Monday, October 24, 2022

पुस्तक: तीमिरभेद

डॉक्टर शमशोद्दिन तांबोळी लिखित धांडोळा मुस्लिम अंधश्रद्धेचा.
पुस्तक : #तिमिरभेद. हे पुस्तक वाचनात आले.

..... प्रा बी आर शिंदे,नेरूळ ७०६

लोकेश शेवडे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून मुस्लिम समाज कसा  मागास आहे त्यांच्या धार्मिक अंधश्रद्धा रुढी परंपराच  अत्याधिक कश्या  आहेत. असा एक समज गेली अनेक वर्ष जगभरात सर्व धर्मीयांमध्ये रुजला आहे.

भारतात तर हा समज मागील अनेक दशकात इतका पक्का झाला आहे की समज काही विशेष गट हेतूपुरस्र पसरवत असावेत अशी शंका येते .कोणत्या धर्माच्या नेमक्या किती टक्के लोकांमध्ये नेमकी किती प्रकारच्या अंधश्रद्धा, रुढीपरंपरा नेमका किती खोलवर प्रभाव आहे याची विश्वासाने आकडेवारी आज पावेतो कुठे पाहायला देखील मिळत नाही.

पसरवलेल्या बातम्या या पूर्वग्रहावर जास्त आधारित असाव्यात असे सिद्ध होतं.

इतरांच्या रूढीप्रथा म्हणजे आपले हसू लपवण्याचा प्रयत्न असे आहे . सव्वाशे वर्षापूर्वी आगरकर दिलेल्या ' नकट्यांनी नकट्यास' हसण्यात काय अर्थ आहे. खरे झाले आहे. सार्थक झाले आहे.

या पुस्तकात वास्तविक श्रद्धा म्हणजे ' चिकित्साहीन ' विश्वास म्हणजेच चिकित्सा न करता विश्वास ठेवल्या त्याला श्रद्धा म्हणतात याचाच अर्थ श्रद्धा हीच अंधश्रद्धा असते.अशी  उत्तम चिकित्सा ' श्रद्धा आणि अंधश्रद्धा' यावर केलेले दिसते.

#धर्म : धर्म ही बाब मनुष्यमात्रात इतक्या खोलवर रुजली आहे की धर्म नाकारल्यास बहुसंख्य लोकांना स्वत्व नाकारल्यासारखं वाटतं धर्मावरचे प्रहार  त्यांना स्वतःवरचे प्रहार वाटतात आणि ते संवादच बंद करून टाकतात. हे विदारक या पुस्तकात मांडलेले आपल्याला पहावयास मिळते.

यात ' कडकलक्ष्मी किंवा पोतराज' यांचे उत्तम उदाहरण दिलेले आहे. स्वधर्मावर टीका करणाऱ्या बंडखोर विचारवंतांची अवस्था ही पोतराज सारखी होत असते. नरेंद्रभकर अमित दलवाई यांची अवस्था वेगळीच झाली नव्हती.

असो, आपण आता मुस्लिम श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी बोलूया. पुस्तकातील एकूण बारा प्रकरणातील अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांतील श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकलेला दिसतो आहे.

आज मुस्लिम समाजातील बुरखा ,मशिदी वरील अजान भोंगा ,तलाक बहुपत्नित्व , हिजाब,बुरखा यासारखे विषयी आज वाद विवादाच्या केंद्रस्थानी आहेत. एकेकाळी  अजान चा आवाज पवित्र वाटायचा त्या आवाजात  मुस्लिम गोडवा होता. आज हा आवाज इतरांना कर्कश वाटत असेल किंवा ध्वनी प्रदूषणात कारणीभूत असेल तर बदललेल्या परिस्थितीत याची योग्य अयोग्यता तपासली पाहिजे. ' नमाज ' ची आठवण करून देणारी ' अजान ' प्रथा निर्माण झाली तेव्हा ती सामाजिक वैज्ञानिक स्थिती ही आजच्या काळातील तंत्रज्ञानाने निर्माण केली स्थिती यातील फरक समजून घेणे आणि त्याला त्रास होणार नाही शांतता भंग होणार नाही याचा संबंध सुविचार समाजातील सभ्यता व्यक्त करते.

आपला समाज अद्याप धर्म चिकित्से साठी तयार नाही धर्माची स्थापना ईश्वराने केली आहे धर्म आणि ईश्वर या विषयावर बुधीप्रामाण्यवाद्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. याचे कारण असे की एखाद्याची 'श्रद्धा ही दुसऱ्याची अंधश्रद्धा' होऊ शकते.

या समाजावर अनेक इस्लामिक राष्ट्राचा प्रभाव दिसून येतो. अरबस्थानात इस्लाम अस्तित्वात आला त्या काळात सर्व स्थानात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा त्याचे हे मूळ कारण होय. मुलगी जन्मताच पुरून  टाकण्याची पद्धत होती. पुरुषांनी किती महिलांशी विवाह करायचा यावर मर्यादा नव्हत्या गृहीत वर्गाकडून आर्थिक शोषण होत होते. सावकार शाही होती मुस्लिमांना पळवून नेले जात होते .जुगार आणि व्यसनाधीनता होती .लुटमार करणार्या गोळ्या होत्या. अशा परिस्थितीत मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामची स्थापना केली .धर्माची नाही . उतम विचारांच्या आदान - प्रदानाची.त्याचे फलस्वरुप ' कुराण ' अस्तित्वात आले.नंतरच्या काळात  पैगंबर याला केंद्रस्थानी मानून त्याचा ईश्वरी आधार घेण्यात आला. आणि हे पुढे आज तागायात  चालत आहे.

ज्यांचे ' इमान' नाही तो मुस्लिम नाही.अशी एक धारणा  तयार झाली. पुढे चालून धार्मिक तत्त्वज्ञान दोन गटात विभागण्यात आले. पहिला ' परलोक '  विषयाच्या आणि दुसरा ' इहलोक ' मुस्लिम समाजाबद्दल बोलायचे झाल्यास याला ' इबादत ' आणि ' आदत' असे होते ' इबादत ' मध्ये व्यक्तीचा परमेश्वराशी संबंध असतो तर ' आदत' मध्ये व्यक्तीचा इतर व्यक्तीशी माणसाची ,समाजाची किंवा देशाशी संबंध असतो या अर्थाने अभिवादन ही व्यक्ती स्वातंत्र्याची किंवा धर्म स्वातंत्र्याची बाब आहे. ' इबादत ' केल्याने त्यांचे इतरांना वाईट परिणाम होत नाहीत ' आदत ' ही दैनंदिन जीवनाशी निश्चित असल्याने ती परिवर्तनी असली पाहिजे जी परिवर्तने आहेत त्याला दैवी म्हटल्यामुळे त्याचे अनाथात आणि अंधश्रद्धेत रूपांतर झाले.

खरे तर हा विषय खूप मोठा आहे आणि गंभीर पण आहे .पण समाजातील मुल्ला मौलवी  यांनी यापूर्वीच  ' स्वतःचा इस्लाम' समाजाच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. जे कुराणात आहे तो इस्लामला अनुसरून आहे .आणि जो कुराणात  नाही तो इस्लाम विरोधी आहे असा संदेश देऊन अनेक समस्या निर्माण केली आहेत.

परिणाम असा झाला की समाजाचा विकास होण्याऐवजी समाज काल बाह्य झाला.

जगातील कोणत्याही धर्माचा उदय असो तो पुरुषप्रधान आहे .जेव्हा इस्लाम अस्तित्वात आला त्या काळात पुरुष प्रधान होता महिलांना दुय्यम स्थान होते.

शेवटी या समाजातील "मुल्ला आणि मौलवी " यांनी  मोहम्मद पैगंबर,कुराण याला मूठमाती  देऊन मुस्लिम समाजातील स्त्रियांवर खूप मोठा अत्याचार आणि अन्याय केला आहे.

श्रद्धा आणि त्या श्रधेतून उदयास आलेल्या अंधश्रद्धेतून  येणारी वाईट चालीरीतीचे  पाळीमुळे रचली आहेत.

पुस्तक  वाचताना असे नजरेत येते  की, स्त्रियांचा सुंता होतो. हे मी प्रथम वाचले हे मला माहिती न्हवते.

पुढे जाऊन या पुस्तकात अशी माहिती आहे की एखाद्या घरात स्त्री मृत्यू झाली तर त्या स्त्रीला तिच्या पतीने मृत वेळेच्या वेळेपासून चार तासाच्या आत संभोग केला तर तिला शांती मिळते ,ती अल्लाच्या  दरबारी जाते. त्यापेक्षा काय वेगळी अंधश्रद्धा असू शकते आता इथे मी थांबतो.

Monday, October 10, 2022

अनाग्रिक धम्मपाल

१० वी सदी तक भारत में बुद्ध शासन आपने समय के साथ खड़ा था।
१२ वी शताब्दी में तुर्को के आक्रमण के बाद बौद्ध धर्म भारत की मुख्य भूमि से एकदम खत्म हो गया। धर्मांध मुसलमान  तुर्किक आक्रमणों के कारण नतीजा यह हूवा की भारत के बचे हुए बौद्ध भागकर तिब्बत एवं नेपाल के दुर्गम पहाड़ो में छीप गए। कींव की बुद्ध धर्म पूरे संसार में शांति ,अहिंसा और समानता का धम्म कहलाया जाता था। परकिय धर्मांध मुसलमानो के बुद्धिस्ट पर हमले से बहुत से हमले हो गए थे और हो रहे थे।
 पहले शंकराचार्य ने भी भारत में बौद्धों का बहुत संहार करवाया। जो भिखु को ले आएगा उसे सोने की मोहरा देने का एलान भी किया था और वैसा ही हुवा शत प्रतिशत भिखू और बौद्ध मारे गए।
उसके बाद  भारत में नाम मात्र बुद्धिस्ट हिमालय के पहाड़ी और  दुर्गम इलाको और चिटगांव की पहाड़ियों में बचे। जिन्होंने आज के बुद्ध धम्म का फैलाव किया है।

 सन १८६४ में श्रीलंका में एक ईसाई परिवार में एक बालक  धर्मपाल पैदा हुआ। युवा होने पर वह २ बुद्धिस्ट मिसनरियो कर्नल अल्काट एवं रुसी महिला मैडम ब्लावट्स्की से मिला जो उस समय श्रीलंका में बौद्ध धर्म के बारे में पढ़ रहे थे।  उस युवा ने अपने नाम के साथ अनागरिक जोड़ा ,अनागरिक का  मतलब होता है ,जो कहीं का वासी न हो। 

अनागरिक धर्मपाल ने बौद्ध धर्म की शिक्षा लेने के बाद यूरोप ,अमेरिका और एशिया में बौद्ध धर्म का प्रचार किया।  सन १८९३ में शिकागो  में हुए विश्व धर्म सम्मेलन में अनागरिक धर्मपाल ने बौद्ध धर्म का प्रतिनिधित्व किया था। 
स्वामी विवेकानंद उस सम्मेलन में हिन्दू धर्म के आधिकारिक वक्ता नहीं थे इसलिए उन्हें बोलने के लिए कम समय मिला था ।

धर्मपाल ने अपने समय में से ३ मिनट स्वामी विवेकानंद को दिए थे। एसे दयालु और धर्म रक्षक थे। धर्मपाल ने डॉक्टर आंबेडकर से ५०  साल पहले तमिलनाडु में दलितों को बौद्ध धर्म की दीक्षा दी थी। धर्मपाल ने ही ' महाबोधि सोसायटी' की स्थापना की थी और ' महाबोधि मंदिर'  को हिन्दुओ के कब्जे से छुड़ाने के लिए आंदोलन भी किया था। 
इसलिए धर्मपाल को बौद्ध धर्म का ' पहला ग्लोबल प्रचारक' माना जाता है। 

सन १९३३ में अनागरिक धर्मपाल का देहांत सारनाथ में हो गया। अनागरिक के अस्थि अवशेष मूल गंध कुटी में रख दिए गए।  अनागरिक धर्मपाल ने भारत में  में बौद्ध धर्म को पुनर्जीवित किया।

साभार : जयपुर के साथी लक्ष्मण सिंह देव की पोस्ट।

इन जैसे महान बौद्ध अनुयायी   के चलते आज भी संसार मे पहले से ज्यादा बुद्ध धम्म ससशक्त हो गया है.
चीन ,जपान,बर्मा ,नेपाल ,  और पश्चिमी राष्ट्र में मूल रूप में त्रिपिटक और अठकथाए मौजूद होने के चलते, बुद्ध धम्म हमे शुद्ध मिला है।
६ वी संगीत के बाद कोई कट या मिलावट नही मिलती है।
बुधघोष लिखित - विसुद्धिमग में ढेर सारे संप्रदाय ने आपने आपने पेट भरनेका तरीका निकल कर उसे योग साधना में डाल दिया है।
लेकिन विपासना को तोड़ नही पाए है।
कई संसार के देश में आज भी मूल बुद्ध साहित्य उपलब्ध है ,वजह है अनगतिक जैसे महान तत्वेत्ता 
उनासवी सदी में डॉ.बाबासाहेब ने उसे दोबारा बाहर पेश कर हमे बुद्ध धम्म का आइना दिखाया है।

नमामि भंते।
जयभीम ! नमो बुद्धाय

Sunday, October 2, 2022

Book - पुस्तक

Book : The Happiest Man on Earth arth.

Eddie Jaku.

हिटलर सन १९३३ मध्ये सत्तेवर आला.  त्याने जर्मनी आपल्या ताब्यात घेतली . जर्मनीत इथूनच विध्वंसक लाट आली .संपूर्ण समाजासाठी आणि जर्मनीसाठी पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम करणारा हिटलर   पुढे जाऊन त्यांनी सत्ता आपल्या ताब्यात घेतली तिथूनच पुढे खऱ्या विध्वंसला सुरुवात झाली.

#ज्यू लोकांना शाळेतून हाकलून दिले जाऊ लागले ज्यू मुलं हद्दपार आणि  शाळाबाह्य झाली.
तु ज्यू आहेस म्हणून तुला आम्ही शाळेत घेऊ शकत नाही .तू शाळेत यायचे नाही अशा समोरासमोर धमक्या दिल्या जाऊ लागल्या. मुलं आणि पालक भयभीत झाली.

याच काळात हिटलर ने आपली एक  एस एस SS (schutzstaffel) नावाचे सैनिक बल तयार केले आणि ते हिटलरच्या नेतृत्वाखाली  ज्यू लोकांचा  छळ करू लागले.

दरवाजा ठोठावून घरात घुसायचे आणि हकनाक लोकांना मारायचे काम सुरू झाले. कधी कधी तर SS चे सैनिक कर्मणूक म्हणून लोकांना बेदम मार द्यायचे आणि त्या बेदम माराचा आनंद घ्यायचे.
त्या सैनिकांचा एकच हेतू होता मानवी प्राण्यांना शारीरिक छळ करण्यातला असूरी आनंद उपभोगायचा .छावणीत असे काही कैदी होती की जे इतर कैद्यांच्या विरोधात जाऊन माझींना सामील व्हायचे त्यांना #कोपा असं नाव होतं .

पण दडपशाही करणारी माणसं सुद्धा दडपल्या जाणाऱ्या माणसा इतकी #भयभीत  असतात यालाच #फाशीझम  म्हणतात. एक अशी समाज रचना की जिथं प्रत्येक माणसाची शिकार होत असे. नाझीचा क्रूरपणा कधी उफाळून येईल हे सांगता येत नव्हते.

त्यांची कैद्यांना कॉफी पाजण्याची एक पद्धत होती. त्यांच्या कॉफीमध्ये ते एक रसायन घालत त्या रसायनाचे नाव होते #ब्रोमाईड . रसायन महाभयंकर मानवांच्या शरीरात काम करते हे रसायन घेतल्याने माणसाची लैंगिक वासना कमी होते व त्याचं पुनरुत्पादन इंद्रिये निरुपयोगी होतं थोडक्यात निकामी होते. थोडक्यात ते ज्यू लोकांना नपुंसक करत होते.

हे पुस्तक वाचल्यानंतर सामान्य माणसाला वाटेल आजच्या वर्तमान काळात आपल्या राज्यात ,देशात याच प्रकारे माणसाची कत्तल हत्या किंवा माणसावर जबरदस्ती , माणसावर या पक्षातून त्या पक्षात नेत असताना दिसत आहे. हे कशाचे द्योतक आहे ?

सुज्ञ वाचकांनी,नागरिकांनी  हे पुस्तक जरूर वाचायला हवे. हे पुस्तक अमेझॉन वर उपलब्ध असून त्याची किंमत ३६० रुपये आहे.

ज्यांचा आनंद हरवला आहे .जे निराशावादी आहेत अशा व्यक्तींनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.छोट्या छोट्या संकटाला न घाबरता यावर कशी मात करावी हे यातून शिकायला मिळते.  लेखकाने आपले अनुभव या पुस्तकात मांडलेले आहेत.

जगात सर्वात आनंदी माणूस कोण आहे ? हे माहिती देणारे पुस्तक आहे. म्हणून आनंद मिळवण्यासाठी , आनंदी राहण्यासाठी हे पुस्तक वाचणे खूप अत्यंत गरजेचे .

लेखक : बी आर शिंदे.नेरूळ नवी मुंबई.

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...