Friday, July 10, 2020

प्रज्ञा आणि आचरण

*प्रज्ञा आणि आचरण*

बुद्ध तत्वप्रणालीत *दान आणि शिल* या  पाठोपाठ  *प्रज्ञा आणि आचरण* यास  तेवढेच महत्व आहे . 

*प्रा. बा र शिंदे ,नेरूळ नवी मुंबई -७०६*

=========

(संदर्भ  - विनय -पिटक :अनुवाद -राहुल संकृत्यायन ,बुध्दाब्द १६३५ ई.)



बौद्ध धम्माची आचरण आणि प्रज्ञा  हे दोन अंग आपणास मतंगाची (हत्ती ) बळे देतात .ते कसे पहा . 

आचरण हा असा दागिना आहे ,ज्याच्याकडे आहे तो सोनं आहे .या आचारणास जो घाबरतो तो बुद्ध धम्मा चा अनुयायी अथवा प्रसारक किंवा रक्षिता होऊ शकत नाही . म्हणून बहुजन वर्गातील बर्‍याच जाती किती तरी कोसो दूर असल्याचे  हे भयावह आहे . 

 आज बुद्ध धर्माचे अंग होऊ शकले  नाहीत त्याचे आंतरिक बरीच कारणे आहेत ते मी इथे विषद करणार नाही .  .आचरण हे वयक्तिक बाब असून ती प्रतेक व्यक्ति तसे करू शकेल असे म्हणता येईल . 

आचरण   हे प्रज्ञा न असलेले व्यक्ती पण पालन करू शकते .आचरण शुद्ध नसेल तर त्या व्यक्ती ची विद्या ,विकास आणि त्याने संपादन केलेली त्याच्या  विकासाची संकल्पना शून्य आहे .

उदा. एखाद व्यक्ती डॉक्टर ,अभियंता आणि प्राध्यापक होणं ही त्याच्या विकासासाठी एक बाल  कल्पना आहे .किंवा त्या व्यक्तीची तशी आणि तेवढीच धारणा असते . *मी आणि माझी* . या पलियाकडे त्यास  जग दिसत नाही याचाच अर्थ त्या व्यक्तीची प्रज्ञा अजून तरी विकसित झाली नाही असेच म्हणावे लागेल . ज्या व्यक्तीत ही प्रज्ञा जागृत झालेली असते त्यात चेतना वास करीत असते ,थोडक्यात ती वैज्ञानिक अंगाने पाहत असते ,आणि इतर समाज वर्गास त्या चेतनामय वाटेवर घेऊन जात असते .  

माझ्याच घरचे उदाहरण देतो एक काका स्त्रीरोग तज्ञा आहेत ,त्यांची उन्नती झाली विकास झाला . पण त्यांची प्रज्ञा जागृत झाली नाही . ,ते पुरोहित आणि देव धर्म करीत देशभर एकटेच फिरले पण त्यांच्या मनात चेतना जागृत झाली नाही ,म्हणजेच प्रज्ञावंत होता आले नाही . ?
 ते डॉ बाबासाहेब यांना  मानणाऱ्या पैकी आहेत .पण त्यांनी सांगितलेल्या *पथ मार्ग* त्यांना जमला नाही ,याचाच अर्थ हयात गेली पण त्यांची  प्रज्ञा जागृत नाही झाली . 


दुसरे काका कमी शिक्षित त्यांच्यात वेळीच प्रज्ञा जागृत झाली , शुध्द आचरण रहित वागू लागले . पुरोहित आणि देव धर्म करीत बसले नाहीत . समाजात राहून समाजाचे अंग होऊन ,बुद्ध देशना देते झाले . डॉ बाबासाहेब यांच्या पथमार्गावर राहिले . यांच्यात त्यांनी स्व चेतना जागृत केली , मनात चेतना जागृत झाली  ,म्हणजेच प्रज्ञावंत आले असेच म्हणावे लागेल . 

ते आजून पंच शीलाचे पालन करतात .ते पुरोहित आणि देव धर्म यापासून कोसो दूर आहेत .म्हणून आज कमी शिकलेले  काका  माझ्यासाठी आदर्श ठरतात ,असे  कमी शिकलेली व्यक्ति आज समाजात  आदर्श आहेत .

उच्च शिक्षण घेऊन प्रज्ञा जागृत होते असे कोणी म्हणत असेल तर ते खोटं आहे . शिक्षणा शिवाय प्रज्ञा जागृत होण्यास त्या व्यक्तीस शुद्ध आचरण आणि कमीत कमी पंचशीलाची जोड असावी लागते .

पंचशील आणी त्याचे पालन न जमत नसल्याने बरीच  विद्वान समजणारी विद्यमान मंडळी ,लोकांना नांवे ठेवत .बुद्धाने सांगितलेल्या शिलापासून कोसो दूर आहेत .हा संशोधन आणि चिंतांनाचा विषय आहे .

प्रज्ञा जागृत होण्याची क्षमता, चारित्र्य आणि पावित्र्य लागते त्यास मनाची तयारी लागते ,त्यास अवलोकन आणि आपले आचरण जोडीला असणं गरजेचं आहे .

शुद्ध आचरणात असल्याने काय फायदा असतो ?

लोक आपणास आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात ,तुमच्या शिक्षणाला इथे गौण स्थान आहे ./असते .
जनात मान सन्मान मिळतो ,यामुळे आपण आपली सतत ची प्रज्ञा जागृत करण्यास आणि ती इतरांना देण्यास मनाने शुद्ध असतो .

झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत जे आपले इतर व्यक्ती प्रति आचरण असते तेच स्वतः प्रति असणे होय .
पत्नी ,आई वडील यांचा मानसन्मान ,मुलांचे नीट संगोपन आणि त्यांच्या सोबत आपला व्यवहार हा कसा असावा तर शुद्ध ! हाच बुद्ध देशना आणि  आचरणाचा गाभा आहे .

जो घरी शुद्ध आचरण करतो तो ,मित्र ,सोबती, कार्यालय आणि समाज या घटकसोबत ही तेच आचरण  करीत असतो. अशीच व्यक्ति  समाज हित करण्यास लायक असतो .स्वहिता पासून दूर राहते . 
स्वहित  पाहणारा समाज हीत कधीच करू शकत नाही ,कारण त्याच्या आचरणात खोट असते .तो समाजाला उलट खाईत घेऊन जात असतो . स्वतचे घर बघत समाजाच्या नावावर सरे आम लूट करीत असतो . समाज शिकावा ,सामाजिक ,आर्थिक प्रबळ व्हावा असे त्याला कधी वाटत नाही . कारण तो येवढा षंढ असतो की ,त्याचे आचरण हे समाजाला अधोगती कडे घेऊन जाणारे असते . अश्या खोट्या व्यक्ति ,नेता ,पुढारी ,आणि समाज सुधारक यापासून सावध असायला पाहिजे . 

प्रज्ञा म्हणजेच चेतना !

ही मानव कल्याण आणि विकास यातील अंतिम बाब आहे .
वर नमूद केल्या प्रमाणे आपली प्रज्ञा जागृत झाली आहे हे कसे ओळखाल ?

बुद्धाने प्रज्ञावंत व्यक्तीच्या तीन कसोट्या सांगितल्या आहेत .

हा तीन कसोटीत ...(पाराजीक १-४)

१.मैथुन : जो नियम जाणून ,कायद्यास नियम पालन करून ही ,त्यास  न जाणता त्याचे पालन करीत नाही ,सतत त्या आचरणात आणत असतो ,तेंव्हा त्याचे आचरण शुद्ध नसते .

२.चोरी : जी वस्तू आपली नसता ,ती आपली असण्याचे मान्य करतो ती चोरी समजावी .असा त्या व्यक्तीचा आचरणाचा भाग अमान्य असतो .

३.मनुष्य हत्या : एखादी गोस्ट माहीत असताना, त्या व्यक्तीस हत्या करण्यास मदत करतो,हत्यार उपलब्ध करून देतो ,किंवा त्यास मारण्यास प्रेरित करतो ,एकंदरीत मारणे आणि मारण्यात साह्य करतो ते त्याचे अशुद्ध आचरण होय .अशी व्यक्ति  समाजात कार्य करण्यास योग्य नसते .

४.दिव्यशक्ती दावा : जो नवविद्या ,दिव्य- शक्ती जाणतो असे वर्तन करतो  ,आणि असे मी जाणतो ,मी ज्ञानी आहे माझ्याकडे या ,असे वर्तन करणारा ,समाज विशुद्धी कडे घेऊन जाऊ शकत नाही.

आचरण डगमगले की बोट बुडाली म्हणून समजा .कीर्ती ,संपत्ती ,राज्य बुडाले तरी चालेल पण आचरण कधी अशुद्ध होऊ देऊ नये .
ते परत मिळवता येत नाही .प्रज्ञावंत कधी या उपरोक्त भौतिक वस्तूत आपले आचरण गहाण ठेऊन माया जपत नसतो . त्यास सतत सदोदित आपल्या आचारणाची काळजी असते .या मुळे तो आपले आणि समाज हीत रक्षित असतो .असा जर कोणी शुद्ध आचरण करणारा ,इतरांच्या मानवी मनात चेतना जागृत करणारा ,आपली  प्रज्ञा जागृत ठेऊन कार्ये करणारा नेता ,पुढारी असेल तर त्यास  आम्ही आमचा नेता म्हणू  ,आणि आदराने त्यास  बाबा ,अण्णा ,दादा ,आपा म्हणू . 

आज असा समाजात  धुरीण नेता असेल तर त्याचे समाज स्वागत करेल .असा असेल तर कळवा !

अमर्त्य सेन

  "आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही." जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षर...