Showing posts with label अंधश्रद्धा निर्मूलन. Show all posts
Showing posts with label अंधश्रद्धा निर्मूलन. Show all posts

Friday, September 15, 2023

संकट में। हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में।

संकट में।..

हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में!

........................प्रा.बा.र.शिंदे,नेरूळ

तमिलनाडु चे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन  यांनी सनातनवर मोठे संकट निर्माण केलं आहे.
सनातन हाधर्म नसून ही एक भ्याड प्रवृत्ती आहे.सनातन ची  तुलना ते डेंगू, मलेरिया असे करता. सनातन हा हिंदू धर्माचा भाग आहे हे भक्तांना वेगळे वाटत नाही.?
तसे पाहता सनातन या शब्दाचा अर्थ प्राचीन काळापासून चालेल आलेला चिरंतन ,अविनाशी असा आहे.(Orthodox)
आत्मा , पुनर्जन्म या संकल्पना मानत असलेल्या हिंदू धर्माला सनातन धर्म असे म्हटले जाते.
तसे पाहता वेदामध्ये कुठेही सनातन धर्म असा उल्लेख आढळ नाही .हिंदू धर्मात सनातन ही संकल्पना पूर्वापार माहिती असली तरी तिची प्रामुख्याने चर्चा सुरू झाली ती एकोणिसाव्या शतकात.
भारतात इंग्रजांनी आधुनिक जगाची ओळख सुरू केली मग या आधुनिक जगाच्या ओळखीचा विरोध करण्यासाठी 'सनातन' यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला.
ब्रिटिश राजवटीत आधुनिक शिक्षणाचे वारे वाहू लागले आता नीट जगाला परिचय होऊ लागला कालबाह्य रूढी परंपरांना प्रश्न विचारले  जाऊ लागले आणि आधुनिक जगाचा  पुरस्कार झाला .यांच्यात वाढ झाली आणि तेव्हापासून सनातली हे कट्टर झाले.
सनातनी कट्टर झाले म्हणजे नेमके काय झाले?
कारण त्यांनी स्त्री शिक्षणाला आणि विधवा विवाह यासारख्या अनेक सामाजिक सुधारणांचा प्रखर विरोध केला.
सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणाला त्याच्या विरोध झाला. स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल. या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले दगड मारले.
तो झाला इतिहास विसरता कामानये.इतिहास खूप मोठा आहे.संत तुकोबा,संत ज्ञानदेव आणि राजे शिवराय यांचा विरोध हे सनातनी डोक्याची करामत होती.
आता सनातन होण्याची नियम आणि विचारधारा काय आहे ते  पाहूया.
हे लक्षात ठेवावे की सनानात हा धर्म नसून ती एक भ्याड वृत्ती आहे.सनातन आणि हिदू धर्माचे नाते काय? तर नाही हे उत्तर होय.
१.जातीय व्यवस्था मानतो.
२ माणसात भेदभाव निर्माण करतो.
३.आरक्षणाला विरोध करतो.
४.स्त्री शिक्षणाच्या विरोध करतो.
५.स्त्री स्वांत्र्याला विरोध करतो.
६.स्त्रियांना डोक्यावर पदर घ्यावा,चूल आणि मूल हे आपले कार्यक्षेत्र ठेवावे.
७.पती निधनानंतर केश वपण करावे,सती जावे.
८.सनातन ची चिकित्सा होऊ नये.
९.सनातन चा विरोध करू नये.
नियम पहा...
१.सप्तसिधुबंधी : तरी सनातनी स्वतः जगभर फिरत असतात.
२.जात व्यवहार: सनातन सोडून सर्व मजुरीची कामे इतर जातीतील करता.ते त्यांना चालते.
३.स्त्रीशिक्षण नको: तरी आज सर्व सनातनी स्त्र्या शिक्षण घेतात.
थोडक्यात स्वतः सनातनी हे सगळे नियम धाब्यावर बांधून ,आग दोंबत आहेत की ,सनातन खत्रे मे है.सनातन( धर्म ?) बुडतो आहे?
नक्की कोण बुडतो आहे ? हे भक्ताने समजावे.


Wednesday, August 31, 2022

श्रमिक आणि वैदिक संस्कृती

#श्रमिक_आणि_वैदिक_संस्कृती.

आदिम काळापासून पाहता भारत हा एक कृषिप्रधान देश आहे या देशात अधिक काळापासून शेतीवर चालणारी व्यवसाय व शेतीवर काम करणारी मजूर कामगार यांची सत्ता होती कालांतराने शेती व्यवसाय हा मागे पडला गेला .श्रमिक नडला आर्थिक दुर्बल झाला.

 या शेतीप्रधान  देशांमध्ये  नंतरच्या काळात श्रमिक आणि वैदिक अशा दोन संस्कृती निर्माण झाल्या. शेतामध्ये काम करणारे मजूर आणि भूमिहीन  शेतमजूर, शेतकरी हे अतीव श्रम , श्रमिक म्हणून हा श्रमिक देश चालवतात देशातील करोडो लोकांना खाद्य पुरवतात मग महत्त्वाचे की नाही ? हो हे महत्त्वाचे नंतरच्या काळामध्ये वैदिक संस्कृतीचा उगम झाला आणि वैदिक संस्कृतीने या श्रमिक वर्गावर वर्चस्व लादून त्यांना गुलाम करून त्यांची सत्ता काबीज करून व त्यांना देशोधडीला  लावत वैदिक संस्कृती मोठ्या प्रमाणावर भारतात विकसित झाली .
मग ही विकसित झालेली संस्कृती गरीब , पीडित आणि अशिक्षित मजूर शेतकरी शेतीत काम करणारे लोक होती त्यांच्या गळ्यात घातली .

आता प्रश्न असा उठतो  की दैनिक लोक हे शेती करत नव्हते त्यांच्याकडे शेती होती पण शेतीवर राब  राबणारा वर्ग हा मजूर होता त्याला आपण श्रमिक म्हणून त्या शेतीवर कामाला लावले.हा सर्व वर्ग कालांतराने हळूहळू अर्थहीन झाला . हा वर्ग पूर्णतः खचला.

" महात्मा फुले यांनी सांगितले आहे की एवढा अनर्थ ' एका अविद्याने केला आणि अर्थाविन शुद्ध खतले."
याचे मूळ कारण हे ' अविज्जा होय.

शेतीचे कुळ कायदे निघाले शेतीपासून वेगवेगळे  आणि शेती वाटण्यात आली . या कायद्यानुसार ही शेती व कोणाला वाटण्यात आली ही शेती ज्यांच्या नावे होती त्यांच्या घरातील कुत्रा ,गाढव,मांजर  किंवा इतर नातेवाईक यांच्या नावे करण्यात आली आणि ती शेती त्यांच्याकडे वडिलोपार्जित कायम राहील.

पण तसे पाहता श्रमिक  संस्कृतीने या वैदीक संस्कृतीला मोठ्या प्रमाणात शह देण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू श्रमिक मागे पडले आणि वैदिक पुढे आले .

आता हे पूर्वश्रमीचे श्रमिक काय करतात ? श्रमिक हे रोज रोजंदारीवर काम करतात शेतीवर काम करतात कारखान्यात काम करतात आणि जिथे मिळेल तिथे काम करतात . यातून मिळालेली पुंजी हे धार्मिक विधी आणि देव देवळात खर्च करतात.

वैदिक लोक काय करतात वैदिक लोक देवळात किंवा इतरत्र पूजा पाठात मिळालेला पैसा हे शेअर मार्केटमध्ये लावतात त्यांना या श्रमिकांचे काही देणे घेणे नसते आणि अशा पद्धतीने देशात आज खूप मोठ्या प्रमावर श्रमिक लुटला जात आहे.

आज त्यांचे  उदनिर्वाहाचे साधन बंद केले गेले आहे.त्यामुळे श्रमिक खचला गेला आता वैदिक संस्कृतीत काय होते वैदिक लोक मंदिर आणि इतर पूजा पाठाच्या ठिकाणी आपले ठाण मांडून बसलेले त्यामुळे त्यांचे कडे श्रमिक वर्गाचा पैका चालून येतो आहे.
 
वैदिक हे  लोक श्रमिक लोकांच्या पैशावर किंवा श्रमिकांच्या बळावर आपले संपूर्ण कार्यक्रम अवैध पणे चालू आहे.  देव आणि देवापासून भीती या वर्गात निर्माण केली ,आज तागायत श्रमिक वर्ग या वैदिक वर्गाचा बळी पडलेला दिसतो आहे.

श्रमिक काय करतात?
श्रमिक आपला शेतीचा किंवा मजुरीचा व्यवसाय करतात आणि याच व्यवसायावर यांचे घर कुटुंब चालते पण हा वर्ग आपले पैसे कमवत असताना वैदिक लोकांच्या बळी पडून देवदिकांच्या किंवा इतर तत्सम देवाने भीती घातलेल्या अंधश्रद्धेला बळी पडतो. आज आपण बघतो आहे की बरीच बहुसंख्य बहुजन किंवा देशातील इतर समाजातील  बहुसख्ये लोक या वैदिक संस्कृतीला बळी पडलेले आहेत.

 वैदिक लोक काय करतात?
वैदिक लोकांना शिक्षणाची गरज नाही बाप दादा किंवा आजोबा पंजोबा या पिढीपासून चालत आलेला पूजा पाठाचा विधीचा प्रोग्राम यांच्याकडे चालून येतो आणि पुढे हे लोक देव किंवा देवळात किंवा इतर धार्मिक विधी मध्ये अग्रेसर असतात आणि बहुजन वर्गातील सर्व या लोकांत विविध पद्धतीने किंवा वेगवेगळ्या मार्गाचे भय भीती किंवा इतर कारणे दाखवत या लोकांना बळी करतात.

तसे पाहता या देशांमध्ये किमान ८० टक्के लोक   शेतमजूर,मजूर  भूमिहीन शेत मजूर किंवा इतर तत्सम काम करणारे देखील त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक साधने किंवा आर्थिक सुबत्ता असलेली पाहाव्यास मिळत नाही.

 वैदिक लोक हे एकदम उजव्या प्रमाणात हात पाय न मिळवता पैसा कमवतात. कमी असून किंवा त्यांचे टक्केवारी एकदमच कमी असताना ही हे लोक एकंदरीत ९० टक्के लोकांवर राज्य करत आहेत याचे उदाहरण म्हणजे आज आपल्या देशात सुरू असलेले राजकारण या राजकारणात अडकलेली जनता.

जनता कशी आहे बघा ?
 ही जनता मेलेली आहे मेलेली म्हणजे जसा मेलेला माणूस आवाज करत नाही हालचाल करत नाही तसेच हे लोक वैदिक लोकांच्या बळी पडलेले असून ते कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचार किंवा अंधश्रद्धा या गोष्टीवर आवाज उठवत नाहीत मग हे लोक मेलेले आहेत की नाही ? तर उत्तर असेल ,हो .

हे लोक मेलेले आहेत अशा लोकांपासून आपण काय अपेक्षा घ्यायची म्हणून श्रमिक लोकांनी जास्तीत जास्त या वैदिक लोकांचे डावपेच ओळखत वागण्याचा प्रयत्न करणे हीच आज काळाची गरज आहे.

प्रा बा र शिंदे,नेरूळ - ७०६.

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...