Friday, February 9, 2018

जनावराचा जंगी बाज़ार हाळी

४.हाळी हे छोटंस गाव .
 तालुका  उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध  स्थळ .इथे तीन दिवस बैल -बाज़ार आसतो ,शनिवार ,रविवार आणि सोमवार ,मग या एकबार भेंट दया !

जनावराचा जंगी बाज़ार हाळी ,हेच माँझे गाँव ....इथे जनावरांना पाणी विकून आम्ही उदर-निर्वाह केला ,आणि आई -वडिलांनी लोकांच्या शेतात्तील गवत विकन आपल्या चुली पेटवल्या .....हे सत्य विदारक

काल  मी fb वर  दोन फोटो आणि एक वेदिओ उपलोड केला आणि मित्र मंडळीने खूप प्रतिसाद दिला ...आणि मला त्या दिवसाच्या आठवणी दाटून आल्या आली मला रडू आवरेना

कारण १९७२ च्या ओल्या दुष्काळातील त्या भय विदारक गोष्टी मी आज इथे लिहणार आहे .जेष्ठ पत्रकार संजीवकुमार भगत ,जेष्ठ शिक्षक सत्यवान माने सर आणि आदरणीय दासू भगत सर यांच्या उत्साहामुळे मी मोडक्या शब्दात थोड या बाजारा विषयी लिहणार आहे .

हाळी म्हणताच लगेच हंडरगुळी लगेच पाठोपाठ थोंडात उच्चार येतो .या गावातून फक्त एक नांदेड -बिदर हा रस्ता जातो .त्यामुळे गाव विभागणी झाली आहे .तसे गाव एकच  …

लहान असताना आई म्हणायची तुला उद्या  हांडरगुळीला दळण दलायला जायचं आहे ...
हाळी हे नदी किनारी आहे .तसेच हंडरगुळी पण देखावा एकाच गावचा कारण पिठाची चक्की आमच्या गावात न्हवती ?

आपण फक्त बाजार विषयी बघू ….पूर्वी आमच्या काळी बाजार हाळीत भरत ( बसत ) असे ,पण जागे अभावी तो हंडरगुळी ला गेला ,आणि आज तागायत तिथेच आहे .खूप मोठ्या प्रमाणात महसूल हंडरगुळीच्या ग्राम पंचायतला मिळतो ,हाळी आपली कोरडीच ..
सन १९७० ( अंदाजे ) दोन्ही गावात या बाजारा वरून खूप मारामारी झाल्या आहेत याची सरकारी कचेरीत नोद आहे बरीच लोक त्या काळात जखमी झाली होती तेव्हा  मी लहान होतो .

हाळी च्या आसपास एकूण बारा वाड्यांचा आणि लमाण तांडा चा पसारा आहे या गावातील आणि वाड्यातील बैल विक्री साठी येत असतात .जरी बाजार एक दिवासचा असला तरी तसा याचा आवाका खूप मोठा आहे.हा बाजार  चार दिवस असतो . मुख्य बाजार रविवारी असतो पण पण बैल शुक्रवारी राती येऊन आपल्या  जागा कायम करतात कारण आवाका एवढा मोठा की मुख्य ठिकाणी जागे साठी बैल दावणीला बांधावे लागतात , बैल खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि बाजाराचे मैदान, जागा कमी पडते .शनिवारी त्याची पूर्ण तयारी होते ,हजारो दावणी पडतात .शनिवारी त्या बैलाच्या माश्यागती कराव्या लागतात ,शिंग तासने ,बैल भादारणे ,खुर साळने ,बैल चका -चक धुऊन उभे करावे लागतात ,यात चारा पाण्याची व्यास्वस्था करावी लागते .यात स्थानिक लोक चार दिवस आपला रोजगार मिळवतात ,कोनि पाणी पाजण्याचे मजुरी करते ,कोणी गावात चारा विकतात ,कोणी बैल धुत्तात तर कोणी शिंग तासण्याचे  काम करतात .या बाजारात जो सर्वात महत्वाचा घटक म्हणजेदलालहे दलाल  एका दिवसात खूप माला -माल होतात ,खोट्या बतावणी करून बैल विकत असतात

मलक हा बैल घा हो असा बैल तुम्हाला अख्या बाजारात मिळणार नाही ,या रोटीची शपथ ( दलालाच्या खांद्यावर एक सोगा असतो त्यात ते आपली फाटकी चप्पल ठेवतात आणि म्हणतातया रोटीची शपथ ...आणि मालक पटतो

माझा चुलता ( काका ) सिंगे तासणी चे म्हणजे सोलण्याचे  काम करीत असे ….”मालक सिंग तासायचे का सिंगअसा बाजारात आवाज काढीत  प्रत्येक दावणीत  फिरत असे ….आणि त्याला बर्या पैकी पैका मिळत असे

मी स्वतः नदीवरून घागरिने पाणी वाहून  घेऊन जाऊन पाणी विकले आहे ,तेंव्हा रुपये १०/- ला घागर विकत असे ,पण सोबत मीठ आणि एक छोटे  घंगाले ( गोल तबकडी चे पसरत भांडे  ) ठेवावे लागते ,कारण बैल मालक  पाणी पाजण्या अगोदर विचारतो की ए पोरा मीठ आहे का र ? हो मलक म्हणून पाणी विकावे लागते ,तेंव्हा खडा मीठ खूप स्वस्थ मिळत असे
एक प्रंसग सांगतो ,मी पाणी तर पाजले त्यात मीठ पण टाकले पण बैल काही पाणी पीत नाही ,तेंव्हा बैलाचा मालक माझ्यावर ओरडला ,...ए पोर्रा पाणी चांगल आहे ,मीठ पण आहे ,आर पीठ कुठ आहे ,माझे बैल पीठा शिवाय पाणी पीत नाहीत ….आणि खरेच त्या मालकाने मला पैसे दिले नाहीत ... कारण बैलाने पाणी पिले नाहीच .

अशी खूप कामे बाजारात करून आपल्या घर परिवाराचा कमवता हिस्सा झालो होतो .या पैश्याचं लोभ कमी होत नहव्ते म्हणून  शनिवारी आणि सोमवारि  शाळेला गुल्टी ,या काष्ठाच्या आणि मेहनतीच्या कमाई सोबत मज्जा पण खूप केली आणि बघायला पण  मिळाली
म्हणून परत गावी जावे वाटते ? पण ते दिवस आज राहिले आहेत का ? बैल ही नाहीत ,चारा  ही नाही आणि पाणी ही नाही ,आमची तेरु नदी आज ओसाड झाली आहे .ज्या नदीत आखा शनिवार भिजून काढला खूप पोहलो खूप उदंड होतो मी

याच नदीच्या पुलावरून आमच्या अशोक शिंदे काका ने पैज लाऊन पुलावरून पाण्यात उडी घेतली होती ,त्या नन्तर राजकुमार आणि माझा नंबर होता उडी मारायचा ?
पण एक भय झाले जसा अशोक वर उडी मारून उसळी घेऊन पाण्याबाहेर आला तेंव्हा एका विहारीच्या आकाराचे तांबड्या रंगाचे  वर्तुळ पाण्यावर तरंगले म्हणजे ,त्याच्या पायात पाण्यातील  दगडाची चीप लागून टाचा चिरल्या होत्या म्हणून रक्त बाहेर आले आणी हे  बघून आम्ही दोघे  पाण्यात उड्या  न मारता खली नदीत पळत सुटलो ,वाटले आता अशोक चे डोके फुटले आणि अशोक मेला ….असे अनेक प्रसंग

 ४.हाळी हे छोटंस गाव .
 तालुका  उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध  स्थळ .इथे तीन दिवस बैल -बाज़ार आसतो ,शनिवार ,रविवार आणि सोमवार ,मग या एकबार भेंट दया !

जनावराचा जंगी बाज़ार हाळी ,हेच माँझे गाँव ....इथे जनावरांना पाणी विकून आम्ही उदर-निर्वाह केला ,आणि आई -वडिलांनी लोकांच्या शेतात्तील गवत विकन आपल्या चुली पेटवल्या .....हे सत्य विदारक

काल  मी fb वर  दोन फोटो आणि एक वेदिओ उपलोड केला आणि मित्र मंडळीने खूप प्रतिसाद दिला ...आणि मला त्या दिवसाच्या आठवणी दाटून आल्या आली मला रडू आवरेना

कारण १९७२ च्या ओल्या दुष्काळातील त्या भय विदारक गोष्टी मी आज इथे लिहणार आहे .जेष्ठ पत्रकार संजीवकुमार भगत ,जेष्ठ शिक्षक सत्यवान माने सर आणि आदरणीय दासू भगत सर यांच्या उत्साहामुळे मी मोडक्या शब्दात थोड या बाजारा विषयी लिहणार आहे .

हाळी म्हणताच लगेच हंडरगुळी लगेच पाठोपाठ थोंडात उच्चार येतो .या गावातून फक्त एक नांदेड -बिदर हा रस्ता जातो .त्यामुळे गाव विभागणी झाली आहे .तसे गाव एकच  …

लहान असताना आई म्हणायची तुला उद्या  हांडरगुळीला दळण दलायला जायचं आहे ...
हाळी हे नदी किनारी आहे .तसेच हंडरगुळी पण देखावा एकाच गावचा कारण पिठाची चक्की आमच्या गावात न्हवती ?

आपण फक्त बाजार विषयी बघू ….पूर्वी आमच्या काळी बाजार हाळीत भरत ( बसत ) असे ,पण जागे अभावी तो हंडरगुळी ला गेला ,आणि आज तागायत तिथेच आहे .खूप मोठ्या प्रमाणात महसूल हंडरगुळीच्या ग्राम पंचायतला मिळतो ,हाळी आपली कोरडीच ..
सन १९७० ( अंदाजे ) दोन्ही गावात या बाजारा वरून खूप मारामारी झाल्या आहेत याची सरकारी कचेरीत नोद आहे बरीच लोक त्या काळात जखमी झाली होती तेव्हा  मी लहान होतो .

हाळी च्या आसपास एकूण बारा वाड्यांचा आणि लमाण तांडा चा पसारा आहे या गावातील आणि वाड्यातील बैल विक्री साठी येत असतात .जरी बाजार एक दिवासचा असला तरी तसा याचा आवाका खूप मोठा आहे.हा बाजार  चार दिवस असतो . मुख्य बाजार रविवारी असतो पण पण बैल शुक्रवारी राती येऊन आपल्या  जागा कायम करतात कारण आवाका एवढा मोठा की मुख्य ठिकाणी जागे साठी बैल दावणीला बांधावे लागतात , बैल खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि बाजाराचे मैदान, जागा कमी पडते .शनिवारी त्याची पूर्ण तयारी होते ,हजारो दावणी पडतात .शनिवारी त्या बैलाच्या माश्यागती कराव्या लागतात ,शिंग तासने ,बैल भादारणे ,खुर साळने ,बैल चका -चक धुऊन उभे करावे लागतात ,यात चारा पाण्याची व्यास्वस्था करावी लागते .यात स्थानिक लोक चार दिवस आपला रोजगार मिळवतात ,कोनि पाणी पाजण्याचे मजुरी करते ,कोणी गावात चारा विकतात ,कोणी बैल धुत्तात तर कोणी शिंग तासण्याचे  काम करतात .या बाजारात जो सर्वात महत्वाचा घटक म्हणजेदलालहे दलाल  एका दिवसात खूप माला -माल होतात ,खोट्या बतावणी करून बैल विकत असतात

मलक हा बैल घा हो असा बैल तुम्हाला अख्या बाजारात मिळणार नाही ,या रोटीची शपथ ( दलालाच्या खांद्यावर एक सोगा असतो त्यात ते आपली फाटकी चप्पल ठेवतात आणि म्हणतातया रोटीची शपथ ...आणि मालक पटतो

माझा चुलता ( काका ) सिंगे तासणी चे म्हणजे सोलण्याचे  काम करीत असे ….”मालक सिंग तासायचे का सिंगअसा बाजारात आवाज काढीत  प्रत्येक दावणीत  फिरत असे ….आणि त्याला बर्या पैकी पैका मिळत असे

मी स्वतः नदीवरून घागरिने पाणी वाहून  घेऊन जाऊन पाणी विकले आहे ,तेंव्हा रुपये १०/- ला घागर विकत असे ,पण सोबत मीठ आणि एक छोटे  घंगाले ( गोल तबकडी चे पसरत भांडे  ) ठेवावे लागते ,कारण बैल मालक  पाणी पाजण्या अगोदर विचारतो की ए पोरा मीठ आहे का र ? हो मलक म्हणून पाणी विकावे लागते ,तेंव्हा खडा मीठ खूप स्वस्थ मिळत असे
एक प्रंसग सांगतो ,मी पाणी तर पाजले त्यात मीठ पण टाकले पण बैल काही पाणी पीत नाही ,तेंव्हा बैलाचा मालक माझ्यावर ओरडला ,...ए पोर्रा पाणी चांगल आहे ,मीठ पण आहे ,आर पीठ कुठ आहे ,माझे बैल पीठा शिवाय पाणी पीत नाहीत ….आणि खरेच त्या मालकाने मला पैसे दिले नाहीत ... कारण बैलाने पाणी पिले नाहीच .

अशी खूप कामे बाजारात करून आपल्या घर परिवाराचा कमवता हिस्सा झालो होतो .या पैश्याचं लोभ कमी होत नहव्ते म्हणून  शनिवारी आणि सोमवारि  शाळेला गुल्टी ,या काष्ठाच्या आणि मेहनतीच्या कमाई सोबत मज्जा पण खूप केली आणि बघायला पण  मिळाली
म्हणून परत गावी जावे वाटते ? पण ते दिवस आज राहिले आहेत का ? बैल ही नाहीत ,चारा  ही नाही आणि पाणी ही नाही ,आमची तेरु नदी आज ओसाड झाली आहे .ज्या नदीत आखा शनिवार भिजून काढला खूप पोहलो खूप उदंड होतो मी

याच नदीच्या पुलावरून आमच्या अशोक शिंदे काका ने पैज लाऊन पुलावरून पाण्यात उडी घेतली होती ,त्या नन्तर राजकुमार आणि माझा नंबर होता उडी मारायचा ?
पण एक भय झाले जसा अशोक वर उडी मारून उसळी घेऊन पाण्याबाहेर आला तेंव्हा एका विहारीच्या आकाराचे तांबड्या रंगाचे  वर्तुळ पाण्यावर तरंगले म्हणजे ,त्याच्या पायात पाण्यातील  दगडाची चीप लागून टाचा चिरल्या होत्या म्हणून रक्त बाहेर आले आणी हे  बघून आम्ही दोघे  पाण्यात उड्या  न मारता खली नदीत पळत सुटलो ,वाटले आता अशोक चे डोके फुटले आणि अशोक मेला ….असे अनेक प्रसंग

Friday, July 14, 2017

गुप्तकाशी ,उत्तरखंड




दिनांक १२-०७-२०१७
मंगळवार
गुप्तकाशी ,उत्तरखंड
या महिन्यात एका नाविन्यपूर्ण कार्यालयीन कामानिमित्त गुप्तकाशी  उतरखंड ला जावे लागले .तसा  मुंबई ते दिल्ली प्रवास सुकर असतो .मी मुंबई दिल्ली राजधानी ने दिल्ली ला पहुंचलो ,तेथून पुन्हा रात्री प्रवास हरिद्वार कडे ,हरिद्वार ला  पहाटे साडेपाच ला आलो ,परत कार ने गुप्तकशी ,एकूणच दोन दिवसाचा प्रवास .रोडचा प्रवास एकदम जीव घेणा आहे .दोनशे वीस किलो मीटर साठी तब्बल आठ ते नउ तास लागतात कारण पर्वतीय रस्ता म्हणून वेग वाढवता येत नाही ,उंच पर्वत आणि खोल दरी या मुळे  गाडी सारखी नागमोडी  फिरत असल्या कारणाने  चक्कर येते आणि उलटी झाल्याचा  सतत भास होतो .पण बाहेर दिसणारे मनोहरी दृश पाहून सगळे विसरायला होते .खोल दऱ्या ,त्या दरीत वाहणाऱ्या लांब लांब  नद्या पाहून मन सुन्न होते ,मंदाकिनी ,अलकनंदा ,आणि भागीरथी, या नद्या पाहून मन उल्हासित होते .

          देव प्रयाग जवळ दोन नद्यांचा संगम आहे .अलकनंदा आणि भागीरथी .या दोन  नद्यांचा  संगम मनमोहक आहे ,दोन्ही नद्यांचे पात्र खूप खोल असून दोन्हीच्या पण्याचा रंग एकदम वेगळा आहे .तो संगम पाहण्यासारखा आहे ,एकीचे अस्तित्व इथे नष्ट होते आणे पुढे ती नदी गंगा नावाने सुरु होते या क्षेत्रास देवप्रयाग असे म्हणता .
गुप्तकशी यथे माझे एका आश्रमात राहणे होते ,समोरच उखीमठ येथून हिमालयाच्या उतुंग रांगा दुर दुर  पसरलेल्या पहावयास मिळतात ,सकाळी दुपारी आणि रात्री अश्या तिन्ही प्रहरी  वेगवेगल्या  पर्वत रंगांची मनमोहक छटा पहावयास मिळते आणि आपले हात सहज मोबाईल चा कॅमेरा किंवा आपल्याकडे असलेया कॅमेरयाकडे वळतात .
इथे पर्वत पायथ्याला विविध देवांची छोटी -मोठी मंदिरे पहावयास मिळतात ,पंचकेदारनाथ ,पार्वती मंदिर या मंदिराला मी भेटी दिल्या ते जीर्ण आणि पडीक वाटली.

इथे सर्वात महत्वाची बाब दिडून आली ती म्हणजे “बुरांश “ नावाचे फुल ,या फुलापासून शरबत तयार होते ,यात कोणत्याही इतर गोष्ठी मिसळण्याची गरज नाही .एकदम उत्तम प्रकारे गोड शरबत .येथील लोकांचा उत्तम पेय.हे पेय बुरांश नावाच्या फुलापासून बनवले जाते . लाल रंगाचा हे  फुल खूप मोठ्या प्रमाणावर मिळते  ,हे फुल संपूर्ण हिमालीन रेंज  मध्ये मिळते ,यालाच उतरखंड चे राज्य फुल असे म्हणतात .आणि हे  नेपाल चे राष्ट्रीय फुल आहे .भारतात हे फुल उत्तराखंड  आणि हिमाचल प्रदेशात मुबलक मिळते .

आता बुरांश हे काय आहे ते बघूया .बुरांश हे गढवाली भाषेतील  नाव, हिंदी मध्ये रोह्तिका असे म्हणतात . ,इंग्रजीत याला  Rhododendron असे नाव असून ते ग्रीक भाषेतील मूळ नाव आहे Rhodo म्हणजे फुल आणि dendron म्हणजे झाड .हे फुल सामान्यतः चार रंगात मिळते पण गर्द लाल रंगाचे फुल खूप प्रचलित आणि मोठ्या प्रमाणात उपलभ आहे .
या फुलाचा उपयोग शरबत आणि स्क्वॅश म्हणून होतो .पर्वत पठारावर ये जा करून वाटसरू खूप थकतात ते या शरबत चा उपयोग शक्तीवर्धक म्हणून  करतात .आज या शरबताचा उपयोग जगभर होत आहे ,खेळ आणि खेळाडू साठी एक संजीवनी ठरला आहे ,हा नैसर्गिक वसा या भागातील अतुल्य देन आहे .

इथे आणखी एक उत्कंठा वर्धक बाब कळली ती म्हणजे २०१३ ला मंदाकिनी ने केलेला उद्रेक असंख्य लोक या देव भूमीत नरक यातना भोगत मर्त्यू मुखी पढले  ,एका एका  व्यक्ती कडून सत्य कथा ऐकून  मन सुन्न झाले ,अशी हे देव भूम मी येह लोकी पहिली ती गुप्तकशी.






वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...