Wednesday, April 13, 2022

जातिअंताच्या लढ्यापुढील दीपस्तंभ ... लोकसत्ता . लेखावर प्रतिक्रिया

 

आज दिनांक १३ एप्रिल लोकसत्ता मधील प्रसाद जाधव कुलकर्णी लिखित उपरोक लेख वाचण्यात आला. आज जात जाणिवा कश्या बळकट होत आहेत ,त्याचा बीमोड करण्यास महात्मा फुले आणि डोक्टर बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार किती प्रवर्तक आहेत ते विषाद केले आहे .

तसे पाहता आज जात ही एक बांधीस्त वर्ग होऊन बसली आहे  . जातिअंताच्या लढाईचे मूळ  हे जरी महात्मा फुले आणि डोक्टर आंबेडकर यांनी ठणकावून संगितले असले तरी आज राजकीय सत्ता आणि विविध विवाह संस्था या जाती व्यवस्थेला खतपाणी घालताना दिसून येत आहेत .

जात निर्मिती हे मानव निर्मित असून तत्कालीन प्रस्थापित , उच्चवरणीयांनी निर्माण केलेले आहे . ती आज तागायत तग धरून बसलेली आहे ? जात नाही ती जात . जाति या मनू ने निर्माण केलेल्या नाहीत हे डॉक्टर बाबासाहेब यांनी ठाम पणे नमूद केलेले  आहेच . या जात संस्थेचे अनुकरण आज ही मोठ्या प्रमाणात तळाचा वर्ण करीत असल्याचे पदोपदी अनुभव येत आहेत . मनू हा जात प्रचारक होता .

हिंदू समाजातील जातीचा पुंजका हे व्यक्ति ,समाज आणि देश विकासाला मारक ठरत चालले आहे . आजमितीला विविध माध्यमाद्वारे होणारे जातीचे मेळावे ,सम्मेलन हे जाती एक्याला बळकट करणारे आहे . हे असे विविध जातिबांधीलकीचे कार्यक्रम  सामाजिक एकजुटीला  टाडा देताना दिसत आहेत .

जातिअंतापेक्ष्या जातबळकटिकरण ,धार्मिकरण ,परधर्मद्वेष ,हे सामाजिक ,आर्थिक ,आणि देश विकास यास खिळ घालताना दिसून येत आहे.

उद्या होणार्‍या प.पू. डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित जातिअंताचा संकल्प करून जाति निर्मूलनचा विडा उचलावा ,अश्या करण्याने महामावांची खरी  जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल .

प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरूळ ७०६


#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...