Showing posts with label कर्णबधिर. Show all posts
Showing posts with label कर्णबधिर. Show all posts

Thursday, July 30, 2020

आनंदवन कर्णबधिर विध्यालाय

मूकं करोति वाचालम्
July 16, 2020
महाराष्ट्रातील कर्णबधिरच्या क्षेत्रातील आनंद मूक बधिर विद्यालय आनंदवन या शाळेची  २ जुलॆ १९८३ ला या शाळेची स्थापना झाली. 

हा लेख मी वाचला आणि आणि संपूर्ण आनंदवनात व्यतीत केलेले दिवस आठवले आणि ,शिव सर यांनी एवढी मेहनत घेऊन लिहलेल्या लेखाला माझी प्रतिक्रिया न देणे हे राहवले नाही ...

या ३७ वर्षांचा शाळेचा प्रवास त्याला एक इतिहास आहे. आनंदवनातील अनाथ मुलांच्या प्रकल्पात कर्णबधिर विधायलाय चा सिंहाचा वाटा आहे .
माझा आनंदवन ला प्रथम भेट देण्याचा योग १९८५ ला आला होता. तेंव्हा नुकतीच आनंदवन ची स्थापना  झाली होती . तीन वर्षे वयात आले होते .

तो अनुभव खूप वेगळा होता ,येवढ्या मोठया प्रमाणात कुष्ठरोगी संख्या  पाहण्याचा वेगळा अनुभव . प्रतेक व्यक्ति आपल्या पुढील आयुष्यात बरे होण्याच्या जिद्धीने दिसली होती ,ती जिद्द खरी झाली . आज ती माणसे आनंदवनात आपले सुखी जीवन जगत आहेत . याचे श्रेय डॉ .आमटे दांपत्याला जाते . त्यांचा त्याग आणि मेहनत यावर आंनदवन येथे आनंदाची ‘वृक्ष वल्ली ’ उभा आहे .

इथे लिहण्याचा संधर्भ असा की १६ जुलाई ला शाळेचे आदर्श विशेष शिक्षक ,शिव सर यांना जाते . शिव सराणी आनंदवण च्या स्थापणे पासून ते आजतागायत इतिवृत खूप मार्मिक आणि सुंदर रीतने मांडले आहे ते सराहनिय आहे अजोड आहे .यावर मागील पंधरा दिवसात  कर्णबधिर क्षेत्रातील मान्यवराणी भर भरून आपल्या प्रतिकऱ्या  लिहाते झाले आहेत . वेळे अभावी मी त्या योग्ये वेळी माझी प्रतिक्रिया देऊ शकलो नाही महणून आज इथे लिहण्याचा उहापोह टाळता आला नाही . 

माझा या शाळेशी जूना  ऋनंनुबंध आहे ,म्हणजेच नाते घट्ट आहे . सन १९९८ ला येथे पुनः जाण्याचा योग आला तो थेट कार्यालयीन कामानिमित्त . 
कर्णबधिर शाळेत मुलांची कान तपासणी घेऊन मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात आली होती .तेंव्हा  बाबा आमटे आणि माझी भेट झाली नाही . या महान व्यक्तिला पाहणायची ईछा पूर्ण झाली नाही . 

परत पुढील दोन कार्यक्रम घेण्यात आले पण माझी प्रतेक्ष भेट कांही झालीच नाही . पण अशाच एका श्रवणयंत्र वाटपाट माझी भेट झाली तेंव्हा बाबा अंथुरणात होते . झोपून होते . त्यांना फिरणे चालणे शक्य  न्हवते कमरेला पट्टा बांधून झोपले होते .  मी आणि माझे स्नेही डोक्टर संजय खंडगाळे ,भाषा आणि वाचा तज्ञ आम्ही दोघांनी बाबांची घरी जाऊन भेट घेतली . यात आजच्या  कार्यक्रमाचे ,नियोजन आणि श्रवणयंत्र वाटप यावर चर्चा करून श्रवणयंत्र आणि त्याचा उपयोग ,वापर याविषयी माहिती दिली ,हे सर्व एकुण बाबा कमालीचे खुश दिसले आणि माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला . 

त्या काळी प्राचार्य हिंगे सर ,कडक शिस्तीत असताना दिसले . त्याचा मुलाच्या भाषा आणि वाचा विकासावर खूप भर असे .

आनंद अंध विद्यालय ,आनंदवन व संधीनिकेतन ,अपंगाची कर्मशाळा तपासणीसाठी आनंदवनात असे अनेक उपक्रम येथे चालतात .

आज भाषा विकास आणि वाचा विकास यावर खूप मोठया प्रमानात काम होताना दिसत आहे . एकंदरीत शाळेतील शिक्षक ,पालक यांच्या संगनमताने शाळेचे वन हे आनंदात झाले आहे . 
मला आनंदवन ची ओढ अजून आहे .आज ही आहे ,आणि असणार आहे .
इथे वास्तव्यात असताना  सकाळी उठल्यावर जो देखावा असतो तो अविस्मरणीय आहे . सकाळी मोर्निग वाक  ला मला जायला हमकास आवडते . मी दोन किंवा तीन दिवशीय कार्यक्रमात जातो,तेंव्हा तेंव्हा शिव सर आणि मी गप्पा मारत ते संपूर्ण निसर्गमय रान फिरून येतो ,बाहेर पडताच पूर्व दिशेला संपूर्ण लाल सुर्ये उगवताना दिसेल ,लगेच उजवे वळण घेतले की सुंदर तलाव .या तलावात अनेक विविध मासे .ते बघत पुढे सरकावे वाटत नाही ,लगेच पुढे खाली घासर्तीला उतरावे लागते ,तोच वेग वेगळी झाडे ,फुले वाघून भारताचा पूर्व प्रदेश आठवतो . पुढे थोडे वळण घेतले की सरळ रास्ता आहे ,परत दोन्ही बाजूला तलाव ,यात मनमोहक कमळ ,आणि विविध फुले . पुढे सरकार गेले की विविध रंगांनी नटलेले गुलाब फुले ,आणि इतर फळांची झाडे . मी ग्रामीण,खेडे गावातून महणून माझे इथे खूप मन रमते आणि मन अडकून राहते . परत परत यावेसे वाटते .
लगेच थोडे पुढे गेले की ,डाव्या हाताला वन गाय ,नीलगाय आणि शहामृग अशी विविध प्राणी . काय तर  आखा निसर्ग इथे नांदतो आहे या वनात आनंद वनात .. बाबाच्या वनात . आठवण आली की परत जाण्याची चाहूल लागते .. 

मूकबधिर विद्यालयाची स्थापना ही एक बाबाची स्व्प्न्पुरती त्यामुळे त्यांनी  एका कॊलारू गेस्ट हाऊस मध्ये शाळा सुरु केली. असा इतिहास आहे . विशेष शिक्षिकेची गरज होती मग नखाते साहेबांनी श्रीमती सरोज कठाळे यांचे नाव सुचविले त्यांची शाळेत नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी येणारा कर्ण बधिर मुलांचा वयोगट वेगवेगळा होता. वय वर्ष ८ ते वय वर्ष १६ एकाच वर्गात अशी मुले सांभाळने ही मोठी कसरत होती. सरोजताईंनी प्रायोगिक तत्वावर काही वर्ग रचना केली. पुढे शाळेत कर्णबधीर मुलांची व शिक्षकांची संख्या वाढत गेली.आणि पुढे वटवृक्ष झाला . 

सर्व सामान्यांप्रमाणे या कर्णबधिर  शाळेतही भाषा, वाचा ,गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल हे विषय शिकविले जातात. कर्णबधिरांच्या अध्यापनातील विशेष गरजा लक्षात घेऊन अध्ययन विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे विविध कौशल्य व साधनांचा वापर केला जातो. 
सर्व शिक्षकांसोबत  विद्यालयातील विशेष शिक्षक  आपल्या वर्गात श्रवण प्रशिक्षण आणि वाचा विकास  यावर भर देताना दिसतात आणि सतत मेहनत घेऊन मुलात भाषा आणि वाचा विकस कसा होइल आकडे त्यांचे ध्यान आणि मनन असते . 

ग्रामीण भागात मुले लवकर शाळेत दाखल होत नाहीत ही खंत आहे . यावर मात करून पुनर्वसन करणे कठीण जाते ,यावर ही या शाळेने मात केलेली दिसून येते .
५ ते ७ या वयोगटातील मुलात भाषा आणि वाचा वाढ करणे हे अवघड कार्ये . मुलांना ,त्यांची वायक्तिक श्रवणयंत्र लावणे ,त्याची काळजी निगा घेणे हे खूप जिकिरीचे असते . वर्गात सामूहिक श्रणवयंत्र ,स्पीच त्रैनर आणि इतर वाचा आणि भाषा आणि वाचा विकासाठी सहायक जे जे हवे त्याची खबरदारी घेणे हे ,निवासी  शाळेचे कौशल्य आहे . याच नसून भररातील निवासी शाळेची ही खूप मोठी अडचण आहे .

एखाद्या व्यक्तीने असे करा तसे करा दोन मिनिटात शाळेत येऊन उपदेश देऊन जाने आणि प्रतेक्ष अश्या मुळसोबत कार्य करणे हा पोर खेळ नाही . इथे आपली सर्वश्व मेहनत ,त्याग पणाला लावावा लागतो तेंव्हा खर्या  अर्थाने या मुलात विकास झाल्याचे दिसून येते . या शाळेत तेच मेहनत करणायचे काम तमाम शाळेतील टिम करीत आहे .  सर्व निरपेक्षतेने विशेष काळजी घेऊन सर्व  विशेष शिक्षक  शिकवितात. अतिशय मेहनत घेण्यांची वृत्ती या शिक्षक वर्गाकडे  आहे. हे मी अवलोकन केले आहे .

आज आनंदवनाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पुनर्वसन... संधीनिकेतन अपंगांची कर्मशाळा येथे अपंगांना व्यवसाय प्रशिक्षण दिल्या जाते. 
आदरणीय डॉ.विकास आमटे सर शाळेच्या प्रगतीला हातभार लावतात आणि शाळा विकासाला प्रथम प्राधान्य देतात . यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ते स्वतः पाहुण्यांना शाळा दाखवायला घेऊन येत असतं, आणि शाळेचा विकास व प्रगती  आलेख दाखवतात . 

शेवटी ,शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया आहे असे श्रध्देय बाबा आमटे म्हणतात.. तीच प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आनंद मूकबधिर विद्यालय, आनंदवन  प्रयत्नशील व कटीबंध आहे......आणि पुढे ही राहील अशी अश्या व्यक्त करतो .
इथे सर्व आठवणी मला व्यक्त किंवा मांडता येणार नाहीत ,पण मी आनंदवन च्या एक आणि एक आठवणी चा साक्षी असून तेथील प्रतेका चा ऋणी आहे . 

दीपक शिव सरांनी फेसबुक वर  आपला लेख लिहला आणि मला आठवणी लिहण्याचा मोह न  झाला नाही हे नवलच . महणून शिव सर ,घोलप सर आणि प्राचार्य हिंगे सर ,व त्यांच्या सर्व विशेष शिक्षकांचा मी ऋणी आहे . 


३० जुलाई २०२०

अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...