Tuesday, June 19, 2018

दलाल आणि दलाली


दलाली
दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८

दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो  की एखाद दुसरी दुय्यम  खरेदी असो .खरेदी विक्री आली की तिथे दलाली आलीच .माझ्या गावी बैल बाजार असल्यामुळे दलाली तेजीत चालते .हल्लीच्या युगात दलाली ला उत आला आहे.आज -काल स्मार्ट फोन मुळे तर खूप मोठ्या प्रमाणावर एप बाजारात दिसत आहेत ते एक प्रकारची दलाली किंवा कमिशन घेऊन धंदा करीत आहेत .
फार पूर्वीच्या काळापासून जसे वस्तू देवाण आणि घेवाण पासून जो कोणी मधेस्थ आला त्याने  मार्जीन मनी ची मिळकत केली तेच दलाली रुपात पुढे उदयास आली .आज आपण त्यास कमिशन असे म्हणतो .कमिशन शिवाय खरेदी विक्री होत नाही .
हाळी या गावी पूर्वी प्रमाणे आजही तेजीत चालणारा एक आठवड्यातील  तीन दिवशीय बाजारातील  व्यवसाय म्हणजे दलाली .बैल विक्री आणि खरेदी मध्ये दोन्ही बाजूने कमिशन घेणारा आणि देणारा पैसे  देतो आणि दलाल ते खुशीने घेतो .
हाळी या गावी जनावराचा जंगी  बाजार तसा तीन दिवस भरतो ,शनिवारी भरत असताना पासून ते सोमवारी ओसरत असताना पर्येंत .शनिवारी पहाटे  सकाळ पासून दूर दूर गावावरून बैल विक्रीसाठी येत असतात ते सोमवारी आपल्या गावी  परत जाई पर्येंत .एकंदरीत हाळी आणि हांडरगुळी या गावातील  सगळे मिळू वीस एक च्या आसपास दलाल असतील .ते बाजारात फिरून बैल खरेदी आणि विक्री करून देतात .आणि कमिशन घेतात .
दलाल म्हण्टेल की त्याचा पोषक ठरलेला असे डोक्यावर गांधी  टोपी हातात एक काठी अंगावर सफेद रंगाचा सदरा आणि धोतर ,पायात काही वाहन असेल नसेल तरी चालेल .
हे लोक पूर्ण बाजारात दिवसभर बैलाच्या दाव्ण्यातून फिरत असतात ,आणि  बैल मालकाला विचार पूस करीत असतात की तुमचे बैल विकायचा हाय का ? आणि किमती विचारून ठेवतात .कधी -कधी  एक तर विकत घेणारा सोबत असतो त्यास वेगळी वेगळी बैल जोडी दाखवावी लागते किंवा ज्या माणसाचे बैल विकायचे असतात त्या दावणीला जाऊन तेथील बैल जोडी किंवा एक बैल दाखवला जातो .या दरम्यान जी वार्ता होते किंवा देवाण घेवाण ची भाषा होते त्या बोलीला किंवा तिघातील संभाषणा ला जगात तोड नाही .कांही नमुने दाखल मी इथे पेश करीत आहे ..
दलाल : मालक हा धावळ्या बघा किती उठावदार आहे .
विकत घेणार : आर ,मला धावळ्या नको ? एकाच रंगाचा पाहिजे बैल .
दलाल : चला मग पुढे .तुम्हाला एकाच रंगाचा बैल  दाखवतो .
ते एका दुसऱ्या  दावणी कडे वळतात तिथे रुद्र्ववाडीचे  चे बैल दावणीला असतात तिथे ते दोघे जातात .
विकत घेणार : हा हा ..हा मस्त हाय की र .याची काय किंमत सांगता हो .
मालक : आठ हजार हाय बघा .
दलाल : अहो ,काय पाटील हा तर पाच हजार चा बैल आणि आठ हजार सांगता ?
विकत घेणार : हो खरे आहे ,दया न पाच हजार ला .
मालक  : नाही हो आणखी एक हजार कमी करतो बघा ,जर घेत असला ,नगदि  रोख रक्कम देत असाल तर ?
दलाल : जाऊ दया हो मालक  ,एकच बोलू का सहा हजार मिळतील बघा .नाहीतर आम्ही चाललो पुढच्या दावणीला .
विकत घेणार : अहो तुमचे आणि माझे जाऊद्या मी तुमाला सहा हजार पाचशे देतो .
( दलाल आणि विकत घेणार थोडे बाजूला जातात आणि आपसात चर्चा करता की हाच बैल घ्यायचा ,कारण काय तर त्या बैलाची एक जोडी हुबेहूब विकत घेणाऱ्या पाटलाच्या घरी आहे .हे कळताच दलाल खुश होतो की आज मला कमिशन मिळणार आणि मी हा बैल विकणारच .हे पक्क होतो .)
मग दलाल आपले अस्त्र बाहेर काढतो आणि त्या बैला कडे स्वारी वळते .चला मालक आज तुम्हाला हा बैल सहा हजार पाचशे रुपया ला घेऊनच देतो .त्याच्या खांद्यावर एक उपरणे असते त्यात पायातील चप्पल गुंडाळून खाद्यावर टाकलेली असते .आणि त्या उपरण्याला हात लावत दलाल शपत घेतो .आणि काय  म्हणतो ते बघा  ...
दलाल : मालक माझे एकता का ,मी खोटे कधी बोलत नाही .ह्या रोटीची शपथ हाय ,तुमच्या बैलाला अख्या बाजारात घेऊन फिरलो तर सहा हजार पाचशे मिळणार नाहीत .आणि देऊन टाका आता .
विकणारा : थोडा वेळ संभ्रमांत पडतो .हा बोलतो ते खरे आहे .बिचारा रोटीची शपथ खातो आहे ,दुपार झाली आहे आजून जेवला पण नाही खांद्यावर  रोटी घेऊन फिरतो आहे .याचे मन परिवर्तन होते आणि सहा हजार पाचशे ला बैलाचा सौदा होतो .
विकत घेणाऱ्याला आणि विकणाऱ्या पाटलाला माहित नाही की त्याच्या खांद्यावर  रोटी नसून त्याच्या पायातील चप्पल आहे .आणि अनवाणी फिरत आहे ...एक दलाल म्हणून......
@@@@

Monday, May 28, 2018

कथा : एक गधे की

( दिनांक: गुरुवार २४, में २०१८ रेडीओ FM गोल्ड हिंदी चानेल वर ऐकलेली कथा ,अजून वाचनात नाही )

दिनांक – सोमवार २८,में २०१८ .



एक भूमिहीन मजदूर आपण दिनभर काम करेके आपने बनाये हुये मिटी के बर्तन आपने सर पर रखकर गाव- गाव जाकर बेच लेता और आपणा घर परिवार चला लेता .येह समान लाने धोने के लिये उसके पास न कोई नोकर था न कोई वाहन या कोई चार पायी वाला प्राणी था .

युंही ही एकदिन वह आपणा समान बेचकर आपने घर जा रहा था .उसे एक नदी किनारे एक छाव भरा पेड दिखा तब उसने सोचा की चलो यहा थोडा आराम कर लु .

पास में जो रोटी थी उसने पेड के नीचे बैठकर आराम से खा ली और नदी का मिठा पाणी पीकर वह पेड के नीचे लेट ही रहा था ,ठीक उशी दरम्यान एक ऋषी महामुनी वहां से गुजर रहे थे .वह भी वहां आराम के लिये ठहेर गये .और बातों बातों में उस ऋषी महाराज ने ,उन्हे पूछा की ,क्या आपके पास कोई वाहन का साधन नाही है ? उसने कहा जी नाही है .फिर ऋषी महाराज ने कहा मेरे घर में एक गधा ही उसे आप ले आना और आपणा काम चला लेना .



फिर एक दिन वह महाशय ने उस गढे को घर ले आये और आपणा धंदा उसिसे करणे लगे .उस गढे का उन्हे खूब फायदा हुवा ,महिने गुजर गये .एकदिन वह गधा बिमार पडा और मर गया .गढे के मरने का दुःख बहुत हुवा . उस महाशय ने सोचा की इसकी कबर किंव न बनाई जाय जिसने मुझे बहुत धन कामाकर दिया ,और मैने उसे आपने परिवार का हिस्सा समजकर देखभाल किया था .

ठीक उसने वही किया ,गधे की कबर खोदकर उसे दाफ्ना दिया .उसे बहुत ही .उसका दुखः सहेन न हुवा और पास में बैठकर फुट फुट कर रोने लगा .कूच समय बाद एक मुसाफिर वहां से गुजर रहा था उसने येह दृश देखा ,और कूच न कहते हुये ,उसे नमन किये आगे निकाल गया .मन ही मन में सोचता रहा कोई बडा पंडित या महान व्यक्ती मरा होगा उसके दुख में वह बेचारा रोता होगा ? फिर जो भी वहां से गुजर था वही प्रणाम करके चुप चाप चले जाते .पूरा दिन गया वही होता रहा .

शाम ढल गयी ,कूच पल निकल गए तब जिसने उन्हें गधा दिया था वह ऋषी महाराज भी वहा पधारे ,उन्होंने पुछा की क्या हुवा किसकी कबर पे रो रहे हो ? तो उसने बीती बताई .तब ऋषी महाराज को बताई . ऋषी महाराज बोले वहा मेरे आश्रम के बगल में बड़ा सा मंदिर जो है मैंने उसे बनवाया था ,और वह मंदिर इस गधे के माँ का है ?

तात्पर्य : ठीक इसी तरह यहाँ भारत में सभी मंदिर बने हुये है और बन रहे है और जोरोंसे पूजा पाठ चल रहा है

Friday, May 25, 2018

लाह्या चा चिवडा : आणि दारूचा अड्डा


लाह्या चा चिवडा : आणि दारूचा अड्डा
शुक्रवार २५, में २०८
हळीचे नाव काढताच बाजाराचे गाव असा संपूर्ण नकाशा डोळ्यासमोर दिसतो .विविध प्रकारचे व्यवसाय  या बाजारात चालतात त्यात दारू का असू नये  हा एक प्रश्न पडल्या वाचून राहणार नाही .बाजारात एकंदरीत चार ते पाच ठिकाणी दारू चे दुकान चालत होते .दारूच्या हातभट्ट्या वाम मार्गाने तेरु नदी किनारी बिनदिक्कत चालू होत्या.याच धंद्यावर मालक करोडोत लोळत होते ,हाळी आणि आसपास च्या बारा वाड्यातील गरीब ,मजूरदार आणि भूमिहीन शेतमजूर संकटात होरपळत होती.तरी हा गावठी दारू चा धंदा फार्मात होता .दारू चे अड्डे जरूर हाळीत चालत असतील पण पिणारे बहुसंख्य हांडरगुळी आणि आसपास खेडो पाड्यातील आणि वाड्यातील होते .हे एक अजब रसायन म्हणावे लागेल .
आजही बाजार तीन दिवसाचा असतो  शनिवार ,रविवार आणि सोमवार मिळून .मग बाजारात हौसे गवसे आणि नवसे सगळे येत असत .आणि बाजारात प्रवेश झाल्यावर आणि ओसरत्या संध्याकळी दोन दोन घोट घश्यात टाकून घरचा रस्ता धरीत असत.तर कोणी कोणी सकाळी बाजरात प्रवेश केल्यापासून बोटाला मीठ लावत आणि मटक्या मारीत दुकानाच्या बाहेर पडत .तेंव्हा चेहर्यावर एक गमत दिसायला मिळे ,एकदम विदुषक सारखा इकडून तिकडे चेहरा फिरवत बाजारात प्रवेश करीत .

मी इयत्ता आठवीत होतो. दर रविवारी माझी पण इकडे घरी  एक तयारी होत असे मोठे पातेले घेऊन , त्यात मस्त कांदे परतून  ,हिरवी मिरची ,जिरे, हळद , मीठ आणि  लाह्या एकत्र करून खमंग गर्डेल तयार करून सरळ दारूचा अड्डा गठीत असे .

माझा अड्डा फिक्स होता .आज मितीला दुकानाचे नाव आठवत नाही .तो अड्डा एकदम भर गर्दीच्या ठिकाणी होता,ही आड्यावर गर्दी असायची .हातात खरेदी केलेला भाजी पाला ,आणि मटन घेऊन बाजारू लोक सरळ अड्डा शोधात येत असत .एका हातात बाजाराची पिशवी ,दुसऱ्या हातात दारूचा प्याला .एक दोन घोट पोटात सरकला की मज्जा रंगत असे .यात मजूर आणि  बहुजनांचा भरणा खूप भर होता .ज्यांचे कडे पैसे न्हवते ते बोटाने मीठ चाटून ,मटक्या मारत गावचा रस्ता धरीत असत .

माझ्या पण गर्डेल वर लोकांची ही गर्दी होत असे .फक्त एक रुपयाला मी माझी गर्डेल पुडी विकत असे .
लोकांना मी उदार कधी देलेले आठवत नाही .काय भरोसा आहे ,बेवडया लोकांचा उद्या मलाच मारतील आणि बदनाम करतील ? एक बाका प्रसंग आज आठवतो मला ..
एक वडगाव चा काळा किसन्या नेहमी मला त्रास देत असे ,ए बाल्या दे  की र चिवडा नाहीतर फेकून देईन मी सगळा गटारात .मी घाबरून एक दोन वेळा  दिला पण होता .पण  एका रविवारी मला खूप राग आला आणि  मी त्याला नकार दिला .मी देत नाही हे कळताच त्याने टोपलीत  हात घालून एक मुठभर चिवडा घेतला आणि दिमाखात खाऊ लागला .मी हे बघितलं आणि टोपली कपड्याने झाकून मालकाच्या गल्ल्यावर ठेऊन मी आलो असे म्हणून , कांही न बोलता घराकडे पळत गेलो ,आणि झाला प्रकार माझा चुलता रामू काका यांना सांगितला .लगेच ते आले आणि वडगावच्या काळ्या किसन्याच्या बाजारात शोधून दोन  कानाखाली दिली आणि तो पळत सुटला आणि वडगाव चा रस्ता धरला .तो परत तो कधी त्या अड्ड्यावर आला नाही ,की तो परत मला दिसला नाही .अशी रामू काकाने त्याला अद्दल घडवली होती .
पण अड्ड्यावर कांही लोक खूप चांगल्या स्वभावाची दिसली  ,अक्काबाई  पोटात शिरली ,की इंग्रजी भाषा सुरु करायचे ...
कधी दोस्त ,कधी दुश्मन ,कधी मैत्रीण तर कधी घरातील लोकांची विषय चघळत बसायचे  ,तेंव्हा  हे सगळ बघून आणि ऐकून मजा येई ...

कधी म्हणायचे की ,रंगी मस्त होती यार ,आता दिसत नाही लग्न तर नाही झालं र तीच .तिला एकदा मी उसात घेऊन गेलो होतो.हे सगलं ऐकायला मला मज्जा वाटत होती .अश्या आणि अनेक गोष्टी मी एकल्या होत्या.

संध्याकाळी दोन ते तीन तासाच्या वेळेत मी  जवळ जवळ दिडसे रुपय जमा करीत होतो .आणि कुटुंबाच्या खर्चात हातभार लावत होतो .माझी माय हे बघून हादरून जात होती की हे सगळ मी कसा करतो ?   

@@@

Monday, May 21, 2018

बाल्या एक अद्भुत नावं


बाल्या
२१ में २०१८
माझे हाळी गाव हे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांचे सिमे लागत आहे ,उदगीर तालुक्यापासून जेमतेम १७ किलो मीटर .म्हणून या दोन्ही राज्याचा या तालुक्यावर खूप प्रभाव जाणवतो .हाळी हे नांदेड बिदर रोड वरील छोटस गाव एक पाय रोडच्य कडेला टाकला की हळी आणि दुसऱ्या कडेला रस्ता ओलांडला की हांडरगुली .जसे उत्तर आणि दक्षिण कोरिया .जसे जर्मन मधील भिंत तीच एक रस्ता .नाव हळीचे जानावारांचा जंगी बाजार ,पण बाजार भरतो हांडरगुली मध्ये .
मांगवाड्यात अंधश्रध आणि अशिक्षित पण शिगेला पाहुण्चला होता .भूमिहीन शेतमजूर तरी देव धर्माची वारी नित्य नेमाने करीत असत .मलंग गड ,त्यात मग बडा पहाड  जाऊन बकरे कापण्याचा नावस करणे ,आणि शेवटचा कळस म्हंजे तिरुपतीला देव दर्शन करून केस कापून मुंडन करणे ,आणि येताना मुलाचे नाव बालाजी ठेवेन असा नवस करून डोक्याला गाठ बांधून येणे .त्याचीच प्रचीती म्हणजे घरो घरी दिसणारा बालाजी होय .सख्खा भाऊ देखील आपल्या मुलाचे नाव बालाजी ठेवीत असे .  
बाल्या म्हणजे बालाजी .आमच्या मांग वाड्यातील घरो घरी मिळणारे हे नाव .काय उपकार आहेत तिरुपती बालाजी चे ,कांही अर्थ नसताना प्रत्येक उट सूट तिरुपती बालाजी चे नाव ठेवतो .
या नावाची मजाच और आहे .आता घरो घरी नाव असल्याकारणाने ओळखायचे कसे ? एखादी गल्लीत घटना घडली की लगेच कोणता बाल्या होता रं ? अशी सगळ्या बायकात आणि माणसात इत उत्सुकता लागत असे .
‘आलो ताई ,मी बालाजी बोलत आहे ,मग आवाज ओळखीचा नसेल तर समोरून लगेच उत्तर येई ..
कुणाचा बालाजी ? तेंव्हा लगेच प्रतिउत्तर द्यावे लागत असे ...की आमुक तमुक चा बालाजी बोलतो आहे .त्यानंतर संभाषण सुरु .
आम्ही लहान असताना कसे ओळखत आसू .ती एक गमंत होती .मांग वाड्यात तील आळी होत्या ,वारला कडील बाल्या ,खालच्या आळीचा बाल्या .आणि मधल्या गालीचा बाल्या .हळू हळू गल्ली चा  विस्तार झाला नि घरे विखुरली गेली .
नंतर च्या काळात प्रत्येक बालाजी ला टोपण नावे पडली ,कांही नवे त्यांच्या विकृती आणि रंग छटा आणि एकंदरीत हालचाली वरून बालाजी नवा पुढे टोपण नावे पडली .
एक बालाजी जो नेहमी डोक्यात हात लावून ऊ मारल्या सारखा करीत होता .त्याचे नाव चेंगरया बाल्या पडले ,एक बालाजी छोटा  उंच आणि क्रकश लुन्द्री बाल्या म्हणून ओळखू लागले .एक बालाजी बाजारात इकडे तिकडे फिरत असताना रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्याचे  चणे उचल ,एखादे केळ उचल ,किंवा एखादा फळ उचलून लकबीने खिशात ताकत असे ,तेंव्हा आम्हाला आर एस एस सारखी लांब लाब खिसे असलेली खाकी  चड्डी होती .त्यात बऱ्याच वस्तू चोरून घरी आणता येत असे .म्हणून या बाल्याचे नाव उचल्या बाल्या पडले होते .कुती बाल्या पण होता ,त्याचा घरी त्याच्या बापाने एक  कुत्री पाळली होती म्हणून त्याचे नाव कुती बाल्या असे पडले .एक बालाजी होता दिसायला एकदम पहिलवान ,उंच आणि गोरा गोमटा पण आकल शून्य होता ,म्हणून त्याला सर्वजन भद्दा बाल्या म्हणून ओळखत असत ,यात बरेच बालाजी अस होते की त्यांना टोपण नाव न्हवते ,त्यात माझा पण नंबर वरचा येतो ,एकदा मी शाळा सोडून शिरूर या गावी पळून गेलो होतो ,आणि मला तेथून कसाराच्या मामू ने धरून आणून माझ्या आईच्या स्वाधीन केले होते .त्या दिवसापासून माझे नाव शिरूळया असे पडले होते .बरेच बालाजी हे आपल्या वडिलांच्या नावाने ओळखत असत. उदा रघु चा बाल्या ,भगू चा बाल्या .
असे होते बालाजी कांही बालाजी आज पडद्या आड गेले आहेत लहान आठवले की सगळे बालाजी कसे होते एकत्र विटी दांडू खेळणे ,गोट्या खेळणे नदीत विहरीत पोहायला जाने .खूप खेळ खेळणे आणि मारामारी पण .ते सर्व बाल्या परत भेटतील का ? कधीच नाही ? कारण आज ते शिकून शहाणे झाले आहेत .आपल्या रहाट गाऱ्हाण्यात दंग झाले आहेत ,शहरी कारणाने गावी कधी मिळणार नाहीत .

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...