Sunday, May 12, 2024

पळस आणि पांगारा

 पळस आणि पांगारा 



पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट





( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो ) 

 ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याचा उपयोग पूर्वी खूप होत असे . 

सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत 'ब्युटिया गम' किंवा 'बेंगॉल कीनो' म्हणतात.

यज्ञ आणि हवनात पळसाची पाने वापरली जातात. धार्मिक कार्यात वापरण्यात येणारी भांडी बनवण्यासाठी पळस लाकडाचा वापर केला जातो. त्याची फुले देवी सरस्वतीला अर्पण केली जातात. 

 

पळसाला पाने तीनच  पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .



शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. पळस हा पानझडी वृक्ष फॅबेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ब्युटिया मोनोस्पर्मा आहे. तो मूळचा दक्षिण आशियातील असून पाकिस्तान, भारत, बांगला देश, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया व मलेशिया या देशांतील उष्ण प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात तो पानझडी वनांमध्ये आढळतो.


पळस हा मध्यम आकाराचा वृक्ष सु. १५ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर १.५–१.८ मी. असतो. साल राखाडी, निळसर वा फिकट तपकिरी असून तिच्या लहान-मोठ्या ढलप्या सोलून निघतात. सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांमधून लाल रस पाझरतो. हा रस सुकल्यावर त्याचा विशिष्ट डिंक बनतो. त्याला इंग्रजीत ब्युटिया गम किंवा बेंगॉल कीनो म्हणतात. पाने संयुक्त, एकाआड एक व पिच्छाकृती असून मोठी व त्रिदली असतात. जानेवारी ते मार्च महिन्यांत या वृक्षाला केशरी-लाल रंगाची फुले येतात. फुले मोठी, द्विलिंगी व बिनवासाची असून ती फांद्यांच्या टोकाला किंवा पानांच्या बगलेत लांब मंजरीवर येतात. ती अनेक व सु. २.५ सेंमी. लांब असतात. त्यामुळे ज्या परिसरात पळसाची झाडे असतात तो परिसर या भडक रंगाच्या फुलोऱ्यांमुळे दूरवरून पेटल्यासारखा वाटतो. म्हणून इंग्रजीत त्याला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ म्हणतात. शिंबावंत फळे १५–२० सेंमी. लांब व सु. ४.५ सेंमी. रुंद असतात. त्यात एकच बी असते.


पळसाचे लाकूड काळपट पांढरे असते. त्यावर पाण्याचा परिणाम होत नाही, म्हणून मोटेसाठी व विहिरींच्या काठावर बांधकामासाठी त्याचा वापर होतो. पाने राठ व कडक असतात. त्यांपासून पत्रावळ्या तयार करतात. फुलांपासून केशरी रंग मिळतो. त्याचा वापर होळीचा रंग व कपडे रंगविण्यासाठी केला जातो. फुलाच्या रंगाकडे डास आकर्षित होतात आणि त्यातील मकरंदामध्ये ते अंडी घालतात. परंतु ही अंडी उबत नाहीत. त्यामुळे डासांची निर्मिती कमी होते. खोडापासून मिळणाऱ्या डिंकाचा वापर औषधात करतात. त्यातील टॅनिनाचा कातडी कमाविण्यासाठी वापर करतात.


पळस हे उत्तर प्रदेश राज्याचे राज्य फूल आहे . भारतीय डाकतार विभागातर्फे सन्मान म्हणून पाळसा च्या फुलाचे पोस्टाचे तिकिट छापले होते . कालिदासणी पळसाला ' ऋतुसंहार ' हे नाव दिले आहे . पळसला पर्यायी बेल आहे . पळस किवा बेल झाड लावले .

पळसाला संस्कृत मध्ये पलाश असे म्हणतात. पलाश अर्थ फुलाणि दावरलेले झाड . विदर्भात याला ' तुळीप असे नाव आहे .


पळसाला पाने तीन असे आपण म्हणतो . ही केवळ एक युक्ति नसून त्यात गहन अर्थ दडलेला  आहे . असंग्रह आणि संयमाची सूचना देणारी युक्ति आहे ती . किती ही माया गोळा करा पण तुम्ही प्रमाणातच वापरू शकता , उपयोगी लावू शकता ,बाकी सर्व व्यर्थ आहे असा संदेश आहे यात याची पाने त्रिदलिय असल्याने याचे संस्कृत नाव ‘ त्रिपटक ‘ असे आहे .


पांगारा : 



एक काटेरी पानझडी वृक्ष. पांगारा या वृक्षाचा फॅबेसी कुलात समावेश केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव एरिथ्रिना इंडिका असे आहे. एरिथ्रिना व्हॅरिगेटा  या शास्त्रीय नावानेही तो ओळखला जातो. मूळचा भारतीय असलेल्या या वृक्षाचा प्रसार म्यानमार, पाकिस्तान आणि अन्य आशियाई देशांतही झालेला आहे. भारतात फुलांच्या रंगांनुसार पांगाऱ्याचे तीन प्रकार आढळतात : लाल, शेंदरी आणि पांढरा. त्यांपैकी पांढरी फुले येणारा पांगारा हा दुर्मिळ असून लाल फुले येणारा पांगारा सर्वत्र आढळून येतो .




पांगारा हा वृक्ष सु. २७ मी. उंच वाढतो. याच्या खोडाची साल पातळ, करड्या रंगाची, क्वचित पिवळी व खडबडीत असते. याला लहान आकाराच्या अनेक फांद्या असतात आणि त्यांना शंकूच्या आकाराचे काटे असतात. पाने संयुक्त, त्रिदली व मोठी असून पर्णिका एकाआड एक व १०–१५ सेंमी. लांब असतात. लांब फुलोऱ्यावर फुले मोठी व आकर्षक असून ती लाल, शेंदरी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. ती बिनवासाची असून त्यांत मकरंदाचे प्रमाण जास्त असते. म्हणून अनेक पक्षी व भुंगे फुलांमधील मकरंद मिळविण्यासाठी फुलांभोवती घिरट्या घालताना दिसतात. फळ (शेंग) १३–३० सेंमी. लांब, काळ्या रंगाचे आणि लंबगोलाकार असते. त्यांत ६­-७ जांभळ्या व हलक्या बिया असतात. पांगाऱ्याची लागवड बिया किंवा कलम लावून करतात.


पांगाऱ्याच्या सालीचा लेप व्रण, सूज व सांधेदुखी यांवर लावतात. साल पित्तरोधक आणि कृमिनाशक आहे. ताज्या पानांचा रस कानदुखी तसेच दातदुखी यांवर वापरतात. कोकणात ताज्या पानांचा रस कृमिनाशक म्हणून वापरतात. लाल पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून लाल रंग, तर शेंदरी पांगाऱ्याच्या पाकळ्यांपासून शेंदरी रंग मिळवितात. या वृक्षाचे लाकूड हलके व टिकाऊ असल्यामुळे त्याचा उपयोग खेळणी, हलक्या वस्तू (उदा., फळ्या, खोकी, तक्ते, आगकाड्या, पळ्या, चाळणीच्या चौकटी इ.) बनविण्याकरिता करतात. चहाच्या किंवा कॉफीच्या मळ्यांत आणि बागांमध्ये सावलीसाठी तसेच मिरवेल, नागवेल, द्राक्षवेल इ. वेलींना आधार देण्यासाठी मुद्दाम पांगारा वृक्षाची लागवड करतात.



                                                                                       पळस 



पांगारा 

लेख आवडला तर जमेल तसे प्रोत्साहन राशी दान Gpay करा . 




प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई - ७०६ 

गुगल आणि मराठी विश्वकोश यांच्या माध्यमाने संकलन . 






पळस : फ्लेम ऑफ फॉरेस्ट

 

पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट



( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो ) 

 ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याचा उपयोग पूर्वी खूप होत असे . 

सालीवर पडलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून व भेगांतून लाल रस पाझरतो व सुकल्यावर त्याचा विशिष्ट गोंद बनतो, त्याला इंग्रजीत 'ब्युटिया गम' किंवा 'बेंगॉल कीनो' म्हणतात.

यज्ञ आणि हवनात पळसाची पाने वापरली जातात. धार्मिक कार्यात वापरण्यात येणारी भांडी बनवण्यासाठी पळस लाकडाचा वापर केला जातो. त्याची फुले देवी सरस्वतीला अर्पण केली जातात. 

 

पळसाला पाने तीनच  पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .


 


 



पिवळ्या पळसामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, महिलांच्या मासिक पाळीची समस्या दूर करण्याची आणि बाळंतपणानंतर किंवा अति काबाडकष्टांमुळे शक्तिहीन झालेल्या स्नायूंना बळकट करण्याची क्षमता आहे.

काश्मीर ते कन्याकुमारी आणि ईशान्येतील अरुणाचल ते पश्चिमेकडील गुजरातच्या कच्छपर्यंतचा प्रदेश पाहता भारताला हवामानाची शीतोष्ण उतरंड लाभलेली आहे. जैवविविधतेने व्याप्त आणि नटलेला हा सारा परिसर! पर्यावरण अभ्यासकांच्या मते १० लाखांवर विविधरंगी, औषधी गुणयुक्त वनस्पतींची संपदा भारतभूमीत आहे. पैकी जेमतेम साडेतीन लाखांवरच वृक्ष-फूल-फळांची ओळख सुस्पष्ट झाली आहे. उर्वरित वनस्पतींच्या नावांचा उलगडा बाकीच आहे. यातील अनेक वनस्पती कालौघात नामशेष झाल्या.

 

काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्या त्यांच्यातील बहुमोल उपयोगी गुणांचा लाभ उठवता-उठवता संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच! यातलीच एक प्रमुख आणि दुर्मिळातील दुर्मीळ झालेली वनस्पती आहे पिवळा, पांढरा व काळा पळस!

 

पिवळ्या-पांढऱ्या पळसाचे मूळ शोधत गेलो तर त्याचे संदर्भ रामायणातील संजीवनीसारखे वेदादी पौराणिक ग्रंथांमधून आढळतात. पिवळ्या पळसाचे फूल हे महादेवाला अत्यंत प्रिय, अशी श्रद्धावंतांची धारणा आहे.

शिशिर ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच पळसाची झाडे बहरू लागतात. याच दरम्यान, महाशिवरात्रही असल्याने बहरलेल्या पिवळ्या पळसाची फुले महादेवाच्या पिंडीवर अर्पण केली जात. त्यासंदर्भातील उल्लेख पौराणिक वेद आदी ग्रंथांमध्ये आढळतो. पळसावर काव्यही लिहिले गेले आहे. वेदांच्या काही ऋचाही पळसाचा संदर्भ देणाऱ्या आहेत.

पळसाच्या पाना-फुलांच्या वर्णनातून एखादी उपमाही दिली गेली आहे. ‘किंशुक’ या नावानेही काव्यातून पळसाचे रूपक मांडले आहे. ‘काय त्या झाडावर पोपट (शुक) बसला आहे?’ अशी पृच्छाच ‘किंशुक’ या शब्दातून केली आहे. शिशिरागमनाला उन्हाचा रखरखाट जाणवू लागताच रानोमाळी बहरू लागलेल्या पळसाकडे दुरून बघितले तर केशरी, पिवळी, पांढरी फुले त्यांच्या पाकळय़ांतील टोकदार वैशिष्ट्यांमुळे जणू पोपट बसल्यासारखी भासतात, असे ते रूपक किंशुकमधून मांडल्याचे दिसते.

परभणीतील चारठाणा येथील निवृत्त मुख्याध्यापक आणि वेद, संस्कृतचे अभ्यासक शिवाप्पा खके हे पिवळ्या पळसावरील सुभाषित अत्यंत लयीत म्हणून दाखवतात. त्यातले रूपक उलगडून दाखवतात.

 

ब्रह्मवृक्ष पलाशस्तवं श्रद्धां मेधां च देहि मे ।
वृक्षाधिपो नमस्तेस्तु त्वं चात्र सन्निधो भव ।।


या सुभाषितामध्ये पळसाचे माहात्म्य सांगताना त्याला ब्रह्मवृक्ष म्हणूनही संबोधले आहे. सुभाषितामध्ये पळसाचे नाव ‘पलाश’ म्हणून आले आहे. अर्थात हे संस्कृत नाम. पळसाला वृक्षातील राजाही म्हटले गेले आहे. त्याला श्रद्धा व मेधा- म्हणजे बुद्धी प्रदान करण्याचे आर्जव वरील सुभाषितामधून केले आहे. वेद, पुराणात पिवळ्या पळसाला त्रिपर्ण, पलाश, पलंकषा, पलंकषी, अशी नामाभिधाने आढळतात.

 

इ.स. १८०० मध्ये भारतावर जेव्हा इंग्रजांचा अमल होता तेव्हा त्यांनी येथील जशी थंड हवेची ठिकाणे शोधली तशी त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचाही अभ्यास केला. ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ नावाचा एक वनस्पती-फुलांचा कोषच लिहिला. या ग्रंथांत अनेक दुर्मीळ वनस्पतींचा उल्लेख आढळतो. पिवळ्या पळसाला इंग्रजीत साजेसे ‘ब्युटिया मोनसपर्मा’ नाव आहे. हिंदीत पलश म्हटले आहे. धुळवडीला पारंपरिक रंग खेळण्याची परंपरा जपणाऱ्या बंजारा समाजात पळसाला केसुला म्हटले जाते.

 

पूर्वीच्या काळी धुळवडीला जे नैसर्गिक रंग खेळले जायचे त्यात केशरी, पिवळ्या, पांढऱ्या व काळ्या पळसाच्या फुलांचीच भुकटी असे. या फुलांच्या रंगांमध्ये उष्णता शामक घटक असल्याचे सांगितले जाते. या फुलांच्या भुकटीचे औषध म्हणून सेवनही केले जात असे.

अत्यंत औषधी गुणयुक्त, पिवळ्या-पांढऱ्या पळसाचे वर्णन जमिनीवरचे सोने म्हणून केले गेले आहे. अर्थात त्याला त्या वृक्षाचे बहुगुणी वैशिष्ट्यच कारणीभूत आहे. मात्र, पिवळ्या पळसाच्या मुळाशी सोने असल्याचा समज करून घेत त्यावर नाहक कुऱ्हाड चालवली गेली असावी आणि ही प्रजात लुप्त झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते. वस्तुत: पिवळ्या पळसात अनेक आजार दूर करणारे गुण आहेत. त्यामुळे त्याला सोने म्हणून संबोधले जात असे

अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक स्तरावरच चिंतेचा विषय झाला आहे. हवा, पाणी प्रदूषित होत आहे. दुर्मीळ आणि औषधीगुणयुक्त वनस्पती नामशेष होणे आणि निसर्गाचा समतोल राखण्यात हातभार लावणारी जैवविविधतेची साखळी तुटत जाणे हेदेखील त्यामागील एक कारण आहे.

 

हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याची जाणीव करून देणारे कोणीतरी मार्गदर्शक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊन दुर्मीळ वनस्पतींचे जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त आहे. याच उद्देशाने उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाचे प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांचा एक वनस्पती उद्यान विकसित करण्यासाचा प्रयत्न करणे आहे.

 

 महाविद्यालयातील दुर्मीळ वनस्पतींचा ठेवा जतन करणे, त्यात आणखी भर घालून नामशेष होऊ पाहणाऱ्या वनस्पतींचे बीज संकलित करण्यासह रोप निर्मितीचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे.

 

प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी पिवळ्या पळसातील औषधी गुण हेरून त्याचे बीज मिळवून त्यापासून रोपे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पिवळ्या पळसामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, मुतखडा, महिलांच्या मासिक पाळीची समस्या दूर करण्याची आणि बाळंतपणानंतर किंवा अति काबाडकष्टांमुळे शक्तिहीन झालेल्या स्नायूंना बळकट करण्याची क्षमता आहे. कामशक्तिवर्धक, तारुण्य वाढवणारे गुण त्यात आहेत. अतिसार, अंगदुखीसह कित्येक आजार आणि दुखण्यांमध्ये पळसाचे सर्व घटक उपयोगी ठरतात. पिवळ्या पळसाचा डिंकही अत्यंत गुणकारी मानला गेला आहे. त्याचे लाडू पूर्वी बाळंतपणानंतर महिलांचे स्नायू बळकट करण्यासाठी दिले जात. अशा जैवविविधतेतील बहुगुणी, नामशेष किंवा लुप्त होत जाणाऱ्या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रकल्प डॉ. पटवारी यांनी उदयगिरीत राबवला आहे.



केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एबीजी म्हणजे ‘असिस्टंट टू बोटॉनिकल गार्डन’ योजनेंतर्गत दुर्मीळ वनस्पती, बीजांचे जतन करण्याला प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली तर महाराष्ट्रात बोटॉनिकल सर्व्हे ऑफ इंडियाअंतर्गत असे प्रकल्प राबवण्यासाठी काही निधीही दिला जातो. वनस्पती उद्यान विकसित करणाऱ्या या योजनेसाठी महाराष्ट्रातून दोनच महाविद्यालयांची निवड झाली आहे. मराठवाड्यातून उदगीरचे महाराष्ट्र उदयगिरी हे एकमेव आहे. उदयगिरीत अनेक दुर्मीळ वनस्पतींचे जतन केले जात असल्याचे केंद्रस्तरावरून आलेल्या पथकाने पाहिले तेव्हा त्यात त्यांना कमतरता जाणवली ती पिवळय़ा पळसाची. दुर्मीळ झालेला का असेना पण पिवळा पळस मराठवाडय़ातच सापडेल, असे त्या पथकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर पुन्हा नव्याने शोध सुरू झाला. महाशिवरात्रीनिमित्ताने महादेवाला प्रिय अशा पिवळय़ा पळसाच्या फुलांची चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आणि पिवळा पळस उदगीरनजीकच्या जायभायचीवाडीत असल्याची वार्ता कानी आली. डॉ. पटवारी यांनी पिवळा पळस तग धरून असलेल्या शिवाराला भेट दिली आणि तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून वृक्षाचे जतन करण्याचे आवाहन केले. त्याच्या बियांचे आता संकलन सुरू झाले आहे.



मराठवाड्यात पिवळ्यापांढऱ्यासोबतच काळा पळसही पूर्वी आढळायचा. जो आता 

दुर्मिळात दुर्मीळ झाला आहे. काळ्या पळसाला तिवस किंवा भुत्या पळसही म्हणतात. मराठवाड्यात बीडजवळील तागडगाव व उदगीरनजीकच्या जायभायाचीवाडी येथे पिवळ्या पळसाचे एखाद-दुसरे झाड आजही आढळते. केशरी-तांबडापिवळापांढरा अशा पळसाच्या विविध प्रजातींबाबत किंवा रंगांबाबत अभ्यासकांमध्ये मात्र काही मतमतांतरेही आढळतात. औरंगाबाद येथील वनस्पती अभ्यासक प्रा. मिलिंद गिरीधारी यांनी अभ्यासकांमधील मतमतांतरे मांडली. अनेक अभ्यासकांच्या मते माणसाच्या त्वचेचा रंग जसा अल्बिनो या पेशीतील दोषांमुळे बदलतो तसा काहीसा प्रकार केशरीपिवळा व पांढऱ्या पळसातील रंगांबाबत आहे.

 

उपयोग : 

आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर फायदेशीर आहेत्यापैकीच एक पळस. पळस औषधी गुणधर्म असलेली एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला ‘फॉरेस्ट फायर म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो. 

 

पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरीअँटी-बॅक्टेरिअलवेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतोशिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत. 

 

डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचार :

मोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस घ्या आणि डोळ्यांमध्ये घाला. असं केल्याने डोळ्याच्या इतर समस्यांपासूनही मुक्तता मिळेल. 

 

किडनी स्टोन दूर करतं :

साखर घालून पळसाच्या फुलांचं सूप बनवा. हे सूप दोनदा पिण्यामुळे मूत्रातील जळजळ दूर होईल आणि मूत्रपिंडातील स्टोनसुद्धा वितळतील. साखर न घालताही तुम्ही हे सूप बनवू शकताज्यामुळे यकृतासंबंधी समस्याही दूर होतील. 

 

सूज नाहीशी होते : 

पळस मुरगळजळजळ किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणारी सूज दूर करते. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर जाळी ठेवून या जाळीवर पळसाची फुलं ठेवा. ही फुलं तुम्हाला जिथं सूज आली आहेत्या भागावर लावा. दिवसातून दोनदा ही क्रिया करा. 

 

त्वचेसाठी फायदेशीर :

त्वचेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठीदेखील पळस प्रभावी आहे. यासाठी पळसाची साल कोरडी किसून घ्या. एक चमचा पळसाच्या सालीची पावडर घेऊन त्यात तूप आणि मध मिसळून दिवसातून दोनदा प्या. अँटी-एजिंग म्हणून हा एक चांगला उपाय आहे. 

 

पोट फुगण्याच्या समस्या दूर होते :

 पळसाची फुलं पचन संबंधित समस्यांसाठी उपयुक्त आहे. तुमचं पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर पळसाची सालं घ्या आणि कोरड्या आल्यासकट पाण्यात उकळवा. हा काढा गाळून प्या. 

 

रक्तस्राव बंद होतो :

नाकातून  रक्त येणं हे नाकाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होण्यामुळे होतं. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कोरडं नाक किंवा नाकात दुखापत. पळसाची फुलं नाकाच्या रक्तस्त्रावात देखील उपयुक्त आहे. 5-7 पळसाची फुलं घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी गाळून त्यात साखर मिसळून प्या. याने नाकाचा रक्तस्त्राव थांबतो. 

 

शरीरातील विषारी घटक दूर होतात :

पळसाच्या फुलांची पावडर तयार करा आणि दररोज 1-2 ग्रॅम पावडर पाण्यासह घ्या. चवीला कडू लागलं तरी यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर जाण्यास मदत होईल. 

(माहिती गुगल वरुण साभार )




लेख आवडला तर Gpay करून मदत करा .  

 


प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई 

पळस आणि पांगारा

  पळस आणि पांगारा  पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट ( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो )   ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्प...