Friday, February 24, 2017

सर्दियों में पानी पीना न करें कम, हो सकती है ये गंभीर समस्‍या

सर्दियों में पानी पीना न करें कम, हो सकती है ये गंभीर समस्‍या

*"जल ही जीवन है"* ये कहावत तो आपने सुनी ही होगी। इससे यह बात बिल्‍कुल साफ है कि पानी पीना हमारे लिए कितना जरूरी है। हमारा शरीर जिन तत्वों से बना है, उसमें जल मुख्य घटक है। अगर शरीर में जल की मात्रा कम हो जाए, तो जीवन खतरे में पड़ जाता है। गर्मियों में प्यास अधिक लगती है तो लोग पानी भी खूब पीते हैं मगर सर्दियों में यह मात्रा कम हो जाती है। इसकी एक वजह यह है कि हमें इन दिनों प्यास नहीं लगती, जिसके कारण लोग पर्याप्‍त पानी नही पीते हैं। इस वजह से कई गंभीर समस्‍याओं का सामना करना पड़ता है।
शारदा हॉस्पिटल एवं मेडिकल कॉलेज में मेडिसिन विभाग के प्रोफेसर डॉक्‍टर सौरभ श्रीवास्‍तव के अनुसार शरीर में पानी की कमी डिहाइड्रेशन, हाई ब्लड प्रेशर और इंफेक्शन जैसी बीमारियों को जन्म देती है। पानी की कमी से पाचन क्रिया भी प्रभावित होती है जिस कारण सिरदर्द और थकान की शिकायत होती है। कई लोग बुखार में मरीज को पानी नहीं देते। जबकि बुखार और डायरिया में शरीर को पानी की ज्यादा जरूरत पड़ती है। डायरिया में शरीर में पानी की कमी के कारण मरीज की हालत खराब हो सकती है। इसलिए थोड़ी-थोड़ी देर में उसे पानी देते रहना चाहिए। बुखार में शरीर का तापमान सही रखने के लिए पानी की जरूरत ज्यादा होती है।


महिलाओं के लिए है जरूरी


डॉक्‍टर श्रीवास्‍तव के मुताबिक महिलाओं को अधिक मात्रा में पानी पीना चाहिए। स्त्रियों में यूरिनरी ट्रैक्ट इंफेक्शन की समस्या होती है। इसी वजह उनके शरीर को पानी की अधिक जरूरत होती है। जो महिलाएं प्रेगनेंट हैं या स्तनपान कराती हैं उनके शरीर को पानी की ज्यादा जरूरत होती है। ऐसे में उन्हें ज्यादा से ज्यादा पानी पीना चाहिए। कोई भी इंसान खाने के बिना कई दिनों तक रह सकता हैं, पर शरीर को पानी रोज चाहिए। शरीर के मेटाबोलिज्म, डाइजेशन और एबजॉरव्शन के लिए पानी की बेहत जरूरत होती हैं। शरीर के यूरिया, सोडियम और पोटेशियम जैसे विषैले पदार्थ को बाहर करने और तापमान सही रखने के लिए पानी की जरूरत पड़ती है।


खूबसूरती के लिए


त्वचा की खूबसूरती को बरकरार रखने के लिए पानी ज्यादा से ज्यादा मात्रा में पिएं। पानी की कमी त्वचा को रूखा बनाती है। रूखी त्वचा पर झुर्रियां भी जल्द पड़ती हैं। इसलिए त्वचा में नमी के लिए पानी पीएं ताकि त्वचा चमकदार और जवां बनी रहे। शरीर में पानी की कमी मोटापा भी बढ़ाता है। पर्याप्त पानी पीने से वजन भी नियंत्रित रहता है। आप चाहें तो डाइट से भी शरीर में पानी की कमी को पूरा कर सकते हैं। खाने में खीरा, तरबूज, खरबूज और दूसरे फल शामिल कर पानी की पूर्ति कर सकते हैं। सर्दियों के मौसम में कई तरह की हरी सब्जियां मिलती हैं जिससे शरीर को पानी मिलता है।


इस वजह से भी पीएं पानी


पानी पीना इस इस बात पर भी निर्भर करता हैं कि आपकी दिनचर्या कैसी है। अगर आप ज्यादा शारीरिक मेहनत करते हैं तो आपके शरीर को ज्यादा पानी की जरूरत है। जो लोग एक्‍सरसाइज करते हैं उन्‍हें भी भरपूर मात्रा में पानी पीना चाहिए। पसीना, यूरिन अैर मेटाबोलिज्म फंक्शन के कारण शरीर में पानी की कमी होती है। इसलिए पानी ज्यादा से ज्यादा पीना जरूरी है।
*बी आर*

शेंगा उकरायला येता का ?

शेंगा उकरायला येता का ?

भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना  बारीक स्वरात  माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्हायची  …
तेंव्हा शेतात मांगवाड्यातील सर्व बायका  सर्वा काढायला जायच्या   त्या वेळच्या गोष्टी आहेत .नेहमी प्रमाणे  सुगी काडून झाल्यावर  परत पेरणी साठी शेत एकदा उकरून घ्यावे लागते किंवा नांगरून घ्यावे लागते ,किंवा कुळव फिरवावा लागतो ,किंवा मजूर लावून शेत भुसभुशीत  करून घ्यावे लागते हे सर्व टाळण्यासाठी शेतकरी काही गरीब भूमिहीन शेतमजूराना  शेतावर शेंगा करण्याचे आवताण देतात त्यास सर्वा असे म्हणतात.
नीला -फुला आज येता का ग आमच्या मळ्यात शेंगा उकरायला ? माली पाटील विंनती स्वरात कामावर बोलावत असे  रोजच्या येळला सकाळी सकाळी माली पाटील मांगवाड्यात आला होता .
माझी आजी फुला म्हणाली हो ,पाटील आम्ही येतो आज सगळया मिळून. काय काळजी करू नका .  
पाटील तिकडून आवाज देतो ,ये नीला तू पण ये बघ ,फुलाला मी आवाज दिला आहे .
रोजच्या प्रमाणे सगळ्या बायका आडावर पाणी भरत होत्या ,त्याकाळी आमच्या मांगवाड्यात एक सामायिक मोठा आड होता ,तिथे सगळे जण पोवऱ्याने शेंदून घागरीत  पाणी भरून घेऊन जात .
तिकडं मी पण पाणी भरायला गेलो आणि पाटलांचे शेंगा उकळण्याचे आवताण सगळ्यांना देऊन आलो
आज पारू माय येणार नाही असे कळले ? ती मुलाकडे लातूर ला गेली आहे .
साकुमाय ला बरं नाही आस कळलं ? या माझ्या सगळ्या आज्या . आज त्यांच्या आठवणीत हे लिहीत असताना यातल्या बऱ्याच आज्या निघून गेल्या आहेत ,मोजक्या बोटावर मोजणाऱ्या जिवंत आहेत म्हणण्या पेक्ष्या एखाद दुसरी असेल ?
हरणा माय,झिंगरा माय ,हिरकण आजी ,रुक्मा आजी ,धुरपत माय,गेंदा आजी आणि माजी आजी फुला माय सगळ्या आप आपले सकाळची कामे आटपून निघल्या होत्या ,पारू माय ची कमर दुखत आहे म्हणून उठली नाही ,माझी माय ,नीला माय पण या सगळयात जमा झाली होती ,सुनंदा काकू ,गया काकू , महानंदा काकू,या माज्या सगळ्या काकू  या सगळया  थोर मोठ्या बायका माली पाटलाचे   शेत उकरायला निघाल्या होत्या .
कालच सुगंधा माय मुंबई हुन गावी आली होती ती आपला  लेक  डॉ दत्तू  शिंदे ,याकडे जे जे दवाखान्यात राहत होती .दत्तू अणा आमचे मांगवाड्यातील पहिले एम बी बी एस डॉक्टर ,खूप हुशार ,स्त्री रोग तज्ञ् ,खूप दूरवर ख्याती पसरलेले तिथूनच ते सेवा निवृत्त झाले होते .
सुंगंधा माय  हे सगळं बघून तिचा पण उर भरून आला  नि ,ती पण आपली जुनी उकरी घरात धुंडूत होती.  सांर घर धुंडून झालं तिला काही उकरी सापडेना ,तेंव्हा ती माझी आजी फुला कंड आली ..
फुले, मला एक उकरी दे ग ? मी पण येते तुमच्या संग , बरेच दिवस झाले मला पण शेंगा खावं वाटतात आणि तुम्ही सगळ्या निघाला आहेत ,मला शेत उकरून बरेच दिवस झाले आहे ,तवा मी पण येते ,मला एक उकरी असली  तर दे ?
माझ्या आजीने सुगंधा आजी ला एक उकरी धुंडून दिली .
  सुगंधा आजी उकरी बघत राहिली ,कारण तिने बऱ्याच दिवसातुन  आपल्या हातात उकरी घेलती होती ?
तशी सुगंधा आजी खूप गोरी आणि सुंदर होती ,तर माजी सक्खी   आजी काळी होती जेवडी सुगंधा आजी गोऱ्या रंगात होती ,तेवडी माझी आजी काळी पण खूपसुंदर होती ,अख्ख्या मांग वाड्यात माझ्या आजी सारखी सुंदर नाकाची बाई नव्हती ? कारण माजी आजी नाकात एक मोत्याची नथ नेहमी वापरात असे ,त्यामुळे ती खूप सुंदर दिसे .
वरच्या आळीची पारू माय खालच्या आळीची  पारू माय या दोघी जावा होत्या ,वरच्या आळीची पारू माय मला खूप प्रेम करायची ,तर खालच्या आळीची पारू माय माझा चांगलाच उपयोग करून घेत असे ,छोटी मोठी  कामे माझा कडून करून घेत असे . दळण आणणे ,छटाक बर तुरीची डाळ ,मसुरीची डाळ ,व चहा पत्ती..  
सकाळ चे आठ वाजत असतील ,सगळ्या बाया मारुमाय च्या पारावर जमल्या होत्या ,धुर्पात माय आणिक आली नव्हती ,कारण शिव्या आणिक घरी आला नव्हता ,तिला घराची चावी शिव्या कड द्याची होती .
सगळ्या आप आपल्या उकरया घेऊन आणि रात ची शिळी भाकर  ओल्या पदरात बांधून निघाल्या होत्या ..
अगे ,निले दोन कोयते पण संग घे बघ !.. येता येता संध्याकाळी थोडे कुपाटी चे लाकडं घेऊन येऊ . !
माझ्या माय न आवाज कानावर पडताच दोन कोयते आणि दोन इळे सोबत घेतली होती ….
आज मांग वाड्यातील पोरं सुगी साजरी करणार होते ,कारण सगळ्या च्या माया माली पाटलाच्या शेतात शेंगा उकरायला गेल्या होत्या ,तसा आज शनिवार होता .
कारण सगळ्या माया चा समज होता कि ,आज शनिवारी अर्धा दिवस शाळा असते ? म्हणून माझ्या मायन मला अगोदर सगळ्या च्या पुढं केलं होत ,गणू मामा न दिलेली पांढरी शेळी घेऊन मी तिला  चरायला निघालो होतो ,मी तेंव्हा सातवीत शिकत होतो ?
किस्न्या ,प्रभ्या ,कुती बाल्या ,लुंडरी बाळ्या ,चेंगऱ्या महवन ,झांप्या कुत्रीला खेळवत खेळ करत होते ,कि नदीला पवायला जायचं का ? त्यावेळी आमची तिरु नदी वर्षाचे बारा महिने वाहत असे ,नदी पात्रात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे डोह होते ,त्यात तुळशीराम काळ्याचा डोह खूप प्रसिद्ध होता ,गावातील सगळी पोर त्या डोहावर पवायला जात असत ,आज तिकडे जाण्याचा सगळ्याचा बेत होता ?
हा हा म्हणता खालच्या आळीतील  आणि वरच्या  आळीतील  पोरांची खूप गर्दी जमली ,तेवढ्यात महाराचा ज्याल्या आणि कोंड्या पण इकडेच निघाले होते  . मांगोड्या जवळ ज्याल्याच घर असल्यामुळं कोंड्या आणि ज्याल्या लवकर मांगवाड्यात दाखल होत होते ? हे दोघे भाऊ,एक नंबर उनाड दिसायला खली सारखे ,कोंड्या दोघात मोठा ,एक डोळा लहानपणी फुटलेला ,ज्याला पण धस्थपुस्थ नेहमी जीभ बाहेर कडून लाळ गळीत असे ,दोधा भावना शाळेपेक्षा पत्ते खेळायला खूप आवडायचे ,दोघे कित्तेकदा एकत्र पत्ते खेळत . कोंड्या पात्यात हरला की ,सगळ्याचे पैसे लूट मारून घेऊन पळून जायचा ,पण ज्याला इमानदार होता.
मला थोडी  येळ झाल्यावर कळलं कि आज कुणी बी शाळेत जात नाही ,माझ्या मनात खूप इचार आले कि रानात जावं कि पोरां संग नदीला पवायला जावं? आणि मी मायला सांगितलो कि ,काळे गुरजी ला भेटून येतो अस खोटबोलून मी मायच्या चावडी तून सुटका केली आणि  मी पोबारा केला ? आणि पोरात येऊन मिसळून गेलो. एकदाची सुटका झाली ती दिवसभर उनाटक्या कारणासाठी.
मांगवाड्यातील सगळ्या बायका शेतात जुंपल्या होत्या ,पाखरांच्या रांगे प्रमाणे सगळ्या मांगिनी मान खाली घालून शेंगाचे वावर पिंजत होत्या ?  माली पाटील मागे उभा असायचा ,त्याला बायका बघायला खूप आवडत असे ,जवळ येऊन नाव विचारणे ,किती बायका आल्यात त्याचा अंदाज लावणे ? हे सगळे.कोणी मनात गाणे गुणगुणत होते ,कोणी एक मेकीत गप्पा मारीत होत्या ,तर कोणी घरातील संसारावर बोलत होत्या . हिरकन आजीचा आवाज खूप चं ती गाणे गात असे ,तसेच माझी आजी पण रोज सकाळी जासी घाव्च्या कन्या दळताना भल्या पाहते गाणे म्हणायची तशीच आज इथे शेतात पण गाणे गात होती ,ती इत्ठ्लाच्या पंढरी वारीला जाऊन आल्यापासून इठूबा रायाचे गाणे खूप गात असे. असे सगळ्या आप आपल्या तालात रंगल्या होत्या.ह्या सगळ्याचा आनंद माली पाटील घेत असे ,म्हणूनच पाटील सगळ्या बायकांना शेतात बोलवत असावा ?  
पण मालीपाटील खूप स्वछ मनाचा निर्मळ माणूस होता.शेषराव काळेगोरे त्याचं नाव ,त्यांना सगळे मालीपातील म्हणत,त्याना  संगीताची खूप आवड ,मध्ये -मध्ये नाशिकेतील आवाजात मुकेश ,रफी चे गाणे गूण गुणत असे . हळव्या मनाचा पाटील होता. माझे वडील बाजा वाजवत होते तेंव्हा चा प्रसंग ,एकदा माझे वडील किलाट वाजवताना पाटलाने पहिला,आणि ते खूप खूश झाले आणि परत परत तेच तेच गाणे वाजवायला सांगत होते ,असे ते कलेचे पण जाणते होते.
पाटलाचा गावात शिवार मोठा होता ,एकंदरीत खूप शेती होती .कमीत कमी तीन ठिकाणी शेती  विभागली होती . कधी कोणावर अन्याय न करणारा आणि सहन हि न करणारा ? असा शेषराव पाटील .
बायका शेतात शेंगा उकरायला जुंपल्या होत्या ,दुपार झाली दिस मावळतीला गेला.दूर वर शेत दिसत असे पूर्वी आमचा कडील शेती दूर सपाट आहे , कारण आमचा भूभाग तसा सपाट दक्खन च्या पठाराचा आहे .कमीत कमी पंधरा बायका जुंपल्या असतील शेतात ,भुईमुगाच्या शेंगा तश्या  कमीच पदरात पडल्या होत्या ?
शेत उकरण्याचं मोठं गोडबंगाल आहे मराठवाड्यात ,हंगाम असताना शेंगाचे वेल उपसून सुरुवातीला शेंगा काढल्या जातात . नंतर पेरणीच्या पूर्वी शेताची  मशागत कारवी लागते म्हणून शेतात अश्या प्रकारच्या बायका कामावर न लावता जेवढी तुमची टाकत तेवढे शेत उकरा आणि शेंगा घरी घेऊन जा . लालचे पोटी बायका भल्या सकाळ पासून शेतात शेंगा उकरायला येतात . मालक ,पाटील किंवा शेतकरी मोबदला न त्यांच्या कडून हे काम करून घेतो ?
खरे तर असे आहे कि ,एकदा शेंगाचे वेल  उपसून नेल्यावर शेतात एखाद दुसरी सेंग जमिनीत चुकून राहते ,जर शेत सुपीक भुसभुशीत असेल तर क्वचित शेंगा मिळतात ,आणि जास्त अंड्याचा भरणा असतो. जर एखादे शेत नापीक असेल ,खडकाळ जमीन असेल तर शेंगा मिळण्याची शक्यता कमी असते ?
मग हि पाटील मंडळी म्हणा किंवा धनिक शेतकरी अशा  बायकांचा फायदा घेऊन फुकट राबून घेतात ,यात बायकांचे कष्ट वाया जातात  ,श्रम वाया जातात ,”ना मजुरी मिळते, ना शेंगा” ,दिवस भर शेत उकरून एखाद  किलो शेंगा मिळत असतील ?
हे शेत सुपीक  करण्यासाठी ,अश्या शेंगा उकरणाऱ्या बायकांचा  शेतावर वापर केला जातो ,आणि पाटलाची मेहनत आणि पैसे याची बचत होते.

आता पैसे आणि मेहनत याची बचत कशी होते ? यांचे कडे कमीत काम दोन घरगडी असतात आणि चार पाच बैल जोडी असतात. तरी यांचा वापर करीत नाही.त्याचा वापर दुसऱ्या ठिकाणी केला जातो .  एखाद ट्रॅकटर लावून शेत सुपीक करावे लागते ,त्यासाठी रोजचा  पैसा  मोजावा लागतो यासाठी हे पाटील ,किंवा शेतकरी अश्या युक्तीचा वापर करून ,दलितांचे शोषण करीत आले आहेत,मग ते शेती रोजगाराचे शोषण असो , त्यात भर म्हणजे सामाजिक शोषण  ,राजकीय शोषण  ,किंवा शैक्षणिक शोषण असे सगळ्या आघाडीवर दलितांचे शोषण केले जाते.  यालाच एक प्रकारचे करप्शन म्हणता येईल.ग्रामीण पातळीवर शोषणाला अशीही एक बाजू आहे
BRS©

अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...