Friday, February 9, 2018

नात्यात लग्न एक अभिशाप

नात्यात लग्न एक अभिशाप

दिनांक : १७-०४-२०१७
नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक अभिशाप म्हणावे लागेल .नात्यात लग्न करण्याची आदिम काळापासून एक परंपरा आहे ,त्याचे बीजे खूप दूरवर कोरली गेली आहेत.आधुनिक काळात नवीन नवीन संशोधन यामुळे नाते संबंधामुळे त्याचे दूष परिणाम आज जगभर भोगावे लागत आहेत ते म्हणजे आज जगभरात दिसून येत असलेली अपंग बालके ,नाते संबंथ हे अतिशय घातक संबंध सूचित झाले आहेत ,त्याचा परिणाम म्हणजे जन्माला येणारे  अपंग बाळ.
आत्याच्या मुलीसोबत किंवा मामाच्या मुली सोबत लग्न केल्यावर नात्यातील रक्त गट एक होईन त्यात एक सुत्रता येते आणि रक्ताचा गट एक झाल्यामुळे येणारे मुल अपंग प्रवर्गात जम्माला येते .हा रक्त गट एका कुटुंबाकडून दुसरया कुटुंबाकडे प्रवाहित होत असल्यामुळे लगेच जरी मुल अपंग जन्माला आले नसले तरी ,दुसऱ्या पिढीत ते बाबा किवा आई ला ज्या ठिकाणी लग्न करून दिले असेल त्या ठिकाणी हमखास अपंग मुल जन्माला येते मग ते कोणत्याही परवार्गाचे असते .
या विषयी आपल्या भारताचा विचार करायचा असेल ते नाते संबंध हे  दृढ होत चालेली बाब आहे ,यामुळे जन्माला येणारे बाळ कोणत्याही अपंगाच्या प्रकारात जन्माला येणाऱ्या बाळात मोडते आज मितीला आपण सरास आवती भोवती पाहत आहोत कली बर्याच प्रकारची अपंग बालके जन्माला येत आहेत ,कर्णबधीर ,अस्थीव्यांग,अंध ,मातीन्मंद आणि बहुविकलांग ज्यात एकापेक्षा जास्थ विकलांगता पहावयास मिळते .त्याचे विविध कारणापैकी एक कारण म्हणजे नात्यात लग्न होय .
नात्यात लग्न जे होतात त्यात हिंदू धर्मात ,मामाच्या मुलीशी ,आत्याच्या मुलीशी , आणि बहिणीच्या मुलीशी आणि जवळच्या नात्यात लग्न करण्याची प्रथा खूप दिवसपासून चालत आलेली आहे ,त्याचा परिणाम अपंग मुल जन्माला येते ते वरील कोणत्याही प्रकारचे असू शकते असे संशोधना अंती शिद्ध झालेले आहे ,मुस्लीम धर्मात ,बहिणीच्या मुलीशी आणि आत्या ,आणि मामा या नाते संबंधात लग्न करण्यची प्रथा आहे .
अनपेक्षित घडून अल्लेला प्रसंग यात भाऊ बहिण ,बाबा -मुलगी , दीर भावजय आणि बालवयात केलेला किवा झालेला अति प्रसंग यातून जर गर्भ धारणा झाली तर अपंग मुल जन्माला येण्याची शक्यता जास्त बळावते .जर मुलीचे किंवा प्रतिस्पर्ध्याचे वय कमी असेल तर नक्की होणारे मुल अपंग असू  येते .
वडिलोपार्जित संपत्ती आपल्या घरात असावी म्हणून ते सख्या बह्वासोबत लग्न करतात . कारण पूर्ण जगभरात फारशी लोकांची संख्या खूप रोडावली आहे .तो धागा पक्सून ही जमत घरात लग्न करीत असल्याचा अहवाल आहे .
अपंग मुल जन्माला येण्याची तशी बरीच करणे आहेत .तयची वर्गवारी जर केली तर तीन भाग पडता येतील एक जन्माच्या पूर्वी दुसरा जन्मः आणि तिसरा म्हणजे जन्मानंर .यात वेग वेगळी करणे आसू शकतात .
पण अनुस्वन्शिकता हा सर्वात महत्वाचा गह्तक आहे . आदिम काळात विवाह संस्था अस्तित्वात न्हवती तेंवा नात्यात लग्न करण्याची पद्धत असावी हळू हळू विकास होत गेला ,वसाहती निर्न्मान झाल्या आणि एक काळ असा आला की विवाह हा नात्यात सुरु झाला .त्याचे कारण असे की एखाद्या अनोळखी व्यक्ती किवा समाजात कसे लग्न करावे ? तर नात्यात लग्न करण्याची प्रथा सुरु झाली असावी ,हळू हळू मानव विकास पावत गेला नि समाजाची  रचना बदलत गेली .ती आजतागायत सामुहिक विवाह पर्येंत पोहचली आहे. पण नात्यात लग्न करण्याची प्रथा कायम ठाण मांडून बसलेली आहे असे पहावयास मिळते .
हे असे का होते करणे जरी वेगळी असली तरी विवाह एक असा खेळ आहे जो आज पर्येंत कोणालाही सुटलेला नाही कारण ही एक सामाजिक संस्था आहे ,एक संस्कृती आहे .आणि पारंपारिक पद्धत आहे .जनन उत्पतीच आणि राष्ट्र विक्साचा मूळ पाया ही .जगात जन्म घेणारे बाळ सुधृद हव्हे म्हणून प्रत्येक समाज ,देश झटत असते .एवढ्या उप्द्य्वातून अपंग मुल जन्माला  आल्या शिवाय राहत नाही .हा नात्यात लग्न करण्याचा अभिशाप आहे .
म्हणून याला एकाच उपाय आहे आणि तो म्हंजे असे लग्न टाळणे होय ,लोकात जनजागृती झाली पाहिजे या साठी वैक्तिक पातळीवर .सामाजिक संथा आणि शासन संस्थेचा हस्थ्क्सेप खूप महत्वाचा आहे .पूर्वी जेण्व्हा गोवर कांजण्या ची साथ येत से तेंव्हा जनजागृती खूप केली जात असे “देवीचा रोगी कालवा ,आणि हजार रुपय मिळवा “. त्याच पद्धतीने जर अपंग मुल जन्माला येण्यापासून थांबवायचे असेल तर अश्या पद्धतीने लोकात जनजागृती केली पाहिजे ,”नात्यात लग्न टाळा आणि पाच हजार रुपय मिळावा “.
आजच्या बदलत्या जगात आणि धावपळीच्या काळात समाजातील गटांनी या बाबी कडे गांभीर्याने पहावयास हवे ,जाती बाहेर जाऊन ,शहराबाहेर जाऊन ,जिथे आपणास योगे स्थळ वाटेल तिथे विवाह केला पाहिजे .ज्या मुले येणारे मुल सुधृद आणि निरोगी जम्माला येईल .आणि त्याचा परिणाम देश विकासासाठी हातभार लावण्यास मदत होईल ,अपंग बालक जन्माला येण्याची संख्या कमी होईल .
इकादारीत सामुर्ण भारताचा विचार केला तर उत्तर राज्यातील तुलनेत दक्षिण राज्यातील लोक जवळच्या नात्यात लग्न करण्यास पसंती देतात .मग अश्या विवाहास का पसंती देण्यात येते ? कारण एकाच आहे नाते संबंध ,रुंनुबंध कायम असावे ,आपुलकी हा एवढाच समंध आहे ,मग एखादे मुल अपंग झाल्यावर घरात एक कोठडी का करून ठेवता आले तरी चालेल ? सामजिक भीती पोटी उच्च कुलीन आणि मध्यम वर्गी देखील घरात जन्माला आलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला लपवण्याचा प्रयन करतात .पण आज थे चित्र थोडे बदलून गेले आहे ,जागरूकता आही सामजिक जान आणि आज अपंग व्यक्तींना मिळत असलेल्या सेवा सुविधा यामुळे मुल समाजाचा भाग बनत चालले आहे .
सामाज्याचाय प्रवाहात येण्यासाठी पालक ,शिक्षक आणि सेवा संस्था यांच्या पुढाकाराने ,नात्यात लग्न करण्याचे प्रमाण कमी झाले असून ,अश्या संबंध्तून जन्माला येणारे मुल दिसत नाही .जरी अपंग मुल जन्माला येत सतील तरी त्यांची करणे वेगळी आहेत हे लाक्षय्त घेण्याची बाब आहे .अश्या संबंध्तून जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश उद्बह्वतो ,आणि वेळ खाऊ आणि खर्चिक  असतो .या सर्व जाचापासून दूर राहण्यासाठी नात्यात विवाह न करणे हे सामाजिक, मानसिक, शारीरिक ,आणि देश हिताच्या दृष्टीने अत्येंत असरदार आहे .
शेवटचे अद्यावत 17-04-207

मराठा आणि इतिहासाच्या पाउलखुणा : तुम्ही कंचा मराठा ?

मराठा आणि इतिहासाच्या पाउलखुणा :

तुम्ही कंचा मराठा ?

दिनांक ०९/०८/२०१७ ,१०/०८ २०१७



महामोठा मराठा मोर्चा  मुंबई परिसरात निघाला होता ,त्या निमित्ताने काही लिहावे हे मोर्च्या बघितल्या  पासून जाणवत होत .इतिहात जर डोकाउन पहिले तर हा मराठा मोर्च्या काढण्याचे कारण कांही असो या मराठा  संघाने बहुजानावर खूप अन्याय अत्याचार केलेले पुरावे मिळतील ,आज माणुसकी लयाला जात आहे,हजारो शेतकरी विविध कारणानं आत्महत्या करीत आहेत ,त्याचे करणे वेगळी आहेत . म्हणून अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी ही जमात रस्त्यावर धुडगूस घालू पाहत आहे ,याच्या  मागचे राजकारण जरी वेगळे असले तरी आज या विखुरलेल्या समाजाची एकी होण्याचे आजची करणे  वेगळी आहेत त्याचा  उहापोह इथे नको ? इतिहास पहिला तर हे मराठे तीन प्रवर्गात विभागले गेले होते .एक गढीवरील मराठा ,चिरेबंदी वाड्यातील मराठा आणि वाडीवरील मराठा ...



तीन मराठे आज रस्त्यावर का उतरत आहेत ते कळने जरी कठीण असले तरी उमगणे सोप्पे आहे यांना सत्तर वर्षानंतर आरक्षणाची गरज वाटत आहे . या तिघा मराठ्यात  कधी रोटी बेटी  व्यवहार झाला नाही तरी पण एक झेंड्याखाली आले आहेत ? हे मोठी राजकीय खेळी आहे .



मराठा हा महाराष्ट्र पुरता पाहावयाचा असेल तर उल्लेख केल्या प्रमाणे  तीन भागात  विखुरलेले पहावयास मिळतील .आज जरी काही कारणाने रस्त्यावर  एकत्र आले असले  तरी पुढील काळात ही एकत्र येतील का हा एक अनुउत्तरीत स्वप्न राहील . आणि पुढे जाऊन  रोटी बेटी व्यवहार होतील असे ही नाही .मग हे तीन मराठा कोण ?





 या गोष्टीला इतिहास साक्षी आहे ,एक मराठा जो गढीवर राहतो ,त्यास गढीवरील मराठा म्हणतात हा एकदम गावाच्या माध्येभागी सुरक्षित वास्तव्यात राहण्याचे ठिकाण म्हणजे  बुरुज.या बुरुजावर या मराठ्याचे वास्तव्य पूर्वी प्रत्येक गावात एक तरी उंच बुरुज असे.गावाला एक गोलाकार बारा ते वीस फुट भिंत असे  आणि या आवारात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे असत ते एका ठराविक वेळेला उघडत आणि बंद होत असत , हे पाटील आशय अलिशान महालात  राहत असे , उंच बुरूजावर ऐक पैस आवार आणि त्या आवारात चिरे बंदी वाडा बांधून राहत असे , भागात या पाटलास मालीपाटील  असे ही म्हणत असत . मात्र बहुजन या आवाराच्या बाहेर ,त्यात मांग ,महार ,आणि त्यांचे सर्व वंश्यावळ भरभक्कम शेतीचे.त्यांना सर्व गाव मालक म्हणायचे देव की हो गावचा.खूप दरारा जे पाटील म्हणतील तेच होणार .



यांचे कडे खूप किंवा मधयम स्वरुपाची शेती असायची ,एवढी असायची की त्यांना ही माहित नसे  ,मग हे शेती कोण करीत असे तर खालच्या वर्गातील बहुजन आणि बहुजनाची कुटुंबे च्या कुटुंबे यांच्या शेतीचे रखवालदार ,शेतीतील सर्व कामे बहुजन करीत असे ,शेत नागरणी पासून ते धान्याची रास करेपार्येंत  ते राब राब राबत ,बहुजनांची मुले संपूर्ण वर्षासाठी घरगडी म्हणून काम करीत असत ,इथेच काम करणे आणि इथेच झोपणे ,जरी त्याचे लग्न झाले तरी सुट्टी नाही ,आई वडील आणि मुल मुली हे  संपूर्ण भूमिहीन शेतमजूर म्हणून काम करीत असत .याचे मोबदल्यात काय मिळत असे तर धान्य चौथाली हिस्सा किंवा कुठे कुठे पाचवा हिस्सा ,आणि उरले सुरले खळ्यातील रास.जास्तच झाले तर खाल्यातील पडलेले धान्ये सावडून घेऊन जाने ,आणि अखेरचा कळस असा की त्यांच्या गाई म्हसी बैल इत्यादी जनावराने खाऊन टाकलेल्या शेणातून मिळालेले धन्य यावर या समाजाची उपजीविका होत असे.अश्या क्रूर पणे धाकाने बहुजनांची सर्रास पिळवणूक करीत होते .



यांचे कडे घरगडी तर कामाला होतेच पण बहुजांची मुलगी उपवर झाली की यांचीच असायची ,यांचे कडून जन्माला आलेले मुल म्हणजे हरिजन ? याच हरिजन शब्दाचा डॉ बाबासाहेबांनी  पुढील आधुनिक काळात विरोध केला आणि महात्मा गांधीजीने त्याचा उहापोह केला .



अश्या आणि अनेक प्रकारे बहुजनाची आदिम काळापासून सामाजिक आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केली होती ,हे सर्व श्रुत आहे .आणि निरंतर बहुजानावर अंकुश ठेवण्याचा पायंडा पाडून ठेवला होता ,हा मराठा ,मी म्हणील ते दिशा दाखवणारा मराठा ? आज बुरुज आणि त्या बुरुजाची माती ढासळून गेली आहे उरले आहे ते अवशेष पाटीलकीचे .



दिनांक : १४-०८-२०१७

१५.०० HRS -१६ :००

दुसऱ्या प्रकारातील मराठा हा चिरेबंदी वाड्यातील होय ,हे मराठे गावात थोडे जास्तच असतात शेती खूप असून ही सारखे कर्ज बाजरी असतात .यांचे वास्तव्ये गढीच्या पाटील यांच्या आसपास असते ,कादाचीच मंदिराजवळ चिरेबंदी वाडे असतात ,मध्यम आकाराची वाडे या वाड्यात संपूर्ण कुटुंब असते ,मुल मुली सुना बाळ एकत्र राहतात ,वाड्याती गुरे ढोरे बांधतात अथवा आसपास गुरा धोरणच गोठा असतो .यांचे मुले शेतीची देखभाल करतात यांना मदतीसाठी बहुजनांची पोरे कामावर लागतात ,पाटील असल्याचा मनात सुकाळ खूप असतो पण गढीवरील पाटील गावचा मुख्य असल्या कारणाने यांचा क्रमामंक मालीपातील असा लागतो ,बहुजावरील कामगारच्या मेहनतीवर यांची मदार असते ,यांना घर गडी लागतो वर्षभर करार पद्धतीने बहुजनांची मुले कमावर ठेवत असत ,भरगच्च  शेत आणि शेत मळे यांचे कडे असल्यामुळे उत्त्पन्न ही तश्याच पद्धतीने असते ,वर उल्लेख केल्यामुळे हे ही बहुजानाचे शोसित आहेत सर्व गह्रातील कामे करून घेत पण घरात प्रवेश नसे ,बहुजनासाठी यांनी एक वेगळी खोली आंदन म्हणून ठेवलेली असते ,तिथेच बसने आणि तिथेच खाणे ,करण प्रश्न सिवाशिव आणि बाटा बाटीचा असतो न ,समजा तुम्हाला चाहा हवा असेल तर ,एक राखून ठेवलेली कप बशी असते ,त्यातच चहा प्यायचा आणि स्वतः धुऊन ठेवायची आणि परत तलफ झाली की ती तुम्ही वापरायची ,आणि कायम ती तुमचीच असे .

शेतावरील कामात भयंकर पिळवणूक केली जात होती ,घर गड्याने पहाटे तीन वाजता मळ्यात  जाऊन विहरीवर पाणी सोडायचे ,उसाला पाणी द्यायचे आणि उस पूर्ण पाणी पिऊन झाल्यावर परत घरी यायचे आणि सर्व गुर ढोरांना पाणी पाजून झाल्यावर त्यांना नंदीवर घेऊन जाऊन धुऊन आणायचे हे सकाळ चे घरगद्याचे काम असे ,नंतर उरलेली शिळी पाकी भाकर पदरात घेऊन घरी जायचे .घरी जाऊन अंघोळ करून परत मालकाच्या शेतावर जुंपायचे ,हे वर्षभर अहो रात्र चालत असे ,आणि घरगाड्याच्या पदरी काय तर एक ठराविक ठरलेली रक्कम ,एक दिवस सुट्टी नाही,ज्या दिवशी कामावर गैरहजर त्या दिवसाची पगार वजा केली जाई .काय जीवन होते जीवनात काही तथ्य होते का आयुषभर राब राब राबता ? घरगडी वर्षभर बांधला असल्याकारणाने तो त्यांचा गुलाम असे म्हणेल ती कामे बैला सारखी करावी  लागत असे,एखाद चुकीचे काम झाले तर वेळ प्रसंगी मार खाण्यास सामोरे जावे लागत असे. शेत आणि घरातील सर्व कामे करायचे पण घरातील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही ,हीच अवस्था शेतात काम करणाऱ्यांना भोगावी लागत असे ,शेतावर काम करणारी बायका ,आणि वयस्क पुरुष मंडळी यांचे गुलाम असत ,बारा बार तास काम करून जुजबी मोबदला पदरी पडे .या पिळवणूकी बरोबर गुलामासारखी वागणूक असे .पातला समोर मन वर करून बोलायचे नाही म्हणेल ते काम गुमाने आणि इमाने इतबारे करायचे .असे जाच खूप आणि अनंत काळ भूमिहीन शेतमजूर आणि बहुजनावर केले होते .

आता शेवटच्या मराठे बुवा कडे वळू या हे महाशय यांचा उस्रलेला सार ,यांचे कडे म्हणावे तेवढी शेती नाह्वती हे वर उल्लेख केलेल्या पाटला कडे काम करीत असे ,गाव गाड्यावर आणि गावाबाहेर वसलेल्या वस्तीती राहणारा पाटील ,गावात खूप आपुलकी आणि सर्व समाजाचा एकदुवा असलेला पाटील मराठा .जगभर मराठा असलेले बिरूद गावभर फिरनारा मराठा ,पाटील आणि मालीपातील यांच्या इश्र्यावर नाचणारा मराठा ,बहुजनांचा कट्टर आणि जाती वाचक आणी प्रचंड प्रमाणात शिवाशिव पाळणारा मराठा ,बहुजनांना गुलाम करून वेळे काळी बळजबरीने आरोप ठेऊन बहुजनांच्या सतत पथ्यावर असणारा मराठा .काम कमी पण कामाचे भाव खाऊन वाव आणणारा मराठा .बहुजांना सोबत मिळेल ते काम करणारा पण त्याच बहुजनाना कमी लेखणारा ,आणि देव देऊळ यावर आपले गुजरा करणारा व बहुजनाना देवळात मनाई करणारा मराठा .

 आज यांची पाळे मुले नस्ठ झाली आहेत .गढी ढासळून गेली आहे ,बुरुजाची माती विकुन खाण्याची वेळ आली आहे ,चिरेबंदी वाडे भुई सपाट झाली आहेत ,आणि राहिल्या आहेत त्या आठवणी ,गाव संपला आहे गावाचा नगारा फुटला आहे,गावाची तटबंदी वाहून गेली आहे ,आणि गावाची येस आणि तिचे दरवाजे ही नस्ट झाली आहेत ,उरला आहे फक्त मराठा ,एक मराठा लाख मराठा .

Last updates :१४ - ०८-२०१७

अंधश्रद्धा एक अभिशाप

अंधश्रद्धा  एक अभिशाप
२१/११/२०१७ -२३/११/१७ -29/११/२०१७ .final correction on 08/12/2017

“आई ! आज शनिवार आहे न ग .रस्त्यावर लिंबू मिरची असतील न पडलेले ? समजा  पायाला लागले किंवा माझा पाय पडला तर दिवस खराब जाईल न माझा ? सांग ना अगदीच खराब दिवस जाईल न माझा ? “ माझ्या सात वर्षाच्या माझ्या मुलीने अक्षरशा तोंड वाकडे करून मला ज्ञानं पाजले .मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले सात वर्षाच्या  मुलीलाही समजतेय की शनिवारी लोकं नजर उतरवण्यासाठी किंवा नजर लागू नये म्हणून मिरची लिंबू रस्त्यावर फेकत असतात .किंवा आपल्या  वाहनाला बांधतात ,दारावर बांधतात .का ? तर वाईट नजर असेल तर जाळून जाईल ,म्हणजेच वाईट नजर लागणार नाही .हे अशिक्षित करतात असे नाही ,तर हे उच्च शिक्षित जास्त प्रमाणात करीत असतात ?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे .या आणि अश्या  उपायाने काय सर्व सुरळीत होते का ? सर्व नीट होण्यासाठी मिरची ,लिंबू एवढी सामर्थ्यशील आहे का ? खरेच प्रश्न  पडतो .आणि असे प्रकार समाजात एवढे सर्रास घडतात की लहान लहान मुलांना देखील असे करणे हे गैर आहे किंवा असे केले नाही तर विपरीत काही तरी घडेल का ? अशी भीती वाटत राहते .हे तर काहीच नाही लोक तर अघोरी कृत्य करायला मागे पुढे बघत नाहीत.अघोरी कृत्य अशी आहेत की ती बघण्याची तर सोयच नाही नुसती ऐकली तरीदेखील अंगावर काटा येईल .त्या विषयी मी विस्तृत सांगतेच पण माझ्या मुलीच्या या गैरसमजाचे मी सर्वप्रथम निरसन केले .तिला समजावले की हे प्रकार केल्याने आपल्या  कामावर शून्य परिणाम होतो .त्यामुळे काम तर बिघडत तर नाहीच शिवाय चागले ही होत नाही .म्हणजे अशा कृत्याचा आपल्या कामाच्या पद्धतीवर काहींच असर होत नाही .माझ्या मुलीची मी समजूत घातली पण अशा  किती आणि कोण -कोणाची समजूत घालायची ? माणसे अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत गेली आहेत त्यांना बाहेर कसे काढायचे ?
आज समाजात असे कितीतरी अघोरी प्रकार घडतात त्या बद्धल आपण बघू .मिरची लिंबू बांधणे हे तर छोटे छोटे प्रकार झाले .आपण विचार देखील करू शकत नाही .असे विचित्र प्रकार लोक करायला धजत नाहीत .परवाचीच गोष्ट  घ्या ना .आमच्या कार्यालयाची सहल गेली होती .ते ठिकाण होते ठाणे जिल्ह्यातील आदिवाशी पाडा.एकंदर सहल म्हणजे त्या पाड्यातील वस्तीती राहणाऱ्या अदिवशी लोकांची जीवनशैली अभ्यासून एक प्रबंध लिहायचा होता आम्हा सगळ्या लोकांना .म्हणून मी सहलीचा  खटाटोप केला आणि आदिवासी पाड्यातील जीवनपद्धती ही अर्थातच मागासलेली होती .प्रगत जीवनशैलीपेक्ष्या त्यांचे जीवनमान फारच खालच्या दर्जाचे  होते .त्यांचे  एकंदरीत वागणे व राहण्या खाण्याच्या पद्धतीत आपल्यापेक्ष्या जमीन अस्मानाची तफावत होती .यामुळे सर्वात मोठा त्यांच्यावर बडगा होता तो म्हणजे अंधश्रध्देचा ! त्यांचे जगणे हे केवळ केवळ आणि केवळ अंधश्रध्देच्या   विळख्यात सापडले होते .
आम्ही एका घरी परीक्षणासाठी गेलो होतो .आदिवाशी  लोकांचे राहणीमान आणि त्यांची  कुटुंब पध्दती यावर प्रकाश टाकावा म्हणून एका घरी भेट देणे गरजेचे होतेचं .घरची परिस्थिती  तशी बेताचीच होती.अर्थातच संसार मोडका होता अगदी मोडक्या -तुड्क्या मातीच्या भांडयासारखा.शेणाने सारवलेल्या जमिनीवर फाटकी चटई दिली आम्हाला बसायला.बसायचे का नाही असा आमच्या मनात विचार येत नाही तोवर आमच्या समोर माठातल्या थंडगार पाण्याचे दोन मळकट ग्लास समोर आले.त्यांच्या आदरतिथ्याला मान  देत कसेबसे आम्ही त्या चटईवर बसलो आणि दोन घोट कसे तरी घशात गिळले.एकंदर घरची परिस्थिती  बेताची असल्या कारणाने दारिद्र्याने घर झाकलेले होते .कुटुंबप्रमुखाच्या अंगावरचं जेमतेम कपडे होते .बाकीचे कुटुंब सदस्य तर जवळ जवळ अर्धनग्नचं  होते .कपड्याचा तुटवडा तसा विचारांचाही तुटवडा ! विचारांचा असा खालचा थर  त्यांच्यामध्ये असणे ही तर प्रगत हे तर प्रगत समाजाचे त्यांचे दूरदूरचे संबंध आहेत म्हणून असावा .घरात नवरा बायको होतेच ,सासू सासरे ,सहा मुली आणि त्यावर शेंडेफळ म्हणजे शेवटचे शेपूट एक मुलगा.या मुलासाठीचं तर सहा मुलीनंतर देखील गरोदर राहण्याचा त्या माउलीने अट्टाहास केला होता.ते देखील सातवी मुलगी ही त्यांनी देवाला बळी दिली होती आणि म्हणूनच देवी पावली आणि आठवा मुलगा जन्माला आला ही त्यांची श्रद्धा ! श्रद्धा असली तरी अंधश्रद्धा  म्हणावी लागेल ही .देवीला मुलगी देताना त्यांचे हात थरथर कापले नसतील का ? त्यांची जीभ कचरली नसेल का ? त्यांचे रह्श्य विदरले नसेल का ?आपल्या पोटच्या गोळ्याला मरणाच्या दारात नेताना ते कसे धजावले  असतील ह्या नुसत्या कल्पनेनेच मी सुन्न झाले होते .
या सर्व करणीचे त्या कुटुंबाला काहींच दु:ख नव्हते ,त्यांचे जीवनमान जैसे होते तसे अगदी सुरळीत चालले होते ,त्यांना यत्किंचितही फरक पडलेला नव्हता .ह्याचे मला फार आश्चर्य वाटले .आम्ही सर्वांनी मिळून त्यांना स्त्री-पुरुष संबंध ,गुणसूत्र ,शारीरिक विज्ञान  याची जितक्या सध्या सोप्या भाषेत समजवता येईल तेवढे पर्यंत केले.त्यांना ही केवळ अंधश्रध्दा बाकी दुसरे काही नाही हे जीव तोडून सांगावे लागले .त्यांना ते कितपत कळले ते माहित नाही .पण आमच्या समोर तरी थोडेफार तरी कळले याची कबुली देताना माना डोलावल्या ,निदान दोन उपदेशात्मक  गोष्टी  कानावर पडल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पडल्याचे झळकत होते .त्यांची ही पिढी तर ते दुष्कृत्य करून बसली होती .आता त्या मुलीला तरी आम्ही परत या जगात आणू शकत नव्हतो पण त्यांच्या पुढच्या पिढीच्या डोळ्यात अंजन घालण्याचे थोडे का होईना आमच्या परीने आम्ही प्रयत्न केले होते .त्या दोघा उभयतांची मुले तरी आपल्या आई बाबांनी जे भीषण कृत्य केले होते त्याची पुनरावृत्ती करणार नाहीत .मुलगाचं हवा हा अट्टाहास जरी केला तरी एका मुलग्याची अशा  परीने लावलेली वात त्यांच्या लक्षात आली होती .पण आता काही करता येणार नव्हते ?
आम्ही समाधानाने  घरी परतलो होतो .त्या आदिवाशी  वाड्यातील सर्वच घरातील अशी विदारक कहाणी होती .ह्या न त्या प्रकारामुळे कोणीतरी बळी पडले होते अंधश्रद्धेच्या खोल दलदलीत बरबटलेले त्यांना बाहेर काढण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले होते .ही गोष्ट झाली एका आदिवाशी  पाड्याची.अशी एक ना अनेक भारत भूमीच्या  पवित्र देहावर सर्वत्र आनंदी आनंद असे चित्र म्हणा किंवा वरवरचे देखावे म्हणा पण गुण्या गोविंदाने नांदत आहेत .गुण्या गोविंदाने  मी म्हणतेय कारण त्यांने  त्यांच्यात यत्किंचित ही  फरक पडत नाही .त्यांचे जसे दिनचक्र आहे तसेच चालू ठेवतात ते.त्यांना वर यायचे नाही किंवा वर येण्याची इच्छा सुद्धा नाही .विकास हा त्यांच्या ध्यानी मनी देखील  नाही .
नरबळी देणे हा अंधश्रद्धेचा झाला एक प्रकार .आणखी कहर म्हणजे पशुबळी देखील की करतात ही मंडळी .मुक्या जनावरांना ,निष्पाप जीवांना का म्हणून बळी दयायचे असे करून का आपली प्रगती होणार आहे का ? नाही न ? आपले काम यशस्वी होणार आहे का ?की आपण यशाच्या शिखरावर पोहोचणार आहोत का ?आपल्या यशाचा पाया हा एखाद्या जीवाची हत्या का असावी ?जीव घेतल्याने का आपल्याया यश मिळणार आहे ? यश अपयश हे आपल्या कर्तृत्वाच्या   बळावर मिळवायची गोष्ट आहे .त्याला दुसरा कोणी जबाबदार असूचं शकत नाही ?समाजात याचं लोकांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेऊन ढोंगी बाबा जन्माला आले आलेत .लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन या ढोंगी बाबांनी आपले दुकान जोमात सुरु केले आहे .मुल होत नाही तर या बाबांकडे जाणारे लोक मूर्खपणाचा कळसच गाठतात .मुल न होणं  आणि  ढोंगी बाबाकडे जाणं याचा तिळमात्र तरी संबंध आहे का ? बाबा मंत्र ,तंत्र,अंगारे -धुपारे करून ,का अंगारा देऊन मुल जन्माला घालणार आहे .? एवढी खालच्या थराची बौद्धिक पात्रता लोक करवून  घेतात ते कळतंच नाही .चांगल्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरकडे जाऊन ,चांगले मार्गदर्शन घेऊन समस्येचे निरसन करण्यापेक्षा ढोंगी बाबाकडे आपली अक्कल गहाण ठेवतात ? हेच मला कळत नाही .बर ढोंगी बाबाकडे जाऊन जर अशी मुल व्हायला लागली तर जगातील स्त्रीरोग तज्ञ मंडळीचे काय काम ? किंवा मोठी मोठी दवाखाने कशायला बांधली असती सरकारने एवढे साधे लोकांना कळत नाही. याचेच मला आश्चर्य वाटते .
आपण एखाद्या कामासाठी बाहेर पडत असलो आणि वाटेत जर मांजर आडवे गेले तर अशुभ घडेल म्हणून परत माघारी फिरतो ,पुढे जातच नाही .ही मानसिकता का ? ती बिचारी मांजर आपले असे काय बिघडवणार् आहे ,.ती तिच्या वाटेने जाते ,तिला काय माहित असते की आपण कोणत्या कामाला जात आहे ? तिच्या आडव्या जाण्याने असा काय फरक पडणार आहे ! मला तर हसू येते की मांजरीचा आणि आपल्या कामाचा काय संबंध आहे ? ती मांजर देखील म्हणत नसेल का ,की ही किती बावळट व्यक्ती आहे ,मला बघून मागे जाते ? तिला पण वाटायला नको का की माझे पण काम बिघडणार .खरोखर मांजर पण परत फिरली पाहिजे माणसे आडवी गेली तर .? खरोखर मांजराने असे केले तर ? म्हणून आपण या सर्व अंधश्रद्धानां बाजूला फेकून आपले कार्य केल पाहिजे ? नाही का .

ग्रामीण भागात अंधश्रद्धेच्या प्रकाराला थारा मिळतो कारण लोक शिक्षण आणि शिक्षणानेच प्रगत होत  असतात .प्रगत शहरापासून दूरचे अंतर.ही झाली ग्रामीण भागाची गोष्ट .पण आपल्या सारख्या शहरातील लोकांनी का अंधश्रद्धेला थारा द्यावा .चार दिवसापूर्वी शाळेतील माझी मैत्रिण भेटली .फार वर्षांनी भेट झाल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा ,जुन्या आठवणी निघाल्या बोलण्याच्या ओघात मी विचारले की कुठे  चालली आहेस ? तर ती म्हणाली की ज्योतिषाकडे खाद्याची अंगूठी बनवायला आणि तिच्या नवऱ्याच्या व्यापारात वाढ व्हावी म्हणून कोणता मुहूर्त चांगला आहे ? नवीन दुकान उघडण्यासाठी ? मी तर दोन मिनिटे तिच्याकडे आ वासूनच पहिले .तिला म्हणाले, आपल्या सारख्या सुशिक्षित लोकांना या सर्वांची का गरज पडावी ? का बर आपण अंगठीचा आसरा घ्यावा ? मुहूर्त शोधून नवीन दुकान का बरे सुरु करावे ,” उत्तर होते आजच्या ,जमाण्याची क्रेज आहे ही “.फेशन असो व क्रेज हे चुकीचे नाही का ? ‘अंध्श्रेधेला क्रेझ  हे गोंडस नाव ‘दिलय या सुशीक्षितानी .मखमली कपड्यात गुंडाळून तिला गोंजारून ठेवले आहे .फेशन म्हणून नामकरण करून अंधश्रद्धेला चांगले सांभाळले आहे .आपण ग्रामीण भागातील लोकांना नावे ठेवतो की ते गावंढळ,अशिक्षित मग आपण सुशिक्षित असून तसे का बरे वागावे ? हीच का आपली सुशिक्षितपाणाची  ओळख .मी तिला समजविण्याचा प्रयत्न केला पण तिच्या डोक्यावर  अंधश्रद्धेचा पडदा पडला होता .त्यामुळे तिला समजावणे कठीणच ! एक वेळ झोपलेल्याला उठवता येईल पण झोपेचे नाटक करणाऱ्या ला कसे उठवणार ? असो ,मी माझे कर्तव्य केल त्याची त्याची इच्छा .माझी इच्छा तर फार होती की तिने ज्योतिष्याकडे न जाता स्व्कृत्त्वावर  विश्वास ठेवावा .

त्या दिवशी  आम्ही आदिवासी  पाड्यातील लोकांना समजवण्यासाठी प्रयत्न केले .ते आदिवसी लोक समजले ही असतील पण शहरातील या सुशिक्षितांना कोण समजवणार ? आपण असे एक न  अनेक प्रकार करत असतो .अशीच कांही उदाहरणे देते .बाहेर निघताना दही खाणे .दही खाऊन लांबचा प्रवास का चांगला होतो ? आपल्या पूर्वजांनी काहीतरी कारण असेल म्हणून या प्रथा सुरु केल्या असतील मी नाही म्हणत नाही .पण त्या वेळची अशी काही तरी परिस्थिती  असेल दही खाणे त्या त्या वेळेनुसार .स्थितीनुसार आरोग्यासाठी चांगले असेल.त्या मागचे श्स्त्रीय कारण आपण समजून घेतले पहिजे.हा खरोखरच अभ्यासण्याचा विषय आहे .म्हणजे केवळ पूर्वजांनी तसे केले म्हणून आपणास करावे लागले का ? त्यांना तर  आपल्या जीवाची आहुतीच द्यावी लागली .अशी एक न अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपले आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनासाठी  वेचले .

निसर्गाने आपणास  एक सुंदर असा ठेवा दिला आहे , “हे आयुष्य सुंदर आहे ,अधिक सुंदर बनूया “आणि आपल्या भारताला  अंधश्रद्धेच्या विळख्यातून मुक्त करूया .   



राधा शिंदे
कुमुद विद्या मंदिर .नेरूळ ,नवी मुंबई -७०६


   
 

हाळी म्हणताच हंडरगुळी लगेच पाठोपाठ थोंडात उच्चार येतो.

.हाळी-हांडरगुळी जनावराचा जंगी  बाज़ार : २०/११/2017


 तालुका  उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध  स्थळ .इथे तीन दिवस बैल -बाज़ार आसतो ,शनिवार ,रविवार आणि सोमवार ,मग या एकबार भेंट दया !

जनावराचा जंगी बाज़ार हाळी ,हेच माँझे गाँव ....इथे जनावरांना पाणी विकून आम्ही उदर-निर्वाह केला ,आणि आई -वडिलांनी लोकांच्या शेतात्तील गवत विकन आपल्या चुली पेटवल्या .....हे सत्य विदारक

काल  मी fb वर  दोन फोटो आणि एक वेदिओ उपलोड केला आणि मित्र मंडळीने खूप प्रतिसाद दिला ...आणि मला त्या दिवसाच्या आठवणी दाटून आल्या आली मला रडू आवरेना

कारण १९७२ च्या ओल्या दुष्काळातील त्या भय विदारक गोष्टी मी आज इथे लिहणार आहे .जेष्ठ पत्रकार संजीवकुमार भगत ,जेष्ठ शिक्षक सत्यवान माने सर आणि आदरणीय दासू भगत सर यांच्या उत्साहामुळे मी मोडक्या शब्दात थोड या बाजारा विषयी लिहणार आहे .

हाळी म्हणताच लगेच हंडरगुळी लगेच पाठोपाठ थोंडात उच्चार येतो .या गावातून फक्त एक नांदेड -बिदर हा रस्ता जातो .त्यामुळे गाव विभागणी झाली आहे .तसे गाव एकच  …

लहान असताना आई म्हणायची तुला उद्या  हांडरगुळीला दळण दलायला जायचं आहे ...
हाळी हे नदी किनारी आहे .तसेच हंडरगुळी पण देखावा एकाच गावचा कारण पिठाची चक्की आमच्या गावात न्हवती ?

आपण फक्त बाजार विषयी बघू ….पूर्वी आमच्या काळी बाजार हाळीत भरत ( बसत ) असे ,पण जागे अभावी तो हंडरगुळी ला गेला ,आणि आज तागायत तिथेच आहे .खूप मोठ्या प्रमाणात महसूल हंडरगुळीच्या ग्राम पंचायतला मिळतो ,हाळी आपली कोरडीच ..
सन १९७० ( अंदाजे ) दोन्ही गावात या बाजारा वरून खूप मारामारी झाल्या आहेत याची सरकारी कचेरीत नोद आहे बरीच लोक त्या काळात जखमी झाली होती तेव्हा  मी लहान होतो .

हाळी च्या आसपास एकूण बारा वाड्यांचा आणि लमाण तांडा चा पसारा आहे या गावातील आणि वाड्यातील बैल विक्री साठी येत असतात .जरी बाजार एक दिवासचा असला तरी तसा याचा आवाका खूप मोठा आहे.हा बाजार  चार दिवस असतो . मुख्य बाजार रविवारी असतो पण पण बैल शुक्रवारी राती येऊन आपल्या  जागा कायम करतात कारण आवाका एवढा मोठा की मुख्य ठिकाणी जागे साठी बैल दावणीला बांधावे लागतात , बैल खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि बाजाराचे मैदान, जागा कमी पडते .शनिवारी त्याची पूर्ण तयारी होते ,हजारो दावणी पडतात .शनिवारी त्या बैलाच्या माश्यागती कराव्या लागतात ,शिंग तासने ,बैल भादारणे ,खुर साळने ,बैल चका -चक धुऊन उभे करावे लागतात ,यात चारा पाण्याची व्यास्वस्था करावी लागते .यात स्थानिक लोक चार दिवस आपला रोजगार मिळवतात ,कोनि पाणी पाजण्याचे मजुरी करते ,कोणी गावात चारा विकतात ,कोणी बैल धुत्तात तर कोणी शिंग तासण्याचे  काम करतात .या बाजारात जो सर्वात महत्वाचा घटक म्हणजेदलालहे दलाल  एका दिवसात खूप माला -माल होतात ,खोट्या बतावणी करून बैल विकत असतात

मलक हा बैल घा हो असा बैल तुम्हाला अख्या बाजारात मिळणार नाही ,या रोटीची शपथ ( दलालाच्या खांद्यावर एक सोगा असतो त्यात ते आपली फाटकी चप्पल ठेवतात आणि म्हणतातया रोटीची शपथ ...आणि मालक पटतो

माझा चुलता ( काका ) सिंगे तासणी चे म्हणजे सोलण्याचे  काम करीत असे ….”मालक सिंग तासायचे का सिंगअसा बाजारात आवाज काढीत  प्रत्येक दावणीत  फिरत असे ….आणि त्याला बर्या पैकी पैका मिळत असे

मी स्वतः नदीवरून घागरिने पाणी वाहून  घेऊन जाऊन पाणी विकले आहे ,तेंव्हा रुपये १०/- ला घागर विकत असे ,पण सोबत मीठ आणि एक छोटे  घंगाले ( गोल तबकडी चे पसरत भांडे  ) ठेवावे लागते ,कारण बैल मालक  पाणी पाजण्या अगोदर विचारतो की ए पोरा मीठ आहे का र ? हो मलक म्हणून पाणी विकावे लागते ,तेंव्हा खडा मीठ खूप स्वस्थ मिळत असे
एक प्रंसग सांगतो ,मी पाणी तर पाजले त्यात मीठ पण टाकले पण बैल काही पाणी पीत नाही ,तेंव्हा बैलाचा मालक माझ्यावर ओरडला ,...ए पोर्रा पाणी चांगल आहे ,मीठ पण आहे ,आर पीठ कुठ आहे ,माझे बैल पीठा शिवाय पाणी पीत नाहीत ….आणि खरेच त्या मालकाने मला पैसे दिले नाहीत ... कारण बैलाने पाणी पिले नाहीच .

अशी खूप कामे बाजारात करून आपल्या घर परिवाराचा कमवता हिस्सा झालो होतो .या पैश्याचं लोभ कमी होत नहव्ते म्हणून  शनिवारी आणि सोमवारि  शाळेला गुल्टी ,या काष्ठाच्या आणि मेहनतीच्या कमाई सोबत मज्जा पण खूप केली आणि बघायला पण  मिळाली
म्हणून परत गावी जावे वाटते ? पण ते दिवस आज राहिले आहेत का ? बैल ही नाहीत ,चारा  ही नाही आणि पाणी ही नाही ,आमची तेरु नदी आज ओसाड झाली आहे .ज्या नदीत आखा शनिवार भिजून काढला खूप पोहलो खूप उदंड होतो मी

याच नदीच्या पुलावरून आमच्या अशोक शिंदे काका ने पैज लाऊन पुलावरून पाण्यात उडी घेतली होती ,त्या नन्तर राजकुमार आणि माझा नंबर होता उडी मारायचा ?
पण एक भय झाले जसा अशोक वर उडी मारून उसळी घेऊन पाण्याबाहेर आला तेंव्हा एका विहारीच्या आकाराचे तांबड्या रंगाचे  वर्तुळ पाण्यावर तरंगले म्हणजे ,त्याच्या पायात पाण्यातील  दगडाची चीप लागून टाचा चिरल्या होत्या म्हणून रक्त बाहेर आले आणी हे  बघून आम्ही दोघे  पाण्यात उड्या  न मारता खली नदीत पळत सुटलो ,वाटले आता अशोक चे डोके फुटले आणि अशोक मेला ….असे अनेक प्रसंग 

माझे पुलावरून उडी मारण्याचे सवप्न कायमचे राहून गेले

हाळी हे छोटंस गाव तालुका  उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध  स्थळ .इथे तीन दिवस बैल -बाज़ार असतो ,शनिवार ,रविवार आणि सोमवार  !

( Halli is one of the biggest village in Udgir Taluka.population Near about ten thousands. Cattle Bazar is famous in Maharashtra , Karnataka, Andhra and Madhya Pradesh. It is situated on SH 217 equi distance i.e. 95 KM. Hallis Just besides Handergulli village which Famous for Hemadpanthi Mahadev Mandir which has been built in 12th century…... By Google Currency )

या गावाच्या नावातच जादू आहे ,संपूर्ण बालपण बाजारात गेल्यामुळे काहीना काही रोज आठवणी मनात येत असतात .आज एक  घटना इथे लिहित आहे .

वर्ष १९८० च्या दर्मान चा किस्सा आहे .तसे आम्ही सगळे पोर उनाड होतो.शनिवारी कधीच शाळेत गेलो नाही . दर शनिवारी काही न काही उचापती चालू आसे .रानात जाने ,नदीला पोहायला जाने आदी .आम्ही पाच जन मित्र ,अशोक ,बबन, किसन,राजकुमार,संजू  आणि मी .

हाळी हे हे तेरु नदीच्या काठी वसलेले आहे .तेरु नदी दक्षिण ते उत्तर वाहते .तेरु नदी त्या काळी दुथडी वाहत असे .पाउस आला कि ती रुद्ररूप धारण करीत असे .आम्ही नदीचा पूर ओसरून गेला कि सगळे पोर शनिवारी शाळेला दांडी मारून खूप खूप वेळ पोहत असू

एके दिवशी आम्ही डोहात पोहत असताना काही बायका नदीवर धुणे धुवत होत्या ,त्यात आमच्या वर्गातील मुली पण त्यांच्या घरातील बायका सोबत कपडे धुण्यासाठी नदीला आल्या होत्या .

त्यांना बघून आम्ही एक शर्यत लावली .ती म्हणजे तिरू पुलावरून उड्या मारण्याची .आणि आम्ही कांही हि विचार न करता ,बघता -बघता तिरू पुलावर वानरा सारखे उभे राहिलो ,पूल महा उंच चार माजली इमारत मावेल एवढा उंच .पण आम्ही कोणीहि घाबरलो नाही असे दाखवत होतो .कारण सगळ्या बायका आमच्या कडे टक लाऊन बघत होत्या कि हि पोर पागल तर झाले नाहीत ? त्या  चिंतेत बघत होत्या ,आणि आम्ही त्यांच्या कडे बघत माकडा सारखे तिरू पुलाच्या काद्ठ्ड्यावर उभे होतो .आता सगळ्यात पहिली उडी कोणी मारायची ?

तेंव्हा अशोक म्हणाला ,मी सगळ्यात मोठा आहे ,माझा मान पहिला .आर सरका बाजूला बघताय काय मीच पहिली उडी मारतो .असे म्हणत क्षणाचा विलंब न करता अशोक ने पुलावरून डोहात झेप घेतली .सरकन वाऱ्या सारखा डोहात जाऊन बुडाला .लगेच माझा नंबर होता. पण सगळ्याची फाटली होती .आमची नजर खोल पाण्यावर गेली .बघता बघता पाण्यावर  एक तांबडे खळे तयार झाले .संपूर्ण लाल लाल रक्त वरून दिसत होते .आम्ही सर्व घाबरो आणि पळत असोक कडे सुटलो .वाटले अशोक चे डोके फुटले किंवा हात पाय नक्की मोडला .

आणि आमचा उडी चा प्रसंग टळला . अशोक लगेच पाण्याबाहेर आला .त्याच्या पायात पाण्यातील दगडाची धारदार चीप लागली होती आणि उजव्या पायाची टाच फाटून  सतत रक्त वाहत होते. ...बायका बघत होत्या आणि आम्ही दवाखान्याचा रस्ता धरला होता

माझे पुलावरून उडी मारण्याचे सवप्न कायमचे  राहून गेले .


लुटिबाची गोस्ट : बबन

लुटिबाची गोस्ट  २३/१२/२०१७

लुटीबा हा दुसरा तिसरा कोणी नसून बाशाच होय ,बाशा तसा थोडा उतावीळ होता ,सेक्स म्हणजे त्याला त्याची कांही जाणीव न्हवती  .बाजार म्हणले कि विविध प्रकारचे  खेळ आणि मनोरंजन आलेच .बासरी वाले ,पत्ते वाले , तमासे ,मुरली ,नाच काम आणि नाटक सिनेमा सुधा चालत असे . अश्या विविधतेने नटलेला हाळी  चा बाजार .

    दिवस रविवार ,वेळ संध्याकाळची होती ,दिवस एकदम झुकलेला  होता ,बाजारात  एका ठिकाणी डोंबार्याचा खेळ चालू होता ,दोरीवर दोम्बार्याची पोर वेगवेगळ्या  कसरती  करीत होती ,बाजारातील लोक आश्चर्य कारक तो जीव घेणा खेळ बघत होती ,त्या जागेवर आमची पण वर्णी लागली होती ,बाशा आमचा मोह्रक्या असल्या करणाने त्याने आम्हाला खेळ बघायला घेऊन गेला होता ,खेळ म्हंटला कि हौसे नवसे गवसे सगळे जमतात तसे आम्ही पण जमलो होतो ,हाळी हे ठिकाण बाजाराचे मुख्य केंद्र या गावा  भोवताली बारा वाड्या आहेत ,उदा .नाग्धर्वादी ,बोरगाव ,शेळगाव ,चिमाची वाडी ,मोरतल वाडी ,खरब वाडी ,आणि अश्या एकंदरीत मिळून बारा वाड्या ,या सर्व वाड्यातील लोक बाजार करण्यासाठी जिकिरीने हजेरी लावतात.खेळ चालालला होता आणि संध्याकाळ असल्या करणांने हा शेवटचा खेळ होता .गोल आकारात या खेळा भोवती मोठी तबकडी तयार झाली होती . एकंदरीत तीन रांगा लागल्या असतील ?

या तिनी रांगेत शेवटच्या रांगेत बाशा मात्र आपला एकटाच तंद्रीत होता.एका खेडे गावातील बाईच्या नादात लागला होता .नऊ  वारी लुगड्यात घुसला होता ,आणि पठ्या ने आपला डाव साधला होता ,बाई असेल पस्तीस च्या वयात ,बाशा मागून लोटत होता ,बाई खुश होती ,लोक खेळ बघत होते आणि बाशा आपला मागून लोटत होता- ,बाशा आपला मागून लोटत होता ,बाशा चा खेळ जोरात चालू होता .आम्ही फक्त बघत होतो .आणि बघतच राहिलो ,आणि बाशा ने आपला खेळ संपवला होता.
आणि डोंबारी पण आपला शेवटचा खेळ करून गाशा गुंडाळत होते.आणि आपल्या सामानाची बांधा बांध करीत होते .तेंव्हा पासून आम्ही बाशाला लोटीबा असे म्हणूण चीडऊ  लागलो ,जेंव्हा -जेंव्हा डोंबार्याचा  खेळ बाजारात येई  ,किंवा तुकामायच्या  जत्रेत लागत असे तेंव्हा- तेंव्हा बाशा लोटीबाची गोष्ठ  मास्थ मसाला लाऊन सांगत असे ….आणि बाशा बेहोश होत असे ,आम्ही मात्र त्या गोष्टीचा मस्त आनद घेत असू .



बाशा

बाशा २३/१२/२०१७
बाशा एक उदंड पोर ,पांच भावंडा पैकी एक अजब मिश्रण ,बाजारात याचा राबता खूप .लग्न होणे बाकी होते .एकदा संध्याकाळी थोडी गावठी टाकून थेट माझी आजी फुला माय कडे घरी आला आणि म्हणाला ,थोरली माय मला तुझ्याशी काही बोलायचे आहे .माझे आज या जगात कोणी हि नाही .बाप गाव सोडून गेला आणि साळू माय तर कधीच मला सोडून गेली .आता तूच माझी आई आणि माय .
तोरल्या मायने लगेच हाक दिली ,बबन तुला काय म्हणचे आहे ते सरळ सांग ,आणि आज परत पिऊन आला आहेस ?

थोरल्या माय मला लगीन करायचे आहे .हे एकूण थोरली माय एकदम थंडगार पडली काही बोलण्या अगोदर लगेच बबन म्हणाला ,माझ्या वायातीन आपल्या मांन्गुड्यातील सगळ्याचे लग्न झाले ,आणि मी गाढव एकटाच मागे पडलो आहे ,कोणी मला पुसत देखील नाही ..आणि बाशा रडत होता  एखद्या लहान मुलासारखा  ,सगळे मांग वाड्यातील पोर आम्ही बबन ला टोपण नावाने बोलत होतो बाशा म्हणून ,आणि बाशा या नावाने बबन बैल बाजारात प्रसिद्ध होता .

बबन सोबत आम्ही सकाळी पहाटे  चार वाजता शेतात जात असू , गवत चोरी हा बबन चा व्यवसाय .एकदम हात खंडा ,मी व्यंकट ,राजकुमार एके दिवशी माली पाटील यांच्या शेतात हल्ला बोल केला ,आणि सकाळी सात च्या आत बाजारात गवत विकायला तयार .त्या दिवशी आम्ही सगळ्याने मिळून एकूण दहा -दहा रुपय चे गवत विकले असेल .हे गवत चोरी करून विकावे लागत असे .कारण आम्ही मांगाची पोर भूमिहीन शेत्मुजारांची पोर ,आमच्याकडे एकच पर्याय होता चोरी ,कारण आम्हा मांग समाजाचा पोटा पाण्या साठी चोरी करून उदर निर्वाह करणे हाच पर्याय आमच्या हातात होता .बबन आमच्या सगळ्यात पोरात  वयाने मोठा असल्यामुळे आमचा बबन दा होता ,आणि सगळ्याचा बाशा .

मला आज अंधुकस आठवत आहे कि ,त्याच वर्षी बबन दादाचे लग्न झाले होते वर्ष होत सन एकोणी से ऐशी .


जनावराचा जंगी बाज़ार हाळी ,हेच माझे गाव ....

हाळी हे छोटंस गाव .जरी छोट असल तरी जनावराच्या बाजारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात देवणी बैल बाजारानंतर याच गावचा नंबर लागतो .हाळी  तालुका  उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध  स्थळ .इथे तीन दिवस बैल -बाज़ार आसतो ,शनिवार ,रविवार आणि सोमवार ,या तीन दिवसात आपले बैल विकणे आणि खरेदी करणे या साठी खूप मोठ्या प्रमाणात उठाठेव चालू असते आणि ते शुक्रवारी रात्री पासून जे सुरुवात होते ती बाजार ओसंडण्यासाठी सोमवार ची संध्याकाळ होऊन जाते . मग या एकबार भेंट दया ! आमच्या हाळी -हांडरगुली च्या twon ला भेट द्यायला ...

जनावराचा जंगी बाज़ार हाळी ,हेच माझे  गाव ....इथे जनावरांना नदीतून पाणी डोक्यावर वाहून बाजारात  विकून आम्ही उदर-निर्वाह केला ,आणि आई -वडिलांनी लोकांच्या शेतात्तील गवत विकन आपल्या चुली पेटवल्या .....हे सत्य विदारक आजून रुह्दायात कायम आहे .म्हणून बाजाराचे कुतूहल अजून मनातून जात नाही .१९७२ च्या ओल्या दुष्काळात जे आम्ही गरिबी आणि भूक मारीचे दिवस सुगडी खाऊन ,अमेरिकेहून आलेल्या काटीजावा ,मिलो ज्वारी आणि तत्स्सम प्रकारचे आणि निकृष्ट दर्ज्याचे धान्य खाऊन जगलो .याच भयानक भूक -बळी मुळे शाळेला दांडी मारून आठवड्यातून तीन दोन दिवस शाळेत न जातं बाजारात मिळेल ते काम करीत राहिलो आणि घर प्रपंचासाठी हातभार लावला .म्हणून घरात चूल पेटत होती .आई -वडील अशिक्षित ,भूमिहीन शेतमजूर ,शेतात हाहाकार माज्ल्यामुळे पिके आडवी पद्लेलेली ,शेतात काम नाही मग मजुरी कुठे करणांर ?
काही काळ निघून गेल्यावर बाजाराला चांगले दिवस आले .शेतात चारा पाणी मिळू लागला आणि बैल बाजार चा मोसम सुरु झाला .
आठवडी बाजार असल्यामुळे शनिवार ,रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवसी काम मिळत आसे .शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असल्यामुळे माय म्हणायची चाल आज अर्ध्या दिवसाची तर शाळा असते ,माझ्यासोबत वावरत काम करायला ...म्हणून माय सोबत मी पण शेतात कामाला जात असे .

तसे पहिले तर बाजार आला की या दोन्ही गावाला सुगीचे दिवस येतात ,कारण या तीन दिवसात वेगवेगळी कामे मिळतात आणि बर्या पैकी दाम पण मिळतो .मग बैलाची सिंगे तासने ,बैल भादरणे,खुरे साळने ही कामे .बैलाला पाणी पाजणे ,चारा देणे आणि एकंदरीत बैलाची निगा राखावी लागते ,माशागत करावी लागते तेव्हा मागेल त्या किमतीला बैल विकला जातो ,म्हणून मालक से सगळे करण्यासाठी त्यावर पैसा खर्च करीत असतो .
दोरखंड विक्रीचा धंदा तेजीत असतो ,हाळी गावात मोठ्या प्रमाणात दोखंड बनवानायचा उद्योग चालत असे ,सर्व बायका हातावर दोर्या ओळून सुंदर दोरखंड तयार करून बाजारात विकत होत्या .आमच्या मांग वाड्यातील भगवान मास्तर यांचा दोरखंड बनवण्याचा मोठा हात -कारखाना होता .ते पाच ते दहा बायका पोरांना धंदा देत होते ,म्हणून त्यांना सावकार म्हणत असू ,आणि मास्तर या साठी की त्यांचा बंडबाजा बाजा चा जोरात इलाका होता म्हणून त्यांना भगवान मास्तर पण म्हणत असू .

काल  मी fb वर  दोन फोटो आणि एक वेदिओ उपलोड केला आणि मित्र मंडळीने खूप प्रतिसाद दिला ...आणि मला त्या दिवसाच्या आठवणी दाटून आल्या आली मला रडू आवरेना

कारण १९७२ च्या ओल्या दुष्काळातील त्या भय विदारक गोष्टी मी आज इथे लिहणार आहे .जेष्ठ पत्रकार संजीवकुमार भगत ,जेष्ठ शिक्षक सत्यवान माने सर आणि आदरणीय दासू भगत सर यांच्या उत्साहामुळे मी मोडक्या शब्दात थोड या बाजारा विषयी लिहणार आहे .

हाळी म्हणताच लगेच हंडरगुळी लगेच पाठोपाठ थोंडात उच्चार येतो .या गावातून फक्त एक नांदेड -बिदर हा रस्ता जातो .त्यामुळे गाव विभागणी झाली आहे .तसे गाव एकच  …

लहान असताना आई म्हणायची तुला उद्या  हंडरगुळीला दळण दलायला जायचं आहे ...
हाळी हे नदी किनारी आहे .तसेच हंडरगुळी पण देखावा एकाच गावचा कारण पिठाची चक्की आमच्या गावात न्हवती ?

आपण फक्त बाजार विषयी बघू ….पूर्वी आमच्या काळी बाजार हाळीत भरत ( बसत ) असे ,पण जागे अभावी तो हंडरगुळी ला गेला ,आणि आज तागायत तिथेच आहे .खूप मोठ्या प्रमाणात महसूल हंडरगुळीच्या ग्राम पंचायतला मिळतो ,हाळी आपली कोरडीच ..
सन १९७० ( अंदाजे ) दोन्ही गावात या बाजारा वरून खूप मारामारी झाल्या आहेत याची सरकारी कचेरीत नोद आहे बरीच लोक त्या काळात जखमी झाली होती तेव्हा  मी लहान होतो .

हाळी च्या आसपास एकूण बारा वाड्यांचा आणि लमाण तांडा चा पसारा आहे या गावातील आणि वाड्यातील बैल विक्री साठी येत असतात .जरी बाजार एक दिवासचा असला तरी तसा याचा आवाका खूप मोठा आहे.हा बाजार  चार दिवस असतो . मुख्य बाजार रविवारी असतो पण पण बैल शुक्रवारी राती येऊन आपल्या  जागा कायम करतात कारण आवाका एवढा मोठा की मुख्य ठिकाणी जागे साठी बैल दावणीला बांधावे लागतात , बैल खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि बाजाराचे मैदान, जागा कमी पडते .शनिवारी त्याची पूर्ण तयारी होते ,हजारो दावणी पडतात .शनिवारी त्या बैलाच्या माश्यागती कराव्या लागतात ,शिंग तासने ,बैल भादारणे ,खुर साळने ,बैल चका -चक धुऊन उभे करावे लागतात ,यात चारा पाण्याची व्यास्वस्था करावी लागते .यात स्थानिक लोक चार दिवस आपला रोजगार मिळवतात ,कोनि पाणी पाजण्याचे मजुरी करते ,कोणी गावात चारा विकतात ,कोणी बैल धुत्तात तर कोणी शिंग तासण्याचे  काम करतात .या बाजारात जो सर्वात महत्वाचा घटक म्हणजेदलालहे दलाल  एका दिवसात खूप माला -माल होतात ,खोट्या बतावणी करून बैल विकत असतात

मलक हा बैल घा हो असा बैल तुम्हाला अख्या बाजारात मिळणार नाही ,या रोटीची शपथ ( दलालाच्या खांद्यावर एक सोगा असतो त्यात ते आपली फाटकी चप्पल ठेवतात आणि म्हणतातया रोटीची शपथ ...आणि मालक पटतो

माझा चुलता ( काका ) सिंगे तासणी चे म्हणजे सोलण्याचे  काम करीत असे ….”मालक सिंग तासायचे का सिंगअसा बाजारात आवाज काढीत  प्रत्येक दावणीत  फिरत असे ….आणि त्याला बर्या पैकी पैका मिळत असे

मी स्वतः नदीवरून घागरिने पाणी वाहून  घेऊन जाऊन पाणी विकले आहे ,तेंव्हा रुपये १०/- ला घागर विकत असे ,पण सोबत मीठ आणि एक छोटे  घंगाले ( गोल तबकडी चे पसरत भांडे  ) ठेवावे लागते ,कारण बैल मालक  पाणी पाजण्या अगोदर विचारतो की ए पोरा मीठ आहे का र ? हो मलक म्हणून पाणी विकावे लागते ,तेंव्हा खडा मीठ खूप स्वस्थ मिळत असे
एक प्रंसग सांगतो ,मी पाणी तर पाजले त्यात मीठ पण टाकले पण बैल काही पाणी पीत नाही ,तेंव्हा बैलाचा मालक माझ्यावर ओरडला ,...ए पोर्रा पाणी चांगल आहे ,मीठ पण आहे ,आर पीठ कुठ आहे ,माझे बैल पीठा शिवाय पाणी पीत नाहीत ….आणि खरेच त्या मालकाने मला पैसे दिले नाहीत ... कारण बैलाने पाणी पिले नाहीच .

अशी खूप कामे बाजारात करून आपल्या घर परिवाराचा कमवता हिस्सा झालो होतो .या पैश्याचं लोभ कमी होत नहव्ते म्हणून  शनिवारी आणि सोमवारि  शाळेला गुल्टी ,या काष्ठाच्या आणि मेहनतीच्या कमाई सोबत मज्जा पण खूप केली आणि बघायला पण  मिळाली
म्हणून परत गावी जावे वाटते ? पण ते दिवस आज राहिले आहेत का ? बैल ही नाहीत ,चारा  ही नाही आणि पाणी ही नाही ,आमची तेरु नदी आज ओसाड झाली आहे .ज्या नदीत आखा शनिवार भिजून काढला खूप पोहलो खूप उदंड होतो मी

याच नदीच्या पुलावरून आमच्या अशोक शिंदे काका ने पैज लाऊन पुलावरून पाण्यात उडी घेतली होती ,त्या नन्तर राजकुमार आणि माझा नंबर होता उडी मारायचा ?
पण एक भय झाले जसा अशोक वर उडी मारून उसळी घेऊन पाण्याबाहेर आला तेंव्हा एका विहारीच्या आकाराचे तांबड्या रंगाचे  वर्तुळ पाण्यावर तरंगले म्हणजे ,त्याच्या पायात पाण्यातील  दगडाची चीप लागून टाचा चिरल्या होत्या म्हणून रक्त बाहेर आले आणी हे  बघून आम्ही दोघे  पाण्यात उड्या  न मारता खली नदीत पळत सुटलो ,वाटले आता अशोक चे डोके फुटले आणि अशोक मेला ….असे अनेक प्रसंग


#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...