Showing posts with label आर्थिक मंथन. Show all posts
Showing posts with label आर्थिक मंथन. Show all posts

Friday, July 22, 2022

जिंदगी के साथ भी! जिंदगी के बाद भी!!

#जिंदगी_के_साथ_भी 
#जिंदगी_के_बाद_भी 

एक काळ होता लोकांना सरकारी नोकरी असणे म्हणजे दिव्य होते.काळ बदलत गेला हळू हळू लोकांना सरकारी , निमसरकारी,खाजगी नोकऱ्या मिळू लागल्या.

मग लोकांनी एकच नाही तर जोडधंदा म्हणून दोन नोकरी करणे,अर्धवेळ काम करणे आणि मुला बाळांसाठी ,त्यांच्या शिक्षणासाठी नोकऱ्या करू लागले .हळू हळू स्त्रिया शिक्षित झाल्या आणि त्याही चुली ओलांडून शाळा ,कंपनी, कार्यालय ,दवाखाने जिथे मिळेल तिथे नोकरी आणि नोकरी.मग कुठं काम तर कोठ  नाही.कुठं एक पगार तर कुठे दोन ते तीन पगारदार झाले,मिळकती वाढत गेल्या.

वर्गवारी चा विचार करता मध्यमवर्ग LIC या एकाच ठिकाणी महिना काठी जुजबी पैसे गुंतवू लागला.या पॉलिसी यवढ्या जोमात आल्या की एखादे छोटेखानी कर्ज हवे तर तुमची LIC पॉलिसी काढली आहे का ? हा हमखास  सवाल.मग ही पॉलिसी असेल तर नक्की १६ते १८ टक्के दराने तुमच्या पदरात कर्ज.

हळू हळू यवढ्या बाजारात विमा कंपन्यांचा  सुळसुळाट झाला की ,गल्ली बोळात शाखा आल्या,मास्तर, नोकरदार आणि तत्सम कामगार हे या विमा कंपनीचे बकरे झाले.यांनी सुरुवातीला आपल्याच घरात,मित्राला ,आणि जवळीक ठेवत असलेल्या व्यक्तींना असे गंडवले की आकडा सांगता येणार नाही यवढ्या ,ग्रामीण,शहरी आणि निमशहरी भागात अगणित  विमा उतरवल्या गेल्या...

यात मग पॉलिसी ही कांहीं दोन तीन वर्षात नाही मिळत ? तब्बल २०वर्ष म्हणजे २तप.आता या दोन तपात काय सावळा गोंधळ झाला असेल? ते पहा . 

ती आकडेवारी वेगळी?.१० टक्के बंद पडल्या १०टक्के हरवल्या,१०टक्के गहाळ झाल्या.१०टक्के लोकं मेली.१०टक्के क्लेम करू शकले नाहीत.१०टक्के २००५ च्या अतिवृष्टीमुळे  वाहून गेल्या.१० टक्के चुकीच्या पत्त्यामुळे ,घर बदली मुळे,शहर सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित  झाल्याने हातच्या निघून गेल्या. या एकूण ७०टक्के गुराळा प्रमाणे नांद भरून वाहून गेल्या.

आता उरल्या त्या २०वर्ष काळासाठी वेशीवर टांगलेल्या.किंवा आपण त्यांना घोंगड्यागत भिजत पडल्या असे म्हणू या. परिपक्व झाल्यावर किती मिळणार तर २ जेमतेम दोन लाख (ते विम्यावर निर्भर करते आहे). हातात मिळतात.तेंव्हा एक तर तुम्ही सेवा निवृत्त झाले असणार .मग हे वीस वर्ष जमा केलेलं  धन काय कामाचे? कुणासाठी?

तात्पर्य ही रक्कम कुठे इतरत्र गुंतवली असती तर नक्कीच २० लाख मिळाले असते.जसे शेअर मार्केट,मुचूवल  फंड,स्टोक्स,असे आणि अनेक प्लॅटफॉर्म आहेत ते सामान्य लोकांना माहिती नाहीत.याच गोस्टिचा  फायदा घेत २०वर्ष गळफास लावून LIC ने पैसा उकळायला सुरुवात  केली आणि अजून हे सत्र  चालूच  आहे.

आज मितीला LIC कडे जो फंड क्लेम केला नाही तो २१,३३६ करोड आहे.हा कोणाचा पैसा आहे? सरकार चा की रिजर्व  बँकेचा? अहो तुमच्या  आमच्या घामाचा पैसा तो . 

आज सर्व सामान्ये गरीब ,भूमिहीन शेतमाजुर  वर्गाच्या गळ्यात डिजिटलच्या फांदात  ज्यांना खायला पैका नाही त्यांची बँक खाती काढून पैसा मग ते शून्य खाती असो की न्यूनेतम  ठेवी असो .पण पैसा एकंदरीत बँकेत तर जातो आहे.माणूस एकंदरीत खंगाळून रीता होत चालला आहे,हे सत्ये नाकारता येणार नाही . 

मी लिहलेला हा  लेख  कांहीं संशोधन अहवाल नाही फक्त मी एक सामान्य विमाधारक म्हणून जिवाच्या आकांताने लिहले  आहे." जागो ग्राहक जागो " या युक्ति प्रमाणे . 

समजा एखाद्या व्यक्तीने संपूर्ण सेवेत विमा कंपनी कडे पैसा भरला आणि आता तो विश्रांति इछितो  ,त्याला सेवानिवृत्ती नंतर तरी, सुखाने त्याचे  जीवन जगू द्या.
त्याला आर्थिक विश्रांति हवी आहे ,आर्थिक सुब्बता नको. 

आज शरमेची बाब अशी आहे की ,तुम्ही निवृती नावाचा प्लॅन घेऊन आला आहे.म्हणजे त्याने मसणात  जाई पर्यंत विम्याचे पैसे भरायचे? का  आणि कोणासाठी ? हे थोतांड बंद झाले पाहिजे असे तुमला का वाटत नाही ?.

आज मितिला असलेला तुमचा Unclaimed Mony ' मार्गी लावा. भूकबळी,विधवा,अशिक्षित मुले, शाळाबाह्य लेकरे,पडीक शाळा इथे कामी येऊ द्या.

विमा मग कोणताही असो !दूर राहा.त्यात कोणाचे कल्याण आहे,जसा पाण्यात कासव ठेवला की घरात पैसा राहतो.पण तो पैसा काचेचा कासव विकणाऱ्या मालकाच्या घरात जातो आहे,तुम्ही आज मितिला  रीते आहेत.देशात अगणित विमा कंपन्या अब्जावधी मालमत्ता कमाई करून बसल्या आहेत.तेंव्हा दूर राहा ,आणि मानसिक तणावातून सुटा.

प्रा.बी आर शिंदे.नेरूळ नवी मुंबई ७०६

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...