This blog is for Socially poor ,for uplifting their human values in day today Pure life.Like Buddhism originates in the teachings of Shakyamuni (Gautama Siddhartha), who was born in what is now Nepal some 2,500 years ago.He became increasingly possessed by a longing to abandon the secular world and go out in search of a solution to the inherent sufferings of life.And he gave Triratn ,Four Nobel truth ,Panchshil ,Ashtangik way and ten Parmi .for peace of Globe.
Friday, May 29, 2020
कविता : मैत्री
कविता : वेळ बंद
प्रा.बालाजी शिंदे.
9702158564
balajishinde65@gmail.com
PM Care fund (?)
बुद्धपौर्णिमा.
प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६
.....म्हणे परत येणार ? काय मरायला येणार का ? \#बीआर🐜antwork.
आजचे कीर्तनकर्ते.
चीनी भासेचा भाषांतरकार भिक्खु कस्यप मातंग .
चीनी भासेचा भाषांतरकार भिक्खु कस्यप मातंग
चीनमध्ये बुद्धाधम्मचा शिरकाव केंव्हा आणि
कसा झाला हे निश्चितपणे सांगता येणार नाही ,पण असे म्हणतात की एका राजाच्या फौन नावाच्या मंत्र्याने
कन्फुसीएसला विचारले की ,’जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे ?’ कन्फुसीएस ने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले की ,पाछिमेच्या देशात राहत असलेला एका स्वर्गीय तत्वज्ञानी ‘माणसा’ बद्दल मी एकले आहे .’ या कथेचा संधर्भ देऊन बहुतेक सर्व चीनी बौद्ध असे अनुमान
काढतात की ,कन्फुसीएसला बुद्धबदधल माहिती होती. हे त्रिकाल सत्ये आहे .
कस्यप मातंग आणि चू-फा–लीन ई स ६७ मध्ये प्रथम चीनला धम्म प्रसार आणि प्रचारासाथी
गेले .
कस्यप हा मातंग बौद्धिस्ट भिक्खु होता . हे
बुद्ध साहित्यात अंकित आहे . मातंग ऋषि ,मातंगी ,तिची चांडाळ पुत्रि कृतिका हे सर्व संधर्भ बौद्ध काळात
अभिधम्म पिटकात -कथावत्थुत घडलेल्या कथात आढळतात . कस्यप मातंग आणि चू –फा–लीन (धर्मरक्षक )हे दोघे प्रथम यू –ची येथे मध्ये आशियातील खाता जवळ भेटले .
कस्यप मातंग हा महान बौद्धधम्म प्रसारक
होता आणि चू –फा–लीन हा महान बौद्धधम्म रक्षक होता . या
दोघांनी आपसात सल्ला मसलत करून धम्म आणि धम्मा चे पुरुजीवन करण्याचे ठरवले .
पांढऱ्या घोड्यावर बसून साठ लाखाहून जास्त शब्द भंडार असलेल्या संस्कृत भासेतील
बौद्धधम्म ग्रंथ आणि बौद्ध मूर्ति घेऊन धम्म प्रसारासाठी चीन ला निघून गेले .
कस्यप मातंग आणि चू–फा–लीन या दोन भारतीय बौद्ध धम्म भिकुणी
चीनचा सम्राट मिंग –टी याला भेट दिली ,धम्म प्रसार आणि प्रचार साठी आल्याचे कळवले . सोबत घेऊन
गेलेल्या वस्तु म्हणजे ,धम्मग्रंथ आणि गौतम बुद्धाची मूर्ति भेट
स्वरूप दिली .
या चीन च्या सम्राटाने कस्यप मातंग आणि चू–फा–लीन यांचा औचित्य पूर्व आणि आदर पूर्वक
भव्ये सत्कार केला . सत्कारा नंतर हो–लू येथील विहारात
त्यांची राहण्याची सोय करन्यात आली . येथे वास्तव्यात राहून यांनी धम्मप्रसार आणि
प्रचार करणायस सुरुवात केली .
कोणत्याही गोस्टिची प्रसिद्धी किंवा प्रचार
रीतसर आणि योजना बद्ध आणि अविरत न रोकता करायचा असेल तर तेथील राजदरबारी त्या
साहित्याची दखल असायला हवी ,थोडक्यात राजाश्रय
हवा आणि तो चीनच्या सम्राटने बहाल केला होता म्हणून इथून बौद्ध धम्माच प्रचार आणि
प्रसार करता आला . तीच गत श्रीलंका ,ब्राह्मदेश ,लाओस ,कंबोडिया आणि जपान
मध्ये झाली आणि धम्म भरभराटीला आला .
राजा अशोकाच्या काळात भारतात तेच झाले ,सम्राट राजा अशोकाने बुद्ध धम्मातील बौद्ध साहित्य शोधून
काढून त्याचे पुर्नुथान केले .येवढ्यावर न थांबता ई. स. ३ ऱ्या शतकात पहिली धम्मसंगीती घेऊन जगभरात धम्माचा
प्रसार आणि प्रचार केला . आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र याला श्रीलंकेत
प्रचारासाठी पाठवले ,इतीहासात हा सर्वात मोठा धम्मप्रचार आणि
प्रसारा साठीचा दुवा मानला जातो . पण
दुर्दैवाने राजा असोकाच्या बृहदत्त या नातू ने त्याचा ब्राह्मण सेनापति
पुस्येमित्र शुंग याचेकडून धोक्याने वढ केला आणि स्वतःस राजा महणून अभिषेक करऊन
घेतला.
प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की
यानेच वैदिक धर्माचे पुनरुज्जीवण केले यज्ञसंस्था परत सुरू केली . नव्याने पुराणे,स्मृति आणि कांही
ब्राह्मण ग्रंथ लिहऊन घेतले. याचा अर्थ परत ब्राह्मणी युग सुरू झाले या युगाची
सुरुवात देशात इंग्रज येई पर्येंत सुरूच राहिली .
सम्राट राजा अशोकाने बुद्ध धम्मातील बौद्ध
साहित्य शोधून काढून त्याचे पुनरुज्जीवण केल तो जसा राजाश्रय होता ,तीच बाब कस्यप मातंग आणि चू – फा –लीन यांचे बाबतीत चीन मध्ये घडली होती ,यांना भक्कम राजाश्रय दिला गेला होता .
आता प्रचार आणि प्रसारासाथी ठिकाण निश्चिती
लागते ते त्यांना चीनी सम्राटाने देण्याचे
मान्ये केले . त्यांची ‘हो –लू’ येथील विहारात
राहण्याची सोय ही करण्यात आली लो –फू पुढील एक वर्ष
काळानंतर ते ‘लो –वाइंग’ शहराच्या पश्चिम
दिशेला दरवाजा बाहेर “स्वेत अश्व” नावाचा भव्ये विहार
बांधण्याची राजआज्ञा ही दिली होती . आज हे विहार भारतीय आणि चीनी बौद्ध धम्माचे
संगमस्थान म्हणून मानले जाते. या विहारचे आधुनिक नाव ‘व्हाईट होर्स हाऊस’ असे संबोधले जाते , लगबघ ३,४५० क्षेत्रफक
असलेला विहार आज दिमाखात धम्म देसणाचे स्थान होऊन बसला आहे .त्या काळात इथूनच
आशिया आणि दक्षिण पूर्व-आशिया खंडात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रवास सुरू झाला
होता .
व्हाईट होर्स हाऊस येथून महान दार्शनिक बुद्ध भिकु कश्यप मातंगाने
‘बेचाळीस सूत्ताचे’ चीनी भाषेत भाषांतर
केले होते. महणून भिक्खु संघात महान दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मातंगाला आणन्ये
साधारण महत्व आहे . याच भाषांतर कार्याने महान दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मातंग ,चीनी भासेचा भाषांतरकार म्हणून बुद्ध साहित्यात प्रसिद्ध
आहे.
दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मतांग याने
मिंग –टी सम्राटाच्या
अनुमतीने चीन मध्ये बुद्ध धम्माच्या प्रसाराचे काम सुरू केले . आणि तो काळ ई स ६७
चा होता .
वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही धर्माची
उन्नती ,विकास आणि वृद्धी हवे असेल तर राजाश्रय खूप महत्वाचा भाग
होय आणि नेमके तेच ई स ६७ मध्ये घडले आणि बुद्ध धममच्या प्रसारास चालना मिळाली .
नंतर च्या काळात धम्म प्रसारा आणि आभ्यास
करण्यासाठी अनेक भारतीय भिक्खु भारतातून चीन मध्ये गेले आणि चीन मधून भारतात आले .
इथून खर्याल अर्थाने आशिया आणि दक्षिण पूर्व-आशिया खंडात बुद्ध धम्माचा प्रचार
सुरू झाला . याचे श्रेय भिक्खु कश्यप मातंग याच्या वाट्याला जाते .
तेंव्हा पासून ते आज तागायत बुद्ध धम्म
प्राप्ती साठी बुद्धांच्या पवित्र स्थळाचे ,धम्माचे दर्शन
घेण्यासाठी अनेक चीनी बुद्ध भिक्खु भारतात येतात .
चीनी लोक जंबुद्वीप देशात आज केळव बुद्धसाधनेसाठी येताना दिसत आहेत .
इतिहासाची पाने पाहत असताना ,सुरवातीच्या काळात चीन देशात बुद्ध त्यांचा धम्म हा सरळ
मार्गी गेला न्हवता तो मध्ये- आशियातून चीन देशात गेला होता . तसे पाहता चीनी आणि
भारतीय भिक्खुनी विविध माध्यमाद्वारे हजारो भारतीय बौद्ध ग्रंथ प्रती भारतातून चीन
मध्ये घेऊन गेल्याचे पुरावे सापडतात .हेच बुद्ध धम्माचा महानतेचे प्रतीक होय .
बुद्धानंतर च्या काळात एखाद दूसरा ग्रंथ जसे “ मंजुश्रीमूलकल्प” सोडला तर एक ही
ग्रंथ अस्तीत्वात न्हवता . म्हणून प्राचीन काळी प्रचार आणि प्रसारचे कार्य चीनी
भाषेतुन जास्त झाल्याची आणि झाले असल्याची असंख्य पुरावे मिळतात .
संदर्भ :
बुद्धधम्मचे
संदेशवाहक – भाग :१ तीन चीनी
प्रवाशी : मा. शं.मोरे २७ एप्रिल १९८२
दीघनिकाय भाग १ -
अनुवादक : वसंत धावरे. सुगावा प्रकाशन ,पुणे.१४ एप्रिल १९८८
बुद्ध आणि त्यांचा
धम्म – अनुवादक : प्रा.
देवीदास घोडेस्वार. १३ ऑक्टोबर २०१३बुधवार २७,मे २०२०
प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६
balajishinde65@gmail.com
धम्म दान.
IIधम्म
दान /बीआरantWork.II
बुध्दत्व प्राप्ती नंतर तथागताने जानलेला, दिव्य
दृष्टिने पाहिलेला ‘धम्म’
जगातील मानव प्राण्यांच्या कल्याणार्थ प्रर्वतीत करण्याचा संकल्प केला. बुध्दापासून
निघून गेलेल्या त्याच पंचवर्गीय भिक्खुना बुध्दाने प्रथम धम्म प्रतिपादन करून
धम्माचे चक्र प्रवर्तीत केले.
बुध्दाने बौध्द उपासकांसाठी जे दहा गुण सांगितले त्यालाच
पारमिता असे म्हणतात. पारमिता म्हणजे श्रेष्ट गुण आणि जो हे गुण
पार करतो तोच ‘बुद्ध
होय’.
या गुणांना म्हणजेच आचरणाला ‘पारमी’ असे
म्हणता . या
दहा पारमी होत.
1. शील
पारमिता
2. दान
पारमिता
3. उपेक्षा
पारमिता (नेक्खम्मा –त्याग )
4. नैष्कम्य
पारमिता (पण्ण)
5. विर्यपारमिता
6. शांती
पारमिता (खान्ति )
7. सत्य
पारमिता
8. अधिष्ठान
पारमिता
9. करूणा
पारमिता
10.मैत्री
पारमिता (मेत्ता
भाव )
आता दान पारमी काय ते बघू या . दानवृत्तीला
म्हणजेच दानाला ‘बौध्द
धम्मात’
शील नंतर दुसर्या क्रमांकाचे महत्व आहे. दान करणे
हा श्रेष्ठ गुण होय.ज्या कडे हा गुण आहे तो खरा धम्म जाणतो असे
म्हणतात . दान केल्याने मनाची आसक्ती
कमी होते. माणूस
घेण्याएवजी देण्याचे शिकतो. यातून
त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते इतरांच्या कल्याणार्थ म्हणून देण्याचे शिकतो. यातून
त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते. जे जवळ आहे ते माझे नाही व जे माझे नाही ते
इतरांना दिले पाहिजे.
पण आज दांनाची परिभाषा पूर्ण निघून गेली आहे . दान
देतांना मात्र बदल्यात दान देणाऱ्याने घेणाऱ्या कडून काहीही अपेक्षा करू नये असे
असताना त्या मोबदल्यात स्वताला सतत प्रासर मध्यावर झळकत ठेवण्यासाठी दान केले जात
आहे . दोन
पार्ले बिसकुट चे पाकेट वाटून दहा फोटो काढल्या जात आहेत .
फोटो घेणे ही अपेक्षा नाही का होत ,हीच
तर खरी धर्म आणि धमामतील घपलत आहे . कशाच्या ना कशाच्या मोबदल्यात दिलेले दान हे
खऱ्या अर्थाने दानच नव्हे. सुखप्राप्ती, स्वर्ग
प्राप्ती, धनप्राप्ती. पाप
मुक्त व्हायचे म्हणून, दानी
म्हणून नाव लौकिक व्हावा या हेतूने जे दान देतात ते दान नव्हे.हा ‘धर्माचा’ भाग
आहे ,असे
दान हे ‘धम्म
दान’ होऊ
शकत नाही . याचा देणाऱ्याला काहीच लाभ होत नाही. बौध्द
उपासक आणि उपासकिने धन, द्रव्य, वस्त्र, रक्त
व प्रसंगी शरीरिक श्रम दान करण्याची तयारी ठेवायला हवी हाच दानाचा खरा अर्थ होय. समाजाला
दान देणे हे आपले कर्तव्य होय कारण आपण जे मिळवले त्यात समाजाचा प्रतेक्ष - अप्रत्यक्ष
का होईना पण सहभाग असतोच . दान देणे व दान घेणे या दोन्ही क्रिया अत्यंत
निर्मल व श्रध्दापूर्वक व्हायला हव्यात , तरच दानाचा हेतू साध्य होईल व दान देणाऱ्या व
घेणाऱ्याचेही कल्याण होईल, मंगल
होईल, म्हणून
‘बौध्द
उपासकाने’ शक्य
तेवढे दान देत राहावे यातूनच तृष्णेचा, आसक्तीचा लोप होऊ शकतो . यामुळे तृष्णेचा क्षय होतो , समर्पनाची
प्रवृत्ती वाढीस लागते. सर्व दानात श्रेष्ठ दान हे ‘धम्मदान’ होय, धम्माच्या
प्रसार, प्रचारासाठी
दान देणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे. पण
सोंग ढोंग करून भिक मागण्याऱ्यांना, कर्मकांड, देव -दैवतांचे
नावावर दान देऊ नये. निरर्थक उत्सवांना दान देऊ नये.
मला इथे एक गोस्ट सांगावी वाटते . धरण
किंवा तलावात छोट्या मोठ्या नद्या आणि नाल्यातून पाणी येऊन तलाव किंवा धरण काठोकाठ
भरते ,ते
फुटू नये महणून अधुन -मधून त्या तलावाचे दरवाजे उघडून पाणी सोडून
त्याचे अस्तित्व कायम टिकवले जाते . तीच गत आपण श्रमाने कामावलेल्या संपती ची आहे ,जर
दान रूपी तलावाचे दरवाजे अधुन -मधून उघडले नाही तर एक वेळ अशी येते की तलाव
वाहून जाते . महणून
बुद्धाणे संपत्ति संचय नाकारला होता. गरजे पूर्ती साठवण करणायस सांगितली होती .जो
खरा धम्म जाणकार आहे आणि तो धम्मा त आहे
तो कधीच संपती संचय करीत नाही.
तर मग चला दिन दुबळ्याना दान करून कसलीच ( फोटो
विडियो ) अपेक्षा
न करता आपला ‘धम्म
दांनाचा’ नियम
पाळा . आणि
सदैव दान करा.
@@@
सर ,
नमस्कार .
मी प्रा.बालाजी शिंदे ,गेली
२५ वर्ष दिव्यांगजन ( Disabilities
) क्षेत्रात
कार्यरत असून कर्णबधिर हे माझे
कार्येक्षेत्र आहे . आपला अपंग क्षेत्रातील लेख वाचून कोणते आपंग
हे कळत नाही ? कर्णबधिर
(HI),अंध (VI) ,अस्थिवयंग (OH) ,की मतिमंद (MR) . लेखाचा
आशय ठीक आहे ,
शुभेचा ,पण
विकलांग किंवा अपंग म्हणून विसंगती वाटते . यात
कोणती दिव्यांगता विशद होत नाही ?
अधिक माहिती साठी ...
Ministry
of Social Justice and Empowerment ,Govt of India येथे
भेट द्या .
कांही अधिक माहिती हवी असेल तर ,मिराज
च्या कर्णबधिर शाळेत माझा सदर्भ देऊन श्री. गढवीर
सर ( विशेष
शिक्षक कर्णबधिर यांचेशी संपर्क साधा )
प्रा.बालाजी शिंदे.
balajishinde65@gmail.com
9702158564#लाईफ_वार्निंग_बेल
#लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...
-
नात्यात लग्न एक अभिशाप दिनांक : १७-०४-२०१७ नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक ...
-
दलाली दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८ दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो ...
-
. हाळी-हांडरगुळी जनावराचा जंगी बाज़ार : २०/११/ 2017 तालुका उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध ...
-
भारतीय शिक्षण प्रणाली बर्याचदा आपनास एखादे आव्हान भेडसावत असते आणि एखादा गहन प्रश्न पडतो उदा : राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ)...
-
अंधश्रद्धा एक अभिशाप २१/११/२०१७ -२३/११/१७ -29/११/२०१७ .final correction on 08/12/2017 “आई ! आज शनिवार आहे न ग .रस्त्यावर लिंबू मिरची...
-
दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि एस एस सी...
-
शेंगा उकरायला येता का ? भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज ...
-
भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्ह...
-
स्पर्श एक एहसास है जो बचपन से लेकर अंतिम सांस तक सचेत रहता है। पहला स्पर्श माँ से होता है , जन्म के तुरंत माँ अ...