Thursday, July 30, 2020

आनंदवन कर्णबधिर विध्यालाय

मूकं करोति वाचालम्
July 16, 2020
महाराष्ट्रातील कर्णबधिरच्या क्षेत्रातील आनंद मूक बधिर विद्यालय आनंदवन या शाळेची  २ जुलॆ १९८३ ला या शाळेची स्थापना झाली. 

हा लेख मी वाचला आणि आणि संपूर्ण आनंदवनात व्यतीत केलेले दिवस आठवले आणि ,शिव सर यांनी एवढी मेहनत घेऊन लिहलेल्या लेखाला माझी प्रतिक्रिया न देणे हे राहवले नाही ...

या ३७ वर्षांचा शाळेचा प्रवास त्याला एक इतिहास आहे. आनंदवनातील अनाथ मुलांच्या प्रकल्पात कर्णबधिर विधायलाय चा सिंहाचा वाटा आहे .
माझा आनंदवन ला प्रथम भेट देण्याचा योग १९८५ ला आला होता. तेंव्हा नुकतीच आनंदवन ची स्थापना  झाली होती . तीन वर्षे वयात आले होते .

तो अनुभव खूप वेगळा होता ,येवढ्या मोठया प्रमाणात कुष्ठरोगी संख्या  पाहण्याचा वेगळा अनुभव . प्रतेक व्यक्ति आपल्या पुढील आयुष्यात बरे होण्याच्या जिद्धीने दिसली होती ,ती जिद्द खरी झाली . आज ती माणसे आनंदवनात आपले सुखी जीवन जगत आहेत . याचे श्रेय डॉ .आमटे दांपत्याला जाते . त्यांचा त्याग आणि मेहनत यावर आंनदवन येथे आनंदाची ‘वृक्ष वल्ली ’ उभा आहे .

इथे लिहण्याचा संधर्भ असा की १६ जुलाई ला शाळेचे आदर्श विशेष शिक्षक ,शिव सर यांना जाते . शिव सराणी आनंदवण च्या स्थापणे पासून ते आजतागायत इतिवृत खूप मार्मिक आणि सुंदर रीतने मांडले आहे ते सराहनिय आहे अजोड आहे .यावर मागील पंधरा दिवसात  कर्णबधिर क्षेत्रातील मान्यवराणी भर भरून आपल्या प्रतिकऱ्या  लिहाते झाले आहेत . वेळे अभावी मी त्या योग्ये वेळी माझी प्रतिक्रिया देऊ शकलो नाही महणून आज इथे लिहण्याचा उहापोह टाळता आला नाही . 

माझा या शाळेशी जूना  ऋनंनुबंध आहे ,म्हणजेच नाते घट्ट आहे . सन १९९८ ला येथे पुनः जाण्याचा योग आला तो थेट कार्यालयीन कामानिमित्त . 
कर्णबधिर शाळेत मुलांची कान तपासणी घेऊन मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात आली होती .तेंव्हा  बाबा आमटे आणि माझी भेट झाली नाही . या महान व्यक्तिला पाहणायची ईछा पूर्ण झाली नाही . 

परत पुढील दोन कार्यक्रम घेण्यात आले पण माझी प्रतेक्ष भेट कांही झालीच नाही . पण अशाच एका श्रवणयंत्र वाटपाट माझी भेट झाली तेंव्हा बाबा अंथुरणात होते . झोपून होते . त्यांना फिरणे चालणे शक्य  न्हवते कमरेला पट्टा बांधून झोपले होते .  मी आणि माझे स्नेही डोक्टर संजय खंडगाळे ,भाषा आणि वाचा तज्ञ आम्ही दोघांनी बाबांची घरी जाऊन भेट घेतली . यात आजच्या  कार्यक्रमाचे ,नियोजन आणि श्रवणयंत्र वाटप यावर चर्चा करून श्रवणयंत्र आणि त्याचा उपयोग ,वापर याविषयी माहिती दिली ,हे सर्व एकुण बाबा कमालीचे खुश दिसले आणि माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला . 

त्या काळी प्राचार्य हिंगे सर ,कडक शिस्तीत असताना दिसले . त्याचा मुलाच्या भाषा आणि वाचा विकासावर खूप भर असे .

आनंद अंध विद्यालय ,आनंदवन व संधीनिकेतन ,अपंगाची कर्मशाळा तपासणीसाठी आनंदवनात असे अनेक उपक्रम येथे चालतात .

आज भाषा विकास आणि वाचा विकास यावर खूप मोठया प्रमानात काम होताना दिसत आहे . एकंदरीत शाळेतील शिक्षक ,पालक यांच्या संगनमताने शाळेचे वन हे आनंदात झाले आहे . 
मला आनंदवन ची ओढ अजून आहे .आज ही आहे ,आणि असणार आहे .
इथे वास्तव्यात असताना  सकाळी उठल्यावर जो देखावा असतो तो अविस्मरणीय आहे . सकाळी मोर्निग वाक  ला मला जायला हमकास आवडते . मी दोन किंवा तीन दिवशीय कार्यक्रमात जातो,तेंव्हा तेंव्हा शिव सर आणि मी गप्पा मारत ते संपूर्ण निसर्गमय रान फिरून येतो ,बाहेर पडताच पूर्व दिशेला संपूर्ण लाल सुर्ये उगवताना दिसेल ,लगेच उजवे वळण घेतले की सुंदर तलाव .या तलावात अनेक विविध मासे .ते बघत पुढे सरकावे वाटत नाही ,लगेच पुढे खाली घासर्तीला उतरावे लागते ,तोच वेग वेगळी झाडे ,फुले वाघून भारताचा पूर्व प्रदेश आठवतो . पुढे थोडे वळण घेतले की सरळ रास्ता आहे ,परत दोन्ही बाजूला तलाव ,यात मनमोहक कमळ ,आणि विविध फुले . पुढे सरकार गेले की विविध रंगांनी नटलेले गुलाब फुले ,आणि इतर फळांची झाडे . मी ग्रामीण,खेडे गावातून महणून माझे इथे खूप मन रमते आणि मन अडकून राहते . परत परत यावेसे वाटते .
लगेच थोडे पुढे गेले की ,डाव्या हाताला वन गाय ,नीलगाय आणि शहामृग अशी विविध प्राणी . काय तर  आखा निसर्ग इथे नांदतो आहे या वनात आनंद वनात .. बाबाच्या वनात . आठवण आली की परत जाण्याची चाहूल लागते .. 

मूकबधिर विद्यालयाची स्थापना ही एक बाबाची स्व्प्न्पुरती त्यामुळे त्यांनी  एका कॊलारू गेस्ट हाऊस मध्ये शाळा सुरु केली. असा इतिहास आहे . विशेष शिक्षिकेची गरज होती मग नखाते साहेबांनी श्रीमती सरोज कठाळे यांचे नाव सुचविले त्यांची शाळेत नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी येणारा कर्ण बधिर मुलांचा वयोगट वेगवेगळा होता. वय वर्ष ८ ते वय वर्ष १६ एकाच वर्गात अशी मुले सांभाळने ही मोठी कसरत होती. सरोजताईंनी प्रायोगिक तत्वावर काही वर्ग रचना केली. पुढे शाळेत कर्णबधीर मुलांची व शिक्षकांची संख्या वाढत गेली.आणि पुढे वटवृक्ष झाला . 

सर्व सामान्यांप्रमाणे या कर्णबधिर  शाळेतही भाषा, वाचा ,गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय शिकविले जातात. कर्णबधिरांच्या अध्यापनातील विशेष गरजा लक्षात घेऊन अध्ययन विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे विविध कौशल्य व साधनांचा वापर केला जातो. 
सर्व शिक्षकांसोबत  विद्यालयातील विशेष शिक्षक  आपल्या वर्गात श्रवण प्रशिक्षण आणि वाचा विकास  यावर भर देताना दिसतात आणि सतत मेहनत घेऊन मुलात भाषा आणि वाचा विकस कसा होइल आकडे त्यांचे ध्यान आणि मनन असते . 

ग्रामीण भागात मुले लवकर शाळेत दाखल होत नाहीत ही खंत आहे . यावर मात करून पुनर्वसन करणे कठीण जाते ,यावर ही या शाळेने मात केलेली दिसून येते .
५ ते ७ या वयोगटातील मुलात भाषा आणि वाचा वाढ करणे हे अवघड कार्ये . मुलांना ,त्यांची वायक्तिक श्रवणयंत्र लावणे ,त्याची काळजी निगा घेणे हे खूप जिकिरीचे असते . वर्गात सामूहिक श्रणवयंत्र ,स्पीच त्रैनर आणि इतर वाचा आणि भाषा आणि वाचा विकासाठी सहायक जे जे हवे त्याची खबरदारी घेणे हे ,निवासी  शाळेचे कौशल्य आहे . याच नसून भररातील निवासी शाळेची ही खूप मोठी अडचण आहे .

एखाद्या व्यक्तीने असे करा तसे करा दोन मिनिटात शाळेत येऊन उपदेश देऊन जाने आणि प्रतेक्ष अश्या मुळसोबत कार्य करणे हा पोर खेळ नाही . इथे आपली सर्वश्व मेहनत ,त्याग पणाला लावावा लागतो तेंव्हा खर्या  अर्थाने या मुलात विकास झाल्याचे दिसून येते . या शाळेत तेच मेहनत करणायचे काम तमाम शाळेतील टिम करीत आहे .  सर्व निरपेक्षतेने विशेष काळजी घेऊन सर्व  विशेष शिक्षक  शिकवितात. अतिशय मेहनत घेण्यांची वृत्ती या शिक्षक वर्गाकडे  आहे. हे मी अवलोकन केले आहे .

आज आनंदवनाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पुनर्वसन... संधीनिकेतन अपंगांची कर्मशाळा येथे अपंगांना व्यवसाय प्रशिक्षण दिल्या जाते. 
आदरणीय डॉ.विकास आमटे सर शाळेच्या प्रगतीला हातभार लावतात आणि शाळा विकासाला प्रथम प्राधान्य देतात . यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ते स्वतः पाहुण्यांना शाळा दाखवायला घेऊन येत असतं, आणि शाळेचा विकास व प्रगती  आलेख दाखवतात . 

शेवटी ,शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया आहे असे श्रध्देय बाबा आमटे म्हणतात.. तीच प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आनंद मूकबधिर विद्यालय, आनंदवन  प्रयत्नशील व कटीबंध आहे......आणि पुढे ही राहील अशी अश्या व्यक्त करतो .
इथे सर्व आठवणी मला व्यक्त किंवा मांडता येणार नाहीत ,पण मी आनंदवन च्या एक आणि एक आठवणी चा साक्षी असून तेथील प्रतेका चा ऋणी आहे . 

दीपक शिव सरांनी फेसबुक वर  आपला लेख लिहला आणि मला आठवणी लिहण्याचा मोह न  झाला नाही हे नवलच . महणून शिव सर ,घोलप सर आणि प्राचार्य हिंगे सर ,व त्यांच्या सर्व विशेष शिक्षकांचा मी ऋणी आहे . 


३० जुलाई २०२०

Monday, July 27, 2020

परिशीलन

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3362065620478340&id=100000248063158

Saturday, July 18, 2020

पुण्य स्मरण :अण्णा भाऊ साठे !

*'तू गुलाम नाहीस तू तर या वास्तव जगाचा निखारा आहेस !’*

‘हि पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे’.  

‘ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है’
....  *कॉ. अण्णा भाऊ साठे* 

माणसाचा जन्म आणि मरण आतील जो काळ असतो तो  तमाम  मानव जातीला इशारा देणारा असतो  . तीच गत या महान लेखकाची झाली होती . अफाट बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्व क्रांतीकारी विचाराने प्रेरित जीवन जगले,कॉ. तुकाराम भाऊराव साठे (अण्णा ). 
---- *प्रा. बालाजी र. शिंदे.* 

वंचिताचे जीवन जगात असताना समाजाला आज उत्तुंग शिखरावर येण्यास जे श्रध्ये अण्णा भाऊ साठे जाते ते त्यांचे उत्तम कार्य होय .अण्णा हे एक मिश्रण ज्यांनी  स्वतंत्र विचारधारा समाजात रुजवली अशी सम्यक विचार प्रणाली  पेरलेले महान कलाकार . प्रतेक्षात सगळ्या “शोषित  समाजाला एकदिशा” देणारे साहित्य त्यांच्या लेखणीतून क्रांतीच्या ठिणग्या घेऊन उतरले होते . 


जन्म जरी अधोरेखित नसला तरी मरण नक्कीच अधोरेखित आहे ,कारण त्यांनी पेरलेली विचार धारा आणि ,पेटवलेली ज्वलंत मने ,ज्याने घाव घालण्याचे आणि जीवन जगत असताना जगात बदल घडवण्याचे धाडस केले . 
आज त्यांचा स्मृति दिवस ! अधोरेखित होतो आहे !!

गोरेगावच्या घरात अण्णा भाऊंचा १८ जुलै १९६९ रोजी मृत्यू झाला होता. जेंव्हा अण्णा भाऊ मरण पावेल त्या समयी कॉ. सत्येंद्र मोरे यांनी वर्तमानपत्रे, ऑल इंडिया रेडिओ, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांना, शाहीर अमर शेख आणि अभिनव प्रकाशनाच्या वा. वि. भट यांना कळविली. अभिनव प्रकाशनाच्या दुकानावरच प्रगत साहित्य सभेची बैठक असल्याने, तेथे बातमी कळताच भट, बाबूराव बागूल, नारायण सुर्वे, दया पवार, प्र. श्री. नेरुरकर, अर्जुन डांगळे, राजा ढाले, प्रल्हाद चेंदवणकर, राजा राजवाडे, शिवराम देवलकर, वामन होवाळ, डॉ. सदा कऱ्हाडे, कॉ. जी. एल. रेड्डी, ए. के. हंगल.. आदी अनेक मान्यवर आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अंत्ययात्रेला उपस्थित होते.(लोकसत्ता टिम जुलै २७ ,२०१९ ). 
पारंपरिक धार्मिक मूल्यांना छेद देणारे ऐतिहासिक विधान नोंदवून जगाकडे डोळस वास्तववादी दृष्टिकोनातून बघण्याची शिकवण देणार्याव वरील  विधानाप्रमाणे दलित-शोषित कष्टकरी चळवळीसोबत एकनिष्ठेने राहणार्या  लोकशाहीर, साहित्यिक कॉ. अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृति दिवस म्हणून पाळला जातो . 
 अण्णा भाऊ यांचा जन्म मातंग समाजात झाला हे अजून किती वर्ष सांगणार ते बहुजन समाजात बहुजन हिताय बहुजन सुखाय साठी जन्म घेतले मानव  . जात नको नको म्हणणारे जातीचे पोवाडे आणि वाभाडे गाण्या सारखे आहे का ? येवढ्या महान कलाकाराला एका  जातीती गुंतून ठेवणे हे माझ्या सारख्या विचारवंत ,समीक्षक माणसाला परवडणारे  नाही ? महाराष्ट्रातील उपेक्षित समाजात आणि त्यात फाशीपारधी नंतर गुन्हेगार म्हणून सरकारने शिक्का मारलेला समिश्र समाजात ,उपेक्षित वर्गात यांचा जन्म.
अशी ज्या समाजाची अवस्था तिथे  त्या समाजातील गुणवंत शांतिप्रिय  अण्णा नावाचा जन्म घेतो आणि तो माणूस  जगविख्यात साहित्यिक होऊन जातो हे अभिमनाची बाब आहे . जगातला एकमेव माणूस ज्याने साहित्यात आपली सीमापार करून रशियात जाऊन आपले विचार मांडले  .ते धाडस त्या शूर वीराचे .  अण्णा भाऊ यांनी आपले भविष्य स्वतः लिहिले आणि ते खरे करून दाखवले.स्वतः खडतर जीवन जगत शेवटी बुद्ध मार्गी गेले .

कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय असताना अण्णा भाऊंची आर्थिक स्थिती जरूर हलाखीची होती; परंतु संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर अण्णा भाऊ हे नामवंत शाहीर-कलावंत म्हणून पुढे आले होते. हे सर्व श्रुत आहे . या प्रस्थापित ,अफाट जगाच्या खुल्या आणि जीवंत विश्वात  शिकत असताना काही सिद्धांत त्यांनी स्व:ताच तयार करून  समजून घेतले होते .स्व:तचे सिधांत त्यांनी  अंगिकारले होते आणि . त्या सिद्धांत जगले. महामानव बोधिसत्व डॉ. बाबसाहेब आंबेडकर  यांच्या लेखणीस प्रेरित होऊन स्वतःला विसरून मानवतेसाठी जगणे हे  खरे जगणे  आहे जीवन आहे याची त्यांना उकल झाली होती  . मानवतेसाठी जगायचे मानवतेसाठी मारायचे हे त्यांच्या तेंव्हा ध्यानात आले होते. म्हणून या  माध्यमातून मानवतेची सेवा करायची. हाच कित्ता त्यांनी पुढे रेटून धरला आणि तसे जगले . कारण मानवता ही कोणत्यही जातीची किंवा धर्माच्या  मालकीची नाही.  हे अण्णा जाणून होते . हा जगण्याचा वैचारिक वारसा मनात ठेऊन जगले . 

आणा पुढे श्रमिकांच्या लढ्यात सहभागी झाले.  श्रमिकांचे नेतृत्व करू लागले. या लढ्यात त्यांचे मन पुढे रमत गेले आणि ते श्रमिक ,कामगार कष्टकरी ,मजदूर  यांचे कैवारी झाले . मुंबई सारख्या  रस्त्यावरची लढाई  त्यांनी लढली , येवढेच नसून  रंगमंचावर ही लढाई जिंकून राहिले . यात लढाईत  तमाशा या कलेचा वापर त्यांनी लोकहित ,जंनजागृती आणि लोकजागृतीसाठी भरपूर प्रमाणात केला.

अण्णा त्या कलेत पारंगत होते आणि लढवये होते महणून त्यांची मैना (मुंबई ) गावावर (महाराष्ट्रात ) राहिली . त्यांची ही  छ्क्कड जगभर गाजली . संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णा ने गायलेली छक्कड संयुक्त लढ्यात सार्थक झाली . आणा अमर झाले . अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्य आणि अनेक सामाजिक विषयात  त्यांनी लीलया पाहावयास मिळते ,यात त्यांनी  शोषित आणि  गरीबांचे जीवन चितारले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात लढणा-या वीरांच्या वीरकथा लिहिल्या. येवढायवर न थांबता भटके- विमुक्त यांचेही जीवन दर्शविले चितरले होते . तुरुंगातील अपराध्यांचे  जग सांगितले यात लावणी, पोवाडा, गीते , नाटक, तमाशा , वगनाट्य  किती -किती विविध प्रकार. सर्व सहज हाताळले.कधी न्हवे येवढे साहित्ये एका अशिक्षित चतुर्थ वर्गातील भल्या माणसाने जगापुढे आपल्या उमद्या लेखणीतून विशद करून गेले आहे . 

अण्णा भाऊंनी कथांसोबत ३०  पेक्षा अधिक कादंबर्याथही लिहिल्या. त्यातील ‘फकिरा’, ‘वारणेच्या खोर्याभत’, ‘वैजयंता’, ‘माकडीचा माळ’, ‘चित्रा’, ‘चिखलातील कमळ’, ‘गुलाम’, ‘वारणेचा वाघ’, ‘आवडी’, ‘वैर’, ‘फुलपांखरू’, ‘अलगूज’, ‘रानबोका’, ‘मूर्ती’, ‘संघर्ष’, ‘चंदन’ आदी कादंबर्याा खूप गाजल्या. त्यापैकी सात कादंबर्यांअवर चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ सारख्या कादंबरीला १९६१ साली राज्यशासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला.

तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही या कादंबरीची प्रसतावना लिहिली व कादंबरीचे कौतुक केले होते . अण्णा भाऊंनी ‘फकिरा’ कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे.आणि पुढे अण्णा  वद्ले “जग बदल घालूणी घाव सांगून गेले मज भीमराव ”.... 

फकिरा  कादंबरीत भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना व दलितांना वाटप करणार्याे मांग समाजातील ‘फकिरा’ या लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वारणेच्या खोर्याूत’ या कादंबरीत १९४२  च्या चले जावच्या स्वातंत्र्यलढ्याचे व स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणार्यांंचे चित्रण आहे. तर ‘वारणेचा वाघ’ या कादंबरीत सावकार-जमीनदार व ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या शोषणाविरुद्ध लढा पुकारणार्या२ ‘सत्तू भोसलेचे’ प्रत्यकारी चित्रण  अण्णा ने खूप प्रभावशाली केलेलं आहे. 

अण्णाभाऊंनी महात्मा जोतिराव फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व प पू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या तमाशा-लोकनाट्यातून पुढे नेली.या दोन महान नेत्यांचा संगम आपल्या साहित्यातून प्रखरपणे मांडला  आहे .अण्णा भाऊ हे  मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशीय कक्षा रुंदावन्यात येशस्वी झाले .जगात याचा परिणाम असा झाला की  अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी व हिंदी, रशियन, फ्रेंच, आणि झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादीत झाले.आणि जगात त्यांच्या साहित्याला झळाळी मिळाली . 

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णाभाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि अण्णाभाऊंचा ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला.

या अफाट लिहलेल्या साहित्याच्या जोरावर त्यांचेवर  अण्णा भाऊ साठे कोण ? आणि  यांच्या साहित्यावर मातबर साहितीक मंडळी ग्रंथ लिहू लागले. हा  निरक्षर माणूस साहित्याचा आधारवाड आज १८ जुलै ला आजरामर झाला . 

*त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!*

Friday, July 10, 2020

प्रज्ञा आणि आचरण

*प्रज्ञा आणि आचरण*

बुद्ध तत्वप्रणालीत *दान आणि शिल* या  पाठोपाठ  *प्रज्ञा आणि आचरण* यास  तेवढेच महत्व आहे . 

*प्रा. बा र शिंदे ,नेरूळ नवी मुंबई -७०६*

=========

(संदर्भ  - विनय -पिटक :अनुवाद -राहुल संकृत्यायन ,बुध्दाब्द १६३५ ई.)



बौद्ध धम्माची आचरण आणि प्रज्ञा  हे दोन अंग आपणास मतंगाची (हत्ती ) बळे देतात .ते कसे पहा . 

आचरण हा असा दागिना आहे ,ज्याच्याकडे आहे तो सोनं आहे .या आचारणास जो घाबरतो तो बुद्ध धम्मा चा अनुयायी अथवा प्रसारक किंवा रक्षिता होऊ शकत नाही . म्हणून बहुजन वर्गातील बर्‍याच जाती किती तरी कोसो दूर असल्याचे  हे भयावह आहे . 

 आज बुद्ध धर्माचे अंग होऊ शकले  नाहीत त्याचे आंतरिक बरीच कारणे आहेत ते मी इथे विषद करणार नाही .  .आचरण हे वयक्तिक बाब असून ती प्रतेक व्यक्ति तसे करू शकेल असे म्हणता येईल . 

आचरण   हे प्रज्ञा न असलेले व्यक्ती पण पालन करू शकते .आचरण शुद्ध नसेल तर त्या व्यक्ती ची विद्या ,विकास आणि त्याने संपादन केलेली त्याच्या  विकासाची संकल्पना शून्य आहे .

उदा. एखाद व्यक्ती डॉक्टर ,अभियंता आणि प्राध्यापक होणं ही त्याच्या विकासासाठी एक बाल  कल्पना आहे .किंवा त्या व्यक्तीची तशी आणि तेवढीच धारणा असते . *मी आणि माझी* . या पलियाकडे त्यास  जग दिसत नाही याचाच अर्थ त्या व्यक्तीची प्रज्ञा अजून तरी विकसित झाली नाही असेच म्हणावे लागेल . ज्या व्यक्तीत ही प्रज्ञा जागृत झालेली असते त्यात चेतना वास करीत असते ,थोडक्यात ती वैज्ञानिक अंगाने पाहत असते ,आणि इतर समाज वर्गास त्या चेतनामय वाटेवर घेऊन जात असते .  

माझ्याच घरचे उदाहरण देतो एक काका स्त्रीरोग तज्ञा आहेत ,त्यांची उन्नती झाली विकास झाला . पण त्यांची प्रज्ञा जागृत झाली नाही . ,ते पुरोहित आणि देव धर्म करीत देशभर एकटेच फिरले पण त्यांच्या मनात चेतना जागृत झाली नाही ,म्हणजेच प्रज्ञावंत होता आले नाही . ?
 ते डॉ बाबासाहेब यांना  मानणाऱ्या पैकी आहेत .पण त्यांनी सांगितलेल्या *पथ मार्ग* त्यांना जमला नाही ,याचाच अर्थ हयात गेली पण त्यांची  प्रज्ञा जागृत नाही झाली . 


दुसरे काका कमी शिक्षित त्यांच्यात वेळीच प्रज्ञा जागृत झाली , शुध्द आचरण रहित वागू लागले . पुरोहित आणि देव धर्म करीत बसले नाहीत . समाजात राहून समाजाचे अंग होऊन ,बुद्ध देशना देते झाले . डॉ बाबासाहेब यांच्या पथमार्गावर राहिले . यांच्यात त्यांनी स्व चेतना जागृत केली , मनात चेतना जागृत झाली  ,म्हणजेच प्रज्ञावंत आले असेच म्हणावे लागेल . 

ते आजून पंच शीलाचे पालन करतात .ते पुरोहित आणि देव धर्म यापासून कोसो दूर आहेत .म्हणून आज कमी शिकलेले  काका  माझ्यासाठी आदर्श ठरतात ,असे  कमी शिकलेली व्यक्ति आज समाजात  आदर्श आहेत .

उच्च शिक्षण घेऊन प्रज्ञा जागृत होते असे कोणी म्हणत असेल तर ते खोटं आहे . शिक्षणा शिवाय प्रज्ञा जागृत होण्यास त्या व्यक्तीस शुद्ध आचरण आणि कमीत कमी पंचशीलाची जोड असावी लागते .

पंचशील आणी त्याचे पालन न जमत नसल्याने बरीच  विद्वान समजणारी विद्यमान मंडळी ,लोकांना नांवे ठेवत .बुद्धाने सांगितलेल्या शिलापासून कोसो दूर आहेत .हा संशोधन आणि चिंतांनाचा विषय आहे .

प्रज्ञा जागृत होण्याची क्षमता, चारित्र्य आणि पावित्र्य लागते त्यास मनाची तयारी लागते ,त्यास अवलोकन आणि आपले आचरण जोडीला असणं गरजेचं आहे .

शुद्ध आचरणात असल्याने काय फायदा असतो ?

लोक आपणास आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात ,तुमच्या शिक्षणाला इथे गौण स्थान आहे ./असते .
जनात मान सन्मान मिळतो ,यामुळे आपण आपली सतत ची प्रज्ञा जागृत करण्यास आणि ती इतरांना देण्यास मनाने शुद्ध असतो .

झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत जे आपले इतर व्यक्ती प्रति आचरण असते तेच स्वतः प्रति असणे होय .
पत्नी ,आई वडील यांचा मानसन्मान ,मुलांचे नीट संगोपन आणि त्यांच्या सोबत आपला व्यवहार हा कसा असावा तर शुद्ध ! हाच बुद्ध देशना आणि  आचरणाचा गाभा आहे .

जो घरी शुद्ध आचरण करतो तो ,मित्र ,सोबती, कार्यालय आणि समाज या घटकसोबत ही तेच आचरण  करीत असतो. अशीच व्यक्ति  समाज हित करण्यास लायक असतो .स्वहिता पासून दूर राहते . 
स्वहित  पाहणारा समाज हीत कधीच करू शकत नाही ,कारण त्याच्या आचरणात खोट असते .तो समाजाला उलट खाईत घेऊन जात असतो . स्वतचे घर बघत समाजाच्या नावावर सरे आम लूट करीत असतो . समाज शिकावा ,सामाजिक ,आर्थिक प्रबळ व्हावा असे त्याला कधी वाटत नाही . कारण तो येवढा षंढ असतो की ,त्याचे आचरण हे समाजाला अधोगती कडे घेऊन जाणारे असते . अश्या खोट्या व्यक्ति ,नेता ,पुढारी ,आणि समाज सुधारक यापासून सावध असायला पाहिजे . 

प्रज्ञा म्हणजेच चेतना !

ही मानव कल्याण आणि विकास यातील अंतिम बाब आहे .
वर नमूद केल्या प्रमाणे आपली प्रज्ञा जागृत झाली आहे हे कसे ओळखाल ?

बुद्धाने प्रज्ञावंत व्यक्तीच्या तीन कसोट्या सांगितल्या आहेत .

हा तीन कसोटीत ...(पाराजीक १-४)

१.मैथुन : जो नियम जाणून ,कायद्यास नियम पालन करून ही ,त्यास  न जाणता त्याचे पालन करीत नाही ,सतत त्या आचरणात आणत असतो ,तेंव्हा त्याचे आचरण शुद्ध नसते .

२.चोरी : जी वस्तू आपली नसता ,ती आपली असण्याचे मान्य करतो ती चोरी समजावी .असा त्या व्यक्तीचा आचरणाचा भाग अमान्य असतो .

३.मनुष्य हत्या : एखादी गोस्ट माहीत असताना, त्या व्यक्तीस हत्या करण्यास मदत करतो,हत्यार उपलब्ध करून देतो ,किंवा त्यास मारण्यास प्रेरित करतो ,एकंदरीत मारणे आणि मारण्यात साह्य करतो ते त्याचे अशुद्ध आचरण होय .अशी व्यक्ति  समाजात कार्य करण्यास योग्य नसते .

४.दिव्यशक्ती दावा : जो नवविद्या ,दिव्य- शक्ती जाणतो असे वर्तन करतो  ,आणि असे मी जाणतो ,मी ज्ञानी आहे माझ्याकडे या ,असे वर्तन करणारा ,समाज विशुद्धी कडे घेऊन जाऊ शकत नाही.

आचरण डगमगले की बोट बुडाली म्हणून समजा .कीर्ती ,संपत्ती ,राज्य बुडाले तरी चालेल पण आचरण कधी अशुद्ध होऊ देऊ नये .
ते परत मिळवता येत नाही .प्रज्ञावंत कधी या उपरोक्त भौतिक वस्तूत आपले आचरण गहाण ठेऊन माया जपत नसतो . त्यास सतत सदोदित आपल्या आचारणाची काळजी असते .या मुळे तो आपले आणि समाज हीत रक्षित असतो .असा जर कोणी शुद्ध आचरण करणारा ,इतरांच्या मानवी मनात चेतना जागृत करणारा ,आपली  प्रज्ञा जागृत ठेऊन कार्ये करणारा नेता ,पुढारी असेल तर त्यास  आम्ही आमचा नेता म्हणू  ,आणि आदराने त्यास  बाबा ,अण्णा ,दादा ,आपा म्हणू . 

आज असा समाजात  धुरीण नेता असेल तर त्याचे समाज स्वागत करेल .असा असेल तर कळवा !

Thursday, July 9, 2020

का रे राजगृही ?

का रे राजगृही ?

का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत 
केवळ तुजसाठी ….

का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतोय 
केवळ तुजसाठी …..
अजून बाबा दिसतात मला त्या शय्येवर
त्या आराम खुर्चीवर
अहोरात्र ,वीस वर्षे नसून ,वर्षो वर्षी .

का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचटायत
केवळ तुजसाठी …..
त्या वृक्षाखाली ,त्या कुंडीपाशी !

का रे राजगृही ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
त्या तावदाने समीप ,त्या रक्षे साक्षी .
शुभ्रवस्त्रे घालुनी प्रज्ञावंत तो बुद्धसाक्षी .

का रे राजगृही ?
अजून कवी बी. आर.पुसीतो तुजला  ,का रे रांडेच्या ?
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
प्रत्यक्ष बाळ पाहतोय त्या पुस्तकातूनी
म्हणून  बांधला 'राजगृह' केवळ त्या
ग्रंथापोटी ….
त्या ग्रंथापोटी ….

का रे राजगृही ?
आणि याद राख...
जिथे आज ही माझे बाबा पुस्तक वाचतायेत
केवळ तुजसाठी …..
आजही पदोपदी  जिवंत मन तयाचे ग्रंथ न्याहळाती 
त्या 'राजगृही' रक्षेरूपी
केवळ तुझसाठी 
केवळ तुझसाठी ,तुझं रक्षणासाठी ?

९ जुलै २०२० |०३.१० (हर्स)

कवी | बी.आर.शिंदे | ९७०२१५८५६४

राजगृह - दादर ,मुंबई 


क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम ) !

प्रेस न्यज

गुरुवार ०९ /०७/२०२०

क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम ) या सामाजिक संघटनेच्या राज्येकार्यकारणीचा विस्तार नुकताच जाहीर करण्यात आला . या झालेल्या बैठकीत लसाकम कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला असून यात  नवीन प्रदेश कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे . या लाईव बैठकीत लसाकम चे संस्थापक मा. नर्सिंग घोडके यांची प्रमुख उपास्तिथी होती .

प्रा. बालाजी शिंदे ,हे कर्णबधिरांचे विशेष शिक्षण  या क्षेत्रात गेली पंचवीस वर्ष कार्यरत असून ,सध्या ते विस्तार सेवा विभाग ,अली यावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्था (भारत सरकार ,नवी दिल्ली ) मुंबई  येथे कार्यरत आहेत . शाहू –फुले आंबेडकरी विचरांची धुरा शिरावर घेऊन कवि ,लेखक कथाकार अश्या  विविध अंगाने नटलेले व्यक्तिमत्व लसकामला लाभले आहे .

प्रा. बालाजी शिंदे हे आणा भाऊ साठे नगर हाळी ता उदगीर येथील मूळ रहिवाशी असून ,सध्या नेरूळ नवी मुंबई येथे वास्तव्यात आहेत .

या कार्यकारिणीत प्रा. बालाजी शिंदे ,यांची ठाणे – सचिव या पदी नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्या पुढील कार्यास तमाम मातंग समाजातर्फे हार्दिक शुभ कामना . लसाकम प्रदेश कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

 1) बालाजी थोटवे , नांदेड - प्रदेशाध्यक्ष

2) राजकुमार नामवाड , लातूर -  महासचिव.

3) प्रा सोमनाथ कदम , कणकवली - कार्याध्यक्ष

4) मनोहर डाकरे , निलंगा  - उपाध्यक्ष

5) ललित अंभोरे , अकोला  - उपाध्यक्ष

6) विलास मानवतकर , बुलढाणा - उपाध्यक्ष

7) पी एल दाडेराव , मुखेड - कोषाध्यक्ष

8) प्रा डॉ.  मारोती कसाब , उदगीर - प्रवक्ता

9) अरूण कांबळे , औरंगाबाद - प्रवक्ता

10) प्रा.  डॉ.  नरेंद्र गायकवाड , कराड - सचिव

11) इंजि. मनियार , औरंगाबाद - सचिव

12)प्रा. बालाजी र. शिंदे , ठाणे - सचिव

दुसरा प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार व विभाग कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येईल.

असे प्रदेश आधेक्ष यांनी कळवले आहे .

 

प्रा.बालाजी र. शिंदे ,नेरूळ -७०६

Mobile : 9702158564

balajishinde65@gmail.com


प्रा. बा र शिंदे 


अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...