Monday, October 24, 2022

पुस्तक: तीमिरभेद

डॉक्टर शमशोद्दिन तांबोळी लिखित धांडोळा मुस्लिम अंधश्रद्धेचा.
पुस्तक : #तिमिरभेद. हे पुस्तक वाचनात आले.

..... प्रा बी आर शिंदे,नेरूळ ७०६

लोकेश शेवडे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून मुस्लिम समाज कसा  मागास आहे त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धा रुढी परंपराच  अत्याधिक कश्या  आहेत. असा एक समज गेली अनेक वर्ष जगभरात सर्व धर्मीयांमध्ये रुजला आहे.

भारतात तर हा समज मागील अनेक दशकात इतका पक्का झाला आहे की समज काही विशेष गट हेतूपुरस्र पसरवत असावेत अशी शंका येते .कोणत्या धर्माच्या नेमक्या किती टक्के लोकांमध्ये नेमकी किती प्रकारच्या अंधश्रद्धा, रुढीपरंपरा नेमका किती खोलवर प्रभाव आहे याची विश्वासाने आकडेवारी आज पावेतो कुठे पाहायला देखील मिळत नाही.

पसरवलेल्या बातम्या या पूर्वग्रहावर जास्त आधारित असाव्यात असे सिद्ध होतं.

इतरांच्या रूढीप्रथा म्हणजे आपले हसू लपवण्याचा प्रयत्न असे आहे . सव्वाशे वर्षापूर्वी आगरकर दिलेल्या ' नकट्यांनी नकट्यास' हसण्यात काय अर्थ आहे. खरे झाले आहे. सार्थक झाले आहे.

या पुस्तकात वास्तविक श्रद्धा म्हणजे ' चिकित्साहीन ' विश्वास म्हणजेच चिकित्सा न करता विश्वास ठेवल्या त्याला श्रद्धा म्हणतात याचाच अर्थ श्रद्धा हीच अंधश्रद्धा असते.अशी  उत्तम चिकित्सा ' श्रद्धा आणि अंधश्रद्धा' यावर केलेले दिसते.

#धर्म : धर्म ही बाब मनुष्यमात्रात इतक्या खोलवर रुजली आहे की धर्म नाकारल्यास बहुसंख्य लोकांना स्वत्व नाकारल्यासारखं वाटतं धर्मावरचे प्रहार  त्यांना स्वतःवरचे प्रहार वाटतात आणि ते संवादच बंद करून टाकतात. हे विदारक या पुस्तकात मांडलेले आपल्याला पहावयास मिळते.

यात ' कडकलक्ष्मी किंवा पोतराज' यांचे उत्तम उदाहरण दिलेले आहे. स्वधर्मावर टीका करणाऱ्या बंडखोर विचारवंतांची अवस्था ही पोतराज सारखी होत असते. नरेंद्रभकर अमित दलवाई यांची अवस्था वेगळीच झाली नव्हती.

असो, आपण आता मुस्लिम श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी बोलूया. पुस्तकातील एकूण बारा प्रकरणातील अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांतील श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकलेला दिसतो आहे.

आज मुस्लिम समाजातील बुरखा ,मशिदी वरील अजान भोंगा ,तलाक बहुपत्नित्व , हिजाब,बुरखा यासारखे विषयी आज वाद विवादाच्या केंद्रस्थानी आहेत. एकेकाळी  अजान चा आवाज पवित्र वाटायचा त्या आवाजात  मुस्लिम गोडवा होता. आज हा आवाज इतरांना कर्कश वाटत असेल किंवा ध्वनी प्रदूषणात कारणीभूत असेल तर बदललेल्या परिस्थितीत याची योग्य अयोग्यता तपासली पाहिजे. ' नमाज ' ची आठवण करून देणारी ' अजान ' प्रथा निर्माण झाली तेव्हा ती सामाजिक वैज्ञानिक स्थिती ही आजच्या काळातील तंत्रज्ञानाने निर्माण केली स्थिती यातील फरक समजून घेणे आणि त्याला त्रास होणार नाही शांतता भंग होणार नाही याचा संबंध सुविचार समाजातील सभ्यता व्यक्त करते.

आपला समाज अद्याप धर्म चिकित्से साठी तयार नाही धर्माची स्थापना ईश्वराने केली आहे धर्म आणि ईश्वर या विषयावर बुधीप्रामाण्यवाद्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. याचे कारण असे की एखाद्याची 'श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा' होऊ शकते.

या समाजावर अनेक इस्लामिक राष्ट्राचा प्रभाव दिसून येतो. अरबस्थानात इस्लाम अस्तित्वात आला त्या काळात सर्व स्थानात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा त्याचे हे मूळ कारण होय. मुलगी जन्मताच पुरून  टाकण्याची पद्धत होती. पुरुषांनी किती महिलांशी विवाह करायचा यावर मर्यादा नव्हत्या गृहीत वर्गाकडून आर्थिक शोषण होत होते. सावकार शाही होती मुस्लिमांना पळवून नेले जात होते .जुगार आणि व्यसनाधीनता होती .लुटमार करणार्या गोळ्या होत्या. अशा परिस्थितीत मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना केली .धर्माची नाही . उतम विचारांच्या आदान - प्रदानाची.त्याचे फलस्वरुप ' कुराण ' अस्तित्वात आले.नंतरच्या काळात  पैगंबर याला केंद्रस्थानी मानून त्याचा ईश्वरी आधार घेण्यात आला. आणि हे पुढे आज तागायात  चालत आहे.

ज्यांचे ' इमान' नाही तो मुस्लिम नाही.अशी एक धारणा  तयार झाली. पुढे चालून धार्मिक तत्त्वज्ञान दोन गटात विभागण्यात आले. पहिला ' परलोक '  विषयाच्या आणि दुसरा ' इहलोक ' मुस्लिम समाजाबद्दल बोलायचे झाल्यास याला ' इबादत ' आणि ' आदत' असे होते ' इबादत ' मध्ये व्यक्तीचा परमेश्वराशी संबंध असतो तर ' आदत' मध्ये व्यक्तीचा इतर व्यक्तीशी माणसाची ,समाजाची किंवा देशाशी संबंध असतो या अर्थाने अभिवादन ही व्यक्ती स्वातंत्र्याची किंवा धर्म स्वातंत्र्याची बाब आहे. ' इबादत ' केल्याने त्यांचे इतरांना वाईट परिणाम होत नाहीत ' आदत ' ही दैनंदिन जीवनाशी निश्चित असल्याने ती परिवर्तनी असली पाहिजे जी परिवर्तने आहेत त्याला दैवी म्हटल्यामुळे त्याचे अनाथात आणि अंधश्रद्धेत रूपांतर झाले.

खरे तर हा विषय खूप मोठा आहे आणि गंभीर पण आहे .पण समाजातील मुल्ला मौलवी  यांनी यापूर्वीच  ' स्वतःचा इस्लाम' समाजाच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. जे कुराणात आहे तो इस्लामला अनुसरून आहे .आणि जो कुराणात  नाही तो इस्लाम विरोधी आहे असा संदेश देऊन अनेक समस्या निर्माण केली आहेत.

परिणाम असा झाला की समाजाचा विकास होण्याऐवजी समाज काल बाह्य झाला.

जगातील कोणत्याही धर्माचा उदय असो तो पुरुषप्रधान आहे .जेव्हा इस्लाम अस्तित्वात आला त्या काळात पुरुष प्रधान होता महिलांना दुय्यम स्थान होते.

शेवटी या समाजातील "मुल्ला आणि मौलवी " यांनी  मोहम्मद पैगंबर,कुराण याला मूठमाती  देऊन मुस्लिम समाजातील स्त्रियांवर खूप मोठा अत्याचार आणि अन्याय केला आहे.

श्रद्धा आणि त्या श्रधेतून उदयास आलेल्या अंधश्रद्धेतून  येणारी वाईट चालीरीतीचे  पाळीमुळे रचली आहेत.

पुस्तक  वाचताना असे नजरेत येते  की, स्त्रियांचा सुंता होतो. हे मी प्रथम वाचले हे मला माहिती न्हवते.

पुढे जाऊन या पुस्तकात अशी माहिती आहे की एखाद्या घरात स्त्री मृत्यू झाली तर त्या स्त्रीला तिच्या पतीने मृत वेळेच्या वेळेपासून चार तासाच्या आत संभोग केला तर तिला शांती मिळते ,ती अल्लाच्या  दरबारी जाते. त्यापेक्षा काय वेगळी अंधश्रद्धा असू शकते आता इथे मी थांबतो.

Monday, October 10, 2022

अनाग्रिक धम्मपाल

१० वी सदी तक भारत में बुद्ध शासन आपने समय के साथ खड़ा था।
१२ वी शताब्दी में तुर्को के आक्रमण के बाद बौद्ध धर्म भारत की मुख्य भूमि से एकदम खत्म हो गया। धर्मांध मुसलमान  तुर्किक आक्रमणों के कारण नतीजा यह हूवा की भारत के बचे हुए बौद्ध भागकर तिब्बत एवं नेपाल के दुर्गम पहाड़ो में छीप गए। कींव की बुद्ध धर्म पूरे संसार में शांति ,अहिंसा और समानता का धम्म कहलाया जाता था। परकिय धर्मांध मुसलमानो के बुद्धिस्ट पर हमले से बहुत से हमले हो गए थे और हो रहे थे।
 पहले शंकराचार्य ने भी भारत में बौद्धों का बहुत संहार करवाया। जो भिखु को ले आएगा उसे सोने की मोहरा देने का एलान भी किया था और वैसा ही हुवा शत प्रतिशत भिखू और बौद्ध मारे गए।
उसके बाद  भारत में नाम मात्र बुद्धिस्ट हिमालय के पहाड़ी और  दुर्गम इलाको और चिटगांव की पहाड़ियों में बचे। जिन्होंने आज के बुद्ध धम्म का फैलाव किया है।

 सन १८६४ में श्रीलंका में एक ईसाई परिवार में एक बालक  धर्मपाल पैदा हुआ। युवा होने पर वह २ बुद्धिस्ट मिसनरियो कर्नल अल्काट एवं रुसी महिला मैडम ब्लावट्स्की से मिला जो उस समय श्रीलंका में बौद्ध धर्म के बारे में पढ़ रहे थे।  उस युवा ने अपने नाम के साथ अनागरिक जोड़ा ,अनागरिक का  मतलब होता है ,जो कहीं का वासी न हो। 

अनागरिक धर्मपाल ने बौद्ध धर्म की शिक्षा लेने के बाद यूरोप ,अमेरिका और एशिया में बौद्ध धर्म का प्रचार किया।  सन १८९३ में शिकागो  में हुए विश्व धर्म सम्मेलन में अनागरिक धर्मपाल ने बौद्ध धर्म का प्रतिनिधित्व किया था। 
स्वामी विवेकानंद उस सम्मेलन में हिन्दू धर्म के आधिकारिक वक्ता नहीं थे इसलिए उन्हें बोलने के लिए कम समय मिला था ।

धर्मपाल ने अपने समय में से ३ मिनट स्वामी विवेकानंद को दिए थे। एसे दयालु और धर्म रक्षक थे। धर्मपाल ने डॉक्टर आंबेडकर से ५०  साल पहले तमिलनाडु में दलितों को बौद्ध धर्म की दीक्षा दी थी। धर्मपाल ने ही ' महाबोधि सोसायटी' की स्थापना की थी और ' महाबोधि मंदिर'  को हिन्दुओ के कब्जे से छुड़ाने के लिए आंदोलन भी किया था। 
इसलिए धर्मपाल को बौद्ध धर्म का ' पहला ग्लोबल प्रचारक' माना जाता है। 

सन १९३३ में अनागरिक धर्मपाल का देहांत सारनाथ में हो गया। अनागरिक के अस्थि अवशेष मूल गंध कुटी में रख दिए गए।  अनागरिक धर्मपाल ने भारत में  में बौद्ध धर्म को पुनर्जीवित किया।

साभार : जयपुर के साथी लक्ष्मण सिंह देव की पोस्ट।

इन जैसे महान बौद्ध अनुयायी   के चलते आज भी संसार मे पहले से ज्यादा बुद्ध धम्म ससशक्त हो गया है.
चीन ,जपान,बर्मा ,नेपाल ,  और पश्चिमी राष्ट्र में मूल रूप में त्रिपिटक और अठकथाए मौजूद होने के चलते, बुद्ध धम्म हमे शुद्ध मिला है।
६ वी संगीत के बाद कोई कट या मिलावट नही मिलती है।
बुधघोष लिखित - विसुद्धिमग में ढेर सारे संप्रदाय ने आपने आपने पेट भरनेका तरीका निकल कर उसे योग साधना में डाल दिया है।
लेकिन विपासना को तोड़ नही पाए है।
कई संसार के देश में आज भी मूल बुद्ध साहित्य उपलब्ध है ,वजह है अनगतिक जैसे महान तत्वेत्ता 
उनासवी सदी में डॉ.बाबासाहेब ने उसे दोबारा बाहर पेश कर हमे बुद्ध धम्म का आइना दिखाया है।

नमामि भंते।
जयभीम ! नमो बुद्धाय

Sunday, October 2, 2022

Book - पुस्तक

Book : The Happiest Man on Earth arth.

Eddie Jaku.

हिटलर सन १९३३ मध्ये सत्तेवर आला.  त्याने जर्मनी आपल्या ताब्यात घेतली . जर्मनीत इथूनच विध्वंसक लाट आली .संपूर्ण समाजासाठी आणि जर्मनीसाठी पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम करणारा हिटलर   पुढे जाऊन त्यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली तिथूनच पुढे खऱ्या विध्वंसला सुरुवात झाली.

#ज्यू लोकांना शाळेतून हाकलून दिले जाऊ लागले ज्यू मुलं हद्दपार आणि  शाळाबाह्य झाली.
तु ज्यू आहेस म्हणून तुला आम्ही शाळेत घेऊ शकत नाही .तू शाळेत यायचे नाही अशा समोरासमोर धमक्या दिल्या जाऊ लागल्या. मुलं आणि पालक भयभीत झाली.

याच काळात हिटलर ने आपली एक  एस एस SS (schutzstaffel) नावाचे सैनिक बल तयार केले आणि ते हिटलरच्या नेतृत्वाखाली  ज्यू लोकांचा  छळ करू लागले.

दरवाजा ठोठावून घरात घुसायचे आणि हकनाक लोकांना मारायचे काम सुरू झाले. कधी कधी तर SS चे सैनिक कर्मणूक म्हणून लोकांना बेदम मार द्यायचे आणि त्या बेदम माराचा आनंद घ्यायचे.
त्या सैनिकांचा एकच हेतू होता मानवी प्राण्यांना शारीरिक छळ करण्यातला असूरी आनंद उपभोगायचा .छावणीत असे काही कैदी होती की जे इतर कैद्यांच्या विरोधात जाऊन माझींना सामील व्हायचे त्यांना #कोपा असं नाव होतं .

पण दडपशाही करणारी माणसं सुद्धा दडपल्या जाणाऱ्या माणसा इतकी #भयभीत  असतात यालाच #फाशीझम  म्हणतात. एक अशी समाज रचना की जिथं प्रत्येक माणसाची शिकार होत असे. नाझीचा क्रूरपणा कधी उफाळून येईल हे सांगता येत नव्हते.

त्यांची कैद्यांना कॉफी पाजण्याची एक पद्धत होती. त्यांच्या कॉफीमध्ये ते एक रसायन घालत त्या रसायनाचे नाव होते #ब्रोमाईड . रसायन महाभयंकर मानवांच्या शरीरात काम करते हे रसायन घेतल्याने माणसाची लैंगिक वासना कमी होते व त्याचं पुनरुत्पादन इंद्रिये निरुपयोगी होतं थोडक्यात निकामी होते. थोडक्यात ते ज्यू लोकांना नपुंसक करत होते.

हे पुस्तक वाचल्यानंतर सामान्य माणसाला वाटेल आजच्या वर्तमान काळात आपल्या राज्यात ,देशात याच प्रकारे माणसाची कत्तल हत्या किंवा माणसावर जबरदस्ती , माणसावर या पक्षातून त्या पक्षात नेत असताना दिसत आहे. हे कशाचे द्योतक आहे ?

सुज्ञ वाचकांनी,नागरिकांनी  हे पुस्तक जरूर वाचायला हवे. हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध असून त्याची किंमत ३६० रुपये आहे.

ज्यांचा आनंद हरवला आहे .जे निराशावादी आहेत अशा व्यक्तींनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.छोट्या छोट्या संकटाला न घाबरता यावर कशी मात करावी हे यातून शिकायला मिळते.  लेखकाने आपले अनुभव या पुस्तकात मांडलेले आहेत.

जगात सर्वात आनंदी माणूस कोण आहे ? हे माहिती देणारे पुस्तक आहे. म्हणून आनंद मिळवण्यासाठी , आनंदी राहण्यासाठी हे पुस्तक वाचणे खूप अत्यंत गरजेचे .

लेखक : बी आर शिंदे.नेरूळ नवी मुंबई.

Monday, September 26, 2022

क्रिप्टो

क्रिप्टो  : जगाला वास्तवाचा दणका.
(अर्थ मंथन).

अंदाजे तीन वर्षांपूर्वी जगात आवाज दराने क्रिप्टो  करेन्सी मधील खूप चलनातील मधील भव्य संधी पाहून अनेक #अर्धशिक्षित लोकांनी हा उप्रोक्त पर्याय जवळ केला.आणि काही दिवसांमध्ये हा आनंद गगनात मावेना असा झाला होता. तेव्हा जगभरात उत्सवाची लाट आली होती .आज संकटात सापडले आहे ते म्हणजे क्रिप्टो.

क्रिप्टो सारख्या अस्तित्वहीन ज्याला आपण आजचे आभासी जग म्हणून ओळखतो  या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याच्या जोखमी असताना कैक लोकांनी गुंतवणूक हा पर्याय का घेतला असावा. 

हे आवासी जग  जंजाळ ,बहुरंगी मुखवटा सोडला तर कुंतूकदारांनी ससेहोल्पट  झाल्याचे पहावयास मिळते.कोणताही माणूस गुंतवणूक करीत असताना आपले उराशी स्वप्न बाळगत असतो आणि त्यातून आपला कसा फायदा होईल हे पाहत असतो पण या अभासी जगात तुरास गुंतता चालला आहे  .हे कृपया जगात हे संपूर्ण आभासी होय त्यास का काळात नाही?

गुंतवणूकदारांचे स्वप्न व उद्दिष्ट असतीलच आणि तसे प्रतेकाचे असतेच .पैसे गमावले गेल्यावर त्या स्वप्न उद्दिष्टांना  कात्री नक्कीच लागते ?

या आभासी योजनेत कुणाला न कळू देता पैशाचे गुंतवणूक करता येते कोणाला मागमूस ही  लागणार नाही असे घडून येते यामुळे गरज कोणाला पडते असे नाही.कोणत्याही कायदेशीर व्यावसायिक उपक्रम तरी अशा भानगडीत पडणार नाही ही स्वाभाविक आहे.कारण ते आभासी जग जाणून असतात.

पण अर्धशिक्षित लोक ज्यांच्याकडे अधिकचा पैसा आहे ज्यांच्याकडे काळा पैसा आहे असेच लोक आभासी जगात येतात आणि आपला पैसा गुंतवण्यासाठीचे मार्ग शोधत असतात. अशा लोकांना नफ्या तोट्याचे किंवा आपले स्वप्न आणि उद्दिष्टाची काही देणे घेणे नसते.

पण तीन वर्षांनी का होईना अशा लोकांना धडा मिळालाच आहे असे आपण आज बघतो आहे.

आज मितीला बेमालूम क्रिप्टोवर  कमवलेल्या पैशावर कर लावण्याची सुविधा सुरू झाली आहे. यात सुरू असलेली अंगभूत काळे व्यवहार सर्वत्र चालू आहेत.आता अशी गंमत आहे की मोठ्या गुंतवणूक दारासोबत छोटे छोटे गुंतवणूकदार ही गव्हाच्या कन्या प्रमाणे रगडत आहेत.

सध्या मध्यवर्ती बँकांनी बाजारात पैसा ओतला आणि आता महागाईला लगाम घालण्यासाठी ओतलेले पैसे मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे हा पैशाचा संकोच जसा -जसा वाढत चालला आहे तसतसे गुंतवणूकदाराच्या हादरे देत आहे.

अधिकचा आणि काळा पैसा गुंतवणुीबाबत गुंतवणूकदार आपला पर्यायी मार्ग शोधत असतो तेच क्रिप्टो बाबत झालेले आहे.
काळाचा विचार केला तर सोन्याला खूप महत्त्व होते.आणि आज ही आहे. सोन्यामध्ये पैसा गुंतवणूक हितकारक आणि सुरक्षित व उपयोगी ठरला आहे.

सोने हे शाश्वत आहे आणि उत्पादन सीमित असल्याने ते महाग बनले आहे त्या उलट क्रिकेटचा पर्याय त्यांना तुलनेने जवळचा वाटू लागला होता म्हणून लोक मागील तीन वर्षात क्रीप्टो कडे वळलेले आपल्या पहावयास मिळते.

एकंदरीत असे पाहिले तर हवालदिन गुंतवूनदारांनी  केवळ क्रिप्टो ला जवळ केली नाही तर सोन्याला नाही तेवढीच संधी दिली आहे. मागील काळात  सर्व मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे. असे असले तरी क्रिप्टो ने सोन्याचा उच्चांक नक्कीच शोषून घेतलेला आहे. सोन्यातून काळे व्यवहार शक्य नाहीत ते क्रिप्टो ने शक्य करून दिलेली आहेत.

आज किमतीतील अस्थिरता आणि नियामक संस्थाच्या नियम आणि अटी यात क्रीप्टो अडकला आहे म्हणून कृपया भविष्य नाही असे मला नक्कीच वाटते. हजारो वर्षापासून सोने ही मानव जातीची एकमेव वैश्विक चलन आहे आणि असणार आहे. या मूल्यवान धातू द्वारे आदावा सोडला जाणार नाही त्यामुळे शक्यता हीच की सोन्याची मोहिनी कधीही कमी होणार नाही.

येणाऱ्या काळात चलन युद्ध शक्य असले तरी स्पष्टपणे यावेळी डॉलरची जागतिक व्यापारावर वर्चस्व कायम राहणार आहे. तीच बाब भांडवल क्रिप्टो आपला प्रभाव टिकून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम सोडणार नाहीत .तर इकडे सोन्याची लकाकी इतक्यात कमी व लोकप्रियता कमी होण्याची  शक्यता नाही .तरीही सोने कायम असेल क्रिप्टो संपुस्ट होईल.

आधुनिक जगाचा इतिहास पाहिले तर, जेव्हा जेव्हा सोने व्यतिरिक्त सार्वभौम चलनात मूल्य रहास झाला तेव्हा पुन्हा सोन्यावर अवलंबून राहणे अनिवारित झाले आहे हा इतिहास आहे .सोन्यासारख्या सार्वत्रिक मालमत्तेची गरज आज म्हणून कधी नवीन इतकी वाढली आहे आणि युद्धाची तीव्रता वाढली किंवा कमी झाली तरी क्रोटोचे जहाज बुडताना दिसेल. फक्त प्रतिक्षा करावी लागेल.

लेखक : बालाजी रघुनाथराव शिंदे.

Wednesday, August 31, 2022

श्रमिक आणि वैदिक संस्कृती

#श्रमिक_आणि_वैदिक_संस्कृती.

आदिम काळापासून पाहता भारत हा एक कृषिप्रधान देश आहे या देशात अधिक काळापासून शेतीवर चालणारी व्यवसाय व शेतीवर काम करणारी मजूर कामगार यांची सत्ता होती कालांतराने शेती व्यवसाय हा मागे पडला गेला .श्रमिक नडला आर्थिक दुर्बल झाला.

 या शेतीप्रधान  देशांमध्ये  नंतरच्या काळात श्रमिक आणि वैदिक अशा दोन संस्कृती निर्माण झाल्या. शेतामध्ये काम करणारे मजूर आणि भूमिहीन  शेतमजूर, शेतकरी हे अतीव श्रम , श्रमिक म्हणून हा श्रमिक देश चालवतात देशातील करोडो लोकांना खाद्य पुरवतात मग महत्त्वाचे की नाही ? हो हे महत्त्वाचे नंतरच्या काळामध्ये वैदिक संस्कृतीचा उगम झाला आणि वैदिक संस्कृतीने या श्रमिक वर्गावर वर्चस्व लादून त्यांना गुलाम करून त्यांची सत्ता काबीज करून व त्यांना देशोधडीला  लावत वैदिक संस्कृती मोठ्या प्रमाणावर भारतात विकसित झाली .
मग ही विकसित झालेली संस्कृती गरीब , पीडित आणि अशिक्षित मजूर शेतकरी शेतीत काम करणारे लोक होती त्यांच्या गळ्यात घातली .

आता प्रश्न असा उठतो  की दैनिक लोक हे शेती करत नव्हते त्यांच्याकडे शेती होती पण शेतीवर राब  राबणारा वर्ग हा मजूर होता त्याला आपण श्रमिक म्हणून त्या शेतीवर कामाला लावले.हा सर्व वर्ग कालांतराने हळूहळू अर्थहीन झाला . हा वर्ग पूर्णतः खचला.

" महात्मा फुले यांनी सांगितले आहे की एवढा अनर्थ ' एका अविद्याने केला आणि अर्थाविन शुद्ध खतले."
याचे मूळ कारण हे ' अविज्जा होय.

शेतीचे कुळ कायदे निघाले शेतीपासून वेगवेगळे  आणि शेती वाटण्यात आली . या कायद्यानुसार ही शेती व कोणाला वाटण्यात आली ही शेती ज्यांच्या नावे होती त्यांच्या घरातील कुत्रा ,गाढव,मांजर  किंवा इतर नातेवाईक यांच्या नावे करण्यात आली आणि ती शेती त्यांच्याकडे वडिलोपार्जित कायम राहील.

पण तसे पाहता श्रमिक  संस्कृतीने या वैदीक संस्कृतीला मोठ्या प्रमाणात शह देण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू श्रमिक मागे पडले आणि वैदिक पुढे आले .

आता हे पूर्वश्रमीचे श्रमिक काय करतात ? श्रमिक हे रोज रोजंदारीवर काम करतात शेतीवर काम करतात कारखान्यात काम करतात आणि जिथे मिळेल तिथे काम करतात . यातून मिळालेली पुंजी हे धार्मिक विधी आणि देव देवळात खर्च करतात.

वैदिक लोक काय करतात वैदिक लोक देवळात किंवा इतरत्र पूजा पाठात मिळालेला पैसा हे शेअर मार्केटमध्ये लावतात त्यांना या श्रमिकांचे काही देणे घेणे नसते आणि अशा पद्धतीने देशात आज खूप मोठ्या प्रमावर श्रमिक लुटला जात आहे.

आज त्यांचे  उदनिर्वाहाचे साधन बंद केले गेले आहे.त्यामुळे श्रमिक खचला गेला आता वैदिक संस्कृतीत काय होते वैदिक लोक मंदिर आणि इतर पूजा पाठाच्या ठिकाणी आपले ठाण मांडून बसलेले त्यामुळे त्यांचे कडे श्रमिक वर्गाचा पैका चालून येतो आहे.
 
वैदिक हे  लोक श्रमिक लोकांच्या पैशावर किंवा श्रमिकांच्या बळावर आपले संपूर्ण कार्यक्रम अवैध पणे चालू आहे.  देव आणि देवापासून भीती या वर्गात निर्माण केली ,आज तागायत श्रमिक वर्ग या वैदिक वर्गाचा बळी पडलेला दिसतो आहे.

श्रमिक काय करतात?
श्रमिक आपला शेतीचा किंवा मजुरीचा व्यवसाय करतात आणि याच व्यवसायावर यांचे घर कुटुंब चालते पण हा वर्ग आपले पैसे कमवत असताना वैदिक लोकांच्या बळी पडून देवदिकांच्या किंवा इतर तत्सम देवाने भीती घातलेल्या अंधश्रद्धेला बळी पडतो. आज आपण बघतो आहे की बरीच बहुसंख्य बहुजन किंवा देशातील इतर समाजातील  बहुसख्ये लोक या वैदिक संस्कृतीला बळी पडलेले आहेत.

 वैदिक लोक काय करतात?
वैदिक लोकांना शिक्षणाची गरज नाही बाप दादा किंवा आजोबा पंजोबा या पिढीपासून चालत आलेला पूजा पाठाचा विधीचा प्रोग्राम यांच्याकडे चालून येतो आणि पुढे हे लोक देव किंवा देवळात किंवा इतर धार्मिक विधी मध्ये अग्रेसर असतात आणि बहुजन वर्गातील सर्व या लोकांत विविध पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गाचे भय भीती किंवा इतर कारणे दाखवत या लोकांना बळी करतात.

तसे पाहता या देशांमध्ये किमान ८० टक्के लोक   शेतमजूर,मजूर  भूमिहीन शेत मजूर किंवा इतर तत्सम काम करणारे देखील त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक साधने किंवा आर्थिक सुबत्ता असलेली पाहाव्यास मिळत नाही.

 वैदिक लोक हे एकदम उजव्या प्रमाणात हात पाय न मिळवता पैसा कमवतात. कमी असून किंवा त्यांचे टक्केवारी एकदमच कमी असताना ही हे लोक एकंदरीत ९० टक्के लोकांवर राज्य करत आहेत याचे उदाहरण म्हणजे आज आपल्या देशात सुरू असलेले राजकारण या राजकारणात अडकलेली जनता.

जनता कशी आहे बघा ?
 ही जनता मेलेली आहे मेलेली म्हणजे जसा मेलेला माणूस आवाज करत नाही हालचाल करत नाही तसेच हे लोक वैदिक लोकांच्या बळी पडलेले असून ते कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचार किंवा अंधश्रद्धा या गोष्टीवर आवाज उठवत नाहीत मग हे लोक मेलेले आहेत की नाही ? तर उत्तर असेल ,हो .

हे लोक मेलेले आहेत अशा लोकांपासून आपण काय अपेक्षा घ्यायची म्हणून श्रमिक लोकांनी जास्तीत जास्त या वैदिक लोकांचे डावपेच ओळखत वागण्याचा प्रयत्न करणे हीच आज काळाची गरज आहे.

प्रा बा र शिंदे,नेरूळ - ७०६.

Friday, August 19, 2022

डॉ नरेंद्र दाभोळकर

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर एक झंझावात !
.... मिनांडर*

संपूर्ण देशात या महाराष्ट्राला सत्यशोधकी चळवळीची एक मोठी परंपरा आहे . खऱ्या अर्थाने ही परंपरा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली .  सत्यशोधकी समाजाची स्थापना  करून महात्मा फुले यांनी या महाराष्ट्राला एक अशी परंपरा दिली त्यातून अनेक सत्यशोधकी तयार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे  बुलंद उदाहरण होय .  या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक सत्यशोधक म्हणून जन्माला आले आणि ती परंपरा आजही कायम आहे.
त्या सत्यशोधकी चळवळीचे एक मोठं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील ते कणखर सत्यशोधकी होती अनेक ठिकाणी भाषणे द्यायचे. एक मजेदार हिस्सा एका गावात घडला तो असा,  एका गावामध्ये त्यांचे भाषण झालं त्यांच्या दुसऱ्या दिवशी गावाच्या देवळातले  चांदीचे डोळे चोरीला गेले त्यांच्या असे लक्षात आलं नानांच्या भाषणाचा प्रभाव म्हणून कोणीतरी ते डोळी चोरली असल्याची लोकांना खात्री होती मात्र ते देवस्थान अतिशय प्रखर आणि जागृत होते त्यामुळे देवाची डोळे  चोरलेला माणूस कोण ? याची एकत्र चर्चा झाली.  आता त्या तिकडून त्या ‘ची ची’ चर्चा सुरू झाली .आणि डोळे परत येतील  असा लोकांचा विश्वास होता एक महिना गेला दीड महिना गेला दोन महिने गेले पण डोळे काही परत आले नाहीत.  तीन -चार महिन्यांनी पुन्हा एकदा नाना पाटील यांचे भाषण गावात झालं त्याच देवळात उभे राहिले आणि म्हणाले, हा देव जागृत आहे, असं तुम्ही म्हणता त्याचे डोळे चार महिन्यापूर्वी चोरीला गेले.खरं तर ते चोरीला गेले नाहीत मीच काढून नेले होते असं म्हणून त्यांनी स्वतःच्या खिशातून डोळे काढून दाखवले ते पुढे म्हणाले जर तुमच्या देवाने माझे काही केलं नाही तर तो जागृत कसा काय असेल ? हे महाराष्ट्रामध्ये -६० -७०  वर्षांपूर्वीचे ‘कृतीशील विचार’ होते . पण शोधकथा आणि कृतिशीलता यांची आजची स्थिती काय आहे ?
तेच आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अनिस च्या मध्येमातून कृतीशील स्वरूपात कार्ये करीत होते .  सध्या चालू असलेली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे हे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य जागतिक दर्जाचे कार्य असून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या कृतीला अर्पण केलेला आहे.  बाबासाहेबांना हवे असलेली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली व्यवस्था त्यांनी या ‘अंधश्रद्धा निर्मूलनातून’ जगापुढे मांडली आहे ‘सत्ते ते सत्य, ‘असते ते असत्य’.  ‘काळा तो काळा गोरा तो गोरा’  ही खरी कृतीशील विचारसारणी  मांडण्याचे  धाडस केले आणि शिक्षित असो किंवा अशिक्षित असो यांच्यावर कसा घाला घातला हे जगाला माहीतच आहे.  आज त्यांचा शहीद दिन  असून आपण त्यांना आठवण करत आहोत . डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे दृष्टी होते त्यांचा खून करण्यात आला हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मारेकरी  कोण?  आत्तापर्यंत ते अजून तरी अधांतरी आहे त्याचा छडा लागला पाहिजे असं मलाही वाटलं तुम्हालाही वाटतं असेल ? आणि जगाला वाटते ,पण तसा अजून सरकार कडून प्रयत्न होत नाही हे सत्य आहे. हेच सत्य आपण जगापुढे मांडलं पाहिजे सत्याची कास धरली पाहिजे सत्याच्या मार्गावर असले पाहिजे असं डॉक्टर नरेंद्र नेहमी सांगत आणि हेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना खरी अर्पण पत्रिका होय . 
आज आठवतं २० ऑगस्ट हे मारेकरी यांनी मारल्याचा दिवस ९ वर्षपूर्ती होत आहे . डॉक्टर नरेंद्र हे कसे होते ,एखादा डॉक्टर एका पेशंटची नाडी बघून त्याला बरं करतो पण नरेंद्र दाभोळकर हे हजार लोकांच्या नाड्या ओळखत आणि त्या लोकांच्या मानसिकतेप्रमाणे त्यांना ते तश्या प्रकारचे  ज्ञान देत किंवा उपदेश देत असे.  डॉक्टर नरेंद्र यांना एकदा असा प्रसंगाला सामोरे जावे लागले की ,तेव्हा त्यांची  मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची भेट झाली.  ते तेव्हा ते मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांना त्यांनी असा एक प्रश्न केला की आपण राज्यकर्ते आहात आपण लोकांची सेवा करता आपण लोकात मिसळतात तेव्हा त्यांना बोलण्याचा योग आला ते म्हणाले , ‘म्हणाले ते सगळं ठीक आहे हो कायदा वगैरे करायला पाहिजे ते आम्हाला कळते .  पण लोक बाबा यांच्याकडे लक्षवेधी लोक  जातात आम्ही शेवटी राजकारणी आहोत ज्यांच्याकडे लोक जातात त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का ?  त्यांना वाटलं त्यांनी मला निवृत्तर करण्याचा प्रश्न  विचारला आहे मी म्हणालो हो माझ्याकडे याचे उत्तर आहे.  त्यांना जरा आश्चर्य वाटले विलासराव थोडे दचकले ते म्हणाले काय उत्तर आहे तुमच्याकडे ? मी म्हणालो याचे उत्तर म्हणजे या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे कसं आहे हे तुम्हाला समजावून सांगणं तर त्यांना काही कळलं नाही ते म्हणाले आमच्याकडे काय उत्तर आहे ?  आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय मी म्हणालो, साहेब तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाहीत तुम्ही राज्यकर्ते आहात तुमच्याकडे आज घडीला २०००० माध्यमिक शाळा आहेत. ८० हजार प्राथमिक शाळा आहेत २,२०० कॉलेजेस आहेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या सहा लाख आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या एक कोटी दहा लाख आहे कॉलेजमध्ये दहा लाख मुलं शिकतात आणि जवळजवळ एक लाख प्राध्यापक आहेत या सगळ्यांच्या अभ्यासक्रमात मूल्य शिक्षणात  तसंच भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा असे दिलेला आहे त्यातले तुम्ही काहीच करीत नाहीत म्हणून आम्हाला करावा लागतो.  असे डॉक्टर नरेंद्र यांनी माजी मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांना ठणकावून  सांगितलं होतं.  असे हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर.
त्यांची मातंग समाज यावर ही खूप आस्था होती .  एकदा असं झालं प्रसंग असा होता की एका मांगवड्यात गेले होते ,मांगवाड्यामध्ये त्याचा कार्यक्रम चालू असताना ते म्हणाले मातंग समाजाकडे सेंदर्यााच्या यात्रेमध्ये तुम्ही गळ का टोचून घेता ? गळ  टोचून घेणे हे अनेक अंगाने अंधश्रद्धा आहे कदाचित यातून एड्स होऊ शकतो किंवा कुठलाही रोग होऊ शकतो असे ते म्हणले . तेंव्हा समोरून कोणीतरी  ‘तुम्हाला फक्त आम्हीच  उरलोय का शहाण करायला ? असा बालिश सवाल केला होता .  
त्या समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन होणार कसं आता मला सांगा हे समाजातील लोक कार्यकर्ते प्राध्यापक, डॉक्टर चुलकीचे संदेश सांगतात.  आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील आहोत आता हे डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीत असलेल्या लोकांना अभिप्रेत आहे ? का कारण नाही कारण बाबासाहेबांनी कधी देवळात जाणे किंवा अशा अंधश्रद्धा बळकटीकरण होईल अशा प्रकारे कुठेच कार्य केलेले  दिसत नाही.यापुढे जाऊन  तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी घ्या, अण्णाभाऊ साठे यांनी एकंदरीत ८०  महामनवला  आपल्या लेखणीची  अर्पण पत्रिका वाहिली .८०  महात्म्यांचे त्यांनी आपल्या पुस्तकातून महात्मे गौरविले आहे.  पण त्यांनीही  कुठेही देवधर्म किंवा कुठेही एखाद्या धार्मिक विषयावर लिहिलेले दिसत नाही कारण अण्णाभाऊ साठेचे विचार आणि डॉक्टर नरेंद्र ,डॉक्टर  बाबासाहेबांचे विचार हे वेगळे न्हवते . 
याचीच परंपरा पुढे चालवत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आपल्या कार्याची परंपरा पुढे चालवली होती म्हणून ते लोकांना आवडत नव्हते.  लोकांना नको होते.  म्हणून त्यांचा खून करण्यात आला त्यांना दिवसाढवळ्या मारल्या गेले. आज मी  त्यांना त्यांच्या विचारला अर्पण पत्रिका सादर करत आहोत. 

डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा २० अगस्त २०१३ रोजी पुण्यामध्ये मॉर्निंग वापरताना काही धर्मांध शक्तीकडून निर्गुण खून करण्यात आला या घटनेला आज नऊ वर्ष पूर्ण होत आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे डॉक्टर कुलबर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारांचेही खून केले गेले .
या चारही खूनामागे एकच संघटना आहे असे तपासा अंती पुढे येत आहे.

डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे असे पर्वा बेलापूर येथे झालेल्या सभेत त्यांच्या मुलीने सांगितले. याचाही कुणाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र वेदना खटकत आहे.

 याप्रसंगी खालील मागण्याचा ते पाठपुरावा  करत आहोत . डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या गुन्हा मागच्या मुख्य सूत्रधारचा शोध घ्यावा या खूना मागच्या धर्मांध संघटनेवर कठोर शिक्षा व्हाव्यात

हा खून खटला जलद गतीने चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करावी #अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकर करायचे म्हणून त्यांचा खून प्रतिगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यक्रमातून करण्यात आला हे आता स्पष्ट झाले आहे परंतु-  "माणूस मारला तरी विचार संपत नाही" हे सत्य डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या पश्चात त्यांच्या निर्भीड आणि विवेकी कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य पूर्ण जोमाने सुरू ठेवत सिद्ध केले आहे.

आजच्या दिनी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी  आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आपणाला विनंती करतो की आपणही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कार्यात सतत सामील व्हावे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य पुढे नेणे हेच शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीला खरे खरे अभिवादन ठरेल.

प्रा बी आर शिंदे ,नेरूळ ७०६

(डॉ. बाबासाहेब आंबेकर विचार -प्रचार,प्रसारक,पाली भाषा आणि साहित्य लेखक,समता सैनिक दल आजीव सदस्य,अनिस सक्रिय सदस्य , कर्णबधीरांचे बाल शिक्षण आणि संशोधक).

Friday, July 22, 2022

जिंदगी के साथ भी! जिंदगी के बाद भी!!

#जिंदगी_के_साथ_भी 
#जिंदगी_के_बाद_भी 

एक काळ होता लोकांना सरकारी नोकरी असणे म्हणजे दिव्य होते.काळ बदलत गेला हळू हळू लोकांना सरकारी , निमसरकारी,खाजगी नोकऱ्या मिळू लागल्या.

मग लोकांनी एकच नाही तर जोडधंदा म्हणून दोन नोकरी करणे,अर्धवेळ काम करणे आणि मुला बाळांसाठी ,त्यांच्या शिक्षणासाठी नोकऱ्या करू लागले .हळू हळू स्त्रिया शिक्षित झाल्या आणि त्याही चुली ओलांडून शाळा ,कंपनी, कार्यालय ,दवाखाने जिथे मिळेल तिथे नोकरी आणि नोकरी.मग कुठं काम तर कोठ  नाही.कुठं एक पगार तर कुठे दोन ते तीन पगारदार झाले,मिळकती वाढत गेल्या.

वर्गवारी चा विचार करता मध्यमवर्ग LIC या एकाच ठिकाणी महिना काठी जुजबी पैसे गुंतवू लागला.या पॉलिसी यवढ्या जोमात आल्या की एखादे छोटेखानी कर्ज हवे तर तुमची LIC पॉलिसी काढली आहे का ? हा हमखास  सवाल.मग ही पॉलिसी असेल तर नक्की १६ते १८ टक्के दराने तुमच्या पदरात कर्ज.

हळू हळू यवढ्या बाजारात विमा कंपन्यांचा  सुळसुळाट झाला की ,गल्ली बोळात शाखा आल्या,मास्तर, नोकरदार आणि तत्सम कामगार हे या विमा कंपनीचे बकरे झाले.यांनी सुरुवातीला आपल्याच घरात,मित्राला ,आणि जवळीक ठेवत असलेल्या व्यक्तींना असे गंडवले की आकडा सांगता येणार नाही यवढ्या ,ग्रामीण,शहरी आणि निमशहरी भागात अगणित  विमा उतरवल्या गेल्या...

यात मग पॉलिसी ही कांहीं दोन तीन वर्षात नाही मिळत ? तब्बल २०वर्ष म्हणजे २तप.आता या दोन तपात काय सावळा गोंधळ झाला असेल? ते पहा . 

ती आकडेवारी वेगळी?.१० टक्के बंद पडल्या १०टक्के हरवल्या,१०टक्के गहाळ झाल्या.१०टक्के लोकं मेली.१०टक्के क्लेम करू शकले नाहीत.१०टक्के २००५ च्या अतिवृष्टीमुळे  वाहून गेल्या.१० टक्के चुकीच्या पत्त्यामुळे ,घर बदली मुळे,शहर सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित  झाल्याने हातच्या निघून गेल्या. या एकूण ७०टक्के गुराळा प्रमाणे नांद भरून वाहून गेल्या.

आता उरल्या त्या २०वर्ष काळासाठी वेशीवर टांगलेल्या.किंवा आपण त्यांना घोंगड्यागत भिजत पडल्या असे म्हणू या. परिपक्व झाल्यावर किती मिळणार तर २ जेमतेम दोन लाख (ते विम्यावर निर्भर करते आहे). हातात मिळतात.तेंव्हा एक तर तुम्ही सेवा निवृत्त झाले असणार .मग हे वीस वर्ष जमा केलेलं  धन काय कामाचे? कुणासाठी?

तात्पर्य ही रक्कम कुठे इतरत्र गुंतवली असती तर नक्कीच २० लाख मिळाले असते.जसे शेअर मार्केट,मुचूवल  फंड,स्टोक्स,असे आणि अनेक प्लॅटफॉर्म आहेत ते सामान्य लोकांना माहिती नाहीत.याच गोस्टिचा  फायदा घेत २०वर्ष गळफास लावून LIC ने पैसा उकळायला सुरुवात  केली आणि अजून हे सत्र  चालूच  आहे.

आज मितीला LIC कडे जो फंड क्लेम केला नाही तो २१,३३६ करोड आहे.हा कोणाचा पैसा आहे? सरकार चा की रिजर्व  बँकेचा? अहो तुमच्या  आमच्या घामाचा पैसा तो . 

आज सर्व सामान्ये गरीब ,भूमिहीन शेतमाजुर  वर्गाच्या गळ्यात डिजिटलच्या फांदात  ज्यांना खायला पैका नाही त्यांची बँक खाती काढून पैसा मग ते शून्य खाती असो की न्यूनेतम  ठेवी असो .पण पैसा एकंदरीत बँकेत तर जातो आहे.माणूस एकंदरीत खंगाळून रीता होत चालला आहे,हे सत्ये नाकारता येणार नाही . 

मी लिहलेला हा  लेख  कांहीं संशोधन अहवाल नाही फक्त मी एक सामान्य विमाधारक म्हणून जिवाच्या आकांताने लिहले  आहे." जागो ग्राहक जागो " या युक्ति प्रमाणे . 

समजा एखाद्या व्यक्तीने संपूर्ण सेवेत विमा कंपनी कडे पैसा भरला आणि आता तो विश्रांति इछितो  ,त्याला सेवानिवृत्ती नंतर तरी, सुखाने त्याचे  जीवन जगू द्या.
त्याला आर्थिक विश्रांति हवी आहे ,आर्थिक सुब्बता नको. 

आज शरमेची बाब अशी आहे की ,तुम्ही निवृती नावाचा प्लॅन घेऊन आला आहे.म्हणजे त्याने मसणात  जाई पर्यंत विम्याचे पैसे भरायचे? का  आणि कोणासाठी ? हे थोतांड बंद झाले पाहिजे असे तुमला का वाटत नाही ?.

आज मितिला असलेला तुमचा Unclaimed Mony ' मार्गी लावा. भूकबळी,विधवा,अशिक्षित मुले, शाळाबाह्य लेकरे,पडीक शाळा इथे कामी येऊ द्या.

विमा मग कोणताही असो !दूर राहा.त्यात कोणाचे कल्याण आहे,जसा पाण्यात कासव ठेवला की घरात पैसा राहतो.पण तो पैसा काचेचा कासव विकणाऱ्या मालकाच्या घरात जातो आहे,तुम्ही आज मितिला  रीते आहेत.देशात अगणित विमा कंपन्या अब्जावधी मालमत्ता कमाई करून बसल्या आहेत.तेंव्हा दूर राहा ,आणि मानसिक तणावातून सुटा.

प्रा.बी आर शिंदे.नेरूळ नवी मुंबई ७०६

Tuesday, July 12, 2022

कॉ. अण्णा भाऊ साठे

*संपूर्ण जीवन संघर्ष जगलेला माणूस – कॉ. अण्णा भाऊ साठे.*
“अखेर ज्ञानेशाची ,तुकयाची ,तीन कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा ,तीचं भंडार लुटून ‘फकिरा ’वर उधळून त्या दोन ओंजळीची फेड करण्याचा मी प्रयत्न केला आहे . (कैफियत ‘फकिरा ’)”
..................कॉ. अण्णा भाऊ साठे 
माणसाला जीवन जगण्याचे कळलं की तो संघर्ष करीत असतो. मानवाचे संपूर्ण जीवन समजून घेतल्या नंतर , आयुष्याची उपेखा (उपेक्षा ) कधी संपलेली दिसत नाही . जीवनाची फरफट कधी थांबलीच नाही . या सगळ्या गोष्टीला फाटा देत जीवन पटलावरून आपल्या आयुष्याच्या पथावरुन कॉ. अण्णा भाऊ साठे कायम चालत राहिले . 
उपास पोटी जीवन जगत असताना कधी पोटाला भाकरी मिळाली तर कधी अर्धपोटी पाणी पिऊन जीवन काढले . असे जिणे जगत असताना ते कधीच अशा जीवनाला बळी पडले नाहीत . उमेदीच्या काळात चिराग नगर मुंबई येथे वास्तव्यात असताना तेथील घाणीत आपली लेखनी तेवत ठेवली . अशा जीवन फुलवणार्याध लेखकाचा १ ऑगस्ट दर वर्षी प्रमाणे येणारा जन्मदिन . 
गेली कैक वर्ष आपण मोठ्या थाटामाटात  कॉ. अण्णा भाऊंची जयंती साजरी करत आलो  आहोत आणि पुढे ही करणार आहोत . सुरूवातीचे दिवस त्यांचे खूप हलाखिचे होते . कोळश्याच्या खाणीत काम करत आपले दु:ख गाठी बांधून ढस्सा ss ढस्सा ss रडले . असे असतांनाही आपल्या दु:खचा कुठे उल्लेख न करता त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनाला सुरुवात केली . 
जीवनात कितीही संकटे आली तरी जीवनापासून कधीही दूर पळायचे नाही उलट दु:खाचा स्वीकार करून जीवन कसे आनंदाने जगायचे हे सूत्र घेऊन ते जगत राहिले . संपूर्ण कृष्णकाठ पालथा घालून तिच्या कडे कपार्याातून फिरत राहिले .यातून त्यांच्या पोटाला अन्न मिळेनासे झाले म्हणून त्यांनी जीवाचे रान करून जिवाची मुंबापुरी गाठली . 
नशीब आजमावण्यासाठी खर्याप अर्थाने मुंबापुरी गाठली तरी तिथे ही त्यांची तीच गत झाली . अशात ते इथे एकटे पडले ,तेंव्हा तर आभाळच कोसळलं तेंव्हा अण्णा भाऊंच्या जीवनाला कुठेच आधार मिळेना . या महान साहित्यिक  माणसाने आपल्या जीवनाला वळण देण्यासाठी शाहीरीचा साज चढवला . स्वत:चं दु:ख विसरून समाजाचे मनोरंजन आणि विचारांचे परिवर्तन करीत ते आपले जीवन जगले . 
आपल्या वाट्याला आलेले दु:ख धारदार लेखणीच्या माध्यमातून जगापुढे मांडले . आख्या मानव जगताला लाजवेल अशी साहित्य  निर्मिती केली . ‘ना पोटाची खात्री ना जिवाची’ तरीही ते निरंतर साहित्य लिहीतच राहिले . 
कष्टकर्याज उपेक्षित दिंनदुबळ्या लोकांचे दु:ख साहीत्यातून ते मांडत राहिले. एवढे असून ही त्यांनी आपले उत्तम प्रकारे मानवी मनाला हुल देणारे ‘जग लौकिक साहित्य’ निर्मिती केली .
प्रतिभेला रंग ,रूप ,वर्ण ,वंश जातपात यांची कुंपणे नसतात . कॉ.शाहीर अण्णा भाऊ साठे हे त्यातील एक उदाहरण होय . ते जसे ‘जगले त्याला जागले’ तेच त्यांनी लिहलं . म्हणूनच साहित्यात त्यांचे आगळे स्थान निर्माण झाले आहे. आजच्या घडीला अण्णांच्या  लिखाणाचे मूल्यमापन  करणारे लिखाण 
वर उल्लेख केल्या प्रमाणे वाटेगावाहून मुंबईत आल्यावर ते कसे जगले हे सर्वश्रुत आहे. तरी पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमर शेख ,गव्हाणकर यांनी जे वादळ उठवले ते वंदनीय आहे . इथे कादंबरीकार म्हणून आपले स्थान निर्माण केले .त्यांच्या कादंबरीलेखनाला  सन १९४८ सुमारास खरा प्रारंभ झाला . 
वाटेगाव परिसरातील निसर्गाची रौद्रगंभीरता ,त्या पहाडी जीवनातल्या बेगुमान अशा बलदंड पुरुषाचे व कमनीय बांध्याच्या रूपयौवन तरुणीचे जीवन संघर्ष हे त्याच्या कादंबर्याबत उतरत गेले . जसे-जसे ते लिहीत गेले तसे - तसे ते साहित्य निर्णायक झाले . त्यांच्या मृत्यू (१९६९) नंतर ते मराठी साहित्यातील दुर्दम्य वादळ ठरले . एकंदरीत ३२ उपलब्ध कादंबर्याा पैकी जनसंस्कृतीला देऊ केलेला वसा महान आहे . वारणेच्या खोर्याात ,वारणेचा वाघ ,आग्निदिव्ये,आघात ,आवडी ,रत्ना, चंदा ,राणगंगा ,फुलपाखरू , ,वैजयंता या आहेत . 
परंतु अण्णा भाऊंनी ज्या सातत्याने  आणि निकराने व निर्णायक रीतीने उपेक्षितांचे जीवनसत्य रंगविले त्याला जगात तोड नाही . 
चित्रा ,माकडीचा माळ ,संघर्ष ,फकिरा ,वैजयंता या त्यांच्या पाच कादंबर्यान आहेत . या कादंबर्या. मधून याची निश्चित साक्ष मिळते . 
माटुंगा लेबर कॅम्प च्या नाक्यावर इराण्याचे ‘लेबर रेस्टोरंट’ नावाचे हॉटेल होते. हा त्या परिसरतील सगळ्या राजकीय पक्षाचा अड्डा होता . या हॉटेल च्या बाजूला ‘एक्सत्रेला बॅटरी’ नावाची कंपनी होती . तिच्या बाजूला एक झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीत अण्णा भाऊ राहत होते . अण्णा भाऊना इथून दलित चळवळीत आणण्याचे काम कॉ.डॉक्टर नारायण पगारे यांना जाते . कारण पगारे यांचे समोर आंबेडकरी चळवळ होती . हीच जागा होती जिथून अण्णा भाऊ साठे आंबेडकरी चळवळीचा एक हिस्सा होऊन गेले होते .  
आंबेडकरी जलशाचे मातृस्थान हे सत्यशोधकी होते .लोकांपर्यंत हे कार्ये पोहचवण्याचे काम याच जलशातून झाले होते . या काळात दलित चळवळ उभी करण्यासाठी अनेक जलसे उदयास आली . जगताप भालेराव ‘जलसे’ यात प्रमुख होते . या जलशातून दलित चळवळ उभी केली गेली लोकात जागृती निर्माण करण्यात आली .कारण त्या काळात तशी दलितांची वृतपत्रे नव्हती . या उलट असे होते की प्रस्थापित वर्तमानपत्रे डॉक्टर बाबासाहेबांना ,त्यांच्या चळवळीना प्रसिद्धी देत नव्हते किंवा विकृत स्वरुपात देत होते .हे जिकिरीचे कार्य अण्णा भाऊंनी त्या काळी जलशातून मोठ्या उमेदीने पार पाडले .  
अण्णा भाऊंनी पोवडे ,लावणी ,गीते ,कथा ,कादंबरी ,प्रवासवर्णने, नाटक ,लोकनाट्य असे विविध प्रकार हाताळले आहेत . वैचारिक बांधिलकी हे अण्णा भाऊंच्या लिखाणाचे मूख्य सूत्र होते . 
एकूण १५ पोवाडा व लावणी ,१० लोकनाट्य ,८ प्रवासवर्णन ,२३ कथा ,३२ कादंबर्याो अशी अमाप साहित्यसंपदा लिहणार्याव कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा ,मराठी साहित्याचा इतिहास पाहील्यास अण्णा भाऊंना योग्य तो न्याय दिला गेला नाही याची उरी खंत आहे . 
----बी.आर. शिंदे ,नेरूळ ७०६

Saturday, June 25, 2022

दलित पँथर चे ५०वर्ष पूर्ण

*पॅन्थर सारखा नवा झंझावात परत आला पाहिजे.* 

.....तो सर्वकष क्रांतीची हाक देवून समग्र परिवर्तनवाद्यांना सोबत घेवून ती  लढाई लढला होता.
म्हणून आज सगळे आप आपल्या चुली मांडून बोके, वाघ बनू पाहत आहेत .
तो संघर्ष ,तो वनवा पुन्हा  पेटला पाहिजे .मरगळलेला  काळा कुट्ट लाल लाल डोळ्यातून आग ओकणारा पँथर.

संघर्ष कोणामुळे झाला ? संघर्ष कोणी केला आणि आज त्याची फळे कोण खात आहेत? याची विचारणा कोणी  आज पँथर या पथावर दिसत नाही?
गोस्ट पँथर ची आहे ..

"ब्लॅक  पँथर ' चळवळीबद्दल  हे अमेरिकेतून आलेल एक  वादळ . ती तरुण बंडखोर विचारवंतांची चळवळ होती. हाच धागा पुढे घेत  दलित पँथरची सुरुवात इथ झाली," 

दलित पँथर या भारतातील पहिल्या आक्रमक दलित युवा संघटनेच्या तीन संस्थापकांपैकी एक.

नुकतेच  २०२२ हे वर्ष त्याच्या स्थापनेपासून ५० वे वर्ष पूर्ण होत आहे . म्हणून कैक दिवसाने मला ही लिहण्याचा मोह टाळता आला नाही आणि मी ते पूर्ण केल . 

हे सर्व सुरू झाले ते वर्ष १९७२. सर्वच वर्षे हजारो लोकांच्या स्मरणात राहण्याचे भाग्य नाही. पण १९७२  वेगळे अंगाने स्मरणात राहणारे  होते. कारण भारतीय स्वातंत्र्याला २५ वर्षे पूर्ण झाली होती आणि तरुण आणि विद्यार्थ्यांच्या चळवळी जगभर रस्त्यावर उतरल्या होत्या. मुंबईतील तरुणांनीही, विशेषत: दलित चळवळी (फक्त बौद्ध ) विषयी  जगभरातील संघर्ष आणि निषेधांबद्दल जग जागृत झाले  होते.

भारतात होत असलेले संघर्ष हे जगभरातील संघर्षापेक्षा  फारसे वेगळे नव्हते. भारत इंग्रजांपासून मुक्त झाला खरा , परंतु अत्याचारांपासून, लोकसंख्येच्या मोठ्या भागावर झालेल्या वाईट वागणुकीपासून नव्हे. दलित ,मागास आणि आदिवासींना उच्चवर्णीयांकडून सर्वात वाईट प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागत होते. हाच धागा पुढे सारत दलित जागा झाला होता . 

अकोल्यातील ढाकळी येथे दोन दलित बांधवांचे डोळे गावातील उच्चवर्णीय लोकांनी फाडून टाकले होते. याच सुमारास परभणीच्या ब्राम्हणगाव गावात एका दलित महिलेची विवस्त्र परेड करण्यात आली. पुण्यातील बावडा गावाने दलितांवर सामाजिक बहिष्कार टाकला होता. ही सर्व प्रकरणे मुंबई आणि पुण्यातील तरुण, नवसाक्षर दलित तरुणांना चिथावणी देणारी ठरली आणि चळवळ आणि बळकट झाली . 

 मग हे तरुण कोण होते? त्यांचे सर्वात प्रसिद्ध आणि प्रसिद्ध नेते  #नामदेव_ढसाळ.  या बंडखोर  कवी मनाच्या चित्याने आपली डरकाळी फोडली  आणि दलित बांधवाच्या प्रश्नाला वाचा पडली  होती . 

गोलपिठासारख्या त्यांच्या कवितांनी भारतभर लक्ष वेधून घेतले होते. त्याची शैली चुंबकीय आणि प्रक्षोभक होती. स्वतः दलित असलेल्या नामदेवने मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवली. 

#राजा_ढाले हे देखील संस्थापक त्रिकुटाचा अग्रभागी होते. ते एक तरुण लेखक, विचारवंत आणि बोलका म्हणून ओळखले जाणारे होते. साधना या मराठी साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या लेखाने राज्यातील अनेकांची सदसद्विवेकबुद्धी ढवळून काढली. 

त्यांनी विचारले की या 'स्वातंत्र्या'चा आम्हा दलितांना काय उपयोग ?  "या तिरंग्याचं काय करायचं?" स्वातंत्र्याला २५ वर्षे उलटूनही दलितांच्या जीवनात सुधारणा होत नसल्याचा प्रश्न त्यांनी आपल्या लेखात केला आहे. या लेखामुळे बराच गदारोळ झाला आणि महाराष्ट्रात पूर्णपणे नवीन वाद सुरू झाला.

या चळवळीची धार ,खरी मेख आणि वादळ , त्यांना मिळाले हत्तीबळ कुठून मिळाले असेल तर ते होते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

डॉक्टर आंबेडकरांनी १९५६ मध्ये जगातील पवित्र बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी धर्म बदलल्यानंतर, त्यांच्यानंतर आलेली पिढी ही दलितांमधील पहिली साक्षर पिढी मानली होती. जी कोणत्याही समाजात आज तागायत दिसत नाही ,( कोणत्याही समाजा माझे वैर नहीं ,की त्याना कमी लेखने नहीं ) जी फक्त बौद्ध धम्मात मला तर दिसते आहे . याच  पिढीचे प्रतिनिधित्व #नामदेव_ढसाळ , #राजा_ढाले  आणि #दया_पवार यांनी केले. 

"सरकारी नोकऱ्यांमध्ये दलित आणि आदिवासी जागांची कमतरता आणि नवीन शिकलेल्या दलित तरुणांना विविध पदांवरून नकार दिल्याने स्पष्टपणे दिसत होते. विशेषत: मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील तरुण अस्वस्थ झाले होते आणि त्यांना या भेदभावाविरुद्ध उभे राहायचे होते. दलित पँथर बलाढ्य व्यवस्थेला सामोरे जाण्याचा त्यांचा मार्ग होता," हे सर्व जे.व्ही. पवार त्यांच्या पुस्तकात आपणास वाचण्यास मिळेल. 

दलित पँथरने स्थापनेनंतर जाहीरनामा आणला. "आम्हाला ब्राम्हण भागात जागेची गरज नाही. आम्हाला संपूर्ण भारतातून सत्ता हवी आहे. आम्ही माणसांकडे फक्त व्यक्ती म्हणून पाहत नाही. आम्ही व्यवस्था बदलण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हाला समता हवी आहे . आम्हाला विश्वास आहे की आमच्यावर होणारे अत्याचार बदलून थांबणार नाहीत. हे त्या त्रयी चे समतोल विचार होते . 

आम्हाला अत्याचारी वर्गाच्या  विरोधात उठावे लागेल, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. यामुळे भांडवलशाही शक्तींविरुद्धही स्पष्ट भूमिका घेतली; (इथे रशियन राज्यक्रांति अभिप्रेत नाही ). भांडवलशाही शक्तींचा पराभव केल्यावरच न्याय आणि समानता येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

दलित पँथरचा राष्ट्रीय राजकीय तसेच सामाजिक परिदृश्यावर मोठा प्रभाव आहे. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम – दलित राजकारणाला उत्तर भारतात नवीन उंचीवर नेणारे – दलित पँथरपासून प्रेरित होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. 

एकदा नामदेव ढसाळांनी दैनिक सामनामधील त्यांच्या स्तंभात लिहिले होते, "काशीराम आम्हाला पुण्यात भेटायचे. त्यावेळी ते सायकलवरून यायचे. महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील जातीय राजकारणातील मतभेदांवर आमची प्रदीर्घ चर्चा झाली." (त्याचा 'सर्व काही समस्थी' हा स्तंभ मराठीत उपलब्ध आहे.)

१९७७ पर्यंत दलित पँथरमधील मतभेद विविध पातळ्यांवर उदयास आले आणि प्रकट झाले. त्या वर्षी, रामदास आठवले – जे आता भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत – प्राध्यापक अरुण कांबळे, एसएम प्रधान, प्रेमकुमार शेगावकर आणि इतरांनी ‘भारतीय दलित पँथर’ सुरू केले.इथेच गोची झाली आणि मूळ विचारसरणीच्या मुद्द्यावरील मतभेदांचाही संघटनेला फटका बसला. 

ढाले सर आणि त्यांच्या समर्थकांनी विश्वास ठेवला आणि नामदेव ढसाळ हे कम्युनिस्ट समर्थक असल्याचा आरोप केला. पुढे महाराष्ट्रातील दलित राजकारण अनेक पक्ष, संघटना आणि गटांमध्ये विभागले गेले. 

१९६६ नंतर काय झाले ते सर्वश्रुत आहे. परंतु या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या आणि भारतीय सामाजिक आणि राजकीय परिदृश्यात दलित पँथरचे महत्त्व आणि योगदान कमी होताना दिसून येत नाही . जसे सोन्याचे कैक तुकडे केले तरी त्याची किमत कमी होत नाही तीच आजची सध्ये परिसतिथी आहे . 

खर्‍या मनाने "पँथर हा भेदभाव, अन्याय, अत्याचार आणि फॅसिझमच्या विरोधात होता हे नाकारता येणारे नाही .  आजची परिस्थिती काही वेगळी नाही भारतभरातील विविध दलित संघटनांमध्ये पँथरचा आत्मा दिसून येतो. 


दलित पँथरने सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय क्षेत्रात एक स्थान निर्माण केले आणि ते कोणीही नाकारू शकत नाही, असे राजकीय विश्लेषकांचे आणि जाणकार लोकांचे मत आहे. "दलित पँथर प्रामुख्याने एक राजकीय चळवळ होती. परंतु त्यांच्या नेत्यांना त्यांच्या सांस्कृतिक कर्तव्यांची चांगली जाणीव होती. 

कविता आणि कादंबरी आणि नंतर नाटके, पथनाट्य आणि इतर कला प्रकारांच्या माध्यमातून दलित पँथरने तत्कालीन तथाकथित मुख्य प्रवाहातील सांस्कृतिक चळवळीला आव्हान दिले. राजकारण केले आणि निर्विवाद समांतर चळवळ या देशात उभी केली ,निर्माण केली. जे कोणत्याही सामाजिक वर्गाला इथे जमलेले नाही . 

ही चळवळ इथेच न थांबता  या चळवळीने दलित आणि कामगारांना ही मोठ्या प्रमाणात स्थान दिले. ही दलित पँथरची सर्वात उल्लेखनीय कामगिरी आहे,  असे मला निक्षून वाटते 


आजच्या महाराष्ट्रीयन तरुणांसाठी, विशेषत: दलित तरुणांसाठी, पँथर ही एक प्रतिष्ठित चळवळ आहे. आणि पुढे ही असणार आहे . 

 "महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर  जर कोणी  दलित तरुनाना ऊर्जा  दिली असेल ते एकच नाव घेता येईल - 'दलित  पँथर'

आज ही माझ्या सारख्याला  हे नाव स्मरण झाले की मी  तरुणांना पुन्हा ऊर्जा देण्याचे कार्ये करीत असतो तो इतिहास सांगत असतो . 

आज जेव्हा फॅसिझम वाढत आहे, तेव्हा भारतभरातील तरुण दलित पँथरच्या इतिहासाची उजळणी करून संघटन कसे बनवायचे, स्वतःच्या हक्कांसाठी कसे लढायचे, हे जर कुठून शिकायचे असेल तर एकच नाव घ्यावे लागेल ते म्हणजे - #दलित_पँथर

हेच  तरुणांना एकत्र आणण्याची आणि त्यांना फॅसिझमच्या विरोधात लढण्यासाठी तयार करण्याची संधी फ्लॅट फॉर्म किंवा फोरम म्हणता येईल . 


नोट - या लेखातील माझे स्वतंत्र विचार आहेत . मी एकदाच जे व्ही पवार सर यांना भेटलो आहे . तिथून प्रेरित होऊन कांही पुस्तकं वाचून हा माझा लेख मी प्रसार माध्यमांवर लिहाला आहे . जर कोणी शेअर करीत असेल तर माझे नाव वगळू नये ही आग्रहाची विनंती .

आज ही चळवळ जरी विखुरली असली तरी मानवी मनाला कलाटणी देणारी चळवळ महणून बघतो आहे . कारण आजच्या काळात याचे बहुजन वर्गात मोलाचे स्थान असायला कोणाची हरकत नसावी . कारण आजचा दिसणारा समाज याच चळवळीचे देणे आहे . 

                    -----बी.आर. शिंदे ,नेरूळ (प) नवी मुंबई -७०६ 

प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडेल - ९७०२ १५८ ५६४

शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर

*समाजक्रांतिकारक राजर्षी  शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.* 

“ तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ,हयाबदल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो . माझी खात्री आहे की , डॉ.आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत . इतकेच नव्हे  तर एक वेळ अशी  येईल की ,ते सर्व हिंदुस्तान चे पुढारी होतील ,असे माझी मनोदेवता मला सांगते आहे.”
--------- *राजर्षी शाहू महाराज*
आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती . मागासलेल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी २६ जुलै १९२० या आपल्या वाढदिवस प्रसंगी आरक्षणाचा जाहीरनामा काढून एक अप्रतिम अशी भेट करविर संस्थानच्या प्रजेस दिली . 
कागल चे अधिपति जयसींग उर्फ आबासाहेब यांचे यशवंतराव उर्फ शाहू महाराज हे पुत्र . त्यांच्या आई राधाबाईसाहेब यांच्या पोटी राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ साली झाला . चौथ्या शिवाजीच्या निधनानंतर  त्यांच्या राणी आनंदीबाई यांनी यशवंतरावास दत्तक घेतले . 
‘राजा हा खरा जनतेचा सेवक असतो; आपल्याला मिळालेले राजेपद,राजेश्वर्य हे विलासात जीवन कंठण्यासाठी नसून प्रजेच्या कल्याणासाठी आहे, याची जाणीव प्रारंभापासून महाराजांना झाली होती, असे दिसते.’
राजाचे हित त्याच्या स्वार्थसाधनात नसून ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते, हा राजनीतीचा मूलभूत पाठ त्यांचे गुरू स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर व दुसरे गुरू रघुनाथराव सबनीस यांनी विद्यार्थीदशेतील महाराजांना दिला होता. राज्यारोहणापूर्वी प्रशासकीय प्रशिक्षण म्हणून आपल्या प्रजेच्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी महाराजांनी आपल्या गुरूसमवेत प्रजाभेटीचे दौरे काढले. या दौऱ्यांत खेड्यापाड्यांतील डोंगराळ भागातील गरीब रयतेची दरिद्री अवस्था त्यांनी पाहिली. दाजीपूरपासून पन्हाळ्यापर्यंतच्या दुर्गम भागात हा राजा फिरत राहिला . 
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अस्पृश्य आणि मागासलेल्या लोकांचा उद्धार करणे, हेच आपले जीवित कर्तव्य आहे, असे मानणाऱ्या शाहू महाराजांना महार समाजातील एक तरूण परदेशात जाऊन उच्चशिक्षण घेऊन आला आहे, हे समजताच ते स्वत: शोध घेत डॉ. बाबासाहेब राहात असलेल्या परळच्या चाळीत गेले; आणि तेथे त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतली. एक राजा आपल्याला भेटण्यास आपल्या चाळीत येतो याचे बाबासाहेबांना मोठे आश्चर्य वाटले. महाराजांनी पुढील आयुष्यात डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला साहाय्यच केलेले दिसून येते. शतकानुशतके मूक राहिलेल्या बहिष्कृत समाजाला जागृत करण्यासाठी 'मूकनायक' नावाचे वृत्तपत्र काढण्याचे जेव्हा डॉ. बाबासाहेबांनी ठरविले, तेव्हा त्यांना पहिले साहाय्य महाराजांनी केले होते.
डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर महाराजांचा विश्वास होता. त्यांच्याबद्दल खूप मोठ्या अपेक्षा त्यांनी बाळगल्या होत्या. म्हणूनच १९२० साली माणगावच्या पहिल्या अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या बाबासाहेबांना पाहून महाराजांनी उद्गार काढले होते, "तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे माझी मनोदेवता मला सांगते आहे. " 
महाराजांनी वर्तविलेले हे भविष्य काळाने अचूक ठरविले. महाराज पुढे म्हणाले होते, “आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे ? विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो. 
अश्या थोर विचारवंताची जयंती आहे ,त्यांना नतमस्तक ! थोर कल्याणकारी लोकराजाला मानाचा मुजरा !!

*प्रा.बी. आर. शिंदे ,नेरूळ प -७०६*

Tuesday, June 14, 2022

वोल्गा से गंगा -महापंडित राहुल सांकृत्यायन

वोल्गा_से_गंगा : महापंडित राहुल सांकृत्यायन
हे हिन्दी पुस्तक वाचनात आले  ...

मी पुस्तक खरेदी करून वाचून झालं की माझे काका चालवत असलेल्या वाचनालयात जाऊन भेट देऊन येतो .मोजकी घरी ठेवली आहेत .करण ते पुनःपुन्हा वाचावे लागतात .परत खरेदी नको .त्यातील हे एक पुस्तक होय.

आपण जरी मराठी भाषिक असलो तरी मराठी त लिहलेले वाचत असताना हिंदीत लिहलेले असेल तर ते हिंदीच वाचावे .कारण खरा गुळ आणि खरा पाक कळत नाही ,तेंव्हा काकवी किंवा पाक उसाचा रस लागतो ...हे झाले गुऱ्हाळ .

एक मी पर्वा #हरमन_हेस लिखित 'सिद्धार्थ ' हे पुस्तक खरेदी केलें ,अनुवाद उल्का राऊत यांनी  मराठीत केला आहे ...किती काय काय घुसडतात आणि लिहतात याची प्रचिती येते आणि कीव वाटते .

हरमन हेस जरी साहित्यातील नोबेल पुसरस्कार प्राप्त लेखक असले तरी ,बुद्धावर लिहणे नाही जमले आणि भाषांतर तर विरळच ..असो तो आपला विषय नाही.

जगविख्यात लेखक राहुल संकृत्ययान यांचं १९४२ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक ज्याची पहिली आवृत्ती केवळ आठ महिन्यात संपते .ही लेखक आणि प्रकाशक यांच्या साठी खूप आनंदाची बाब होय.

मी शक्यतो मूळ पुस्तक वाचतो .हे पुस्तक हातात घेतल्यास एक नवीन शब्द मला दिसला आणि मी ती कथा प्रथम  वाचण्याचे ठरवले ...'बन्धल मल्ल' म्हणजे बुद्ध !

शंभर वर्षा पूर्वी ची ऐतिहासिक गोस्ट आहे.तेंव्हा सामाजिक अराजकता समाजात आणि एकंदर देशात मोठ्या प्रमाणावर मजली होती. व्यापारी वर्गाच्या हातात सत्ता होती आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक ,आर्थिक पिळवणूक चालू होती ...

कथा वाचावी !

"राहुल सांकृत्यायन आपल्याला ‘व्होल्गा ते गंगा’ या कथासंग्रहातील २० कथांद्वारे टाइममशीनमधून आठ हजार वर्षे मागे घेऊन जातात आणि मानवाचा आठ हजार वर्षांचा प्रवास गोष्टिरूपाने दाखवतात.

व्होल्गेच्या काठावर राहणाऱ्या या परिवाराचे आयुष्य अतिशय खडतर आहे. शिकारीसाठी भटकणे, नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे आणि सततचे टोळीयुद्ध यांमुळे परिवाराचे आयुष्य संघर्षमय आहे.

२० कथांमध्ये चार रिकरिंग थीमस् म्हणजेच लेईटमोटिफ ठेवले आहेत – सामंतशाही आणि राजेशाही, युद्ध, दासप्रथा आणि स्रीदास्य. व्होल्गातीरावर झालेल्या भारतीय संस्कृतीच्या उगमापासून गंगातीरी झालेला विकास आणि स्थिराव यांचा इतिहास म्हणजे दमनाचा, शोषणाचा, काही लोकांच्या सुखासाठी इतरांचे शोषण करण्याचा इतिहास आहे. 

सांकृत्यायनच्या कथांमधील पुरुहुतु, बंधुलमल्ल, नागदत्त, प्रभा, अश्वघोष, सुपर्ण यौधेय, मंगल सिंह, सफदर, सकिना, शंकर, सुमेर या पात्रांप्रमाणे चांगले लोक असतात, ते बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, ते बदल काही काळपर्यंत प्रभावी ठरतात पण शेवटी माणसाची भोगलोलुपता जिंकते. असे वास्तववादी चित्र सांकृत्यायनांनी रंगवले आहे. सुमेर या शेवटच्या कथेत सांकृत्यायन यांनी कम्युनिझमचा खुलेपणाने पुरस्कार केला आहे.

संपूर्ण कथासंग्रहच इतिहासाचे मार्कसिस्ट इंटरप्रिटेशन आहे असे म्हणता येईल. गांधींच्या असहकार चळवळीला, कनिष्ठ जातींना ‘हरिजन’ म्हणून ‘आहे तिथेच सडत राहा’ या वृत्तीला सुमेर नकार देतो, आंबेडकरांच्या मर्यादा सांगतो आणि कम्युनिझम हेच समतेचा युटोपीयन समाज प्रत्यक्षात आणण्याचे साधन आहे असे सांगतो. पण ‘इजम’ कोणताही असला तरी मानवी स्वभावातली सत्तेची लालसा, भोगलोलुपता, दुसऱ्याच्या जिवावर ऐश करण्याची वृत्ती मात्र तशीच असते.  पर्यायाने सांकृत्यायनन  काहीच भाष्य केलेले नाही .

लेखक :महापंडित राहुल सांकृत्यायन
पुस्तक वोल्गा से गंगा.(हिन्दी)
कीमत ::२५०/-
पुनर्मुद्रण: 2022
वितरक : किताब महल ,दिल्ली०२
प्रकाशक : किताब महल ,दिल्ली ०२
प्रा बी आर शिंदे ,विशेष कर्णबधिरांचे शिक्षण . नेरूळ -७०6

एक होता कार्व्हर -लेखिका विना गवाणकर

मी_वाचून_जाणलेला_कार्व्हर. 
                           ----- #मिनण्डर
जगात अश्या जादूगरची वानवा नाही . खरेच एक होता कार्व्हर पुस्तकाचे शीर्षक अनमोल रत्न डोक्टर कार्व्हर चे मोल सांगून जाते . 
बाल वयात बाबा गेले ,आई ला डोळ्या देखत  गुंड लोकांनी पळवून घेऊन गेले . काय झाली असेल अवस्था त्या कोवळ्या वयाची . 
आपल्या हाताच्या लांब बोटांनी जगात शेतीत कोरीव काम केले . दक्षिण अमेरिकेतील निग्रो अनाडी ,वर्ण भेदाने खाईत खुंटत असलेल्या वर्गाचे मर्म जाणून त्यांच्या उभ्या आयूषात सोने भरून काढणारा बालक ,पुढे अमेरिकेचा एक भला मोठा वैज्ञानिक झाला हे नवल वाटायला नको . 

मातीचे सोन करून विविध रंग तयार करणे हे अवघड काम या गाड्याने मोठ्या सीताफीने केले . आपण खाऊन टाकलेल्या भुईमूगच्या शेंगापासून विविध रंग तयार करून दाखवणारा जादूगर . येवढ्यावर न थांबता १३२ प्रकारात शेंगदाणा कसा खावा हे जगाला सांगून गेले . 

डुक्कर खाणारे भुईमूग आणि टोमॅटो ,रताळे अशी भीती आणि चुकीची समज असणार्‍या निग्रो शेतकर्‍यांना ते स्वतः खाऊन दाखवून हजारो प्रयोग करणारा मानव . आणीबाणीच्या काळात बालके दुधावचून मरु लागली ,तेंव्हा हा माणूस थोडाच गप्पा बसणार ? शेंगदाण्यापासून दूध तयार करून हजारो बालकाना जीवदान देणारे डॉक्टर कार्व्हर .... 

शेती वेडा . फूल वेडा . बारीक बारीक कणात आणि दगडात काय दडले आहे याचे कोडे उलगडणारा डॉक्टर . टाकाऊ पासून टिकाऊ कसे बनवता येईल याचे मोलाचे मार्गदर्शन करणारा शिक्षक . 

प्रयोग शाळेत अहोरात्र मरणारा . एकदा काय झाले तर डॉक्टर साहेबांनी एका मोठ्या व्यक्तिला हिरा मागितला . मग काय मॅजिक ,त्या व्यक्तीने कांही एक विचार न करता एक मौल्यवान हिर्‍याची अंगुठी भेट दिली . त्या व्यक्तिला वाटले की ते लगेच बोटात सरकवतील पण झाले ते इपरीत . त्यांनी ती अंगुठी सरळ  आपल्या प्रयोग शाळेत आणून ठेवली . असे का विचारता ते म्हणाले माझ्या मुलांना दाखवण्यास एकच वस्तु माझ्या कडे न्हवती ती म्हणजे हिरा .... असा हिरा माणूस ,शिक्षक मिळेल का जगात ?
जगभरातील असंखे प्रलोभने धुडकावून आपल्या मातीत आपल्या रंजल्या गांजल्या मनसात रममाण झालेया लीलया . 
आपल्या माणसात रमणारा ,उच्चप्रभू लोकात लाजणारा ,बुजणारा वैज्ञानिक डॉक्टर कार्व्हर ... 

डॉक्टर  वाशिंग्टनना दिलेल्या वाचनाला जागत हा भूमिपुत्र अखेरपर्यन्त जगाला आपल्या कर्मभूमीत ,टस्कीगीत त्यांनी अखेरचा प्राण  सोडला .
इकडे भारतात डॉक्टर  बाबसाहेबांनी आपल्या बहुजन लोकांसाठी आणि त्यांच्या उत्थंनासाठी  आपल्या प्रणाची आहुति दिली . तीच गत तिकडे दक्षिण अमेरिकेत आपल्या लोकांसाठी ,निग्रो करिता डॉक्टर कार्व्हर यांची झाली . 

अशी सोनेरी मनं घेऊन जगात जन्माला आलेली साधी  माणसे नसून ते महामानव होत . 

पुस्तक वाचावे . खूप सुंदर माहिती.  वीणा गवाणकर या प्रख्यात लेखिकेने कार्व्हर उभा केला आहे . त्यातील  एक तरी  अंश आपल्या गुणात सामील झाला तर पुस्तक वाचल्याचे भाग्ये मिळेल .. 

प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे, ,नेरूळ ७०६
(कर्णबधिरांचे विशेष शिक्षण )

Wednesday, April 13, 2022

जातिअंताच्या लढ्यापुढील दीपस्तंभ ... लोकसत्ता . लेखावर प्रतिक्रिया

 

आज दिनांक १३ एप्रिल लोकसत्ता मधील प्रसाद जाधव कुलकर्णी लिखित उपरोक लेख वाचण्यात आला. आज जात जाणिवा कश्या बळकट होत आहेत ,त्याचा बीमोड करण्यास महात्मा फुले आणि डोक्टर बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार किती प्रवर्तक आहेत ते विषाद केले आहे .

तसे पाहता आज जात ही एक बांधीस्त वर्ग होऊन बसली आहे  . जातिअंताच्या लढाईचे मूळ  हे जरी महात्मा फुले आणि डोक्टर आंबेडकर यांनी ठणकावून संगितले असले तरी आज राजकीय सत्ता आणि विविध विवाह संस्था या जाती व्यवस्थेला खतपाणी घालताना दिसून येत आहेत .

जात निर्मिती हे मानव निर्मित असून तत्कालीन प्रस्थापित , उच्चवरणीयांनी निर्माण केलेले आहे . ती आज तागायत तग धरून बसलेली आहे ? जात नाही ती जात . जाति या मनू ने निर्माण केलेल्या नाहीत हे डॉक्टर बाबासाहेब यांनी ठाम पणे नमूद केलेले  आहेच . या जात संस्थेचे अनुकरण आज ही मोठ्या प्रमाणात तळाचा वर्ण करीत असल्याचे पदोपदी अनुभव येत आहेत . मनू हा जात प्रचारक होता .

हिंदू समाजातील जातीचा पुंजका हे व्यक्ति ,समाज आणि देश विकासाला मारक ठरत चालले आहे . आजमितीला विविध माध्यमाद्वारे होणारे जातीचे मेळावे ,सम्मेलन हे जाती एक्याला बळकट करणारे आहे . हे असे विविध जातिबांधीलकीचे कार्यक्रम  सामाजिक एकजुटीला  टाडा देताना दिसत आहेत .

जातिअंतापेक्ष्या जातबळकटिकरण ,धार्मिकरण ,परधर्मद्वेष ,हे सामाजिक ,आर्थिक ,आणि देश विकास यास खिळ घालताना दिसून येत आहे.

उद्या होणार्‍या प.पू. डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित जातिअंताचा संकल्प करून जाति निर्मूलनचा विडा उचलावा ,अश्या करण्याने महामावांची खरी  जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल .

प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरूळ ७०६


Tuesday, April 12, 2022

iphone7_औरढाईमाला.

#iphone7_औरढाईमाला.

-------------- बा. र. शिंदे 

आज कुछ निजी काम के चलते मै घर से ऑफिस के लिए देर से निकला था । हुवा यूं की जैसे मै बांद्रा रेल्वे (लोकल ) स्टेशन पहुँच गया और लोकल से उतर गया । लोकल बांद्रा थी और वापिस सी एस टी जाने वाली थी ( बांद्रा –सी एस टी ) और रोज की तरह स्टेशन से बाहर पश्चिम की ओर  निकलते हुये रिक्शा ले लिया जैसे ही रिक्शा मे बैठ गया तब पता चला की मेरे जेब मे मैंने  हल्कापन महसूस पाया । तब पता चला की मेरा मोबाइल नहीं है ? (मै दो मोबाइल इस्तेमाल करता हूँ,एक आंड्रोइड और एक इओएस  )

 एकदम से शॉक लगा ,चलो अभी मेरा मोबाइल गुम हो गया । यह मन ही मन मे ठान लिया , फिर मैंने तुरंत रिक्शा छोड़ दी । और जिस स्टाल  से ठंडा खरीदा था उस स्टाल तक जाने की सोचकर स्टेशन की ओर भाग ही रहा था तब मेरा बड़ा बेटा आदित्य का कॉल आया ,कुछ पल लगा की इस समय अदित्या कॉल किंव कर रहा है ? जैसे ही मैंने उठाया तब उस ओर से आवाज आयी की आपका कहाँ है ? मोबाइल किसी और को मिला है और कहते है की वी.टी.आकार ले जाओ । मेरे बेटे के यह शब्द सुनकर मेरी बड़ी हुयी धड़कन थम गयी । 

मै तुरंत बांद्रा प. टिकट विंडो से सी एस टी का वापसी का टिकट लिया। बांद्रा से तेज लोकल लेकर वाया दादर सी एस टी पहुँच गया । जिन्हे मेरा मोबाइल लोकल ट्रेन मे प्राप्त हुवा था वे एक पेशे से बड़े सज्जन  वकील है  उन्होने किल्ला कोर्ट सी एस टी मे मिलने को कहा ।  मै उन्हे वहाँ पहुँचते ही कॉल लिया उन्होने मुझे ‘ढाई माले’ पर आने को कहा । जैसे मै कोर्ट मे पहुँच गया तो बड़ी तादात मे पुलिस कर्मी बैठे दिखाई दिये । और ढेर सारे वकील । 

मै उन्हे वाहा से और दुबारा कॉल किया की मुझे ‘ढाई माला’ समज नहीं आरहा है । फिर से उन्होने कहा की आप पहले माले पे आओ । तब एक नीचे सेकुरिटी मे बैठी पुलिस महिला से पूछा की यह ढाई माला किधर है ? वह भी चौक गयी और कहा की मै नहीं जानती । मै तो पहली बार सुनरही हूँ । और मेरी मुसीबत बढ़ और बढ़ गयी । 

किला कोर्ट अंग्रेज़ के जमाने का कोर्ट है यह ,उनका एक माला ही हमारे चार माले की तरहा है । मै एक ही माले पर गया लिकिन येसा लगा की मै चौथी मंजिल पार किया हूँ । क्या करे गुम हुवा मोबाइल वापस मिलनेकी की खुशी मे मै इतनी तेज ऊपर गया की मै कितनी मंजिल ऊपर आया यह भूल गया । मेरे पैर का पुराना दर्द भूल भी गया ।  जैसे ही ऊपर आया तब मेरे दूसरे  मोबाइल से मेरे ही मोबाइल पर कॉल किया । तभी वे भले इंसान मेरे सामने ही खड़े थे । हात ऊपर किए हुये पास मे आने का इशारा कर रहे थे। 

भला इंसान ।मुसकुराते हुये  उन्होने मेरे हाथ मे हाथ दिये हुये मेरा सन्मान किया । मैंने आपसे बेटे से बात की थी । उन्होने मेरे फोन से एमर्जेंसी नंबर पर कॉल किया था तब एक ही बार मेरी पत्नी ,मेरे दो बेटे के पास कॉल गया था .... 

आप भी आपने मोबाइल मे घर के सभी सदस्यो के एमर्जेंशी नंबर दल सकते हो ...  

उन्होने मुझे आपने टेबल पर बिताया ,हम दोनों की पहचान हुयी और मैंने जापानी स्टाइल मे उनका शुक्रिया किए हये कोर्ट छोड़ दिया ... 

(मा. वकील साहेब हे हिन्दी भासिक आहेत ,हा संदेश त्यांच्या प्रएंत जावा हा हिन्दी लिहण्याचा मनसुबा होता ). 

मिनांडर


#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...