Showing posts with label मातंग समाज. Show all posts
Showing posts with label मातंग समाज. Show all posts

Friday, October 22, 2021

ऊस तोडीतून कंदुरी

||ऊस तोडीतून कंदुरी  ||

१९५६ चे पर्व संपले .मांग मागे राहिले .जे धम्मात गेली ते आज नवी पिढी उछभ्रू म्हणून जीवन जगत आहे.

आंध्र ,कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मांग जात दिशाहीन असून अजून संभ्रमात जीवन जगताना दिसत आहे.

समाज आणि जातीचा पुळका मिरवणारे ,डॉ बाबासाहेब यांच्या चाळवतील मातंग म्हणून शेकी मिरवणारे ,सामाजिक बांधिलकी असलेली किंवा नसलेली हिंदू च्या खालच्या पायरीला खुंटन खाण्यात जीवन जगताना जग पाहतो आहे.याचे कारण धर्मात कायम असणे .

फक्त तिन्ही राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील ऊस तोडणी मजूर  कर्नाटक सीमेलगत चे जिल्हे हे ख्रिश्चन होऊन जीवन जगत आहेत ,पुण्यालगत चे कांही गावे तर जैन धर्मात असून त्या त्या धर्माचे जीवन जगत असताना चालीरीती या हिंदूंच्याच आहेत.
मग ते जैन असू की ख्रिश्चन .?

इकडे महाराष्ट्र्रात खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात बरीत लोक धर्मातीत आहेत.

मराठवाड्यात प पू बाबासाहेब नाही पहूनचले म्हणून इथे ,औरंगाबाद वगळून ,आज ही थोडा शहरी भाग वगळता जैसे थे ची परिस्थिती शाबूत आहे.

करण हा भूभाग निजाम दरबारी असल्या कारणाने इथे बाबासाहेब यांचेवर सभा घेण्यास बंदी होती .तरी बाबासाहेब धोकी तळवडे या उस्मानाबाद जिल्ह्यात येत होते.मोजकी लोकं या सभेला हजेरी देत.

उस्मानाबाद ,लातूर ,जालना आणि बीड या जिल्ह्याची सामाजिक ,धार्मिक ,राजकीय आणि शैक्षणिक स्तिथी अजूनच पीछेहाट झालेली पहावयास मिळते आहे .

कमकुवत शिक्षण ,अंधश्रद्धा ,यातून उदयास येणारी सामाजिक स्तिथी खूप हालकीची आहे .

बीड ,लातूर आणि उस्मानाबाद चे उदाहरण द्यायचे झाले तरी पुरे आहे .बऱ्याच अंशी लवकर लग्न झालेली मुलं-मुली कामासाठी भटकत असताना .काम आणि रोजंदारी काम करीत असतात.काम मिळत नाही म्हणून ऊस तोडणी हा एकच पर्याय त्यांचेकडे उरतो .

म्हणून शेजारील राज्य ,आणि जिल्हे यात कामे करीत असतात .उदा आंध्र आणि कर्नाटक

नाते संबंध जपत असताना आईने देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी मुलगा ,ऊस तोडणीवर जातो .

बोललेला नवस वेळेत फेडण्यासाठी उस मालकाकडून हात उसने उधार पैसे घेऊन .नवस फेडावा लागतो.

बऱ्याच खेड्यातून घरगडी म्हणून कामावर राहण्याची प्रथा अजून जिवंत असताना पहावयास मिळते.
ताई चे लग्न आणि लग्नात दिलेला हुंडा ,लग्नात झालेला रकून खर्च यासाठी वर्षभर रात्री मालकाच्या शेतीवर काढल्या जाऊन उभ्या आयुष्यची राख रांगोळी होते.

नाते जपण्यासाठी किंवा अंधश्रद्धेपोटो जीवन आणि परिवार एक खेळ होऊन बसतो .

घेतलेल्या आगाऊ रकमेचा परतावा करण्यास कैक वर्ष निघून जातात. याच काळात त्यांच्या पोटी जन्माला आलेले अपत्य ही त्याच शेतात आणि शिवारात खेळुन बाळ वयातून तरुण वयात येते आणि आई वडिलांच्या सिस्टम चा एक अविभाज्य अंग बनून जाते .

आज ही श्शृंखला  येवडी रूढ आणि मजबूत झाली आहे की ,ती परत आपल्या दारी येणे शक्य नाही .ही दरी खोलवर जात असतानाचे चित्र निर्माण झाले आहे.

आजच्या पेंडमीक काळात तर काय स्तिथी असेल ते विरळा.खाजगीकरण आणि बेरोजगारी यात गाव पातळीवरील मातंग समाज वरील कारणांमुळे नक्कीच बाहेर फेकला गेला आहे असे म्हणणे वावगे होणार नाही .

कालच लातूर येथील बातमी ऐकायला मिळाली की परडी आणि कवड्याच्या माळा याची होळी मातंग समाजातील कांही कार्यकर्त्यांनी केली .हे अभिनंदनीय होय .

याचा परिपाक म्हणून 'कंदुरी आणि नवस' यावर कर्डी नजर ठेवून गल्ली बोळ आणि गावात ,खेडोपाडी होणाऱ्या कंदुरी आणि नवस यावर अंकुश ठेऊन अश्या प्रथा मोडीत काढण्याचे काम गाव पातळीवर होणे गरजेचे आहे .

लेखक -प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरुळ -७०६

मिनांडर

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...