Thursday, June 17, 2021

आगरकर ,गोपाळ गणेश

*‘देव आकाशतून आले ते परत कधी गेलेच नाहीत?’*
                                                --थोर  समाज सुधारक : गोपाल गणेश आगरकर . 
बुद्धिवादी दृष्टीकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांना फाटा देऊन रूढीवादयावर त्या काळात अंधश्रद्धा गाठीशी धरून कार्य हाती घेणारे कर्ते या यादीत यांचे वरचे स्थान म्हणायला हरकत नाही . धर्म वेड्या लोकांवर  कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या आणि विज्ञान या  निकषांखेरीज अन्य कोणताही निकष त्यांना मान्ये न्हव्ते . 
याच मूळ कारणाने  थोर समाज सुधाकर होत . आज यांचे पुन्ये स्मरण . त्यांचे देवा विषयी ठळक मत होते . नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती.
नितीमत्ता हा त्यांच्या विचारसरणीचा पाया होता . परोपकार, सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद,आणि त्याचे मूळ हे  व्यक्तिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या सप्त:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे.
महान व्यक्ति चे स्मरण का करावे त्याचे मूळ कारण त्यांनी समाज विकास व  समाजाची केलेली प्रगति आणि त्यांनी केलेलं ‘समतेच’ कार्य याचा धागा धरून स्त्रिया साठी केलेलं समतेचे विचार हा मूळ गाभा होय तेच थोर पुरुष या नामरूपाला शोभून येतात . 
यांना पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर तीळमात्र  विश्वास नव्हता. येवढेच नसून वेदांनी निर्माण क्लेले चार वर्ण ही मान्ये न्हवते ,या  चातुर्वर्ण्य, जातिसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह, ठरवून केलेले विवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. 
मुला-मुलींस समान आणि सक्तीचे करण्यावर त्यांचा भर होता .  शिक्षण हे कौशल्याधारित असावे . शिक्षण हे अभ्यासक्रम व व्यवसायाभिमुख असावे त्याने पुढील काळात त्यांना त्या त्या ठिकाणी कामात तिथे मदत होऊ शकते यावर ते अडून होते . शिक्षनात आचारांचे निर्मूलन करावे. सदाचाराचा प्रसार करावा,बाल वयात मुलात  ज्ञानवृद्धी करावी, मुलांना सत्य शोधकी करण्यावर  भर होता . 
 शिक्षनात नीति मूल्ये जपून  संयमी जीवनामुळे लाभणारे मानसिक  समाधान या होईल असे करावे . 

मानवी जीवनात व्यक्तिस्वातंत्र्यामुळे किती फायदा आणि लाभ होतो ते ठाम पणे सांगत . स्वार्थ आणि स्वैराचार हे समाज हितास कसे बाधक आहेत ते नेहमी म्हणून दाखवत . समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच व्हावी , असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. 
समाजातील परंपरेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता; त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. कारण ‘जुने गेले मरणा लगुणी’ असे त्यांचे मतं होती . जुन्या रूढी ,परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या सरकार च्या  मदतीने कायदेशीर रीत्या नाहीशा कराव्या, यावर ते ठाम होते.
 ---“ज्या देशातील हजारो पिढ्यांनी अनेक गोष्टीत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले अशा अनेक देशांतील धर्मांचा, रितीरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही”, हे त्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहे. (मराठी विश्वकोश – वीरकर )
या देशात केवळ धर्मच नव्हे, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सारासार विचार करून आंधळेपणाने गतानुगतिक वर्तन नाकारून जाणीवपूर्वक योग्य त्या मार्गाची निवड करण्याचा पुरस्कार करणारे आगरकर बुद्धिवादी संत किंवा देव न मानणारे व्यक्ति न्हवते .
खरा मुदा इथे येतो ते असा की बाळ गंगाधर टिळक ( २३ जुलाई १८५६ - १ अगस्त १९२०)यांचे सोबत चे दिवस आणि त्यांच्या पासून वैचारिक मतभेत झाल्यावर निरखून पारखून निघलेले आगरकर (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५) हे कितीतरी पटीने पूर्वी पेक्षा ‘समाज सुधारक’  मतवादि आणि खरे सुधाकर ,म्हणजेच ‘कर्ते सुधाकर’ दिसून येतात ते जीवनाखेर प्रवसा असेतोवर  .  
यांचे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. हेच यांच्या विचारांचे दुक्ख होय.  
कारण यांना देशा अगोदर समाज आणि समजतील एक एक व्यक्तीचा विकासा अगोदर हवा होता . त्यांचे  लक्ष  जनहित होते . ‘सुधारक (१८८८)’ हे त्यांचे चळवळीचे अस्त्र . त्यांनी चळवळी चे अनेक लेख लिहले या लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. यवढेच नसून खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे आदी प्रकार झाले. अश्या धमक्यांना ते डगमगले नाहीत . ते नेहमी ठणकाउन सांगत की ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, हीच करणे घेऊन किंवा या  भूमिकेतून ते नवे गोपाळ गणेश आगरकर म्हणून उदयास आले . त्यांची याच वेळी बाळ गंगाधर टिळक यांच्या  सोबतची मैत्री ही संपली . 

सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आपल्या हयात असे प्रयंत  चालू ठेवला. ‘सुधारका’ तील अनेक  लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या अनेक  अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते होते . 

स्त्री पुरुष राहणीमन समान असावे आणि त्यांचे पोशाख त्यांच्या आवडीचे असावे असे यावर त्यांचा भर असे . यांनी बर्‍याच  लेखांतून येथील सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या रूढी परंपरा ,शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार केले होते याला इतिहास साक्षी आहे .
समजाच्या उन्नतीसाठी प्रथम व्यक्ति स्वतत्र्य त्यांना अभिप्रेत होत . त्यांना देशाबादधल ही खूप आदर होता हे ही अधोरेखित करण्यासारखे आहे .  
आगरकर ,फुले आंबेडकर ही थोर माणसे ज्या प्रकारे द्वंद्वात्मक परिस्तिठीत सापडली होती , ती ओलांडून आज पुढे आलो आहोत . अशावेळी त्या नेत्यांनी जे योगदान केले त्या विषयी कृतज्ञ असण्याएवजी ‘ अमक्याने तमुक का केले नाही ?’ तमक्या वेळी आमका कुठे होता ?’ असले प्रश्न उपस्थित करून त्यावर निर्थक वाद घालत बसणे ही आत्मवंचना तर होईलच ,परंतु ते आपल्या जाणिवा प्रगल्भ पुरे नसल्याची खूण ठरेल .( सदानंद मोरे ,लोकसत्ता ,एकमेव लोकमान्ये –पा -४३ )
मानवी मनाला सत्सत विवेक बुद्धीला ओळखून मानव सेवा ,समता,स्वातंत्र्य  आणि बंधुता या विचाराने प्रेरित होऊन अखेर प्रयंत त्यांनी  कार्य केले . 
आज त्यांचे स्मृतीस अभिवादन !

*प्रा. बालाजी रघुनाथराव  शिंदे.*

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...