Thursday, August 17, 2023

अण्णाभाऊ यांचे मारे करी .


डोकं ठिकाणावर आहे का?

                      प्रा. बी. आर. शिंदे ; (विशेष शिक्षण ) नेरूळ नवी मुंबई ७०६ .

जसे मला कळते आहे, १९७२ पासून अण्णाभाऊ साठे यांचेवर नुसते फालतू भाषण एकूण थकलो आहे.माझ्या सारखे कैक तोच प्रश्न मनात करीत आहेत.हे सत्य आहे.उठ सुठ सोम्या गोम्या आमच्या कॉम्रेड साहित्यकाराला ,कम्युनिस्ट (Not a Marxist, he was a  Comrade   )  येवढ्या पाण्यात पाहतो आहे की ,आमचा बाप दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न झाला.गरिबी हालाकी मधून दिवस काढले ? पाई चालत मुंबई गाठली.असे अपमानास्पद छातीठोक पणे बोलत असतो आणि ते आम्ही एकून गप्पा ही बसतो . ?

मा . माझी आमदार पी टी कांबळे ते मा. आमदार सुधाकर भालेराव असे अनेक आमदार होऊन गेले पण मला एकच आमदार भावले ते म्हणजे मा. भालेराव सर . 

खूप पोटतिडकीने समाजासाठी कार्य करणारे . 

यांनी कितीही संपत्ति कमवली असली तरी  कमवू द्या . तुमच्या खिशातून देत आहेत का ? शेवटी मांगाचा ढाण्या वाघ आहे . तब्बल दोन वेळा आमदार होणे हे कांही सोप्पे नाही ? 

समाजातील आमदारकिचा इतिहास पहिला तर कुणी  गाणे गावून आमदार झाले तर कुणी अण्णाभाऊ यांची छककड गावून आमदार झाले . माझ्या उदगीर राखीव मतदार संघचे  पहा . अनेक आमदार दिले आम्ही पण मा. भालेराव साहेब यांच्या कार्याला तोड नाही ? खरे आमदार . 

असो तो माझ्या विषय नाही असे म्हणणे हे तेवडेच घातक  आहे . कारण बाबासाहेबाणी सत्तेत जा हे सांगून गेले . म्हणून सत्तेत असताना आपले दु:ख मांडणारे नेते अजून भेटले नाहीत ? ही समाजाची खंत आहे . एक म्हण आहे , साहेबाच्या पुढे आणि मागे जाऊ नये ,नाहीतर तुम्ही संपला म्हणा ,या उक्ती प्रमाणे आपले काम भले आणि मी भला  असतो . 

नेते पुढारी हो ,अरे अण्णाभाऊ कांहीं गरीब नव्हते? त्यांचे कडे शेती होती .शेतकरी होते.शेतीत मशागत करीत होते.पण तिथे त्या शेतीत  त्यांचे मन रमले नाही .गाव सोडून मुंबई ला जाऊ तेथील गरीब ,गिरणी कामगार ,मिल मजूर यांच्या बाजूने आपण लढू संघर्ष करू या वैश्विक हेतूने ते राजधानी मुंबई येथे आले होते.

मला या लोकांचे अजब वाटते आहे.त्या काळात शाळा होत्या का? बहुजन वर्गाला शिक्षण संधी होत्या का? गाव कुसा बाहेरील लोकांना शिक्षण होते का? आरे तुम्ही वेशी बाहेर होते . गावा बाहेर होते . फेकलेली जमात होती ( Read : who where Shudras ? ) तरी म्हणे आम्ही या देशाचे पाइक ? 

ये आझादी झुटी है ,असे सांगणारा माणूस देश स्वातंत्र्य साठी त्या इंग्रज लोका विरुद्ध  का लढेल ? इंग्रज आले म्हणून शिक्षण तुम्हाला माहिती झाले ? नाहीतर पाटलाच्या वाड्या शिवाय दुसरी चौकट माहिती होती का ? 

येथील अश्या वाईट शिक्षणाला तिलांजली देऊन .अण्णाभाऊ 'लोक लढ्यासाठी ' मुंबईत आले.हे सांगायला जमत नाही का ? ते मुंबईत मजुरी करण्यास आले होते का ? असे हिडीस भाषणातून का सांगता . बाळ मनावर काय बिंबवायचे आहे आपणास ? तुम्ही आर एस एस च्या भागवत सारखे का अण्णाभाऊ विषयी बोलत आहेत . याचा अर्थ मी असा घेईन की आपण आर एस एस च्या 'गाय माय चे सेवक'  आणि भक्त आहेत . हे आम्ही आंबेडकरवादी बहुजन खपवून घेणार नाही ? कदापि नाही ? 

कॉ . अण्णाभाऊ समजून घेत असताना कुणी त्यांना वेगळ्या  पदव्या मागत आहेत.ते तर भारतरत्न आहेत.फक्त नाव कोरले गेले नाही.

सूर्याला आरसा कश्याला? अन्याय आणि न्याय यातील फरक समजावण्यासाठी त्यांनी आपल्या समोर ' फकिरा ' सादर केली.तिच कादंबरी महामानव बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांना अर्पण केली.किती मांग लोकांच्या घरात ही कादंबरी आहे?

पर्वा मागच्या महिन्यात मी पुण्यात एक कार्यक्रमात गेली असता एक व्याख्याते यांनी  विचारले की फकिरा कोणी कोणी वाचली आहे? 

फक्त दोन लोकांनी हात वर केला होता? किती शरमेची बाब आहे.एकीकडे अण्णाभाऊ चे गुणगान गाता आणि दुसरी कडे त्यांच्यावर घनाघात करीत आहेत. त्या सभेत लाज वाटली ?

१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट नाच गण्यात तल्लीन झालेली  पिढी ,गुटके बहादुर यातील ,अण्णाभाऊ कोणाला कळले का ? उत्तर हे नाहीच मिळणार आहे ? 

अहो ते डॉक्टर होवू द्या की नाही होवू द्या .आपण त्या डॉक्टर व्यक्तीचे किती साहित्य वाचले आहे? हा बिनीचा प्रश्न आहे . 

अण्णाभाऊ काय? पुतळ्यात  आहेत का? कधीच नाही?

ते त्यांनी मांडलेल्या आपल्या वैश्विक साहित्यात आहेत.कथा कादंबऱ्या आणि ग्रंथात आहेत . त्यांचे साहित्य वाचा . वाचा अण्णा वाचा.तुम्ही वाचा आणि आपल्या येणाऱ्या मुला बाळाणा पण वाचायला सांगा . अण्णा कांही पुतळ्यात मिळणार नाहीत ? 

जसा ३१ अगस्त चा आकडा संपेल तसे मांग समाजाच्या घरा दारात मातीचा ,थर्माकोल चा गणपती विराजमान होईल? काय घनघोर अपमान आहे त्या महानवाचा महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब ,शाहू महाराज आणि आण्णाभाऊ साठे यांनी कुठे आपणास त्यांच्या साहित्यात घरात गणपती बसवण्यास सांगितले आहे का? किती छळ कपट करीत आहेत त्या मानवांचे.

यांचे पाइक म्हणून मिरवत असताना आपल्याला लाज वाटली पाहिजे . ज्या मंडपात महानवाच्या जयंत्या उभ्या केल्या त्याच मांडवात गणपती आणून बसवता ? लाज कशी वाटत नाही आपणास बहुजन  समाजाचे नेते आणि कार्यकर्ते म्हणून समाजात मिरवत असताना . समाजाची किती दिशाभूल करीत आहेत . समाज आपणास माफ करणार नाही ? याद राखा !

अण्णाभाऊ यांनी गण आणि गणपती गवळण मोडीत काढीत आपले ' आदी जनाला ' हा झांजवत आपल्या लाल बावटा पथका मार्फत जनमनात पेरला.हे आपणसा कसे कळत नाही ? त्यांना गणपती ची आराधना केलेल कधी कुठे पुरावे असतील तर द्या आणि खुशाल घरात ,घरावर ,अंगणात जिथे जागा असेल त्या जागेवर गणपती बसवा . किंवा डोक्यावर घेऊन खुशाल फिरा ? 

हे सांगण्यास आपणास लाज वाटते.म्हणे अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत? 

हो अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत ? नाही जाउद्या , पण परत परत किती वर्ष गुरळ ओकणार आहेत . ? याद राखा खूप मोठी गफलत करीत आहेत. उद्या येणारी पिढी आपल्या तोंडात  शेण फेक्तील?

आपले अण्णाभाऊ तर शाळेत गेले नाहीत? मग मी शाळेत जाऊन काय करू? असे जर आपले मुले विचारतील तर ,तेंव्हा उत्तर तयार ठेवा.? 

काळ बदलत गेला.डॉक्टर बाबासाेबांबद्दल माहिती आहे का?

परदेशात जाऊन बॅरिस्टर होऊन आले? राज्य घटना लिहली  असे एवढेच सांगितले जाते. पण तसे नाही ? 

त्यांनी संघर्ष केला आणि त्यातून दलित उठावाच्या ठिणग्या पडल्या , सारा आसमंत पेटून उठला.गुलामी चे साखळ दंड तुटले माणसे ,दलित स्वतंत्र  झाला ,हवा मोकळी झाली.

याचा धागा पुढे रेटीत अण्णाभाऊणी जग बदलाची धार आणि कवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कडे झुकती केली .अर्पण केली . ते आंबेडकरवादी होते ? ते तसे नसते तर त्यांनी 'जग बदल घालूणी घाव सांगून गेले मज कार्ल मार्क्स राव ' असे कवण नाही का गायीले असते ? 

प. पू. डॉक्टर बाबासाहेब अण्णाभाऊ यांना तेंव्हा कळले त्या काळात कळले ,पण आज आपणास का कळत नाहीत ? या मागचे गौडबंगाल कळायला हवे . 

जगभरात ख्याती असलेले अण्णाभाऊ जगाला काळले ,कारण त्यांनी त्यांचे साहित्य वाचले . आपण त्यांचे साहित्य वाचलेच  नाही ?  तर कळतील कसे ?










 

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...