Showing posts with label ऐतिहासीक पुस्तक. Show all posts
Showing posts with label ऐतिहासीक पुस्तक. Show all posts

Tuesday, June 14, 2022

वोल्गा से गंगा -महापंडित राहुल सांकृत्यायन

वोल्गा_से_गंगा : महापंडित राहुल सांकृत्यायन
हे हिन्दी पुस्तक वाचनात आले  ...

मी पुस्तक खरेदी करून वाचून झालं की माझे काका चालवत असलेल्या वाचनालयात जाऊन भेट देऊन येतो .मोजकी घरी ठेवली आहेत .करण ते पुनःपुन्हा वाचावे लागतात .परत खरेदी नको .त्यातील हे एक पुस्तक होय.

आपण जरी मराठी भाषिक असलो तरी मराठी त लिहलेले वाचत असताना हिंदीत लिहलेले असेल तर ते हिंदीच वाचावे .कारण खरा गुळ आणि खरा पाक कळत नाही ,तेंव्हा काकवी किंवा पाक उसाचा रस लागतो ...हे झाले गुऱ्हाळ .

एक मी पर्वा #हरमन_हेस लिखित 'सिद्धार्थ ' हे पुस्तक खरेदी केलें ,अनुवाद उल्का राऊत यांनी  मराठीत केला आहे ...किती काय काय घुसडतात आणि लिहतात याची प्रचिती येते आणि कीव वाटते .

हरमन हेस जरी साहित्यातील नोबेल पुसरस्कार प्राप्त लेखक असले तरी ,बुद्धावर लिहणे नाही जमले आणि भाषांतर तर विरळच ..असो तो आपला विषय नाही.

जगविख्यात लेखक राहुल संकृत्ययान यांचं १९४२ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक ज्याची पहिली आवृत्ती केवळ आठ महिन्यात संपते .ही लेखक आणि प्रकाशक यांच्या साठी खूप आनंदाची बाब होय.

मी शक्यतो मूळ पुस्तक वाचतो .हे पुस्तक हातात घेतल्यास एक नवीन शब्द मला दिसला आणि मी ती कथा प्रथम  वाचण्याचे ठरवले ...'बन्धल मल्ल' म्हणजे बुद्ध !

शंभर वर्षा पूर्वी ची ऐतिहासिक गोस्ट आहे.तेंव्हा सामाजिक अराजकता समाजात आणि एकंदर देशात मोठ्या प्रमाणावर मजली होती. व्यापारी वर्गाच्या हातात सत्ता होती आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक ,आर्थिक पिळवणूक चालू होती ...

कथा वाचावी !

"राहुल सांकृत्यायन आपल्याला ‘व्होल्गा ते गंगा’ या कथासंग्रहातील २० कथांद्वारे टाइममशीनमधून आठ हजार वर्षे मागे घेऊन जातात आणि मानवाचा आठ हजार वर्षांचा प्रवास गोष्टिरूपाने दाखवतात.

व्होल्गेच्या काठावर राहणाऱ्या या परिवाराचे आयुष्य अतिशय खडतर आहे. शिकारीसाठी भटकणे, नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे आणि सततचे टोळीयुद्ध यांमुळे परिवाराचे आयुष्य संघर्षमय आहे.

२० कथांमध्ये चार रिकरिंग थीमस् म्हणजेच लेईटमोटिफ ठेवले आहेत – सामंतशाही आणि राजेशाही, युद्ध, दासप्रथा आणि स्रीदास्य. व्होल्गातीरावर झालेल्या भारतीय संस्कृतीच्या उगमापासून गंगातीरी झालेला विकास आणि स्थिराव यांचा इतिहास म्हणजे दमनाचा, शोषणाचा, काही लोकांच्या सुखासाठी इतरांचे शोषण करण्याचा इतिहास आहे. 

सांकृत्यायनच्या कथांमधील पुरुहुतु, बंधुलमल्ल, नागदत्त, प्रभा, अश्वघोष, सुपर्ण यौधेय, मंगल सिंह, सफदर, सकिना, शंकर, सुमेर या पात्रांप्रमाणे चांगले लोक असतात, ते बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, ते बदल काही काळपर्यंत प्रभावी ठरतात पण शेवटी माणसाची भोगलोलुपता जिंकते. असे वास्तववादी चित्र सांकृत्यायनांनी रंगवले आहे. सुमेर या शेवटच्या कथेत सांकृत्यायन यांनी कम्युनिझमचा खुलेपणाने पुरस्कार केला आहे.

संपूर्ण कथासंग्रहच इतिहासाचे मार्कसिस्ट इंटरप्रिटेशन आहे असे म्हणता येईल. गांधींच्या असहकार चळवळीला, कनिष्ठ जातींना ‘हरिजन’ म्हणून ‘आहे तिथेच सडत राहा’ या वृत्तीला सुमेर नकार देतो, आंबेडकरांच्या मर्यादा सांगतो आणि कम्युनिझम हेच समतेचा युटोपीयन समाज प्रत्यक्षात आणण्याचे साधन आहे असे सांगतो. पण ‘इजम’ कोणताही असला तरी मानवी स्वभावातली सत्तेची लालसा, भोगलोलुपता, दुसऱ्याच्या जिवावर ऐश करण्याची वृत्ती मात्र तशीच असते.  पर्यायाने सांकृत्यायनन  काहीच भाष्य केलेले नाही .

लेखक :महापंडित राहुल सांकृत्यायन
पुस्तक वोल्गा से गंगा.(हिन्दी)
कीमत ::२५०/-
पुनर्मुद्रण: 2022
वितरक : किताब महल ,दिल्ली०२
प्रकाशक : किताब महल ,दिल्ली ०२
प्रा बी आर शिंदे ,विशेष कर्णबधिरांचे शिक्षण . नेरूळ -७०6

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...