण्यात आला हे आता स्पष्ट झाले आहे परंतु-  "माणूस मारला तरी विचार संपत नाही" हे सत्य डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या पश्चात त्यांच्या निर्भीड आणि विवेकी कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण जोमाने सुरू ठेवत सिद्ध केले आहे.

आजच्या दिनी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी  आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपणाला विनंती करतो की आपणही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कार्यात सतत सामील व्हावे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य पुढे नेणे हेच शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीला खरे खरे अभिवादन ठरेल.

प्रा बी आर शिंदे ,नेरूळ ७०६

(डॉ. बाबासाहेब आंबेकर विचार -प्रचार,प्रसारक,पाली भाषा आणि साहित्य लेखक,समता सैनिक दल आजीव सदस्य,अनिस सक्रिय सदस्य , कर्णबधीरांचे बाल शिक्षण आणि संशोधक).

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...