Sunday, December 11, 2016

आपल्या मातृ भाषेवर कृतीशील प्रेम करावे !

आपल्या मातृ भाषेवर कृतीशील प्रेम करावे
Image result for book montessori method

दिनांक २७ /२ /१३ रोजी ‘मराठी राजभाषा  दिन ‘ आहे . आपली बोली आणी मायबोलीला  ,इंग्रजीत  आपण “मदरटंग” म्हणतो . जपान सारख्या प्रगत देशात हि याला महत्व आहे . पण आपल्या कडे का नाही  ? मराठी भाषेच्या भवितव्या साठी  सातत्याने चिंता करणारे धुरीण तिच्या अस्तित्वासाठी कोणती कृती करतात ? कारण प्रश्न फक्त मातृभाषेचा नाही ,किंवा तिच्या प्रेमाचा हि नाही ,प्रष्न आहे तो तिच्या २००० वर्ष्यापेक्ष्या  अधिक काळ वाहत आलेल्या ज्ञानाचा ,संस्कृतीचा आणि संचिताचा आहे .

आपण भारतीय या गोष्टीला मुकत चाललो  आहोत .थेट जन्माने मिळणारे हे संचित आपण नाकारत आहोत . इंग्रजी सारख्या परक्या भाषेत आपण आज आपल्या लाडक्या मुलांना शिक्षणाच्या नावाखाली अपरिचित संस्कृती ,आणि संचितात ढकलत आहोत . ते इतर राष्ट्रात होत नाही .मोंटेसरी  नावाच्या बाईने पुर्वाते देशात इटलि येथे आपल्या “मोटेसरी मेथोड “ या पुस्तकात मातृभाषेत  शिक्षण दिल्याने मुलावर किती संस्कार  होतात व ज्ञान मिळते याचा  उहापोह केले आहे .

आज मराठीच्या  भवितव्याची चिंता अनेकांना वाटते आहे .चिंता वाटणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले धुरीण आहेत . त्यात धुरा सांभाळणारे नेते सुद्धा  आले .

कवी, लेखक ,कथाकार ,नाटककार ,कलाकार ,निर्माते ,दिग्दर्शक इत्यादी या सर्वाना वाटते कि मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे ,तिची संस्कृती टिकली पाहिजे ,आणि तिचे  संचिते टिकले पाहिजेत .
मग हि मंडळी आपापल्या मार्गाने तिला पुढे नेत असतात .

विविध क्षेत्रातील जाणत्या आणि नेतृत्वाच्या स्थायी असलेल्या आपल्या भाषेच्या संधर्भात आपण काय करायला  हवे याची गरज आणि निकड निर्माण केलेली आहे . जरी असतील त्यांची कक्षे वेगवेगळी .

आणि हि गरज  सर्वच क्षेत्रात झाली पाहिजे असे  त्यांना वाटते ,मग ते सामाजिक ,आर्थिक आणि राजकीय असेल . आणि त्यातल्या त्यात ती जास्त  करून “शैक्षणिक “ असायला हवी . तरच तिची पाळेमुळे आजच्या पिढीला कळतील .

मातृभाषेला २००० वर्ष्या पासुनची असलेली गढी आज आपण विसरत चाललो आहोत . यात असलेलं ज्ञान आपण विसरत चाललो आहोत ।

आज आपण हे विसरत चाललो आहोत कि आईच्या गर्भात जी भाषा शिकतो तीच मातृभाषा होय ,तीच्यापासूनच  आपण पोरके का ? मूळभाषेतच आपल्या  मुलाच्या शिक्षणाला सुरुवात होते ,तिची पाळेमुळे तेथूनच सुरु  होतात . नंतर भाषेचा विकास होत असतो ,आणि नंतरच्या काळात मुल इतर भाषा शिकते ,या भाषा  शिकत असताना प्रेत्येक ठिकाणी त्या भाषेला मुला कडून संदर्भ  लावला जातो ,जर मुळात मूळभाषेचा मुलात विकास झाला नसेल तर ,पुढील भाषा व भाषेचा आशय लावणे कठीण जाते .

म्हणून मातृभाषा अवश्य असायला हवी . खेड्यापाड्यातील मुल जेंव्हा शाळेत जाते तेव्हा त्याची भाषा  हि आईची असते ,मग ती लिखित असो कि बोली ,आणि तीच असायला हवी . तरच मातृभाषेचा विकास म्हणजेच भाषेचा विकास म्हणता येईल . जुने व नवीन याची सांगड होण्यासाठी भाषा एक मोठे साधन आहे ,आणि ती म्हणजे मातृभाषा मराठी होय .

जुनी वाक्ये नेहमी नव्याला सांगड घालत असतात . उदा.   धुरा सांभाळावी ,शेजारधर्म पाळावा ,हि झाली  आजी आजोबांची भाषा  यात आपण धुरा ,(शेतीतील अर्थाने वापरतो ) तर शहरात मित्र या अर्थाने वापरतो ,या शब्दांचे अर्थ कळण्यासाठी जुने आलेच पाहिजे . तर नवीन आणि जुन्यांची  सांगड घालता येईल ,जुनीच भाषा  नसेल तर भाषा विकास कसा करता येईल ?

भाषेला रूप देऊन आपली भाषा विकसित करू शकतो आज आपणच आपल्या मुलाबाळाना परकीय भाषेत लोटत चाललो आहोत . ती भाषा आपली नसताना देखील , ना ती आपल्या आईची न आजी- आजोबांची तरी ती परकीय भाषा आपली कळत  नकळत आपली होत आहे ? हे काही मातृभाषा विकासाला पूरक नाही या बाबीचा विचार व्हवा . हे आपण क्रूर कृत्ये करत आहोत अपरिचित भाषेत आपण लोटत असताना त्या संस्कृतीचा विचार ,संचिते आणि विचार नकळत शिकवत आहोत याचा विसर पडायला नको .

दूरगामी विचार केलातर हे फार नुकसानकारक आहे . पूर्वी आम्ही सर्वांनी मराठी भाषेत राहूनच हजारो पुस्तके वाचली ,कथा कादंबऱ्या वाचल्या आणि भरपूर ज्ञान मिळाले . जे मातृभाषेत आहे ते कुठेच नाही . जर आज लोकांना  इंग्रजी  उत्तम वाचता लिहिता येत असेल तरीपण उत्तम मराठी किती जणांना येते ?

जे लोक ज्या मातृभाषेत शिकतात त्या देश्यातील लोकांनी ,धुरिणांनी सगळे ज्ञान मातुभाषेत उपलब्ध करून दिलेले आहे ,पण तसे आपल्या मायबोलीत किंवा भारतात झालेले प्रयेत्न दिसत नाहीत ,हि खेदाची बाब आहे . त्यांचे इंग्रजी वाचून काहीच अडत नाही ,ते उच्च पातळीला गेले आहेत , मग आपलेच इंग्रजी वाचून का अडते ?त्या त्या देशाने आपल्या भाषेचा विकास केला मग आपल्याकडे का व्हायला नको ?

सगळ्या गोष्टीचे ज्ञान मराठीत उपलब्ध करून देणे हा एक उपाय होऊ शकतो ,मग विज्ञान ,सगल्या ज्ञानक्षेत्रातले ज्ञान मराठीत उपलब्ध करून हि प्रक्रिया  सतत चालू ठेवायला हवी . तरच मराठी भाषा उच्च कोटीला जाईल ,मुळात ती उच्चकोटीला आहेच फक्त तिला पुढे ढकलण्याचे सततचे बल लावायला हवे  . आणि या बाबीवर सामाजिक , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील धुरिणांनी एकत्रित येउन विचार करणे अवश्यक नाही का ?

जगातील कोणतेही बालक वयाच्या ३ वर्षीपर्येंत आपली मातृभाष्याच अवगत करत असते . मग महाराष्ट्रात  पहिलीपासून इंग्रजी विषय कश्याला हवा ? विज्ञान आणि गणित तर इंग्रजी भाषेतून शिकवणे फार घातकच आहे ? हातचे ,वजाबाकि कसे शिकवणार . कारण हे सगळे मातृभाषेतून सुलभ आणि सहज असते . कोणतेही ज्ञान फक्त मातृभाषेतूनच लवकर ग्रहण होते .

मराठी हि भाषा अतिप्राचीन आहे . चक्रधरस्वामी  ,संत  तुकाराम , संत ज्ञानेश्वर ,बा शी मर्ढेकर , शिरवाडकर ,पु ल देशपांडे हे या भाषेचे खांब आहेत . यांनी जनसामन्याला कळावी अशी मराठी  भाषा निर्मिती केली . यांच्या  प्रमाणेच आपणही थोडा खारीचा वाटा  उचलून कृतीशील आणि वक्तशीर मराठीवर प्रेम करूया .


कडेवरील तान्हे बाळ

कडेवरील तान्हे बाळ

Image result for mother feeding baby images

बाळ म्हणताच सर्वांच्या नजरेसमोर एक छानशी छबी येते. ते गोंडस गोजिरवाणे बाळ .बाळ हाच   देशाचा एक  महान नागरीक  .कुटुंबातील प्रत्येकाला बाळ हवे असते,आणि ते असायलाच हवे ,जर बाळाचे योगे रीतीने संगोपन,पालन पोषण  केले तर ,बाळ घराची ,समाजाची आणि देशाची मान जगात उंचावेल ,मग ती मुलगी असो व मुलगा .
सद्याचा काळात बाळाची खूप हेळसांड होताना आपण पाहतो .
मी निवणूक अधिकारी असतानाची घटना ,एका लेखात लिहिले होते कि ,"कडेवरील बाळास मतदान केंद्रात परवानगी देण्यात यावी ".....तसे आणखी सरकारी दफ्तरी आदेश आहेत असे मला वाटत नहि.
कडेवर घेतलेले हल्लीच्या काळात एक देखील बाळ  बघायला मिळणार नाही .(दुरचित्रवाणीच्या कार्यक्रमातील  राखी सावंत सोडली तर  ,चांगल्या अर्थाने आदर्श अदिवशी व ग्रामीण माता भगिनी वगळता ) ..
कडेवरील बाळ हि संकल्पना अत्येंत चांगली व बाळाच्या वाढीस व पोषणास उपायकारक आहे बाल कडेवर घेतल्याने बालकाच्या  संगोपनास त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो .बाळ  कडेवर घेतल्याने खालील गोष्टीचा फायदा होतो .

मुल कडेवर घेण्याची फायदे खालील प्रमाणे आहेत
१.भाषा वाढीस मदत :
मुल कडेवर असल्याने मुलांची भाष्या वाढ लवकर होते .जेव्हा आई बडबड करते एखादे गाणे गुणगुणते तेंव्हा  मुलाला खूप आनंद होतो ,तेच तेच एकूण मुल पुन्हा गुंगुण्याचा प्रयेत्न करते .मुल दोन वर्ष्या खालील असेल तर सतत बडबड करीत असते आईला हैराण करून सोडते ,आणि बोलण्याचा प्रयेत्न करते .आणि सतत प्रश्न विचारीत असते .आई हे काय आहे ?ते काय आहे ?मला ते दे ?ममी मला हे दे ते ? मला भूक लागली आहे दुदु दे खाऊ  दे ? इत्यादी .मुल जेंव्हा अर्धे वाक्य बोलते तेंव्हा आई ते पूर्ण करते ,आणी हसत खेळत मुळात भाष्या विकास घडून येतो .उदा.बाबा आले ..बाबा आले ..मग आई बोलते ..बाळा बाबा ऑफिस मधून आले ,असे म्हणावे ..!
जगातील कोणत्याही मुलात  भाषा विकासाचा काळ म्हंजे वयाची ३ वर्ष होय ,आणि या काळात मुल हे ज्यास्तीत जास्त  आई कडेच असते .याच  काळात मुल आईची भाषा शिकते ,आणि ती आईकडूनच शिकते .आणि हि भाषा मुल आईकडून ऐकून ऐकून शिकते .आणि नंतरच्या काळात या भाषेला अमूर्त स्वरूप  प्राप्त होते .तेंव्हा मुल कडेवर घेतल्याने हा सर्वात मोठा फायदा बघावयास मिळतो .  

२.सुरक्षितता :
मुल कडेवर असेल तर ते स्वताला सुरक्षित समजते .त्याला कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही .बिनदिक्कत आईच्या कडेवर बागडत असते .म्हणून आईच्या कडेवर मुल असायला हवे .



३.आईचा स्पर्श :
बाळाच्या एकंदरीत वाढीस व संगोपनात आईच्या स्पर्श्यची खूप गरज असते .सतत बाळ कडेवर असल्यावर आईच्या स्पर्शाने बाळ सतत उबदार राहते .जसे कांगारूच्या पिशवीत तिचे छोटे बाळ असते .जेव्हा बाळाला आईच्या उबदार स्पर्शाची उब मिळते तेंव्हा बाळाला कसलीच भीती वाटत नाही ,याचाच अर्थ बाळ कडेवर असताना धस्थपुस्थ होते .बिनदिक्कत आईच्या कडेवर बागडत असते .म्हणून आईच्या कडेवरील मुल खूप सुरक्षित वाढते .
४.संसर्ग रोगापासून  बचाव  
हल्लीच्या काळात शहरी भागात आणि वातावरणात आणि कार्यालइन  कामकाजात आईला मुलाना कडेवर घेण्यास वेळच कोठे असतो .तेंव्हा बरीच मुले घराबाहेर ठेवली जातात .काही मुले पाळणा घरात ,क्रेडल मध्ये ,घरात काम करणाऱ्या घरवालीकडे किंवा घरकाम करणाऱ्या बायकांकडे ठेवले जाते .
फारतर मुले पाळणाघरात ठेवली जातात ,किंवा अंगणवाडीत जातात ,( ग्रामीण भागात )अश्या एकंदरीत मुले  ठेवल्यामुळे एकमेकांचे आजार व आजारपासून  होणारे संसर्ग होण्याची संभावना असते .आणि संसर्गरोग होण्याचा ज्यास्त प्रदूभाव असतो .
म्हणून अश्या प्रकारच्या रोगापासून बचाव करण्यासाठी मुल कडेवर वावरणे महत्वाचे असते .
हल्लीच्या काळात  बर्याच मात्ता भगिनी या कामावर जाणार्या  असतात तेंव्हा त्यांच्याकडे वेळ नसतो .तरी पण आपण जेंव्हा जेंव्हा घरी असता तेंव्हा तेंव्हा घरामध्ये वरांड्यात ,गच्चीवर फिरता फिरता बाळ कडेवर घेऊन फिरावे .म्हणजेच कडेवर घेऊन फिरावे .तेंव्हा बाळ खूप आनंदित पहावयास मिळेल .आणि कालांतराने गुटगुटीत दिसेल ,गुटगुटीत बाळ म्हणजे निरोगी बाळाचे लक्षन होय.
तसे पाहीलेतर तर आजकालच्या चंदेरी दुनियेत आणि फ्याशन च्या जमान्यात आई मुल कडेवर घेताना दिसत नाही .कारण सुडौल बंद्याचा प्रश्न उद्भवतो मध्येम वर्गापासून ते उच्च शिक्षित वर्गापार्येंत आईपेक्ष्या घरात काम करणाऱ्या बायका मुलांचे संगोपन करतात .ह्यामुळे आई व बालकात प्रेम वाढत नाही .जिव्हाळा वषात नाही .त्यामुळे दुरावाच ज्यास्त निर्माण होतो .तेंव्हा मुल मुल असुरक्षित होण्याची भीती ज्यास्त निर्माण होते .       


अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...