एम.करुणानिधी हे पेरियार
आणि अण्णादुराई यांच्या मुशीत घडलेले क्रांतिकारक व्यक्तिमत्व.
बी. आर. शिंदे ,नेरूळ -७०६
“महिला साठी कायदे
आणि विकास करण्यात ते मागे नाही राहिले .महिलांना
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ टक्के जागा राखीव ठेवणारे व ते मिळउन देणारे तामिळनाडू
हे देशातील पहिले राज्य गणले गेले.”
“जमीनधारणा
कायद्यात बदल करून कमाल जमीनधारणे कायदा तयार केला पूर्वीची जुनी जमीन धारणा असलेली कमाल मर्यादा १५
एकर ची केली .हि मर्यादा घालणारे व
हीमर्यादा मंदिरांना लागू करणारे तामिळनाडू हे भारतातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले”
“सिलिंग
कायद्यानुसार अतिरिक्त जमीन भूमिहीनांना वाटप करतांना मागासजातींना प्राधान्य
देण्याचा त्यांचा निर्णय क्रांतिकारी स्वरूपाचा होता.”
पेरियार आणि अण्णादुराई यांच्या मुशीत घडलेले
क्रांतिकारक व्यक्तिमत्व सामजिक
व आर्थिक न्यायाचा प्रखर पुरस्कर्ता
म्हणून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व .बाल वयात आलेलं जाती व्यवस्थेचे बंधन आणि मनावर
झालेले वाईट परिणाम या मधून ते बाहेर आले आणि त्या बाबींचा परिणाम इतर लोकांवर होऊ
नये म्हणून ,ब्राह्मण विरोधी चळवळीचा धागा होऊन गेले ते कायमचे .हे त्यांच्या त्यांच्या
लिखाणातून आग ओखताना पाहिलं आहे स्वतः लेखन कौशल्य असल्या कारणाने ते आपल्या मुख
पत्र “मुरासोली” त लिहित असत .याच लेखन कार्यामुळे ते सुप्रसिध् झाले होते .मित्र
मंडळी साठी आपले रोजचे विचार पोहचावे म्हणून ते “उडणपिरप्पे” हा स्थंभ
लिहून आपले विचार मांडीत असत .आणि ब्राह्मणी विचार हाणून पाडीत असत.याच काळात ते
संपूर्ण तमिळ बहुजन जनतेचा आधार होऊन गेले होते.
विचाराने ते विवेकवादी व आचाराने राज्य
समाजवादी होते.त्यांना दोन मुले आणि एक
मुलगी असा परिवार ,त्यांनी आपल्या एका मुलांचे नाव स्टालिन ठेवले व दुसऱ्या
मुलाचे नाव अळगिरी (हे द्रविडचळवळीतील प्रखर देव-धर्म विरोधी व ब्राह्मणविरोधी
नेते होते.)
त्यांनी शिवाजी
गणेशन या प्रसिद्ध अभिनेत्याला देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले या कारणावरून द्रमुक पक्षातून हाकलून दिले
होते.कारण ते एक विचारी आणि निश्चयी होते
. त्यांच्या मनावर विवेकवादी व समाजवादी विचारांचा
प्रभाव होता हे यातून जाणवते.
करुणानिधीनी तामिळनाडूचे
मुख्यमंत्री म्हणून निर्विवाद सत्ता हातात घेतल्यानंतर राज्यात सामजिक व आर्थिकन्याय प्रस्थापित
करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्या .
यात जमीनधारणा कायद्यात बदल करून
कमाल जमीनधारणे कायदा तयार केला
पूर्वीची जुनी जमीन धारणा असलेली कमाल मर्यादा १५
एकर ची केली .
अशी मर्यादा घालणारे व ही मर्यादा मंदिरांना लागू करणारे तामिळनाडू
हे भारतातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले.सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमीन
भूमिहीनांना वाटप करतांना मागासजातींना प्राधान्य देण्याचा त्यांचा निर्णय
क्रांतिकारी स्वरूपाचा होता.याशिवाय सर्व जातींतील लोकांना मंदिरातील पुजारी
बनण्याचा कायदा केला जेणे करून जाती
व्यवस्था हि समूळ नस्थ करता येईल हा त्या मागील हेतू होता ,महिलांना वडिलोपार्जित
संपत्तीत समान वाटा मिळण्याचा कायदा, शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांचे आरक्षण २५ टक्क्यांवरून ३१ टक्के
पर्यंतवाढविण्याचा निर्णय, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३०
टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा
निर्णय,
अतिमागास जाती हा स्वतंत्रप्रवर्ग तयार यांच्या कळत करण्यात आला .स्वतंत्र प्रवर्ग तयार करून
त्यांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात २० टक्के आरक्षणदेण्याची तरतूद असे अनेक
क्रांतिकारी निर्णय त्या शिक्षण सम्राट
ने घेतले होते आणि समाज ,राज्य आणि देश विकासचा पाया रचला होता .या
सर्व जातीधार्माला सुविधा देणारे तामिळनाडू राज्य भारतात आघाडीवर आले होते .
राज्य सरकारतर्फे त्यांनी प्रत्येक जातींची गणना करून लोकसंख्येच्या प्रवर्गानुसार शिक्षण,नोकऱ्याची संधी निर्माण
केली ,
शेती तसेच रोजगाराच्या संधीचेवाटप करण्याचा क्रांतिकारी निर्णय
करुणानिधी यांनी घेतला व आपल्याप्रदेशात लागू केला.एक कमालीचा कायदा करून एकूणच अनुसूचित जाती/जमातीं व तथाकथित सवर्ण
जातीयांच्यासाठी मोफत घरे बांधून देण्याची 'समदुवापुरम' नावाची एक नाविन्यपूर्ण योजना त्यांनी सुरु केली. या योजनेनुसार
दलित,मागास आणि सवर्ण यांना एकमेकांच्या
शेजारी संयुक्त भिंती ठेऊन घरे बांधून देण्यात येऊ लागली.
जाती निर्मुलनात ते मागे राहिले नाहीत .जातीभेद
नष्ट करण्याचा हा एक अत्यंत व्यावहारिक आणि क्रांतिकारक बद्दल
करून घेतला यात शंकाच नाही.
करुणानिधी यांनी केवळ जाती आधारित सामाजिक सुधारणाकेल्या असे नाही. सर्व जातींमधील
गरीब आणि दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूरव्हावे, त्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे ,उत्तम
आणि मोफत आरोग्य इत्यादी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले .एवढ्या वर न थांबता त्यांनी मोफत शिक्षण व मोफत आरोग्य विमा योजना सुरु केली होती .
शिदा वाटपात पण त्यांनी क्रांतिकारी बदल केले होते .यात मोफत अन्नदान योजना,२ रुपये
किलो दराने धान्यवाटप योजना, शेतकर्यासाठी शेतीपंपासाठी लागणारी वीज
मोफत देण्याची योजना,अश्या अनेक योजना राबल्या आणि त्या येश्स्वी करू दाखवल्या
.रस्त्या रस्त्यातून हातरिक्षा
ओढण्याची अमानुष प्रथा बंद केली
जी आदिम काळापासून तामिळनाडू राज्यात चालू होती .या परंपरा बंद करून नाही थांबले
त्यांना पर्यायी नोकरी व काम धंद्याची सोय करून दिली होती.पूर्वी शाळेत धार्मिक
प्रथानेला खूप राज्श्राय होता तो मोडीत काढून शाळेतील धार्मिकप्रार्थना
बंद केल्या अनेक थरातून विरोध झाला पण ते
आपल्या विचारापासून तसूभर हि मागे हटले नाहीत.”कारण धर्म कांही नवे शिकवीत नाही
अशी त्यांची धारणा होती.”असे अनेक धाडसी आणि
क्रांतिकारी निर्णय त्यांनी आपल्या एकूण १९
वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतले व त्याची कठोर अमलबजावणी हि केली.
महिला साठी कायदे आणि
विकास करण्यात ते मागे नाही राहिले.महिलांना स्थानिक स्वराज्य
संस्थामध्ये ३३ टक्के जागा राखीव ठेवणारे व ते मिळउन देणारे तामिळनाडू हे देशातील पहिले राज्य गणले गेले हा संपूर्ण मान करुणानिधी यांच्या दूर दृस्ठी
कार्यास जातो .
तामिळनाडू वगळता देशाच्या अन्य कोणत्याही राज्यातील कोणाही
नेत्यांमध्ये किंवा मुख्यमंत्री
पदी असलेल्या व्यक्ती मध्ये ते धाडस न्हवते
असे क्रांतिकारी निर्णय घेण्याचे व ते लागू करण्याचे धाडस अद्यापही नाही यातच
करुणानिधींचे क्रांतीकारकत्व आणि
विकस पर्व व्यक्तीमत्व दिसून
येते.
Posted on 06/09/2018