....आज दिवसभर आषाढी वरील पोस्ट वाजून १९५५ ला क्रांतेयबुद्ध बाबासाहेब यांनी 'Who is the Vitthal? ' हा लेख आठवला . अनेक संदर्भ घेऊन त्यात लिहले लिहले आहे की विठ्ठल ,बालाजी आणि पुरीचा जगन्नाथ हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान बुद्ध हेच आहेत हे सिद्ध केले होते .
ही नुकतीच अर्ध्या शतकाची घटना गृहीत धरता येईल.वर वर पाहता वेदांची जी प्रस्थापित वर्गाने घुसडन केली त्याचा ही पर्दाफाश करून त्यांतून 'Who where Shudra 'हा ग्रंथ बाहेर आला,हे आपण सर्व जाणून ,वाचून अभ्यासून आहोत,हा ग्रंथ ज्यांनी नाही वाचला आहे त्यांनी एकदा वाचून वेद जाणून घ्यावे हा या मागचा हेतू.
वेदात डॉ बाबासाहेब असे सांगून गेले की ,शुद्र हे पूर्वी अस्तित्वात नव्हते .क्षत्रिय हेच शुद्र होत हा त्यांचा रास्त विचार सांगून गेले.
अंदाजे ७०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विठ्ठल रुपात अवतरलेल्या बुद्धाला परत बुद्ध म्हणून येण्यास तेवढाच काळ नाही का लागणार .तेंव्हा आपण नसणार आहे ,अंदाजे पुढील २०० वर्षात भारत देश हा नक्कीच बुद्धमय होईल यात शंका नाही ,असे मला ही ठाम पणे सांगावे असे वाटते .
उदा: समुद्रातील वाळू संपूर्ण १२ तास उष्ण होते ,परत तिला मूळ सवरूपात येण्यास तेवढाच वेळ लागतो .तद्वत तब्बल ७०० वर्षे लागतील पुनः बुद्ध मूळ रुपात येण्यास .
मी एकूण ३ वेळा तिरुपती बालाजी आणि एकदा नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराला भेट दिली आहे .या दोन्ही मूर्ती बुद्ध रुपात मिळतात .गाभाऱ्यात छताला लागून दोन्ही ठिकाणी असंख्य बुद्ध मुर्त्या पहावयास मिळतात.ते त्यांना नष्ठ करता आले नाही .
पशुपतीनाथ मंदिरात सर्व सापस्थ दिसते ,मंदिर आतून उघडे आहे ,आत फक्त एक नंदी बैल बसवला आहे .
माझ्या सारख्या कैक लोकांनी हे दोन्ही मंदिरे पहिली असतील तर सत्य जानवे आणि जनास सांगावे की त्या मुर्त्या बुद्धच आहेत.
शतक ३ उजाडले आणि राजा अशोका नंतर चा प्रताप,आणि भारत इतिहासात दिसून येतो .शतकानुशतके अश्या बाबीला राज्यश्रय प्राप्त झाला आणि बुद्ध झाकून ठेवण्यात आला ,त्यास देव रूपं दिली गेली .जोडीला कैक लोकांची व्यापारी खलबते उदयास आली ,बहुजन त्यावर आपला वेळ आणि आपला घाम घालून कमावलेले पैसे लावून लयास गेली ..
यामुळे मानवी मनाच्या आत्ताची गती संथ झाली ,ती आजवर चाली रीती आणि रुढीतून पुढे ढकलत असताना दिसून येत आहे .
वेळ घर बांधून बसत नाही ,बहुजन आज शिकून शहाणा झाला आहे ,सत्य शोधू लागला आहे ,ते सत्य कायम बुद्ध असल्याचे भाकीत ठरणार आहे ,१९५६ ला दिलेल्या हाकेचे स्वप्न पूर्ण होणार आहे !
भारत बुद्धमय ,आणि बुद्धीमय नक्कीच होणार आहे.
लेखक :बा.र.शिंदे ,नेरुळ -७०६