This blog is for Socially poor ,for uplifting their human values in day today Pure life.Like Buddhism originates in the teachings of Shakyamuni (Gautama Siddhartha), who was born in what is now Nepal some 2,500 years ago.He became increasingly possessed by a longing to abandon the secular world and go out in search of a solution to the inherent sufferings of life.And he gave Triratn ,Four Nobel truth ,Panchshil ,Ashtangik way and ten Parmi .for peace of Globe.
Sunday, September 26, 2021
लग्न गावचे
Friday, August 27, 2021
मूरख साधू !
किसी गाँव में दो साधू रहते थे. वे दिन भर भीख मांगते और मंदिर में पूजा करते थे। एक दिन गाँव में आंधी आ गयी और बहुत जोरों की बारिश होने लगी; दोनों साधू गाँव की सीमा से लगी एक झोपडी में निवास करते थे, शाम को जब दोनों वापस पहुंचे तो देखा कि आंधी-तूफ़ान के कारण उनकी आधी झोपडी टूट गई है। यह देखकर पहला साधू क्रोधित हो उठता है और बुदबुदाने लगता है ,” भगवान तू मेरे साथ हमेशा ही गलत करता है…
में दिन भर तेरा नाम लेता हूँ , मंदिर में तेरी पूजा करता हूँ फिर भी तूने मेरी झोपडी तोड़ दी… गाँव में चोर – लुटेरे झूठे लोगो के तो मकानों को कुछ नहीं हुआ , बिचारे हम साधुओं की झोपडी ही तूने तोड़ दी ये तेरा ही काम है …हम तेरा नाम जपते हैं पर तू हमसे प्रेम नहीं करता….”
तभी दूसरा साधू आता है और झोपडी को देखकर खुश हो जाता है नाचने लगता है और कहता है भगवान् आज विश्वास हो गया तू हमसे कितना प्रेम करता है ये हमारी आधी झोपडी तूने ही बचाई होगी वर्ना इतनी तेज आंधी – तूफ़ान में तो पूरी झोपडी ही उड़ जाती ये तेरी ही कृपा है कि अभी भी हमारे पास सर ढंकने को जगह है…. निश्चित ही ये मेरी पूजा का फल है , कल से मैं तेरी और पूजा करूँगा , मेरा तुझपर विश्वास अब और भी बढ़ गया है… तेरी जय हो !
मित्रों एक ही घटना को एक ही जैसे दो लोगों ने कितने अलग-अलग ढंग से देखा … हमारी सोच हमारा भविष्य तय करती है , हमारी दुनिया तभी बदलेगी जब हमारी सोच बदलेगी। यदि हमारी सोच पहले वाले साधू की तरह होगी तो हमें हर चीज में कमी ही नजर आएगी और अगर दूसरे साधू की तरह होगी तो हमे हर चीज में अच्छाई दिखेगी ….अतः हमें दूसरे साधू की तरह विकट से विकट परिस्थिति में भी अपनी सोच सकारात्मक बनाये रखनी चाहिए।
अंधभक्त को कोई निसर्ग की जानकारी नहीं होती है । वे हर बात को भगवान -भगवान करते है । अब इनको भिक मांगकर खाने की आदत जो लगी है वे उसी चंगुल मे मस्त है । और भगवान जो दिखाई नहीं देता है उसे ही सब मानकर उसे के ऊपर निर्भर रहते है । जब आँधी हवा तेज चली तो उसे कौन दानव मानव पता नहीं होता है वे तो सभी को दबोच लेता है ।
उसपर भक्ति करो या न करो न तुम्हें वह देखता है ना तुम्हें जनता है । तुम्हें मेहनत करकर धन कमकर आपने घर को कुशीहाल करना है । जैसे आज के साधू कम ढोंगी जादा होते है ।
आपने इस कथा मे दो ठग देखे है वे कहते है की , गाँव में चोर – लुटेरे झूठे लोगो के तो मकानों को कुछ नहीं हुआ , बिचारे हम साधुओं की झोपडी ही तूने तोड़ दी ये तेरा ही काम है …हम तेरा नाम जपते हैं पर तू हमसे प्रेम नहीं करता….”
अभी विज्ञान से देखे इनकी झोपड़ी कूड़ेदान से बनी है ,दूसरे चोर झुटे लोगोंकी झोपड़ी नहीं है उनके पक्के ईटा और सीमेंट के घर है ,वे भला कैसे टूट जायेंगे ?
इस तरह के कथाओंसे हमे सच्चाई के रास्ते न मिलते है न ढूंढ पाते है । तो येशी कथा से दूर रहे सच की रह पर रहे ।
मिनांडर
Wednesday, August 18, 2021
Malala and Swat Valley , Afghanistan
Thursday, August 12, 2021
बुद्ध विहार
Friday, August 6, 2021
स्वचित्त बोध
स्वचीत्त बोध /बालाजी
शिंदे ,नेरूळ -७०६
दूरध्वनी क्र.9702 158 564
सोमवार २३
,मार्च २०२० /२८ मार्च २०२०
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वचीत्त बोध
चित्त म्हणताच
‘मन’ हे डोळ्यासमोर येणे सहज आहे .मनाच्या शांतीसाठी गौतमी पुत्र भगवान शाक्यमुनी
सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपले आयुष्य खर्चून जगाला मनाचा शोध लाऊन दिला .
स्वतःला जगणे
किती आवश्यक्य आहे हा संदेश त्यांनी संपूर्ण जगाला दिला आहे. सुखी आणि यशस्वी जीवन
जगण्यासाठी स्वतःला जगणे अगदी आवश्यक्य आहे .घरात ,मित्र -लोकात आणि समाजात जगणे आणि उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठी
स्वतःला जगणे आवश्यक्य आहे.उत्तम रीतीने जगण्याचा मंत्र बुद्धाने जगाला देऊन गेला
आहे.
अध्यात्मिक प्रगतीतून आपल्या मनावर कार्य करण्याचे आपण शिकत असतो .यात मनाचा कार्यभार खूप महत्वाचा
आहे.आपल्या मनावर काय कार्य करायचे आणि कसे कार्याचे हे मनामुळेच समजू शकतो .प्रश
असा निर्माण होतो कि, स्वतःला जाणणे म्हणजे काय ? स्वतःला जाणणे म्हणजे शरीराचा
आकार किंवा उंची किंवा रंग नसून स्वतःची वास्तविक माहिती असणे म्हणजे हि स्वतःची
जाण न्हवे ? स्वचीत्त बोध म्हणजे स्वताचे ‘मन’ जाणणे हे होय .
पण मन जाणणे ,चित्त बोध करून घेणे हे अवघड काम आहे .आपले मन
आपण इतरांना दाखूऊ शकत नाही आणि मन प्रकट पण करून दाखऊ शकत नाही.कारण मन हि वस्तू
नाही .ती निराकार आणि असीम अशी आहे .पण आपणास निरीक्षण करणारे ते मन आहे , मात्र
त्याचे निरीक्षर करता हि येत नाही . त्यास ‘स्वचित्त बोध’ असे म्हणणे वावगे होणार
नाही ,याची व्याप्ती खूप आघाड आणि असीमित आहे ते विशद हि करता येत नाही .
‘स्वचित्त बोध’
हि एक निरंतर आणि वेगळी बाब आहे .यालाच चिन्तन असे म्हणता येईल .दुसऱ्या भाषेत
सांगायचे झाले तर आंतरिक,किंवा स्वतःवरील स्वताचे आंतरिक चिंतन असे म्हणू .किंवा
मनातील सातत्याने बदलाचे चिंतन असे हि म्हणता येईल .मन हे अनात्मिक आहे ते सातत्य
असून निश्चित प्रहावीत नाही.मनाच्या कप्यात बदलाचे हेलकावे आणि बारकावे सतत चालत असतात
(Mind is continues and
changeable process in rational animal like human being ) म्हणून माणसाने सतत स्वताच्या मनाचे निरीक्षण (continues observation of own Mind) करावे .
मनाला सतत प्रश विचारात राहावे ,यात मन सुखी कि दुखी ,कुशल
कि अकुशल किंवा माझी अवस्था धाम्म्कुल आहे का ?या हि पलीकडे जाऊन माणूस
मनोवास्थेचा शोध करू शकतो किंवा घेऊ शकतो .मनोधर्माचा शोध म्हणजे धम्म विषयक
अंगाचा शोध होय .मनोधार्माचा शोध घेत घेत त्याचे मर्म जानने हे होय.मन हे कांही
भाजी पाला नसून लवकर टोपलीत येण्याची बाब नाही .म्हणजेच विकात घेण्याची बाब हि
नाही .याच मानला प्रश विचारत दूरवर घेऊन गेले कि तिथे एक अशी अवस्था येते कि ,त्याचा
परिपाक विपस्सनेमध्ये होतो.
सुरुवातीला आपल्या मनात काय चालले आहे ते कळत असताना आपण
सुखी का दुखी हे ठरवत असतो .एक वेळ अशी येते कि हीच अस्वस्था जवळून पाहण्याची संधी
प्राप्त होते.पण या अनुभवास आपण नाव देऊ शकत नाही ,जसे जसे मनाचे कोडे उलगडत जाते
तसे तसे मन आणि मनातील अनुभव सखोल होत जातो .
जेंव्हा खरे
स्वरूप कळण्यास सुरुवात होते तेंव्हा मनामध्ये निर्माण होणारे स्वरूप अनित्य आणि
बदलाव घडउन आणणरे आहे हे आपण स्वतः अनुभवतो .आणि त्याची प्रचीती आपणास येण्यास
सुरुवात होते .
आता आपली
स्तिथी अशी येत कि मनातील एकण -एक बाब शून्य आहे असे जाणवते .हि स्तिथी
प्रतीत्यसमुत्पादानुसार निर्माण होत आहे हे लक्षात येते ,मग मन हे एक वास्तविक आहे
हे जाणतो तेंव्हा आपण धर्म्विविचय किंवा विपास्सनामय होतो .खर्या अर्थाने इथे तीपिटकातील
अभिधम्म (तसे पाहता थेरवादातील सुत्तपिटक
आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत, या दोन
ग्रंथात फरक इतकाच आहे की,
अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस्तर, रुक्ष व पांडित्यपूर्ण
आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. अभिधम्मपिटकात
एकंदर सात ग्रंथ मोडतात.(अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे. ) मन अस्तित्वात येत
असल्याचा भास निर्माण होतो ,कारण अभिधाम्मात मनाचे संशोधन करता यावे म्हणून त्यात
चैत्यधम्माच्या याद्या करून दिलेल्या आहेत.
चैत्धर्म ..म्हणजे यात प्रत्येक चीत्तक्ष्णामध्ये विविध घटकांचा समावेश
झालेला असतो ,आपले मन बाह्य जगाशी कसे जोडलेले आहे हे चैत्य्धर्म दर्शवतात ,एवढेच नसून बाह्य मन आणि अंतर मन याचा कुठे संयोग होतो
का ते शोध चालू असतो.आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि त्याची मानत होणारी जाणीव हे
चैत्यधर्म होय.जाणीवेच्या नजरेतून पहिले तर बाह्य मन आणि अंतर मन हे वेगळे आहेत
याची जाणीव सतत होत असते.म्हणून चैत्यधर्म समजण्यासाठी ती जाणीव होणे हे गरजेचे
असते.
चैत्यधर्म पहा एका निर्देशकासारखा असतो , उंटावर
किंवा एखाद्या वाहनावर आरूढ होऊन आपल्या
साथीदारांना आदेश देत असतो ,पण स्वतः त्याचा त्यात हिस्सा नसतो. आदेश देणारा हा
चित्त तर एक एक सातीदार हा चैत्य्धर्म होय.जरी त्याचा त्यात सहभाग नसला तरी त्याचे
तिकडे लक्ष मात्र सतत असते.
चैत्ययादी मधील पाच धर्मातील एक
म्हणजे ‘स्पर्श’होय .मनात घडत असलेल विषय हे संपर्कात सामावलेले आहेत. विषयाला संपर्कात महत्वाचे
स्थान आहे ,मन आणि विषय यांचा संपर्क नसेल तर चित्त हि उपस्थित नसते .इद्रीयाशी
आलेला संपर्क आणि चित्त हा चित्तातील मुख्य विषय आहे .जिवंत इंद्रियात विषय
निर्माण होत असतात .म्हणून ते इंद्रिय सतत जिवंत असायला पाहिजे .उदा.आपण झोपलेले
आहोत आणि कोठून तरी आवाज कानी येतो ,पण तो कश्याचा आवाज आहे किंवा कोठून येतो ते
कळत नाही ,झोपेत असताना तो आवाज आणि त्याची जाणीव होणे,पण तिथे आपले चित्त उपस्तीत
नसते .तेंव्हा ते अनुभवावे लागते .यालाच लक्ष असे हि म्हणावे लागेल .इथे ऐकणे आणि
लक्ष द्या असतला भाग होतो .
आपण एकाद्या कुत्र्याचे उदा घेऊ रात्री च्या वेळी कुत्रा जमिनीवर लोळत पडलेला
असतो ,तो झोपेत नसतो पण कानी कांही आवाज आला कि एक कान वर उचलून मागमूस घेत असतो
आणि परत दोन्ही कान सरळ करून झोपी जातो तो त्या आवजाची किंवा वस्तूची खात्री करून
मगच झोपी जातो किंवा लोळत असतो .
अश्या प्रकारे आपले एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित होत नाही तोवर दुसरी तिसरी
वस्तू आपल्या लक्ष्यात येते ,आणि मनात सुखद ,असुखद वेदनांचा अनुभव सुरु होत असतो हाही चित्ताचा
मुख्य घटक आहे .मानवी वेदना या मानसिक
अनुभव आहेत ,त्या शरीराने अनुभवता येत नाहीत ,त्या मानाने अनुभवाव्या लागतात
.मनाच्या द्वारे मानसिक वेदना अनुभवता
येतात तर पंचइंद्रिया द्वारे शरीराच्या
वेदना अनुभवता येतात .सुखद आणि दुखद अश्या
दोन्ही वेदना आपण अनुभवत असतो .मानवात वेदना निर्माण करणारा सर्वात महत्वास चैत्यधर्म
आहे .
वेदनेतून मानवात जागृत भाव निर्माण होतो ,म्हणून वेदना हि सर्वात महतवाची
चेतना म्हणावी लागते .
भौतिकचक्रा नुसार पहिले तर आपल्याला हे लक्षात येईल कि जेंव्हा आपण एखाद्या
वेदनेला प्रतिकार देतो तीच आपली ‘तृष्णा ’ होय म्हणून बर्याच वेदना ह्या
प्रतेक्ष्यात शरीरीरात सुप्त अवस्तेथ असतात .म्हणून आपल्यात असलेली वेदना आपण
स्पस्ट पहिली पाहिजे .
चित्ताचा गुणधर्म ओळखण्याची संज्ञा
हि जाणून घेणे महत्वाचे आहे .एखादी गोष्ट जाणून घेण्यास आपण उत्सुकत असतो ,त्याचा
अनुभव घेतो आणि त्याकडे आपण लक्ष देतो ,त्यामुळे आपल्यात विशिष्ट अश्या प्राथमिक
वेदना निर्माण होतात ,पण त्या वेदना कश्याच्या आहेत ते आपणास पूर्णतः माहित नाहीत
,थोडक्यात इथे क्रमाने कार्य होत नाही .कारण कि वेदने पूर्वी ‘संज्ञा’ पण उत्पन्न
होऊ शकते ,किंवा उपस्थित असू शकते.त्या वेदनेचा गुणधर्म समजला कि एखाद्या गोष्टीचा
संबंध पुर्वानुबावाशी करीत असतो. नंतर ती वस्तू किंवा विषय आहे असे ठरवतो .एखाद्या
दूरवर ठिकाणी आपणास विशिष्ठ वस्तू असल्याचा भास होतो ,त्यास पूर्ण पाहिल्यावर आपण ठरवतो कि तो कावळा
आहे त्याचा रंग काळा आहे ,त्यास चोच आहे
आणि दोन पाय आहेत ,तो कावळा म्हणून जेंव्हा ओळखतो
तो त्याचा गुणधर्म म्हणून ओळखतो .कधी कधी एखादी वस्तू ओळखून खुश होतो ,पण
तो अनोळखी निघाली कि आपण जीभ तरी दाताखाली चावतो ,किंवा डोके खाजवतो आणि आपली चूक
काबुल करतो .यालाच आपण ‘संज्ञा’ असे म्हणतो. सभोवतालचे जग आपण नेहमी ओळखतो आणि
त्याचे वर्गीकरण करतो ,त्यास संज्ञा असे
म्हणतो. जशी आहे तशी ओळखणे हे होय ,आणि ती
आनित्य आणि दु:खमय आहे .
जेंव्हा आपली विषयानुरूप हालचाल असते तीच ‘चेतना’ होय .चित्त हे नेहमी नवीन-
नवीन हालचालीकडे धावत असते .ते कधी हि स्थिर नसते .नेहमी हालचाल करणारे चित्त हे
निश्चित दिशेने पुढे सरकत असते .’पाच चैत्य’ हे चित्ता चा पाया आहे .
एक स्पर्श ,दुसरा मनसकार,तिसरी संज्ञा ,चौथी वेदना आणि पाचवा आणि अति
महत्वाचा घटक चेतना या पाच बाबी कधी हि वेगळ्या करू शकत नाही ,त्या एकमेकात एकरूप
असून प्रतेकासोबत असतात.याच पाच गोष्ठी खऱ्या
ध्यानाचा पाया आहेत.
‘छंद’ उराशी बाळगून दृढ निश्चय केला
किंवा निर्धार केला कि त्या विषयात आपण
सातत्याने लक्ष केंद्रित केले कि आपला संकल्प पूर्ण होतो . बरीच लोक या पाच
गोष्टीचा मेळ घालत नाहीत म्हणून ते पूर्णत्वाला जात नाहीत .त्या साठी छंद असणे हे
मुळचे कारण होय .स्मृतीला एकत्र आणणे हे फक्त छंदा मार्फत करता येते. ध्यान करीत
असताना आपण कुठेतरी असतो ,म्हणजे छंद आहे पण कुठे तरी भटकत असतो याचा अर्थ असा कि
स्मृती नसते .स्मृती चा अर्थच असा आहे कि विखुरलेले घटक एकत्रित करणे होय .
आपल्या कडे छंद असेल ,आणि स्मृती पण
असेल ,तेंव्हाच आपण समाधी कडे जाऊ शकतो .आपल्याला पाहिजे तेथे मन एकाग्र ठेवणे
म्हणजे ‘समाधी’ होय .स्वसनाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणे ,मग समाधीतून आपण ‘प्रज्ञा’ कडे जातो .तसे पाहता
समाधीच प्रज्ञा कडे घेऊन जाते .मन एकाग्र होते आपण जाणतो आणि ओळखत असतो .थोडक्यात
आपणास खर्या स्वरुपाची माहिती होते .आपण ‘सत्य’ जाणतो ,कसलीच शंका उरत नाही
त्यालाच विपस्सना असे म्हणतात.
हि ‘साधना’ केवळ आणि केवळ बुद्धाना प्राप्त झाली होती...
सिद्धार्थ
वयाच्या सात वर्षापासून मनाच्या शोधात होता आणि त्यानेच एकट्याने मनाचा शोध लाऊन
बोध हि करून घेतला होता हे जगश्रुत आहे .
शनिवार २८,मार्च
२०२०
Monday, August 2, 2021
१०० स्मृतिशताब्दी: अण्णा भाऊ साठे .
Tuesday, July 20, 2021
सत्य का पक्षकार :बाबासाहेब अम्बेडकर
बुद्ध पंडुरंग :गौतम बुद्ध
बुद्ध पंडुरंगा
Sunday, July 18, 2021
कोम्रेड अण्णा भाऊ साठे
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मृति दिन !
----------- प्रा बा.र.शिंदे
तुकाराम भाऊराव उर्फअण्णाभाऊ साठे –त्यांचा १८ जुलै हा स्मरणदिन (मृत्यू १८ जुलै ,१९६९ ) त्यांना सलाम !
आज अण्णा आम्हाला सोडून गेले तो दिवस म्हणजे स्मृती दिवस .
संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम असो अण्णा सदैव स्मृतीत दिसतात . यांच्या यशात यांच्या आवेशपूर्ण पोवाड्यांची सन्मानपूर्वक वैश्विक नोंद झालेली आहे.
लौकिकार्थाने एक अशिक्षित माणूस ३२ कादंबऱ्या ,२२ कथा संग्रह,१० लोकनाट्य असंख्य पोवाडे लिहितो हे कश्याचे द्योतक आहे . आज मितील त्याचे साहित्य मराठीचा उंबरा ओलांडून सात समुद्र पार गेले आहे .एकूण २१ भाषेत जाते.
त्यात झेक ,पोलिश ,जर्मन ,फ्रेंच या भाषा असतात याचा ताळमेळ कसा लावायचा ? असंख्य साहित्य जंत्री कमावलेले व्यक्ती लेखक .
'फकिरा' चा प्रसंग बाका देता येईल ... जेंव्हा सरकारी स्टोर्स वर दरोडा घालायाल येतो. तेंव्हा तेथील व्यवस्थापक तेथील कर्मचारी महिलांना एका खोलीत बंद करून ठेवतो . त्यांची अब्रू लुटली जाऊ नये यासाठीचा हा आटापिटा असतो.फकिरा त्या व्यवस्थापकाला ती खोली उघडायला लावतो.आणि आतील महिलांन उद्देशून म्हणतो” मी इथं धान्य आणी पैसा लुटण्यासाठी आलोय. तुमची आब्रू लुटण्यासाठी नाही.भुकेली माणसं बाया बापड्यांचा आत्मसन्मान पणाला लावून त्यांच्या पोटाची खळगी भरत नाहीत" .
इथे लेखकाने स्त्रियांच्या चारित्र्याला तर जपलंच पण डाकू दरोडेखोरांच्या माणुसकीचा,त्यांच्या मनात असलेला माता भगिनी बद्दलच्या आदरालाही सलाम केला आहे हे याचं वेगळेपण दिसून येत.
तमाशा उलट्या खिशा सारखा माहित असलेला हा शाहीर.आता तमाशा हेच साधन आपल्या बंडखोरीसाठी वापरु लागला.जुन्या कथा बदलून नव्या युगाच्या गोष्टी याच्या वगात दिसू लागल्या.अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी ते आधुनिक सवाल जबाब चपखल वापरत. गण तर इतका आक्रमक केला की सुरवातच तळपणारया वीररसाने होत असे.प्रतिभेला एकदा बहर यायल लागला की सगळीकडे वसंत आणि वसंतच फुलतो; तसे त्यांचे झाले.
'ग्रामीण जीवन टिकावू काया आहे आणि समाजक्रांतीचा दलित जीवनातच पाया आहे'. हे त्यांचे जीवनसूत्र त्यांच्या साहित्यातून खळाळत समोर येते .
त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट निघाले. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्या कथानकात ग्रामीण महाराष्ट्राला गुंतवून ठेवण्याची ताकद होती, उत्कंठा वाढवणारी कलाटणी होती. म्हणूनच त्यासाठी आयुष्य वाहून घेण्याच्या त्यांच्या लेखणीला लोकमान्यता मिळाली त्यामुळेच ते लोक साहित्यिक म्हणून नावारूपाला आले .
त्यांचं कम्युनिस्ट असणं हे पोथीनिष्ट नव्हतं. तर ते त्यांच्या अर्धपोटी जगण्यातून ,श्रमिकांचा टाहो अंतःकरणा पासून ऐकून सारे आयुष्य त्यासाठी वाहून घेण्याच्या प्रवृत्तीतून जन्माला आलं होतं. या साऱ्या चा परिपाक . त्यांना आलेले इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीचे आमंत्रण
हे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवं . त्यांच्या रशिया भेटी आधी त्यांची चित्रा ही कादंबरी रशियन मंडळींनी आपल्या भाषेत वाचलीही होती.
नंतर माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे आलेले पुस्तक.
जगभरातील इतर भाष्या व्यतिरिक्त हिंदी भाषेचे जपानी लोकांना अति वेड ,मग राज कपूरचे 'आवारा हूं' हे गाणं रशियन जपानी तरुणांनी डोक्यावर घेतलं होतं हे नवल वाटायला नको .
त्याहूनही अधिक वेड त्यांना अण्णा भाऊ साठे त्यांच्या ‘स्तालिनग्राडचा पवाडा’ ने रशियाच्या क्रांतिकारी वेदना जगजाहीर केल्या होत्या.
त्यांना सलाम !
कोम्रेड अण्णा भाऊ साठे
कॉ.अण्णा भाऊ चा स्टॅलिनग्राड चा पोवाडा आणि चौक सात !
ज्यांच्या आयुष्याकडे आणि साहित्याकडे पाहिल्यावर या व्याख्येची यथार्थता पटावी असे उदाहरण म्हणजे शाहीर अण्णा भाऊ साठे!
प्रतिभेचे लेणे कुणा भाग्यवन्ताला लाभेल हे सांगता येणे कठीण. नाहीतर, वाटेगावच्या गावकुसाबाहेर मातंग समाजात जन्मलेला अण्णा भाऊ साठे नावाचा मुलगा, ज्याला वयाच्या १५-१६व्या वर्षापर्यंत धड अक्षरओळखही झालेली नव्हती, तो मराठी साहित्यातील मानसन्मान मिळवितो, 'फकिरा' या त्याच्या बावनकशी कादंबरीच्या अनेक भाषात आवृत्ती निघतात , मराठीव्यतिरिक्त भाषा माहीत नसलेला हा अभिजात कलाकार रशियाला जाऊन येतो आणि त्याच्या साहित्यकृतींची भाषांतरे केवळ भारतीय नव्हेत तर भारताबाहेरील भाषांमध्येही केली जातात, या अघटिताचा अर्थ कसा लावायचा?
राशियात गेल्यावर चौका चौकात अण्णा भाऊ साठे यानी तेथील चौका- चौकात पोवड़े गायले आणि आपल्या विचारांची उधळण केली .
मनोरंजनातून समाजप्रबोधन कसे करता येते याचा वस्तुपाठच खरे तर अण्णा भाऊंनी समाजापुढे ठेवला. याबाबतची मतभिन्नता गृहीत धरूनही एवढे मात्र निश्चितच म्हणता येईल की लोककलेला कालानुरूप करण्याचे ऐतिहासिक मोलाचे कार्य करून अण्णा भाऊ साठे हेच 'लोकनाट्याचे जनक' ठरतात .
अपार करुणा आणि संपूर्ण मानवजातीच्या हिताची मनीषा तिथे सामावलेली असते. भगवान बुद्ध, ज्ञानोबा माऊली तुकोबा राया यांच्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या करुणेचा आणि मनात दाटलेल्या मानवहिताच्या मनीषेचा अंश ज्यांना लाभतो त्यांच्या कृतीत, उक्तीत, साहित्यात सृजनाची बीजे आढळतात, संहाराची नव्हेत. अण्णा भाऊंच्या साहित्यात हेच दिसून येते.
अण्णा भाऊ साठे यांचे १९४८ मध्ये सोविएत रशियाला जायचे तसे ठरले होते, पण काही कारणाने ते नाही गेले. पुढे १९६१ मध्ये इंडो-सोविएत कल्चरल सोसायटीतर्फे ते तिकडे गेले. भारत भरातून निवडलेल्या लोकांचे एक शिष्टमंडळ तेथे गेले, त्यात ते होते. तेथे ते महिनाभर होते. साम्यवादी रशियाला भेट देण्याची संधी अण्णा भाऊंना बरीच उशिरा (१९६१ साली) मिळाली असली तरी साम्यवादाशी त्यांची ओळख १९४० च्या आसपास झालीच होती.
शोषितांना शोषणमुक्त करण्याचे, एक स्वतंत्र माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचे आश्वासन देणारे साम्यवादी तत्त्वज्ञान त्यांच्या मनात खोलवर ठसले आणि हा ठसा त्यांच्या साहित्यावर आणि सर्वाधिक स्वरूपात त्यांच्या लोकनाट्यांवर उमटलेला आढळतो.
त्यांच्या लिखाणात १५ पोवडे व लावण्या ,२ नाटक ,१० लोकनाट्य ,८ प्रवास वर्णन ,२३ कथा ,३२ कादंबर्या .
चौक पहिला –
दलितांचा आशाकिरण रशियाचा प्राण । जगजंगी ज्यानं ज्याने लढविले रोस्तोव आणि खार्कोव ।
रक्षिले लेनिनग्राड मास्को नाझीचा काळ तिमोशेको ।।
चौक दूसरा –
नाझीनी बेत मग केला । हेस परि गेला । करू या म्हणे हल्ला । रशियाचा लाल कोट
पाडून । सोविएट लोकशाही मोडून । आशिया सारा घेऊ जिंकून ।
सन एकोणीसशे एकेचाळ । मोठे जंजाळ । युद्धाचा काळ । जून बावीस तारखेला।
नाझी सैन्याने हल्ला केला । मध्यरात्रीच्या सुमाराला ।।
चौक तिसरा-
जिंकित शहरांपाठी शहर । नाझी निशाचर । करीत अत्याचार । आले लेनिनग्राद शहर
भूमीत । अगणित गोळ्या घेऊन पाठीत । पळती माघारी धूम ठोकीत ।।
परतला पुन्हा जर्मन । आला धावून । कोट पाडून । उपनगरात हल्ला केला। लाल सैनिक
पुढे भिडला | पुन्हा लढाईला रंग चढला ।।
वेशीत तोफ धडधडे । पडति भिताडे । अग्नि भडभडे । नाझीकडे यशकाटा झुकला
लाल सैनिक खिन झाला । निराशा झडपी हृदयाला ॥३॥
या चौकत अण्णानी नाझी यश संपनदासाठी कसा झुकला आणि लाल सैनिक कसा खिन्न या वर भाष्य केले आहे.
चौक चौथा-
रशियाची पोकळ भिंत । नाझी शोधीत । शिरकावया हात । नाही पर कोठे वाव मिळाला।
लाल फौजेचा जोर कळला । त्यांनी मग आपुला मोहरा वळला ।।
या चौकात नझिला लाल फौजेचा जोर कळला आणि नाझी ने आपली कशी माघार घेतली ते संगितले आहे. नाझीने पळ कसा काढला याचे वर्णन पाहावयास मिळते .
चौक पाचवा –
पराजित गुलाम फौजेला । आणी आघाडीला । युद्ध करण्याला । घ्यावया स्तालिनग्राड शहर ।
जावया इराक इराणवर । पुन्हा मग हिंद पेशावर ।। जो जो हल्ला शत्रूनं केला ।
तो तो परतविला । नाझी संतापला । कराया ठार रशियाला । कपटयुद्धाचा कट रचला ।
तोंड नाही इतिहासी ज्याला ।।
जगभरातील १९४२ च्या उद्धाचे पुरावे देत देश परत्वे चालू असलेले युद्ध आणि नाझी चे कपट कारस्थान नाझी कसा संपवला हे या पोवड्यातून संगितले आहे .
चौक सहावा-
पसरला बर्फ मोहिको गारिगार । त्याने आछादिले संगर झाले शुभ्र । आकाशी रत्तरंगी निशाण लहरे । त्याखाली जमले धुरंधर । रशियाचे प्यार । कराया विचार ।।
खवळावा सिंधू किंवा उठावे तुफान । उपटावे वृक्ष अजस्त्र त्यानं मुळातून । तसा प्रचंड
हल्ला चवन । रशियाच्या भूमिवरून । द्याया हाकलून । नाझी सैतान ।।
देई वीर तोफेला बत्ती । डोळे कडकती । जाउनी पडती । फोडुनी नाझीचा रणगाडा ।
गर्जती दुसरी आधाडी उघडा । जगातील नाझी नाव काढा । जी जी ।।
नाझी चा नायनाट करा ,जगातून नाझीचे नामो निशाण मिटवा हा मोलाचा क्रांति संदेश दिला आहे .
चौक सातवा-
उत्तराची वेळ संपली नौबत झडली । नाझींच्या अंतांची घंटा वाजू लागली । रशियाची
संगीन सारी वर उचलली। नाझींचा कराया अंत । निघाली जोरात । शत्रू-हृदयात धडकी
ती भरली।
नाझीला लाल सेने ची धडकी भरली . रशियाचा नाझीचा पराभव झाला . लाल सेनेचा विजय झाला .
(अण्णा भाऊ च्या ‘पोवाडा या नावाची व्याप्ती’ खूप मोठी आहे ,यात मी एकूण सात चौकातील फक्त सुरुवातीच्या कांही ओळी घेतल्या आहेत ,पोवाड्याच्या सविस्तर माहिती साठी संपूर्ण पोवाडा वाचावा याची वाचकांनी नोंद घ्यावी )
त्यांचे ते स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळच राहील.एक तारा साहित्ये रूपी गगनात आपले स्थान घेऊन याच दिवशी आपल्यातून १८ जुलै १९६९ ला निघून गेला .
बा.र .शिंदे ,नेरूळ – ७०६
(लेखक मिनण्डर )
Wednesday, July 14, 2021
संत अनेक ,क्रांतेयबुद्ध एक !
Thursday, June 17, 2021
आगरकर ,गोपाळ गणेश
Monday, June 7, 2021
लसाकम चे प्रबोधन
Monday, August 3, 2020
Doodle On Dr.B R Ambedkar .
Google गुरु
ची Doodle देऊन महामानव ,बोधिसत्व डोक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी !
INDIAN SOCIAL REFORMER AND POLITICIAN HONOURED
WITH A GOOGLE DOODLE
The jurist, who campaigned for the rights of
India's 'untouchable' caste and converted to Buddhism, was born 124 years ago
सॅन फ्रान्सिस्को येथे
तयार केलेल्या विपणन
दृष्टिकोनातून गूगल, अत्यंत फायदेशीर इंटरनेट सर्च इंजिन,
हे एक शोध इंजिन आहे, बातमी किंवा मनोरंजन साइट नाही. मुख्यपृष्ठ कधीही बदलत नाही, त्या डूडल वगळता कलात्मक, कधी मजेदार, कधीकधी आत लपलेल्या लोगोसह चकित करणारे – व्यक्ति चे विशेष त्यांचे
समाजासाठी चे योगदान ,त्याग ,जगात केलेला आमुलाग्र बादल या आधारे त्यांचे
डूडल प्रसिद्ध करतात . त्यात महामानव ,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे Doodle हे महत्वाचे अंग होते .
Google हे मानवी
मूल्ये जोपासण्यासाठी चे इंजिन ,मानव जीवन पुनरुत्थान करण्यासाठी वापरलेले
मशीन. मानव आनंदित करण्यासाठी आणि Google चे मानवीकरण करण्यासाठी आज गूगल ने संपूर्ण जगावर कब्जा केला आहे .
एके काळी नाराजगी
दर्शवणारे जग आज गुगल हा उत्तम पर्याय म्हणून स्वीकारित असताना दिसत आहेत
. शाळा ,महाविध्यलय आणि एकंदरीत एकदारीत कोर्पोरेटर क्षेत्र गूगल
वर विसंबून आहे .
Google च्या
व्यवसायाची बाजू जी डेटा आणि उपयोगाचे सतत विश्लेषण करते, डुडल्स
त्यांचे व्यक्तिनिष्ठ निकषांवर मूल्यांकन करतात. जुरी बोर्ड ठरवत असते ,की कोणाचे Doodle तयार कराचे .
गूगल हे सामाजिक नेटवर्क
आहे . गूगल टीम
दरवर्षी अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये doodle केले आहेत आजवर ३०० हून अधिक डूडल तयार केले आहेत . परंतु राजकीय किंवा वादग्रस्त विषयांपासून सतत दूर
असलेले पाहावयास मिळत आहे .
मुळात गमतिची बाब अशी आहे
की ,गूगल
नाविन्यपूर्ण, कलात्मक आणि मूर्खपणाच्या कोणत्याही
गोष्टीबद्दल विचार करतो, जे Google साठी
योग्य आहे.
यात डूडल कल्पना फक्त कोठूनही
येऊ शकतात. गूगलची नाविन्यपूर्ण संस्कृती, आरामशीर वातावरण,
काम आणि खेळाचे मिश्रण सर्जनशील प्रक्रियेस मदत करते.
डूडल चा इंजिनियर ख्रिस होम, ने आजवर ३०० पेक्षा जास्त जगभ्रतील प्रसिद्ध व्यक्ति
सहित डूडल बनवले आहेत .
गूगल डूडलर म्हणतात की आम्ही गूगल च्या जगभरातील
वापरावर डूडल बनवत असतो आणि त्या कलाकृतीचा अतुलनीय मान सन्मान देतो
त्यात त्या व्यक्ति विशेष तीचे अभिनव संस्कृतीचे प्रतिबिंबित करतो आणि Google
वर Doodle तयार करतो .
गूगल
हे संपूर्ण जगात ऑनलाइन भेट देण्यात आलेले स्थान , यात मानवी मूल्ये प्रतिबिंबित करते.
अशीच गूगल ने १२५ वर्षा
पूर्वी चतुर्थ
प्रवर्गात जन्म घेतलेल्या महामानव ,बोधिसत्व डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांचे
डूडल/Doodle तयार केले होते .
याची दखल जगभरातील
बुद्धिजीवी वर्गाने घेतली . आणि या महामानव बोधिसत्व यांच्या डूडल लोगो मुळे त्रिलियायन व्यू आले होते .
आजवर
डूडल ने ३०० च्या वर प्रसिद्ध केलेल्या Doodle मधील रांगेत प्रथम १० मध्ये स्थान आले होते याची नोंद घ्यावी .
अशी महती आज ही १२६
वर्षांनंतर महामानव ,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायम टिकून आहे ,आणि मानव जमात या जमिनीवर जो
पर्येंत जीवंत असेल तो पर्येंत महामानव ,बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मोठेपण ,त्याग ,मानव
उत्थान साठी केलेले समर्पण जगाच्या कृती पटलावर असणार आहे .
#लाईफ_वार्निंग_बेल
#लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...
-
नात्यात लग्न एक अभिशाप दिनांक : १७-०४-२०१७ नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक ...
-
दलाली दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८ दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो ...
-
. हाळी-हांडरगुळी जनावराचा जंगी बाज़ार : २०/११/ 2017 तालुका उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध ...
-
भारतीय शिक्षण प्रणाली बर्याचदा आपनास एखादे आव्हान भेडसावत असते आणि एखादा गहन प्रश्न पडतो उदा : राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ)...
-
अंधश्रद्धा एक अभिशाप २१/११/२०१७ -२३/११/१७ -29/११/२०१७ .final correction on 08/12/2017 “आई ! आज शनिवार आहे न ग .रस्त्यावर लिंबू मिरची...
-
दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि एस एस सी...
-
शेंगा उकरायला येता का ? भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज ...
-
भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्ह...
-
स्पर्श एक एहसास है जो बचपन से लेकर अंतिम सांस तक सचेत रहता है। पहला स्पर्श माँ से होता है , जन्म के तुरंत माँ अ...