Friday, September 15, 2023

३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?

 


३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?

-------------------- प्रा.बा.र.शिंदे 

लोक जागर,महोत्सव ,जयंती ,जयंती- उत्सव सभा,चर्चासत्र,मेळावे ,प्रचार, यात समाज प्रबोधन करीत विद्वान व्यक्ती, प्राध्यापक,डॉक्टर ,अभियंता,आणि शिक्षक - शिक्षिका यांनी ऑगस्ट चा महिना पिंजून काढणार?

कार्यकर्ते गल्ली बोळात जाऊन ' जय लहूजी ' चा नारा देत, लोकशाहीर,डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे,बघता काय सामील व्हा.असे आणि कैक नारे देत चंदा काढून जयंती साजरी करणार? कारण ते आपलेच महामानव आहेत.आपणास पट्टी देणे भाग आहे.हे त्यांचे रास्त मत असते? आणि तसे असणे साहजिक आहे.

झोपडपट्टीतील घराला दार नसले तरी,तेथून ते तमाम चाळी -चाळी तून अमाप पैसा जमा होणार.याच दिमतीवर जयंती साजरी होते.

एकदाची कार्यकर्ते नेते मिळून जयंती साजरी करणार? पदरात काय? पुढील ऑगस्ट ची वाट पाहावी लागते.

आता जसा ३१ ऑगस्ट निघून जाईल तसा दुसऱ्या कार्यक्रमाचे वेध लागते,ते म्हणजे ,गणराया येणार?

तुम्ही कांहीं म्हणा गणराया आमच्या घरी येणार, म्हणजे येणार?

आपणास विचार करायला हवा की ,आपली बुद्धी शुद्ध नसते.आपले डोके इतरांच्या इशाऱ्या वर चालते.म्हणून असे उद्योग सुचत असतात.

राजा शिवराय ,राष्ट्रपिता  महात्मा फुले ,शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात ,साहित्यात कुठे गणपती या शब्दाचा उल्लेख मिळतो का?

मग आपण या महामनवाचे वारसदार कसे ? तर नाही! आपण या महामानवाला खऱ्या अर्थाने तिलांजली देत आहेत.

संकट में। हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में।

संकट में।..

हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में!

........................प्रा.बा.र.शिंदे,नेरूळ

तमिलनाडु चे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन  यांनी सनातनवर मोठे संकट निर्माण केलं आहे.
सनातन हाधर्म नसून ही एक भ्याड प्रवृत्ती आहे.सनातन ची  तुलना ते डेंगू, मलेरिया असे करता. सनातन हा हिंदू धर्माचा भाग आहे हे भक्तांना वेगळे वाटत नाही.?
तसे पाहता सनातन या शब्दाचा अर्थ प्राचीन काळापासून चालेल आलेला चिरंतन ,अविनाशी असा आहे.(Orthodox)
आत्मा , पुनर्जन्म या संकल्पना मानत असलेल्या हिंदू धर्माला सनातन धर्म असे म्हटले जाते.
तसे पाहता वेदामध्ये कुठेही सनातन धर्म असा उल्लेख आढळ नाही .हिंदू धर्मात सनातन ही संकल्पना पूर्वापार माहिती असली तरी तिची प्रामुख्याने चर्चा सुरू झाली ती एकोणिसाव्या शतकात.
भारतात इंग्रजांनी आधुनिक जगाची ओळख सुरू केली मग या आधुनिक जगाच्या ओळखीचा विरोध करण्यासाठी 'सनातन' यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला.
ब्रिटिश राजवटीत आधुनिक शिक्षणाचे वारे वाहू लागले आता नीट जगाला परिचय होऊ लागला कालबाह्य रूढी परंपरांना प्रश्न विचारले  जाऊ लागले आणि आधुनिक जगाचा  पुरस्कार झाला .यांच्यात वाढ झाली आणि तेव्हापासून सनातली हे कट्टर झाले.
सनातनी कट्टर झाले म्हणजे नेमके काय झाले?
कारण त्यांनी स्त्री शिक्षणाला आणि विधवा विवाह यासारख्या अनेक सामाजिक सुधारणांचा प्रखर विरोध केला.
सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणाला त्याच्या विरोध झाला. स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल. या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले दगड मारले.
तो झाला इतिहास विसरता कामानये.इतिहास खूप मोठा आहे.संत तुकोबा,संत ज्ञानदेव आणि राजे शिवराय यांचा विरोध हे सनातनी डोक्याची करामत होती.
आता सनातन होण्याची नियम आणि विचारधारा काय आहे ते  पाहूया.
हे लक्षात ठेवावे की सनानात हा धर्म नसून ती एक भ्याड वृत्ती आहे.सनातन आणि हिदू धर्माचे नाते काय? तर नाही हे उत्तर होय.
१.जातीय व्यवस्था मानतो.
२ माणसात भेदभाव निर्माण करतो.
३.आरक्षणाला विरोध करतो.
४.स्त्री शिक्षणाच्या विरोध करतो.
५.स्त्री स्वांत्र्याला विरोध करतो.
६.स्त्रियांना डोक्यावर पदर घ्यावा,चूल आणि मूल हे आपले कार्यक्षेत्र ठेवावे.
७.पती निधनानंतर केश वपण करावे,सती जावे.
८.सनातन ची चिकित्सा होऊ नये.
९.सनातन चा विरोध करू नये.
नियम पहा...
१.सप्तसिधुबंधी : तरी सनातनी स्वतः जगभर फिरत असतात.
२.जात व्यवहार: सनातन सोडून सर्व मजुरीची कामे इतर जातीतील करता.ते त्यांना चालते.
३.स्त्रीशिक्षण नको: तरी आज सर्व सनातनी स्त्र्या शिक्षण घेतात.
थोडक्यात स्वतः सनातनी हे सगळे नियम धाब्यावर बांधून ,आग दोंबत आहेत की ,सनातन खत्रे मे है.सनातन( धर्म ?) बुडतो आहे?
नक्की कोण बुडतो आहे ? हे भक्ताने समजावे.


#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...