Thursday, February 23, 2017

शेंगा उकरायला येता का ?

भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना  बारीक स्वरात  माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्हायची  …
तेंव्हा शेतात मांगवाड्यातील सर्व बायका  सर्वा काढायला जायच्या   त्या वेळच्या गोष्टी आहेत .नेहमी प्रमाणे  सुगी काडून झाल्यावर  परत पेरणी साठी शेत एकदा उकरून घ्यावे लागते किंवा नांगरून घ्यावे लागते ,किंवा कुळव फिरवावा लागतो ,किंवा मजूर लावून शेत भुसभुशीत  करून घ्यावे लागते हे सर्व टाळण्यासाठी शेतकरी काही गरीब भूमिहीन शेतमजूराना  शेतावर शेंगा करण्याचे आवताण देतात त्यास सर्वा असे म्हणतात . शेताची मशागत तर होते पण गरिबांच्या हातात दिवसभर शेत उकरून  कवडी मोल शेंगा मिळतात.  
नीला -फुला आज येता का ग आमच्या मळ्यात शेंगा उकरायला ? माली पाटील विंनती स्वरात कामावर बोलावत असे
रोजच्या येळला सकाळी सकाळी माली पाटील मांगवाड्यात आला होता .
माझी आजी फुला म्हणाली हो ,पाटील आम्ही येतो आज सगळया मिळून. काय काळजी करू नका .  
पाटील तिकडून आवाज देतो ,ये नीला तू पण ये बघ ,फुलाला मी आवाज दिला आहे .
रोजच्या प्रमाणे सगळ्या बायका आडावर पाणी भरत होत्या ,त्याकाळी आमच्या मांगवाड्यात एक सामायिक मोठा आड होता ,तिथे सगळे जण पोवऱ्याने शेंदून घागरीत  पाणी भरून घेऊन जात .
तिकडं मी पण पाणी भरायला गेलो आणि पाटलांचे शेंगा उकळण्याचे आवताण  देऊन आलो
आज पारू माय येणार नाही असे कळले ? ती मुलाकडे लातूर ला गेली आहे .
साकुमाय ला बरं नाही आस कळलं ? या माझ्या सगळ्या आज्या . आज त्यांच्या आठवणीत हे लिहीत असताना यातल्या बऱ्याच आज्या निघून गेल्या आहेत ,मोजक्या बोटावर मोजणाऱ्या जिवंत आहेत म्हणण्या पेक्ष्या एखाद दुसरी असेल ?
हरणा माय,झिंगरा माय ,हिरकण आजी ,रुक्मा आजी ,धुरपत माय,गेंदा आजी आणि माजी आजी फुला माय सगळ्या आप आपले सकाळची कामे आटपून निघल्या होत्या ,पारू माय ची कमर दुखत आहे म्हणून उठली नाही ,माझी माय ,नीला माय पण या सगळयात जमा झाली होती ,सुनंदा काकू ,गया काकू , महानंदा काकू,या माज्या सगळ्या काकू  या सगळया  थोर मोठ्या बायका माली पाटलाचे   शेत उकरायला निघाल्या होत्या .
कालच सुगंधा माय मुंबई हुन गावी आली होती ती आपला  लेक  डॉ दत्तू  शिंदे ,याकडे जे जे दवाखान्यात राहत होती .दत्तू आणा आमचे मांगवाड्यातील पहिले एम बी बी एस डॉक्टर ,खूप हुशार ,स्त्री रोग तज्ञ् ,खूप दूरवर ख्याती पसरलेले तिथूनच थे सेवा निवृत्त झाले होते .
सुंगंधा माय  हे सगळं बघून तिचा पण उर भरून आला  नि ,ती पण आपली जुनी उकरी घरात शोधात होती . घर सार शोधून झालं तिला काही उकरी सापडेना ,तेंव्हा ती माझी आजी फुलं कंड आली ..
फुले मला एक उकरी दे ग ? मी पण येते बरेच दिवस झाले मला पण शेंगा खावं वाटतात ,आणि तुम्ही सगळ्या निघाला आहेत ,मला शेत उकरून बरेच दिवस झाले आहे ,तवा मी पण येते ,मला एक उकरी असली  तर दे ?
माझ्या आजीने सुगंधा आजी ला एक उकरी धुंडून दिली .
सुगंधा आजी उकरी बघत राहिली ,कारण तिने बऱ्याच दिवसातुन  आपल्या हातात उकरी घेलती होती ?
तशी सुगंधा आजी खूप गोरी आणि सुंदर होती ,तर माजी सक्खी   आजी काळी होती जेवडी सुगंधा आजी गोऱ्या रंगात होती ,तेवडी माझी आजी पण सुंदर होती ,अख्ख्या मांग वाड्यात माझ्या आजी सारखी सुंदर नाकाची बाई नव्हती ? कारण माजी आजी नाकात एक मोत्याची नथ नेहमी वापरात असे ,त्यामुळे ती खूप सुंदर दिसे .
वरच्या आळीची पारू माय खालच्या आळीची  पारू माय या दोघी जावा होत्या ,वरच्या आळीची पारू माय मला खूप प्रेम करायची ,तर खालच्या आळीची पारू माय माझा चांगलाच उपयोग करून घेत असे ,छोटी मोठी  कामे माझा कडून करून घेत असे . दळण आणणे ,छटाक बर तुरीची डाळ ,मसुरीची डाळ ,व चहा पत्ती..  
सकाळ चे आठ वाजत असतील ,सगळ्या बाया मारुमाय च्या पारावर जमल्या होत्या ,धुर्पात माय आणिक आली नव्हती ,कारण शिव्या आणिक घरी आला नव्हता ,तिला घराची चावी शिव्या कड द्याची होती .
सगळ्या आप आपल्या उकरया घेऊन आणि रात ची शिळी भाकर  ओल्या पदरात बांधून निघाल्या होत्या ..
अगे ,निले दोन कोयते पण संग घे बघ !.. येता येता संध्याकाळी थोडे कुपाटी चे लाकडं घेऊन येऊ . !
माझ्या माय न आवाज कानावर पडताच दोन कोयते आणि दोन इळे सोबत घेतली होती ….
आज मांग वाड्यातील पोरं सुगी साजरी करणार होते ,कारण सगळ्या च्या माया माली पाटलाच्या शेतात शेंगा उकरायला गेल्या होत्या ,तसा आज शनिवार होता .
कारण सगळ्या माया चा समज होता कि ,आज शनिवारी अर्धा दिवस शाळा असते ? म्हणून माझ्या मायन मला अगोदर सगळ्या च्या पुढं केलं होत ,गणू मामा न दिलेली पांढरी शेळी घेऊन मी तिला  चरायला निघालो होतो ,मी तेंव्हा सातवीत शिकत होतो ?
किस्न्या ,प्रभ्या ,कुती बाल्या ,लुंडरी बाळ्या ,चेंगऱ्या महवन ,झांप्या कुत्रीला खेळवत खल करत होते ,कि नदीला पवायला जायचं का ? त्यावेळी आमची तिरु नदी वर्षाचे बारा महिने वाहत असे ,नदी पात्रात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे डोह होते ,त्यात तुळशीराम काळ्याचा डोह खूप प्रसिद्ध होता ,गावातील सगळी पोर त्या डोहावर पोचवायला जात असत ,आज तिकडे जाण्याचा सगळ्याचा बेत होता ?
खालच्या आळी तील  आणि वरच्या  आळीच्या  पोरांची गर्दी जमली ,तेवढ्यात महाराचा ज्याल्या आणि कोंड्या पण इकडेच निघाला होता  . मांगोड्या जवळ ज्याल्या च घर असल्यामुळं कोंड्या आणि ज्याल्या लवकर मांगवाड्यात दाखल होत होते ?
मला थोडी  येळ झाल्यावर कळलं कि आज कुणी बी शाळेत जात नाही ,माझ्या मनात खूप इचार आले कि रानात जावं कि पोरां संग नदीला पवायला जावं? आणि मी मायला सांगितलो कि ,काळे गुरजी ला भेटून येतो ? आणि मी पोबारा केला ? आणि पोरात येऊन मिसळून गेलो .
सगळ्या बायका शेतात जुंपल्या होत्या ,पाखरांच्या रांगे प्रमाणे सगळ्या मांगिनी मान खाली घालून शेंगाचे वावर पिंजत होत्या ?  माली पाटील मागे उभा असायचा ,त्याला बायका बघायला खूप आवडत असे ,जवळ येऊन नाव विचारणे ,किती बायका आल्यात त्याचा अंदाज लावणे ? हे सगळे .
पण माली पाटील खूप स्वछ मनाचा निर्मळ राजा होता ,त्याला संगीताची खूप आवड ,मध्ये -मध्ये नाशिकेतील आवाजात मुकेश ,रफी चे गाणे गूण गुणत असे . हळव्या मनाचा पाटील होता ,गावात शिवार मोठा होता ,एकंदरीत खूप शेती होती .तीन ठिकाणी विभागली होती . कधी कोणावर अन्याय न करणारा आणि सहन हि न करणारा ?असा शेषराव पाटील .
बायका शेतात जुंपल्या होत्या ,दुपार झाली दिस मावळतीला गेला ,कमीत कमी पंधरा बायका जुंपल्या असतील शेतात ,भुईमुगाच्या शेंगा काही कमीच पदरात पडल्या असतील ?
शेत उकरण्याचं मोठं गोडबंगाल आहे मराठवाड्यात ,हंगाम असताना शेंगाचे वेल उपसून सुरुवातीला शेंगा काढल्या जातात . नंतर पेरणीच्या पूर्वी शेताचॆ मशागत कारवी लागते म्हणून शेतात अश्या प्रकारच्या बायका कामावर न लावता जेवढी तुमची टाकत तेवढे शेत उकरा आणि शेंगा घरी घेऊन जा . या लालचे पोटी बायका भल्या सकाळ पासून शेतात शेंगा उकरायला येतात . मालक न मोबदला देतो ना त्यांनी उकरून घेतलेल्या शेंगा मागतो ? कारण या मागे मोठे अर्थकारण जडलेले आहे ते मला खूप उशिराने  कळले होते ?
खरे तर असे आहे कि ,एकदा शेंगाचे वेल  उपसून नेल्यावर शेतात एखाद दुसरी सेंग जमिनीत चुकून राहते ,जर शेत सुपीक भुसभुशीत असेल तर कवचीत सेंग मिळतात ,जर एखादे शेत ना पीक असेल ,खडकाळ जमीन असेल तर शेंगा मिळण्याची शक्यता कमी असते ?
मग हि पाटील मंडळी म्हणा किंवा धनिक शेतकरी अशा भोळ्या बायकांचा फायदा घेऊन फुकट राबून घेतात ,कष्ट वाया जाते ,श्रम वाया जाते ,न मजुरी मिळते ना शेंगा ,दिवस भर शेत उकरून एखाद  किलो शेंगा मिळत असतील ?
हे शेत सुपीक  करण्यासाठी ,अश्या शेंगा उकरणाऱ्या बायका शेतावर वापर करतात ,आणि पाटलाची मेहनत आणि पैसे याची बचत होते ?
आता पैसे आणि मेहनत याची बचत कशी होते ? यांचे कडे कमीत काम दोन घरगडी असतात ,आणि चार पाच बैल जोडी असतात ? तरी यांचा वापर करीत नाही ?त्याचा वापर दुसऱ्या ठिकाणी केला जातो .  एखाद ट्रॅकटर लावून शेत सुपीक करावे लागते ,त्यासाठी रोजचा  पैसा  मोजावा लागतो यासाठी हे पाटील ,किंवा शेतकरी अश्या उक्तीचा वापर करून ,दलित शोषित आणि बहुजनांचे आदिम काळापासून शोषण करीत आले आहेत ,जसे  मंदिरात बसून शोषण चालू आहे ,त्या पेक्ष्या विदारक वास्तव ,शेतकरी, पाटील मग तो गढी चा पाटील असो कि चिरेबंदी वाड्यावरील पाटील असो ,या वर्गाने बहुजनांचे  असे नकळत छुपे  शोषण केले आहे ,मग ते शेती रोजगाराचे शोषण असो ,शेतमजुरीचे शोषण असे  आर्थिक शोषण हे आदिम काळापासून सुरूच आहे  ,आणि त्यात भर म्हणजे सामाजिक शोषण  ,राजकीय शोषण  ,किंवा शिक्षणाचे शोषण असे सगळ्या आघाडीवर याच वर्गाने बहुजनांचे शोषण केले आहे.  यालाच एक प्रकारचे करप्शन म्हणता येईल आणखी काय उपमा देता येईल . एवढा अनर्थ या वर्गाचा जर कश्यामुळे झाला असेल तर शिक्षण .

brs/23/02/2017

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...