Monday, December 12, 2016

मी कसा झालो , मुक्कदर का शिकंदर !

मी कसा झालो

मुक्कदर का शिकंदर !


मी कार्यालीन  कॅम्प वर नसेल तर कधी सायकल वर जातो ,तर कधी मोर्निंग वाक करतो ,मी कॉलेज  मध्ये असताना माझ्या  वडिलाने मला एक सायकल घेऊन दिली होती तो काळ होता १९८४ चा मी माझी शाळा करून नुकताच लातूरला कॉलेज करण्यासाठी आलो होतो  ,वडील माझे खूप हरणकाळजी स्वभावाचे ,माझ्यावर त्यांचे खूप प्रेम ,कारण माझ्या पाटीवर एकूण तीन मुलीचा आणि तीन भावांचा विस्तार ,मी मोठा असल्या कारणाने ते मला खूप जपत असत ,म्हणून ते काळजी करीत असत. तसे कारने खूप होती त्यातले मला असे एक  वाटते ते म्हणजे मी त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा  माझ्या अगोदर एक मला बहीण होती ती लगेच काही कारणास्तव लहानपणी  मरण पावली होती ,असे नंतर  माय  ने मला सांगितले होते ,मी आणि माझ्या  नंतर एकूण तीन मुली आशालता ,उषा आणि महानंदा .या तिघीचा पाठीवर परत तीन भाऊ झाले .विजय ,दीपक आणि शिद्धेश्वर .या प्रेमापोटी ते माझी खूप काळजी घेत .हि गोस्त आहे ती १९८४ सालची .

मी शिवाजी विद्यालय हाळी -हंडरगुळी ,तालुका उदगीर येथून प्रथम वर्गात १० वि पास होऊन आलो ते ,जिल्ह्याचं ठिकाणी लातूर ला कॉलेज करण्यासाठी आणि श्री बसवेश्वर कॉलेज ला प्रवेश घेतला आणि माझे कॉलेज चे दिवस चालू झाले .

‘हरकुलस’ सायकल घेऊन दिली होती त्या वेळी माझ्या वडिलाने  त्यावर मी रोज  कॉलेजला जात  असे ..मला गावी असताना सायकल खूप येत होती ,  कारण सायकल चालवणे ,खेळणे खूप आवडत असे .

सायकल घेतल्यापासून सारखे वाटत होते कि सायकल वर कांही तरी नाव असावे ? कॉलेज ची मुलं आपापल्या परीने आवडीप्रमाणे सायकल वर नाव टाकीत असत . मग सायकल वर काय  नाव असावे असे मला सारखे विचारात टाकत असे  ,त्याच  दरम्यान लातूर मध्ये मी शिकत  असताना रिगल सिनामामध्ये  अमिताभ बच्चन चा सीनेला लागला होता आणि तो   मी पहिला तेव्हा असे वाटले कि ,सायकल वर नाव ......
“मुक्कदर का शिकंदर “ टाकावे हे पक्के झाले .  आणि मी ते सायकलच्या चैन च्या  मडगाड वर पेंटर  रंगारी सर यांच्या कडून ते काम करून घेतले .


आणि ते नाव  मी सार्थक केले  झाले.कारण मी केलेला माझा विकास आणि विश्वास आज मला दिसतो आहे.  

मी शाळेत ईयेत्ता आठवी पर्यंत नियमित गेलेलं आठवत नाही .माझे दादा खूप काळजीत असत ,एकदा असा योग आला कि यांचे चुलत भाऊ डॉ  .डी एन शिंदे हळीला गावी आले होते ,त्यांनी मला दादांच्या विंनती वरून शाळेत नियमित जा आणि अभ्यास कर असा सल्ला दिला नि मी खरोकर पूर्ण बदलून गेलो .सतत मेहनत केली नी ईयेत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने पास झालो .हे श्रेय जाते ते माझे काका डॉ शिंदे यांना ,ते सर जे.जे.हॉस्पिटल ,भायकला येथे स्त्री रोग तञ् म्हणून कार्यरत होते . तसेच कामावरून रेर्टिर्ड होईपर्येंत त्यांचेकडे व जे जे  कॅन्टीन चार्जे  पण होता .

दादा नुकतेच गावी गेले आहेत. कारण मी लातूर सोडल्या मुले ते पण गावी कायमचे स्थायिक झाले आहेत ,ते एक कुशल क्लॅरिनेट वादक ,गायक ,आणि उत्तम सिव्हिल चे काम करत असत . त्यांनी १९९५ ला राजा शाहू छत्रपती महविद्यालय येथील माझ्या डोळ्यासमोर संपूर्ण वर्गातील भिंती वरील  फळे तयार केले होते ,तेंव्हा डॉ वाघमारे सर ,प्राचार्य होते . त्यांनी हे वर्गातील फळे (ब्लॅक बोर्ड ) बघून माझ्या वडिलांची प्रशंसा केली होती . “ शिंदे मिस्त्री तुम्ही हे सर्व कुठे शिकला आहेत ,एखाद्या शिल्पकाराला लाजवेल असे फळे तुम्ही कोरून काढले आहेत “ आज के वाक्य एकूण माझे डोळे पाणावले आहेत ?

माझे दादा एक कुशल वादक पण होते ,ते नेहमी हैद्राबाद ला वाजवण्या साठी जात ,ते बरेचदा शीख बँड मध्ये काम करीत असत . एकदा हैद्राबाद ला असताना त्यांचा सनई वादक बिस्मिल्ला खान यांच्याशीही संपर्क आला होता ,दोघांनी एका मंचावर गीत गायनाचा कार्यक्रम केला होता ,जेंव्हा माझे वडील क्लॅरिनेट वाजून उठले तेंव्हा उस्ताद खान साहेबानी माझ्या दादांची शबासकी देऊन पाठ थोपटली होती . असे माझे कष्टकरी होते ?

    त्यांनी ती १९८४ ची सायकल पुनः दुरुस्त केली आहे ,ती बघून मला माझे कॉलेज चे दिवस आठवले ,व तो दुष्काळ पण आठवला .तेव्हा मी आणि माझे वडील दोघेच लातूर ला राहत असू ,माय आणि इतर भाऊ- बहिणी गावी राहत असत .

माझे दादा भूमिहीन शेतमजूर पण शहरात असल्याकारणाने ते  शेतात काम न करता ,गोवंडी काम करत .माझे अकरावी ते बी .ए .चे तृतीय वर्ष पर्येंत चे पूर्ण  शिक्षण घरातले काम करून  पूर्ण केले आहे ,दोघांचा स्वयपाक ,घर सफाई भांडी धुनि नि घरातील इतर कामे करून कॉलेज ला जात होतो आणि दुपारच्या सुट्टीत येऊन भाकर खाऊन परत कॉलेज ला जाई

जेंव्हा मी लातूर सोडलं तेंव्हा माझे दादा काही दिवस राहिले ,पण खाण्यापिण्याचा त्रास व इतर काम यामुळे ते पण १९८९ -१९९० ला लातूर सोडून गावी गेले .

मी मुंबईत एम .ए .इंग्लिश या पदवी अभ्यास क्रमाल प्रवेश घेतला ,आणि डॉ .बाबसाहेब आंबेडकर ,शासकीय मुलांचे वसतिगृह ,बी,डी .डी.चाळ वरळी  येथे प्रवेश मिळताच  राहावयास गेलो. त्या पूर्वी मला जो आधार होता तो माझी बहीण आशा हीचा तिच्याकडे मी मुंबईत आल्यापासून ते वसतिगृह प्रवेश पर्येंत घोडबंदर ला वास्तव्यात होतो .


प्रथम वर्ष पूर्ण झाल्यावर दिव्तीय वर्षात असताना मी बी .एड (कर्णबधीर ) डिग्री साठी अली यावर जंग राष्ट्रीय विकलांग संस्थान ,बांद्रा मुंबई येथे प्रवेश घेतला नी मी तेथून पास झालो ..आणि माझे एम.ए .चे दिव्तीय वर्ष अधुरे राहिले ..

आणि माझा विस्तार सेवा सहायक ( विशेष शिक्षा ) म्हणून १९९५ साली अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था ,के. सि . मार्ग बांद्रा मुंबई ( भारत सरकार ).... एकात भरणा झाला नी भारत भाराचा  प्रवास  सुरु झाला तो कधी न संपणारा .....

गुणो का खज़ाना है टमाटर !


गुणो का खज़ाना है टमाटर ! सेहत और सौंदर्य दोनों में लाभदायक..!!


Image result for tomato images
टमाटर सिर्फ स्वाद में ही खट्टा-मीठा नहीं होता बल्कि टमाटर कई तरह के औषधिय गुणों से भी भरपूर होता है। टमाटर एंटी-ऑक्सीडेंट और खासकर लाइकोपीन से भरपूर होता है। टमाटर में प्रोटीन, विटामिन, वसा आदि तत्व विद्यमान होते हैं। यह सेवफल व संतरा दोनों के गुणों से युक्त होता है। कार्बोहाइड्रेट की मात्रा कम होती है इसके अलावा भी टमाटर खाने से कई लाभ होते हैं। पौष्टिक तत्वों से भरपूर टमाटर हर मौसम में फायदेमंद है। इसे सब्जी में डालें या सलाद के रूप में या किसी और रूप में यह आपके लिए बेहद फायदेमंद साबित होगा।

टमाटर प्राकृतिक विटामिन और मिनरल्स से भरपूर होते है जिनमे विशेष रूप से विटामिन A, K, B1,B3, B5, B6, B7 और विटामिन C का समावेश होता है. इसके साथ ही टमाटर में फोलेट, आयरन, पोटेशियम, मेंग्नेशियम, क्रोनियम, कोलिन, जिंक और फास्फोरस भी होता है

टमाटर के फायदे | Benefits Of Tomato :

भूख बढाने के लिए – टमाटर खाने से भूख बढती है। इसके अलावा टमाटर पाचन शक्ति, पेट से संबंधित अनेक समस्याओं को दूर करता है। टमाटर खाने से पेट साफ रहता है और इसके सेवन से रोग प्रतिरोधक क्षमता मजबूत होती है।

पेट के लिए – पेट में कीड कीड़े हैं तो हर रोज खाली पेट टमाटर खाने फायदा होता है। टमाटर में हींग का छौका लगाकर पीजिए, पेट के सारे कीडे मर जाएंगे। टमाटर पर काली मिर्च लगाकर खाना भी काफी फायदेमंद होता है।

डायबिटीज के लिए – डायबिटीज रोगियों के लिए टमाटर खाना बहुत फायदेमंद होता है।टमाटर, क्रोमियम का एक बहुत अच्छा स्रोत हैं, जो रक्त शर्करा को नियंत्रित करने में मदद करता है। हर रोज एक खीरा और एक टमाटर खाने से डायबिटीज रोगी को लाभ मिलता है। टमाटर आंखों व पेशाब संबंधी रोगों के लिए भी फायदेमंद है।लीवर और किडनी के लिए – टमाटर खाने से लीवर और किडनी की कार्यक्षमता को बढ़ाता है। हर रोज टमाटर का सूप पीने से लीवर और किडनी को फायदा होता है।

गठिया के लिए – अगर आपको गठिया है तो टमाटर का सेवन कीजिए। एक गिलास टमाटर के रस को सोंठ में डालकर अजवायन के साथ सुबह-शाम पीजिए, गठिया में फायदा होगा।धूप से जली त्वचा के लिए – एक ताज़ा टमाटर और आधा कप दही को मिलाकर पीस ले और धूप से जली त्वचा पर लागये इस से राहत मिलती है |
दिल के रोग के लिए मददगार है टमाटर – टमाटर रोज खाने से अप्प का दिल मजबूत रहता है जिससे आप को हार्ट अटैक का खतरा कम हो जाता है और साथ में  ब्लड प्रेशर कंट्रोल में आता है
आखों की रौशनी के लिए मददगार है टमाटर – टमाटर आपकी दृष्टि में सुधार कर सकता है। टमाटर जो विटामिन ए प्रदान करता है, वो दृष्टि में सुधार और रतौंधी को रोकने में मदद कर सकता है। हाल के शोध से पता चला है कि, टमाटर लेने से धब्बेदार अध: विकृति, एक गंभीर और अपरिवर्तनीय आंख की स्थिति को कम करने में मदद मिल सकती है।
त्वचा के लिए – ब्रिटेन स्थित न्यूकैसल यूनिवर्सिटी के शोधकर्ताओं ने पाया कि टमाटर में एक ऐसा तत्व पाया जाता है जो त्वचा की सूर्य की पराबैंगनी किरणों से रक्षा करता है। इस तत्व को लाइकोपेन कहते हैं। इसके कारण ही टमाटर का रंग लाल होता है। शोधकर्ताओं का कहना है कि टमाटर से बने खाद्य पदार्थो (टोमैटो कैचप, प्यूरी, सूप, जूस) में यह भरपूर मात्रा में होता है।
प्रजनन शक्ति :- टमाटर का सूप पीने से मर्दों  की पर्जन्न शक्ति बढ़ जाती है |
अगर चाहते हैं कि आप एक स्वस्थ जीवन जिएं और प्रोस्टेट कैंसर जैसी घातक बीमारी से दूर रहें, तो जरूरी है कि आप रोजाना कम से कम एक  टमाटर जरूर खाएं।



श्रीराम गोजमगुंडे आणि मी

श्रीराम गोजमगुंडे आणि मी:





सन 1986 ची गोस्ट , श्रीराम गोजमगुंडे "झटपट करु दे खटपट " नंतर माझ्या कॉलेज मध्ये वार्षिक महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते।
त्यांचे हस्ते मला एका नाटकात 'बेस्ट कलाकार 'चा बहुमान मिळाला होता। प्रशंसा प्रमाणपत्र आणि रोख रक्कम 501/- रुपय।
त्यांची आठवण आली म्हणून ,मी आज ब्लॉग वर लिहीत आहे कारण ते आज आपल्यात नाहीत।

1 डिसेंबर 2016 ला अल्पशा आजाराने एका खासजी इस्पितळात लातूर येथे निधन झाले। ते 70 वर्षाचे होते।

लातूर चे पहिले सिने कलाकार, नट आणि दिग्दर्शक।असा त्यांचा प्रवास होता . त्यांचा सुप्रसिद्ध सिनेमा म्हणजे 'राजा छत्रपती'.
राजा शिवाजी हा त्यांचा एक उत्कृष्ट सिनेमा या सदरात मोडतो .

झटपट करू दे खटपट ' या सिनेमाचे गीत "दगडाने अंग तू चोळू नको ,ची शूटिंग मी पहिली होती। हे गीत त्याच्या शेतात शूट झालं होत ?सोबत सारला येवलेकर होत्या । सिनेमा तर चांगलं होता ,पण फ मु शिंदे यांचे गीत आणि महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा आवाज हा त्या सिमेचा गाभा होता । ते स्वतः या चित्रपटाचे नट आणि दिग्दर्शक होते ।

संदर्भ फोटो :श्री बसवेश्वर कॉलेज,लातूर ,प्राचार्य सितानागरे ,प्रा कुलकर्णी सर, माझे स्नेही सत्यनारायण राजहंस, मी आणि श्रीराम गोजांगुंडे ।


Sunday, December 11, 2016

आपल्या मातृ भाषेवर कृतीशील प्रेम करावे !

आपल्या मातृ भाषेवर कृतीशील प्रेम करावे
Image result for book montessori method

दिनांक २७ /२ /१३ रोजी ‘मराठी राजभाषा  दिन ‘ आहे . आपली बोली आणी मायबोलीला  ,इंग्रजीत  आपण “मदरटंग” म्हणतो . जपान सारख्या प्रगत देशात हि याला महत्व आहे . पण आपल्या कडे का नाही  ? मराठी भाषेच्या भवितव्या साठी  सातत्याने चिंता करणारे धुरीण तिच्या अस्तित्वासाठी कोणती कृती करतात ? कारण प्रश्न फक्त मातृभाषेचा नाही ,किंवा तिच्या प्रेमाचा हि नाही ,प्रष्न आहे तो तिच्या २००० वर्ष्यापेक्ष्या  अधिक काळ वाहत आलेल्या ज्ञानाचा ,संस्कृतीचा आणि संचिताचा आहे .

आपण भारतीय या गोष्टीला मुकत चाललो  आहोत .थेट जन्माने मिळणारे हे संचित आपण नाकारत आहोत . इंग्रजी सारख्या परक्या भाषेत आपण आज आपल्या लाडक्या मुलांना शिक्षणाच्या नावाखाली अपरिचित संस्कृती ,आणि संचितात ढकलत आहोत . ते इतर राष्ट्रात होत नाही .मोंटेसरी  नावाच्या बाईने पुर्वाते देशात इटलि येथे आपल्या “मोटेसरी मेथोड “ या पुस्तकात मातृभाषेत  शिक्षण दिल्याने मुलावर किती संस्कार  होतात व ज्ञान मिळते याचा  उहापोह केले आहे .

आज मराठीच्या  भवितव्याची चिंता अनेकांना वाटते आहे .चिंता वाटणारे वेगवेगळ्या क्षेत्रातले धुरीण आहेत . त्यात धुरा सांभाळणारे नेते सुद्धा  आले .

कवी, लेखक ,कथाकार ,नाटककार ,कलाकार ,निर्माते ,दिग्दर्शक इत्यादी या सर्वाना वाटते कि मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे ,तिची संस्कृती टिकली पाहिजे ,आणि तिचे  संचिते टिकले पाहिजेत .
मग हि मंडळी आपापल्या मार्गाने तिला पुढे नेत असतात .

विविध क्षेत्रातील जाणत्या आणि नेतृत्वाच्या स्थायी असलेल्या आपल्या भाषेच्या संधर्भात आपण काय करायला  हवे याची गरज आणि निकड निर्माण केलेली आहे . जरी असतील त्यांची कक्षे वेगवेगळी .

आणि हि गरज  सर्वच क्षेत्रात झाली पाहिजे असे  त्यांना वाटते ,मग ते सामाजिक ,आर्थिक आणि राजकीय असेल . आणि त्यातल्या त्यात ती जास्त  करून “शैक्षणिक “ असायला हवी . तरच तिची पाळेमुळे आजच्या पिढीला कळतील .

मातृभाषेला २००० वर्ष्या पासुनची असलेली गढी आज आपण विसरत चाललो आहोत . यात असलेलं ज्ञान आपण विसरत चाललो आहोत ।

आज आपण हे विसरत चाललो आहोत कि आईच्या गर्भात जी भाषा शिकतो तीच मातृभाषा होय ,तीच्यापासूनच  आपण पोरके का ? मूळभाषेतच आपल्या  मुलाच्या शिक्षणाला सुरुवात होते ,तिची पाळेमुळे तेथूनच सुरु  होतात . नंतर भाषेचा विकास होत असतो ,आणि नंतरच्या काळात मुल इतर भाषा शिकते ,या भाषा  शिकत असताना प्रेत्येक ठिकाणी त्या भाषेला मुला कडून संदर्भ  लावला जातो ,जर मुळात मूळभाषेचा मुलात विकास झाला नसेल तर ,पुढील भाषा व भाषेचा आशय लावणे कठीण जाते .

म्हणून मातृभाषा अवश्य असायला हवी . खेड्यापाड्यातील मुल जेंव्हा शाळेत जाते तेव्हा त्याची भाषा  हि आईची असते ,मग ती लिखित असो कि बोली ,आणि तीच असायला हवी . तरच मातृभाषेचा विकास म्हणजेच भाषेचा विकास म्हणता येईल . जुने व नवीन याची सांगड होण्यासाठी भाषा एक मोठे साधन आहे ,आणि ती म्हणजे मातृभाषा मराठी होय .

जुनी वाक्ये नेहमी नव्याला सांगड घालत असतात . उदा.   धुरा सांभाळावी ,शेजारधर्म पाळावा ,हि झाली  आजी आजोबांची भाषा  यात आपण धुरा ,(शेतीतील अर्थाने वापरतो ) तर शहरात मित्र या अर्थाने वापरतो ,या शब्दांचे अर्थ कळण्यासाठी जुने आलेच पाहिजे . तर नवीन आणि जुन्यांची  सांगड घालता येईल ,जुनीच भाषा  नसेल तर भाषा विकास कसा करता येईल ?

भाषेला रूप देऊन आपली भाषा विकसित करू शकतो आज आपणच आपल्या मुलाबाळाना परकीय भाषेत लोटत चाललो आहोत . ती भाषा आपली नसताना देखील , ना ती आपल्या आईची न आजी- आजोबांची तरी ती परकीय भाषा आपली कळत  नकळत आपली होत आहे ? हे काही मातृभाषा विकासाला पूरक नाही या बाबीचा विचार व्हवा . हे आपण क्रूर कृत्ये करत आहोत अपरिचित भाषेत आपण लोटत असताना त्या संस्कृतीचा विचार ,संचिते आणि विचार नकळत शिकवत आहोत याचा विसर पडायला नको .

दूरगामी विचार केलातर हे फार नुकसानकारक आहे . पूर्वी आम्ही सर्वांनी मराठी भाषेत राहूनच हजारो पुस्तके वाचली ,कथा कादंबऱ्या वाचल्या आणि भरपूर ज्ञान मिळाले . जे मातृभाषेत आहे ते कुठेच नाही . जर आज लोकांना  इंग्रजी  उत्तम वाचता लिहिता येत असेल तरीपण उत्तम मराठी किती जणांना येते ?

जे लोक ज्या मातृभाषेत शिकतात त्या देश्यातील लोकांनी ,धुरिणांनी सगळे ज्ञान मातुभाषेत उपलब्ध करून दिलेले आहे ,पण तसे आपल्या मायबोलीत किंवा भारतात झालेले प्रयेत्न दिसत नाहीत ,हि खेदाची बाब आहे . त्यांचे इंग्रजी वाचून काहीच अडत नाही ,ते उच्च पातळीला गेले आहेत , मग आपलेच इंग्रजी वाचून का अडते ?त्या त्या देशाने आपल्या भाषेचा विकास केला मग आपल्याकडे का व्हायला नको ?

सगळ्या गोष्टीचे ज्ञान मराठीत उपलब्ध करून देणे हा एक उपाय होऊ शकतो ,मग विज्ञान ,सगल्या ज्ञानक्षेत्रातले ज्ञान मराठीत उपलब्ध करून हि प्रक्रिया  सतत चालू ठेवायला हवी . तरच मराठी भाषा उच्च कोटीला जाईल ,मुळात ती उच्चकोटीला आहेच फक्त तिला पुढे ढकलण्याचे सततचे बल लावायला हवे  . आणि या बाबीवर सामाजिक , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील धुरिणांनी एकत्रित येउन विचार करणे अवश्यक नाही का ?

जगातील कोणतेही बालक वयाच्या ३ वर्षीपर्येंत आपली मातृभाष्याच अवगत करत असते . मग महाराष्ट्रात  पहिलीपासून इंग्रजी विषय कश्याला हवा ? विज्ञान आणि गणित तर इंग्रजी भाषेतून शिकवणे फार घातकच आहे ? हातचे ,वजाबाकि कसे शिकवणार . कारण हे सगळे मातृभाषेतून सुलभ आणि सहज असते . कोणतेही ज्ञान फक्त मातृभाषेतूनच लवकर ग्रहण होते .

मराठी हि भाषा अतिप्राचीन आहे . चक्रधरस्वामी  ,संत  तुकाराम , संत ज्ञानेश्वर ,बा शी मर्ढेकर , शिरवाडकर ,पु ल देशपांडे हे या भाषेचे खांब आहेत . यांनी जनसामन्याला कळावी अशी मराठी  भाषा निर्मिती केली . यांच्या  प्रमाणेच आपणही थोडा खारीचा वाटा  उचलून कृतीशील आणि वक्तशीर मराठीवर प्रेम करूया .


कडेवरील तान्हे बाळ

कडेवरील तान्हे बाळ

Image result for mother feeding baby images

बाळ म्हणताच सर्वांच्या नजरेसमोर एक छानशी छबी येते. ते गोंडस गोजिरवाणे बाळ .बाळ हाच   देशाचा एक  महान नागरीक  .कुटुंबातील प्रत्येकाला बाळ हवे असते,आणि ते असायलाच हवे ,जर बाळाचे योगे रीतीने संगोपन,पालन पोषण  केले तर ,बाळ घराची ,समाजाची आणि देशाची मान जगात उंचावेल ,मग ती मुलगी असो व मुलगा .
सद्याचा काळात बाळाची खूप हेळसांड होताना आपण पाहतो .
मी निवणूक अधिकारी असतानाची घटना ,एका लेखात लिहिले होते कि ,"कडेवरील बाळास मतदान केंद्रात परवानगी देण्यात यावी ".....तसे आणखी सरकारी दफ्तरी आदेश आहेत असे मला वाटत नहि.
कडेवर घेतलेले हल्लीच्या काळात एक देखील बाळ  बघायला मिळणार नाही .(दुरचित्रवाणीच्या कार्यक्रमातील  राखी सावंत सोडली तर  ,चांगल्या अर्थाने आदर्श अदिवशी व ग्रामीण माता भगिनी वगळता ) ..
कडेवरील बाळ हि संकल्पना अत्येंत चांगली व बाळाच्या वाढीस व पोषणास उपायकारक आहे बाल कडेवर घेतल्याने बालकाच्या  संगोपनास त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो .बाळ  कडेवर घेतल्याने खालील गोष्टीचा फायदा होतो .

मुल कडेवर घेण्याची फायदे खालील प्रमाणे आहेत
१.भाषा वाढीस मदत :
मुल कडेवर असल्याने मुलांची भाष्या वाढ लवकर होते .जेव्हा आई बडबड करते एखादे गाणे गुणगुणते तेंव्हा  मुलाला खूप आनंद होतो ,तेच तेच एकूण मुल पुन्हा गुंगुण्याचा प्रयेत्न करते .मुल दोन वर्ष्या खालील असेल तर सतत बडबड करीत असते आईला हैराण करून सोडते ,आणि बोलण्याचा प्रयेत्न करते .आणि सतत प्रश्न विचारीत असते .आई हे काय आहे ?ते काय आहे ?मला ते दे ?ममी मला हे दे ते ? मला भूक लागली आहे दुदु दे खाऊ  दे ? इत्यादी .मुल जेंव्हा अर्धे वाक्य बोलते तेंव्हा आई ते पूर्ण करते ,आणी हसत खेळत मुळात भाष्या विकास घडून येतो .उदा.बाबा आले ..बाबा आले ..मग आई बोलते ..बाळा बाबा ऑफिस मधून आले ,असे म्हणावे ..!
जगातील कोणत्याही मुलात  भाषा विकासाचा काळ म्हंजे वयाची ३ वर्ष होय ,आणि या काळात मुल हे ज्यास्तीत जास्त  आई कडेच असते .याच  काळात मुल आईची भाषा शिकते ,आणि ती आईकडूनच शिकते .आणि हि भाषा मुल आईकडून ऐकून ऐकून शिकते .आणि नंतरच्या काळात या भाषेला अमूर्त स्वरूप  प्राप्त होते .तेंव्हा मुल कडेवर घेतल्याने हा सर्वात मोठा फायदा बघावयास मिळतो .  

२.सुरक्षितता :
मुल कडेवर असेल तर ते स्वताला सुरक्षित समजते .त्याला कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही .बिनदिक्कत आईच्या कडेवर बागडत असते .म्हणून आईच्या कडेवर मुल असायला हवे .



३.आईचा स्पर्श :
बाळाच्या एकंदरीत वाढीस व संगोपनात आईच्या स्पर्श्यची खूप गरज असते .सतत बाळ कडेवर असल्यावर आईच्या स्पर्शाने बाळ सतत उबदार राहते .जसे कांगारूच्या पिशवीत तिचे छोटे बाळ असते .जेव्हा बाळाला आईच्या उबदार स्पर्शाची उब मिळते तेंव्हा बाळाला कसलीच भीती वाटत नाही ,याचाच अर्थ बाळ कडेवर असताना धस्थपुस्थ होते .बिनदिक्कत आईच्या कडेवर बागडत असते .म्हणून आईच्या कडेवरील मुल खूप सुरक्षित वाढते .
४.संसर्ग रोगापासून  बचाव  
हल्लीच्या काळात शहरी भागात आणि वातावरणात आणि कार्यालइन  कामकाजात आईला मुलाना कडेवर घेण्यास वेळच कोठे असतो .तेंव्हा बरीच मुले घराबाहेर ठेवली जातात .काही मुले पाळणा घरात ,क्रेडल मध्ये ,घरात काम करणाऱ्या घरवालीकडे किंवा घरकाम करणाऱ्या बायकांकडे ठेवले जाते .
फारतर मुले पाळणाघरात ठेवली जातात ,किंवा अंगणवाडीत जातात ,( ग्रामीण भागात )अश्या एकंदरीत मुले  ठेवल्यामुळे एकमेकांचे आजार व आजारपासून  होणारे संसर्ग होण्याची संभावना असते .आणि संसर्गरोग होण्याचा ज्यास्त प्रदूभाव असतो .
म्हणून अश्या प्रकारच्या रोगापासून बचाव करण्यासाठी मुल कडेवर वावरणे महत्वाचे असते .
हल्लीच्या काळात  बर्याच मात्ता भगिनी या कामावर जाणार्या  असतात तेंव्हा त्यांच्याकडे वेळ नसतो .तरी पण आपण जेंव्हा जेंव्हा घरी असता तेंव्हा तेंव्हा घरामध्ये वरांड्यात ,गच्चीवर फिरता फिरता बाळ कडेवर घेऊन फिरावे .म्हणजेच कडेवर घेऊन फिरावे .तेंव्हा बाळ खूप आनंदित पहावयास मिळेल .आणि कालांतराने गुटगुटीत दिसेल ,गुटगुटीत बाळ म्हणजे निरोगी बाळाचे लक्षन होय.
तसे पाहीलेतर तर आजकालच्या चंदेरी दुनियेत आणि फ्याशन च्या जमान्यात आई मुल कडेवर घेताना दिसत नाही .कारण सुडौल बंद्याचा प्रश्न उद्भवतो मध्येम वर्गापासून ते उच्च शिक्षित वर्गापार्येंत आईपेक्ष्या घरात काम करणाऱ्या बायका मुलांचे संगोपन करतात .ह्यामुळे आई व बालकात प्रेम वाढत नाही .जिव्हाळा वषात नाही .त्यामुळे दुरावाच ज्यास्त निर्माण होतो .तेंव्हा मुल मुल असुरक्षित होण्याची भीती ज्यास्त निर्माण होते .       


Thursday, December 1, 2016

फैसिलिटी का पूरा फायदा लेने वाले कोण है ?

फैसिलिटी का पूरा फायदा लेने वाले कोण है ?

मेरा मातंग समाज महान ,कहकर नहीं चलेगा ।
पहले देश आता है ।
उदा : जब भाषा के ऊपर देश में तनाव था ।
तब हिंदी भाषा को राष्ट्र का दर्जा देनेके लिये वोटिंग हुई ।
50 वोट हिदी को 50 वोट अलग भाषा (?) को ?
फिर ऐसा हुवा किसीने दूसरे दिन एक वोट तोड़कर एक वोट हिंदी को दे दिया ।
हिंदी राष्ट्र भाषा बन गयी ?
राष्ट्र भाषा किसे कहते है ,जो हर आदमी की हो ,गांव की ,अपने माँ की ,अपने समाज और राज्य की ? ऐसा नहीं हुवा ।
राष्ट्र भाषा कहते हुई भी वह ,राज्य भाषा बन गयी ।
ठीक इसी तरह मातंग समाज की हालत है । इसे कोई जानता ही नहीं ?
वह आज भी 'मांग ' मेरे बहुजन गांव में जी रहे है।
और हम शहर में।
जैसे हिंदी अगर राज्य भाषा होती तो ठीक ही वह अपनी भाषा में कहती।
उदा : घर में जो मैगी आती है ,उसपे न मराठी में लिखा नहीं है।
न हिंदी में,सिर्फ अंग्रेजी में ।
तो हमारी राष्ट्रिय भाषा 'अंग्रेजी 'हो गयी।
ठीक इसी तरह ,मातंग की भाषा ,हिन्दू होगयी ,हिन्दू मांग।
किंव की हम आज भी ,मनु के दिखाई हुई रस्ते पे चल रहे है।
महात्मा फुले -आंबेडकर के नहीं।
(लेकिन फैसिलिटी का पूरा फायदा तो ले रहे है?)



अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल.

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल


अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७, रोजी एडिनबर येथे  झाला .यांचे सगळ्यात यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.आपली पत्नी मेबल ह्यूबर्ड ऐकण्याचा प्रयोग केला होता .दूरध्वनी यंत्राचा शोध लाऊन जगाला अर्पण केले .त्या गोष्टीचा आज संपूर्ण जग स्मार्टफोन च्या रुपात वापर करीत आहेत .मोबाईल फोन आज संपूर्ण जगात मानवी विकासाच्या मैलाचा दगड झाला आहे .

बालपण
बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. थोडक्यात संपूर्ण कुटुंब कर्णबधीर यांच्या विकासासाठी अहोरात्र धडपडत होते ,तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी यांचे अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात आले होते? वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने संपूर्ण जगात ओळखले जाऊ लागले.

मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे स्पस्ट कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील राहिले . त्यासाठी त्यांनी  बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमनुक करण्यात आली होती  आले. कर्ण बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. आणि एकूणच कर्णबधिरांच्या भाषा विकासाचा इथेच उगम झाला असे म्हणने वावगे होणार नाही ? मग  बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सतत सुरू ठेवले  आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे खरे कोडे उलगडले.

कार्य
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी मित्र वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसर्‍या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी मित्र वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी संकेत दिले होते.

बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून विचार विनिमय केला होता आणि दोघांनी पेटंट विषयी अहोरात्र चर्चा केली आणि  दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी पेटंट कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात बर्याच महिन्यापासून पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना विजय मिळाला आणि त्यांना त्यांच्या दूरध्वनी यंत्राचे पेटंट ही  मिळाले.

योगदान
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या दूरध्वनी  यंत्राचे प्रयोग जगभरातील राष्ट्रबरोबर , अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून जगभरात  ओळखली जावू लागली,आणि प्रशिधीस ही आली त्यांचे प्रधीर्घ काळ या कामासाठी संशोधन चालू राहिले होते .


उल्लेखनीय
विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला होता. आपल्याजवळील होता नव्हता तेवडा पैसा लावून हे नियतकालिक सतत आठ वर्षे  सुरू ठेवले होते  पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.

असे अविरत समाजासाठी संशोधनाचे  कार्य करीत असताना दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी अलेक्झांदर ग्राहम  बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीटा साठी  बंद ठेवण्यात आले होते .असे हे श्रवण कर्णबधीर साठी कार्य करीत असताना कालवश झाले .अश्या महान संशोधकाचा आज जन्म दिवस आपण याद करीत आहोत .


वक्कलि भिक्षु

वक्कलि भिक्षु


राजा गौतम बुद्ध के ज़माने में एक वक्कलि नामक भिक्षु हुवा करता था   एक दिन वह  भिक्षु भगवान् बुद्ध के सूंदर तेजस्वी शरीर से और प्रभावशाली ओजस्वी व्यक्तित्व से इतना प्रभावित हुआ की न समाधी द्वारा चित्त एकाग्रता का कोई अभ्यास करे और ना ही विपश्यना द्वारा प्रज्ञा जाग्रत करने का कोई प्रयास करता था ।

एक तक जब देखो तब  भगवान् गौतम बुद्ध के  के प्रभामंडित चेहरे को देखता रहता था ।

करुणामय भगवान् गौतम बुद्ध  ने उसे फटकारते हुए कहा, " अरे नादान भिक्षु !

मेरे इस शरीर को पागलो की तरह क्या देख रहा है? मेरी इस रूप- काया में क्या रखा है? यह भीतर से उतनी ही गन्दी है, जितनी की किसी भी अन्य की काया। रूप का दर्शन मूर्खो को आनंदित करने वाला होता है। यदि मुझे देखना है तो मेरे भीतर समाये हुए धर्म को देख।
जो धर्म को देखता है, वही मेरे सच्चे स्वरुप को देख पाता है।"और वही मेरा असली रूप और असली काया है। 

 वकक्ली भिक्षु के प्रज्ञा चक्षु खुल गए। उसे भगवान् की बात समझ में आई की वस्तुतः वे धर्म के ही मूर्त स्वरुप हैं। उनके दर्शन में सत्यधर्म का दर्शन होना ही चाहिये, और यह निर्वाण धर्म तो अंतर्मुखी होकर स्वयं अपने ही भीतर देखने के लिए है, बाहर नही।इसीलिए भगवान भगवन गौतम बुद्ध हमेशा कहते है ,ऊपर न देखो ,इन्सान के अन्दर को देखो.चाहे समय लगेगा ?

अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...