This blog is for Socially poor ,for uplifting their human values in day today Pure life.Like Buddhism originates in the teachings of Shakyamuni (Gautama Siddhartha), who was born in what is now Nepal some 2,500 years ago.He became increasingly possessed by a longing to abandon the secular world and go out in search of a solution to the inherent sufferings of life.And he gave Triratn ,Four Nobel truth ,Panchshil ,Ashtangik way and ten Parmi .for peace of Globe.
Wednesday, August 31, 2022
श्रमिक आणि वैदिक संस्कृती
Friday, August 19, 2022
डॉ नरेंद्र दाभोळकर
Friday, July 22, 2022
जिंदगी के साथ भी! जिंदगी के बाद भी!!
Tuesday, July 12, 2022
कॉ. अण्णा भाऊ साठे
Saturday, June 25, 2022
दलित पँथर चे ५०वर्ष पूर्ण
शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर
Tuesday, June 14, 2022
वोल्गा से गंगा -महापंडित राहुल सांकृत्यायन
एक होता कार्व्हर -लेखिका विना गवाणकर
Wednesday, April 13, 2022
जातिअंताच्या लढ्यापुढील दीपस्तंभ ... लोकसत्ता . लेखावर प्रतिक्रिया
आज दिनांक १३ एप्रिल लोकसत्ता
मधील प्रसाद जाधव कुलकर्णी लिखित उपरोक लेख वाचण्यात आला. आज जात जाणिवा कश्या बळकट
होत आहेत ,त्याचा बीमोड करण्यास
महात्मा फुले आणि डोक्टर बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार किती प्रवर्तक आहेत ते विषाद
केले आहे .
तसे पाहता आज जात ही एक
बांधीस्त वर्ग होऊन बसली आहे . जातिअंताच्या
लढाईचे मूळ हे जरी महात्मा फुले आणि डोक्टर
आंबेडकर यांनी ठणकावून संगितले असले तरी आज राजकीय सत्ता आणि विविध विवाह संस्था या
जाती व्यवस्थेला खतपाणी घालताना दिसून येत आहेत .
जात निर्मिती हे मानव निर्मित
असून तत्कालीन प्रस्थापित , उच्चवरणीयांनी
निर्माण केलेले आहे . ती आज तागायत तग धरून बसलेली आहे ? जात
नाही ती जात . जाति या मनू ने निर्माण केलेल्या नाहीत हे डॉक्टर बाबासाहेब यांनी ठाम
पणे नमूद केलेले आहेच . या जात संस्थेचे अनुकरण
आज ही मोठ्या प्रमाणात तळाचा वर्ण करीत असल्याचे पदोपदी अनुभव येत आहेत . मनू हा जात
प्रचारक होता .
हिंदू समाजातील जातीचा
पुंजका हे व्यक्ति ,समाज आणि
देश विकासाला मारक ठरत चालले आहे . आजमितीला विविध माध्यमाद्वारे होणारे जातीचे मेळावे
,सम्मेलन हे जाती एक्याला बळकट करणारे आहे . हे असे विविध जातिबांधीलकीचे
कार्यक्रम सामाजिक एकजुटीला टाडा देताना दिसत आहेत .
जातिअंतापेक्ष्या जातबळकटिकरण
,धार्मिकरण ,परधर्मद्वेष
,हे सामाजिक ,आर्थिक ,आणि देश विकास यास खिळ घालताना दिसून येत आहे.
उद्या होणार्या प.पू.
डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित जातिअंताचा संकल्प करून जाति निर्मूलनचा
विडा उचलावा ,अश्या करण्याने महामावांची
खरी जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल .
प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरूळ ७०६
Tuesday, April 12, 2022
iphone7_औरढाईमाला.
#iphone7_औरढाईमाला.
-------------- बा. र. शिंदे
आज कुछ निजी काम के चलते मै घर से ऑफिस के लिए देर से निकला था । हुवा यूं की जैसे मै बांद्रा रेल्वे (लोकल ) स्टेशन पहुँच गया और लोकल से उतर गया । लोकल बांद्रा थी और वापिस सी एस टी जाने वाली थी ( बांद्रा –सी एस टी ) और रोज की तरह स्टेशन से बाहर पश्चिम की ओर निकलते हुये रिक्शा ले लिया जैसे ही रिक्शा मे बैठ गया तब पता चला की मेरे जेब मे मैंने हल्कापन महसूस पाया । तब पता चला की मेरा मोबाइल नहीं है ? (मै दो मोबाइल इस्तेमाल करता हूँ,एक आंड्रोइड और एक इओएस )
एकदम से शॉक लगा ,चलो अभी मेरा मोबाइल गुम हो गया । यह मन ही मन मे ठान लिया , फिर मैंने तुरंत रिक्शा छोड़ दी । और जिस स्टाल से ठंडा खरीदा था उस स्टाल तक जाने की सोचकर स्टेशन की ओर भाग ही रहा था तब मेरा बड़ा बेटा आदित्य का कॉल आया ,कुछ पल लगा की इस समय अदित्या कॉल किंव कर रहा है ? जैसे ही मैंने उठाया तब उस ओर से आवाज आयी की आपका कहाँ है ? मोबाइल किसी और को मिला है और कहते है की वी.टी.आकार ले जाओ । मेरे बेटे के यह शब्द सुनकर मेरी बड़ी हुयी धड़कन थम गयी ।
मै तुरंत बांद्रा प. टिकट विंडो से सी एस टी का वापसी का टिकट लिया। बांद्रा से तेज लोकल लेकर वाया दादर सी एस टी पहुँच गया । जिन्हे मेरा मोबाइल लोकल ट्रेन मे प्राप्त हुवा था वे एक पेशे से बड़े सज्जन वकील है उन्होने किल्ला कोर्ट सी एस टी मे मिलने को कहा । मै उन्हे वहाँ पहुँचते ही कॉल लिया उन्होने मुझे ‘ढाई माले’ पर आने को कहा । जैसे मै कोर्ट मे पहुँच गया तो बड़ी तादात मे पुलिस कर्मी बैठे दिखाई दिये । और ढेर सारे वकील ।
मै उन्हे वाहा से और दुबारा कॉल किया की मुझे ‘ढाई माला’ समज नहीं आरहा है । फिर से उन्होने कहा की आप पहले माले पे आओ । तब एक नीचे सेकुरिटी मे बैठी पुलिस महिला से पूछा की यह ढाई माला किधर है ? वह भी चौक गयी और कहा की मै नहीं जानती । मै तो पहली बार सुनरही हूँ । और मेरी मुसीबत बढ़ और बढ़ गयी ।
किला कोर्ट अंग्रेज़ के जमाने का कोर्ट है यह ,उनका एक माला ही हमारे चार माले की तरहा है । मै एक ही माले पर गया लिकिन येसा लगा की मै चौथी मंजिल पार किया हूँ । क्या करे गुम हुवा मोबाइल वापस मिलनेकी की खुशी मे मै इतनी तेज ऊपर गया की मै कितनी मंजिल ऊपर आया यह भूल गया । मेरे पैर का पुराना दर्द भूल भी गया । जैसे ही ऊपर आया तब मेरे दूसरे मोबाइल से मेरे ही मोबाइल पर कॉल किया । तभी वे भले इंसान मेरे सामने ही खड़े थे । हात ऊपर किए हुये पास मे आने का इशारा कर रहे थे।
भला इंसान ।मुसकुराते हुये उन्होने मेरे हाथ मे हाथ दिये हुये मेरा सन्मान किया । मैंने आपसे बेटे से बात की थी । उन्होने मेरे फोन से एमर्जेंसी नंबर पर कॉल किया था तब एक ही बार मेरी पत्नी ,मेरे दो बेटे के पास कॉल गया था ....
आप भी आपने मोबाइल मे घर के सभी सदस्यो के एमर्जेंशी नंबर दल सकते हो ...
उन्होने मुझे आपने टेबल पर बिताया ,हम दोनों की पहचान हुयी और मैंने जापानी स्टाइल मे उनका शुक्रिया किए हये कोर्ट छोड़ दिया ...
(मा. वकील साहेब हे हिन्दी भासिक आहेत ,हा संदेश त्यांच्या प्रएंत जावा हा हिन्दी लिहण्याचा मनसुबा होता ).
मिनांडर
Thursday, December 2, 2021
ढलांटी
Friday, October 22, 2021
ऊस तोडीतून कंदुरी
Friday, October 15, 2021
कर्णबधिर -निकिता. Deaf Nikita
कर्णबधिर -निकिता.
वर्ष अंदाजे १९९६ असेल. निकिता कान तपासणी साठी माझ्या दवाखान्यात आली होती .तिला दोन्ही कानात ऐकण्याचा त्रास होता.
निकिता ,एक सुंदर मुलगी .मध्यम बांधा ,गोरी कांती आणि टपोरे डोळे.
कर्णबधिर असली तरी खूप देखणी होती.चेहरा गोल ,लांब केस .बघताच स्मिथ करून कांही हातवारे किंवा सांकेतिक खुणा करून तरी व्यक्त करण्यास उत्सुक आहे असा भास करणारी.
स्मित हास्य करताना गालावर खळी उमटून यायची .तीच तिची अभिव्यक्ती ची भाषा असावी .तळ मजल्यावर कान तपासणी करून झाल्यावर दोघी माय लेकी माझ्या कक्षात आल्या .
मी त्यांची वाट पाहत बसलो होतो ,माझ्या जागेवर. फाईल माझ्या टेबलावर ठेऊन पुन्हा दिलेल्या तारखेला येण्याचे कळून आपल्या घरी जाण्यास निघाल्या.
आज यांची माझी पहिलीच ओळख होती .आई पूर्वी पासून मला ओळखत होती .पण निकीतला मी आज प्रथम पाहिले होते .मला कधी वेळ काढून घरी येण्याची विंनंति करून त्या घरी जाण्यास निघाल्या ती मुंबई सेंट्रल च्या रेल्वे च्या क्वार्टर मध्ये राहत होती ,आई आणि बाबा सोबत.बाबा रेल्वेत उच्च अधिकारी .दोन वर्षे लोटली असतील .मी मुंबई सेंट्रल ला गेलो असताना ,निकिता च्या घरी जाण्याचा योग आला .वार शनिवार होता .तेंव्हा निकीताच्या आई ने घरी येण्याची विन्नती केल्याचे आठवले .आणि जवळच असलेल्या कॉलनीत जाऊन ,निकिता कुठे राहते हे कळल्यावर मी घरी गेलो.
ती पहिल्या माळ्यावर राहत असे .ती त्या कॉलनीत जुनी .लहानाची मोठी झाली .कर्णबधीर असल्यानेच सर्व तिला ओळखत असावीत.आई बाबांची एक एकुलती लाडकी लेक.आई खूप प्रेम करायची .निकिता आई चा जीव की प्राण .आज निकिता २० वर्षाची असेल.घरी मी बाबांना पहिल्यांदा भेटतो आहे.
चहा घेता घेता कांही वेळा ,कर्णबधिर आणि त्याच्या अडचणी वर चर्चा झाली .आणि शेवटी निरोप घेतला ,निघता निघता निकिता ची आई माझ्याकडे विन्नती वजा पाहून ,माझ्या लेकीला कुठे वर मिळाला तर असे विचारले .आणि मी निरोप घेतला.
एक महिना लोटला नाही तोच ,निकिता ची आई माझ्या दवाखान्यात मला भेटण्यास आली .एकटी बघून मला प्रश्न पडला की या एकट्या का आल्या असतील ? काय अडचण असेल असा मला मनात संभ्रम निर्माण झाला ,आणि ते साहजिकच होते.
मी विचारले की ,अचानक कसे काय येणे केलं? त्या म्हणाल्या मी ,सहज आपणास भरण्यास आले आहे .निकीतला कुठे स्थळ मिळाले का हे विचारण्यासाठी आले आहे.
हे एक ..होते .मात्र त्यांच्या बोलण्यात अडचण वेगळीच होती हे मला त्याच्या बोलण्यावर कळत होते...तोच त्या म्हणाल्या .
सर आपणास मला कांही सांगायचे आहे .काय बोला ना काय अडचण आहे?.मी म्हणालो .
त्यांनी घरातील एक प्रसंग सांगायचा आहे.
त्या पुढे म्हणाल्या की मला ,निकीतच्या बाबा वर माझा संशय आहे .काय म्हणता ? हो सर .कोणत्या संधार्भात. बोला ना ,काय अडचण असेल तर नक्की सांगा ..
आपण चर्चा करून सोडवू या .
निकीतच्या बेड मधून तिचे बाबा बाहेर निघतच नाहीत .नेहमी सारखे निकिता जवळ बसतात .तिला इकडून तिकडून येऊन स्पर्श करतात ..अंगा खांद्यावर हात फिरवतात .आज ती दहावी पास झाली आहे ,कळती ,शहाणी उपवर झाली आहे .
मला यांच्या वर्तनावर संशय आहे .माझी द्विधा झाली आहे काय करावे ते कळत नाही .
आपण मला मार्ग सांगावा ..ती बोलत होती आणि मी ऐकत होतो पण मनात संशय बळ देत होता .
करण अश्या अनेक घटना वाचनात होत्या आणि ऐकण्यात होत्या.
त्यांच्या या बॉलण्यावर पुष्टी होती.या प्रसंगाने आईचा जीव भांड्यात पडला होता.
कारण एकुलती एक मुलगी ,आणि वरून कर्णबधिर.आपल्याच घरात हे पाप शिजते आहे या मुळे त्या पूर्ण खचल्या होत्या.
बाई खूप संकटात होती. बाहेर कोणाला सांगता पण येत नाही आणि मनात साठवता ही येत नाही ?
मनाने खूप खचली होती .घरच्या इभ्रतीचा प्रश्न होता .आणि आज मज जवळ मन मोकळे करून झाली .हा प्रश्न मलाच का सांगितला हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे .
मन मोकळे करून ,जड अंतः कारणाने आपल्या घरी निघून गेल्या .
आज बाप आणि मुलीचा संबंध स्पष्ट झाला होता .अश्या कैक ना बोलता येणाऱ्या मुलीवर ,अपंग ,मतिमंद मुलीवर बलात्कार च्या घटना आपण एकतो आहोत आणि वाचतो आहोत . नातेवाईक ,मित्र ,घरचे आणि बाहेरचे त्या व्यंगाचा सहज फायदा घेत असल्याचे शिक्का मोहर्तब झाले होते .
वाचलेले आणि ऐकलेले खरे ठरले होते ,नक्की झाले होते .घरातील नात्याला गळ लागली होती .बाप मुलीचा फायदा घेत होता.
तिच्या बोलण्यात वाटत होते की ,मी पोलीस तक्रार करावी.मी कसं काय हे करू शकतो.हे सर्रास जगात चालू आहे हे मी मान्य केलं .कांही काळ निघून गेला ,आई परत माझ्याकडे आज आली होती .पण ती अडचण सांगण्यात आले नव्हती ,तर एक खुश खबर घेऊन !आली होती .
निकीतच्या लग्नाची ती बातमी होती .तिचे लग्न ठरले होते.आज ती आनंदी दिसली .बातमी एकूण मी त्यांचं अभिनंदन केलं! त्यांना मी मागील कांही विषय न काढता .त्यांना कँटीन मध्ये घेऊन गेलो आणि चहा पाजला . नंतर त्या घरी निघाल्या.
निकिताचे लग्न झाले .मी लग्नाला जाऊ शकलो नाही.सहा महिने झाले लग्न होऊन .निकीताला डोंबिवली येथे दिले होते.नवरा पण कर्णबधिर .गोदरेज कंपनीत कारकून म्हणून कामाला होता.
आज निकिताची आई परत एकदा माझ्याकडे आली होती .हो या खेपेची तिची माझी तिसरी भेट.
ही भेट धक्कादायक होती .ताईने मला सांगितले ते सत्य भयावह होत.
ताई म्हणाली की ,सर निकिता चे बाबा दर शनिवारी डोंबिवली ला जातात. तिथे एक रात्र राहतात .
तर कधी कधी निकीतला आपल्या घरी घेऊन येतात ?आहे की नाही ,लज्जास्पद आणि भयावह!
या जगात आज अश्या कितीतरीं निकिता सारख्या कर्णबधिर ,मतिमंद आणि अपंग मुलीवर अत्याचार होत असतील आपल्याच घरात .
कसे हनन ,दमण होत असेल यांचे अंदाज बांधता येत नाहीत.? अश्या घरात घडणाऱ्या घटना ,कितीतरी घरात निकीताच्या सम घरे उध्वस्त झाली असतील ,मने उद्धवस्थ झाली असतील.
आपल्याच बाबा कडून आपल्याच मुली सोबत असे वागणे किती मानसिक आघात करणारे आहे .अमानुष आहे हे अमान्य आहे . आज समाजात खूप मानसिकता विकृत झाली आहे .याची मानसिक करणे कांही असू देत.हे भयावह आणि धोकादायक तर आहेच. पण समाज दिव्यांग बाबतीत विघातक आणि अनैतिक तर नक्कीच आहे .
( या घटनेत कांही मिळते जुळते असेल तो एक योगायोग समजावा )
बालाजी रघुनाथराव शिंदे ,नेरूळ -०६
मिनांडर
Friday, October 8, 2021
हरिपाड,अलपूझा केरळ
जेंव्हा मी दौऱ्यावर होतो…हरिपाड
हरिपाड
हरिपाड हे अलापूझा जिल्ह्यातील गाव ,केरळ म्हणटले की हिरवेगार ,रान आणि शिवार आणि गर्द झाडी डोळ्यासमोर आलाच म्हणून समजा.
हरिपाड हे पश्चिम समुद्र किनाऱ्यापासून नुकतेच दोन किलो मीटर अंतरावरील गाव .गर्द झाडी ,तुबकदार आणि सुबक आकाराचे रंगी कौलारू बंगले .घरादारात विविध नैसर्गिकरित्या उगवलेली झाडे ,त्यात डोके वर काढणारे नारळाचे गगनचुंबी झाड ,नारंगी रंगाचे गोल गरगरीत लटकणारे दहा ते वीस नारळ .
पाण्यानी गच्च भरलरली गावे .निमुळती रस्ते .कुठं कुठं तर चार चाकी जाईल एवढाच रस्ता.एक गाडी आत गेली की दुसरी बाहेर निघणे कठीण .एकाला माघार नक्कीच घ्यावी लागते.
लोकल माहिती च्या आधारे बरीच माहिती उपलब्ध झाली.
इथे भाषेची खूप अडचण धड त्यांना हिंदी येत नाही की इंग्रजी .आपल्याला एखादं शिकलेले द्विभाषिक वापरावे लागतात .कामात खूप अडचण येते .तो पण आपल्या लातूरच्या भाषेत इंग्रजी बोलत असतो.त्याला देखिल हिंदी किंवा इंग्रजी धड येत नाही .
सुरुवातीला मला 'हरिपाड 'हे देव भूमी किंवा 'हरी चे पद ' असेच वाटले .खरेच इथे एकूण सत्तर च्या आसपास मंदिर आहेत .पाड म्हणजे नद्या .हा इलाखा पूर्ण नद्यांचा आहे .
अलीपुझा हे खूप जुने शहर.मंदिराचे महेर घर
जवळच ४ किलो मीटर वर दोन मोठे बुद्ध विहार असून ते इथं प्रसिद्ध आहे .एक 'महावेरीकेरा आणी दुसरे कैरुनाली'.
आज संध्याकाळी मी तो विहार पाहण्यासाठी येथील स्थानिक कोणाची मदत घेऊन जाणार आहे .कारण बुद्ध आणि त्यांचे पुरातन विहार हा एक माझा आवडीचा विषय आहे .पाली भाषेचा विध्यार्थी आणि अभ्यासक या नात्याने हे शोध कार्य हा माझा नित्याचा वयक्तिक कार्यक्रम आहे.
कालच भल्या पहाटे उठून मी आणि माझा कार्यालय मित्र डॉ पुथूलिन मार्टिन पी.जे. , (मास मेडिया ऑफिर) आम्हा दोघांनी मिळून 'नागराज्या' या मंदिराला भेट दिली .डॉ मार्टिन हा कोट्याम केरळ चा रहिवाशी असल्या कारणाने कॅम्प साठी माझ्या ऑफिस ला अनेक विन्नती पत्र येत असतात .याच मूळे केरळ राज्यात शिरकाव करण्यास अडचण येत नाही .हरिपाड येथील 'नागमंदिर ' या वरून एक गोस्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की हे गाव कदाचित ही नागभूमी असावी .तिसऱ्या शतका नंतर बुद्ध भिक्खु आणि विहार यांचा नाश करण्यात आला असावा .
हे या वरून कळते की .हे एक खूप मोठे आणि प्राचीन मंदिर असून येथील लोकांची खूप श्रद्धा आहे .
सध्या मंदिराच्या आतील जिर्णोद्धार करण्याचे काम चालू आहे.मुख्य दरवाजा तर थोडा वेळ जागेवर थांबून नक्षीकाम पाहण्यासाठी मजबूर करतो.लाकडा वरील नक्षीकाम,कोरीव काम खूप सुन्दर आहे .आतील बाजूला अनेक नाग नागीण यांची चित्र रेखाटली आहेत .हे कोरीव काम बघून माणूस थक्क होतो .
मंदिराच्या आत मध्ये प्रवेश केल्यावर केवळ 'साप' आणि 'सापच' दिसतात ,नक्षीकाम केलेले .जो माणूस सापाला घाबरत असेल त्याला तर इथे खूप भीती वाटल्यागत राहणार नाही .मला पण सारखे वाटत होते की इकडे पायाजवळ एखादा साप किंवा सापाचे पिल्लू तर पायात घुटमळत नाही असा भास झाला होता.म्हणून मी जास्त वेळ आत पाहण्याचे धारिष्ट्य केले नाही .
अलीपुझा येते चिकन कमी पण 'बदक' खायला नक्कीच मिळतात .बदकाचे पिल्ले हा येथील खाद्य पदार्थ .चिकेन कमी बदक जास्त खाल्ले जाते .मी पण प्रथम इथे 'डक फ्राय ' खाल्ले .चवीला तसे चिकन सारखे लागत नाहीत.कधींतुम्ही आलात तर लाईव्ह डक नक्कीच खा आणि आस्वाद घ्या .
समुद्र जवळ असला तरी ,ताजे मासे खाण्यास मिळत नाहीत .इतर भाज्या या केरलीयन असतात ,तिखट कमी ,मसाले कमी .रंग लाल असला तरी मिर्ची तिखट नसते .सांबर हेच मला आवडलेले पदार्थ.यात पाणी आणि भरपूर तरकारी समाविष्ठ असतात म्हणून खाण्यास आवडते .
पांढरा भात हे येथील स्थानिक लोकांचे मुख्य खाद्य .
मी गेली २७ वर्ष देशातील कित्येक राज्य फिरली ,पण माझ्या गावचा रस्सा अजून कुठे मला सापडला नाही ,की कुठे मुंबईचा ताजा मासा,मावरा मिळाला नाही .
कैकदा मी केरळला कार्यालयीन कामाकरिता आलो पण कांही तरी लिहावे असे कधी वाटलेच नाही .कारण कामात डोके वर काढता येत नाही .
आज इथे आल्यावर गेली दोन दिवस टूर वर कांही लिहावे असा मनात विचार आला म्हणून माझा हा उहापोह .
पूर्वी लिहलेल्या गोष्टी माझ्या ब्लॉगवर टाकतो आहेच आपण माझ्या ब्लॉग वर इच्छा असेल तर वाचून मला प्रतिक्रिया द्यावे. balajirshinde.blogpost.com
आपल्या प्रतिक्रिया या माझ्या मेल आयडी वर जरूर द्या
balajiayjnihh@gmail.com
गेली चार दिवस मी केरळ राज्यात वास्तव्यात आहे ,येत्या तीन दिवसांत मी मुंबईत असेन .माणूस जरी जग पालथे घातला तरी आपले घर आणि आपल्या घरातील माणसं त्यांची ओढ निराळीच असते .तो धागा निराळा असतो .
खाण्यापिण्याच्या वेळा ,सवाई आणि आपली माणसे त्यात असलेला सहवास हे जगभरात कुठंच मिळणारे नसते .
प्रा बालाजी शिंदे ,नेरुळ ७०६
९७०२ १५८ ५६४
Sunday, September 26, 2021
लग्न गावचे
Friday, August 27, 2021
मूरख साधू !
किसी गाँव में दो साधू रहते थे. वे दिन भर भीख मांगते और मंदिर में पूजा करते थे। एक दिन गाँव में आंधी आ गयी और बहुत जोरों की बारिश होने लगी; दोनों साधू गाँव की सीमा से लगी एक झोपडी में निवास करते थे, शाम को जब दोनों वापस पहुंचे तो देखा कि आंधी-तूफ़ान के कारण उनकी आधी झोपडी टूट गई है। यह देखकर पहला साधू क्रोधित हो उठता है और बुदबुदाने लगता है ,” भगवान तू मेरे साथ हमेशा ही गलत करता है…
में दिन भर तेरा नाम लेता हूँ , मंदिर में तेरी पूजा करता हूँ फिर भी तूने मेरी झोपडी तोड़ दी… गाँव में चोर – लुटेरे झूठे लोगो के तो मकानों को कुछ नहीं हुआ , बिचारे हम साधुओं की झोपडी ही तूने तोड़ दी ये तेरा ही काम है …हम तेरा नाम जपते हैं पर तू हमसे प्रेम नहीं करता….”
तभी दूसरा साधू आता है और झोपडी को देखकर खुश हो जाता है नाचने लगता है और कहता है भगवान् आज विश्वास हो गया तू हमसे कितना प्रेम करता है ये हमारी आधी झोपडी तूने ही बचाई होगी वर्ना इतनी तेज आंधी – तूफ़ान में तो पूरी झोपडी ही उड़ जाती ये तेरी ही कृपा है कि अभी भी हमारे पास सर ढंकने को जगह है…. निश्चित ही ये मेरी पूजा का फल है , कल से मैं तेरी और पूजा करूँगा , मेरा तुझपर विश्वास अब और भी बढ़ गया है… तेरी जय हो !
मित्रों एक ही घटना को एक ही जैसे दो लोगों ने कितने अलग-अलग ढंग से देखा … हमारी सोच हमारा भविष्य तय करती है , हमारी दुनिया तभी बदलेगी जब हमारी सोच बदलेगी। यदि हमारी सोच पहले वाले साधू की तरह होगी तो हमें हर चीज में कमी ही नजर आएगी और अगर दूसरे साधू की तरह होगी तो हमे हर चीज में अच्छाई दिखेगी ….अतः हमें दूसरे साधू की तरह विकट से विकट परिस्थिति में भी अपनी सोच सकारात्मक बनाये रखनी चाहिए।
अंधभक्त को कोई निसर्ग की जानकारी नहीं होती है । वे हर बात को भगवान -भगवान करते है । अब इनको भिक मांगकर खाने की आदत जो लगी है वे उसी चंगुल मे मस्त है । और भगवान जो दिखाई नहीं देता है उसे ही सब मानकर उसे के ऊपर निर्भर रहते है । जब आँधी हवा तेज चली तो उसे कौन दानव मानव पता नहीं होता है वे तो सभी को दबोच लेता है ।
उसपर भक्ति करो या न करो न तुम्हें वह देखता है ना तुम्हें जनता है । तुम्हें मेहनत करकर धन कमकर आपने घर को कुशीहाल करना है । जैसे आज के साधू कम ढोंगी जादा होते है ।
आपने इस कथा मे दो ठग देखे है वे कहते है की , गाँव में चोर – लुटेरे झूठे लोगो के तो मकानों को कुछ नहीं हुआ , बिचारे हम साधुओं की झोपडी ही तूने तोड़ दी ये तेरा ही काम है …हम तेरा नाम जपते हैं पर तू हमसे प्रेम नहीं करता….”
अभी विज्ञान से देखे इनकी झोपड़ी कूड़ेदान से बनी है ,दूसरे चोर झुटे लोगोंकी झोपड़ी नहीं है उनके पक्के ईटा और सीमेंट के घर है ,वे भला कैसे टूट जायेंगे ?
इस तरह के कथाओंसे हमे सच्चाई के रास्ते न मिलते है न ढूंढ पाते है । तो येशी कथा से दूर रहे सच की रह पर रहे ।
मिनांडर
Wednesday, August 18, 2021
Malala and Swat Valley , Afghanistan
Thursday, August 12, 2021
बुद्ध विहार
Friday, August 6, 2021
स्वचित्त बोध
स्वचीत्त बोध /बालाजी
शिंदे ,नेरूळ -७०६
दूरध्वनी क्र.9702 158 564
सोमवार २३
,मार्च २०२० /२८ मार्च २०२०
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वचीत्त बोध
चित्त म्हणताच
‘मन’ हे डोळ्यासमोर येणे सहज आहे .मनाच्या शांतीसाठी गौतमी पुत्र भगवान शाक्यमुनी
सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपले आयुष्य खर्चून जगाला मनाचा शोध लाऊन दिला .
स्वतःला जगणे
किती आवश्यक्य आहे हा संदेश त्यांनी संपूर्ण जगाला दिला आहे. सुखी आणि यशस्वी जीवन
जगण्यासाठी स्वतःला जगणे अगदी आवश्यक्य आहे .घरात ,मित्र -लोकात आणि समाजात जगणे आणि उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठी
स्वतःला जगणे आवश्यक्य आहे.उत्तम रीतीने जगण्याचा मंत्र बुद्धाने जगाला देऊन गेला
आहे.
अध्यात्मिक प्रगतीतून आपल्या मनावर कार्य करण्याचे आपण शिकत असतो .यात मनाचा कार्यभार खूप महत्वाचा
आहे.आपल्या मनावर काय कार्य करायचे आणि कसे कार्याचे हे मनामुळेच समजू शकतो .प्रश
असा निर्माण होतो कि, स्वतःला जाणणे म्हणजे काय ? स्वतःला जाणणे म्हणजे शरीराचा
आकार किंवा उंची किंवा रंग नसून स्वतःची वास्तविक माहिती असणे म्हणजे हि स्वतःची
जाण न्हवे ? स्वचीत्त बोध म्हणजे स्वताचे ‘मन’ जाणणे हे होय .
पण मन जाणणे ,चित्त बोध करून घेणे हे अवघड काम आहे .आपले मन
आपण इतरांना दाखूऊ शकत नाही आणि मन प्रकट पण करून दाखऊ शकत नाही.कारण मन हि वस्तू
नाही .ती निराकार आणि असीम अशी आहे .पण आपणास निरीक्षण करणारे ते मन आहे , मात्र
त्याचे निरीक्षर करता हि येत नाही . त्यास ‘स्वचित्त बोध’ असे म्हणणे वावगे होणार
नाही ,याची व्याप्ती खूप आघाड आणि असीमित आहे ते विशद हि करता येत नाही .
‘स्वचित्त बोध’
हि एक निरंतर आणि वेगळी बाब आहे .यालाच चिन्तन असे म्हणता येईल .दुसऱ्या भाषेत
सांगायचे झाले तर आंतरिक,किंवा स्वतःवरील स्वताचे आंतरिक चिंतन असे म्हणू .किंवा
मनातील सातत्याने बदलाचे चिंतन असे हि म्हणता येईल .मन हे अनात्मिक आहे ते सातत्य
असून निश्चित प्रहावीत नाही.मनाच्या कप्यात बदलाचे हेलकावे आणि बारकावे सतत चालत असतात
(Mind is continues and
changeable process in rational animal like human being ) म्हणून माणसाने सतत स्वताच्या मनाचे निरीक्षण (continues observation of own Mind) करावे .
मनाला सतत प्रश विचारात राहावे ,यात मन सुखी कि दुखी ,कुशल
कि अकुशल किंवा माझी अवस्था धाम्म्कुल आहे का ?या हि पलीकडे जाऊन माणूस
मनोवास्थेचा शोध करू शकतो किंवा घेऊ शकतो .मनोधर्माचा शोध म्हणजे धम्म विषयक
अंगाचा शोध होय .मनोधार्माचा शोध घेत घेत त्याचे मर्म जानने हे होय.मन हे कांही
भाजी पाला नसून लवकर टोपलीत येण्याची बाब नाही .म्हणजेच विकात घेण्याची बाब हि
नाही .याच मानला प्रश विचारत दूरवर घेऊन गेले कि तिथे एक अशी अवस्था येते कि ,त्याचा
परिपाक विपस्सनेमध्ये होतो.
सुरुवातीला आपल्या मनात काय चालले आहे ते कळत असताना आपण
सुखी का दुखी हे ठरवत असतो .एक वेळ अशी येते कि हीच अस्वस्था जवळून पाहण्याची संधी
प्राप्त होते.पण या अनुभवास आपण नाव देऊ शकत नाही ,जसे जसे मनाचे कोडे उलगडत जाते
तसे तसे मन आणि मनातील अनुभव सखोल होत जातो .
जेंव्हा खरे
स्वरूप कळण्यास सुरुवात होते तेंव्हा मनामध्ये निर्माण होणारे स्वरूप अनित्य आणि
बदलाव घडउन आणणरे आहे हे आपण स्वतः अनुभवतो .आणि त्याची प्रचीती आपणास येण्यास
सुरुवात होते .
आता आपली
स्तिथी अशी येत कि मनातील एकण -एक बाब शून्य आहे असे जाणवते .हि स्तिथी
प्रतीत्यसमुत्पादानुसार निर्माण होत आहे हे लक्षात येते ,मग मन हे एक वास्तविक आहे
हे जाणतो तेंव्हा आपण धर्म्विविचय किंवा विपास्सनामय होतो .खर्या अर्थाने इथे तीपिटकातील
अभिधम्म (तसे पाहता थेरवादातील सुत्तपिटक
आणि अभिधम्मपिटक या दोन्ही ग्रंथाचे विषय एकच आहेत, या दोन
ग्रंथात फरक इतकाच आहे की,
अभिधम्मपिटकातील ग्रंथाची माहिती अधिक सविस्तर, रुक्ष व पांडित्यपूर्ण
आहे. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होत. अभिधम्मपिटकात
एकंदर सात ग्रंथ मोडतात.(अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे. ) मन अस्तित्वात येत
असल्याचा भास निर्माण होतो ,कारण अभिधाम्मात मनाचे संशोधन करता यावे म्हणून त्यात
चैत्यधम्माच्या याद्या करून दिलेल्या आहेत.
चैत्धर्म ..म्हणजे यात प्रत्येक चीत्तक्ष्णामध्ये विविध घटकांचा समावेश
झालेला असतो ,आपले मन बाह्य जगाशी कसे जोडलेले आहे हे चैत्य्धर्म दर्शवतात ,एवढेच नसून बाह्य मन आणि अंतर मन याचा कुठे संयोग होतो
का ते शोध चालू असतो.आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि त्याची मानत होणारी जाणीव हे
चैत्यधर्म होय.जाणीवेच्या नजरेतून पहिले तर बाह्य मन आणि अंतर मन हे वेगळे आहेत
याची जाणीव सतत होत असते.म्हणून चैत्यधर्म समजण्यासाठी ती जाणीव होणे हे गरजेचे
असते.
चैत्यधर्म पहा एका निर्देशकासारखा असतो , उंटावर
किंवा एखाद्या वाहनावर आरूढ होऊन आपल्या
साथीदारांना आदेश देत असतो ,पण स्वतः त्याचा त्यात हिस्सा नसतो. आदेश देणारा हा
चित्त तर एक एक सातीदार हा चैत्य्धर्म होय.जरी त्याचा त्यात सहभाग नसला तरी त्याचे
तिकडे लक्ष मात्र सतत असते.
चैत्ययादी मधील पाच धर्मातील एक
म्हणजे ‘स्पर्श’होय .मनात घडत असलेल विषय हे संपर्कात सामावलेले आहेत. विषयाला संपर्कात महत्वाचे
स्थान आहे ,मन आणि विषय यांचा संपर्क नसेल तर चित्त हि उपस्थित नसते .इद्रीयाशी
आलेला संपर्क आणि चित्त हा चित्तातील मुख्य विषय आहे .जिवंत इंद्रियात विषय
निर्माण होत असतात .म्हणून ते इंद्रिय सतत जिवंत असायला पाहिजे .उदा.आपण झोपलेले
आहोत आणि कोठून तरी आवाज कानी येतो ,पण तो कश्याचा आवाज आहे किंवा कोठून येतो ते
कळत नाही ,झोपेत असताना तो आवाज आणि त्याची जाणीव होणे,पण तिथे आपले चित्त उपस्तीत
नसते .तेंव्हा ते अनुभवावे लागते .यालाच लक्ष असे हि म्हणावे लागेल .इथे ऐकणे आणि
लक्ष द्या असतला भाग होतो .
आपण एकाद्या कुत्र्याचे उदा घेऊ रात्री च्या वेळी कुत्रा जमिनीवर लोळत पडलेला
असतो ,तो झोपेत नसतो पण कानी कांही आवाज आला कि एक कान वर उचलून मागमूस घेत असतो
आणि परत दोन्ही कान सरळ करून झोपी जातो तो त्या आवजाची किंवा वस्तूची खात्री करून
मगच झोपी जातो किंवा लोळत असतो .
अश्या प्रकारे आपले एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित होत नाही तोवर दुसरी तिसरी
वस्तू आपल्या लक्ष्यात येते ,आणि मनात सुखद ,असुखद वेदनांचा अनुभव सुरु होत असतो हाही चित्ताचा
मुख्य घटक आहे .मानवी वेदना या मानसिक
अनुभव आहेत ,त्या शरीराने अनुभवता येत नाहीत ,त्या मानाने अनुभवाव्या लागतात
.मनाच्या द्वारे मानसिक वेदना अनुभवता
येतात तर पंचइंद्रिया द्वारे शरीराच्या
वेदना अनुभवता येतात .सुखद आणि दुखद अश्या
दोन्ही वेदना आपण अनुभवत असतो .मानवात वेदना निर्माण करणारा सर्वात महत्वास चैत्यधर्म
आहे .
वेदनेतून मानवात जागृत भाव निर्माण होतो ,म्हणून वेदना हि सर्वात महतवाची
चेतना म्हणावी लागते .
भौतिकचक्रा नुसार पहिले तर आपल्याला हे लक्षात येईल कि जेंव्हा आपण एखाद्या
वेदनेला प्रतिकार देतो तीच आपली ‘तृष्णा ’ होय म्हणून बर्याच वेदना ह्या
प्रतेक्ष्यात शरीरीरात सुप्त अवस्तेथ असतात .म्हणून आपल्यात असलेली वेदना आपण
स्पस्ट पहिली पाहिजे .
चित्ताचा गुणधर्म ओळखण्याची संज्ञा
हि जाणून घेणे महत्वाचे आहे .एखादी गोष्ट जाणून घेण्यास आपण उत्सुकत असतो ,त्याचा
अनुभव घेतो आणि त्याकडे आपण लक्ष देतो ,त्यामुळे आपल्यात विशिष्ट अश्या प्राथमिक
वेदना निर्माण होतात ,पण त्या वेदना कश्याच्या आहेत ते आपणास पूर्णतः माहित नाहीत
,थोडक्यात इथे क्रमाने कार्य होत नाही .कारण कि वेदने पूर्वी ‘संज्ञा’ पण उत्पन्न
होऊ शकते ,किंवा उपस्थित असू शकते.त्या वेदनेचा गुणधर्म समजला कि एखाद्या गोष्टीचा
संबंध पुर्वानुबावाशी करीत असतो. नंतर ती वस्तू किंवा विषय आहे असे ठरवतो .एखाद्या
दूरवर ठिकाणी आपणास विशिष्ठ वस्तू असल्याचा भास होतो ,त्यास पूर्ण पाहिल्यावर आपण ठरवतो कि तो कावळा
आहे त्याचा रंग काळा आहे ,त्यास चोच आहे
आणि दोन पाय आहेत ,तो कावळा म्हणून जेंव्हा ओळखतो
तो त्याचा गुणधर्म म्हणून ओळखतो .कधी कधी एखादी वस्तू ओळखून खुश होतो ,पण
तो अनोळखी निघाली कि आपण जीभ तरी दाताखाली चावतो ,किंवा डोके खाजवतो आणि आपली चूक
काबुल करतो .यालाच आपण ‘संज्ञा’ असे म्हणतो. सभोवतालचे जग आपण नेहमी ओळखतो आणि
त्याचे वर्गीकरण करतो ,त्यास संज्ञा असे
म्हणतो. जशी आहे तशी ओळखणे हे होय ,आणि ती
आनित्य आणि दु:खमय आहे .
जेंव्हा आपली विषयानुरूप हालचाल असते तीच ‘चेतना’ होय .चित्त हे नेहमी नवीन-
नवीन हालचालीकडे धावत असते .ते कधी हि स्थिर नसते .नेहमी हालचाल करणारे चित्त हे
निश्चित दिशेने पुढे सरकत असते .’पाच चैत्य’ हे चित्ता चा पाया आहे .
एक स्पर्श ,दुसरा मनसकार,तिसरी संज्ञा ,चौथी वेदना आणि पाचवा आणि अति
महत्वाचा घटक चेतना या पाच बाबी कधी हि वेगळ्या करू शकत नाही ,त्या एकमेकात एकरूप
असून प्रतेकासोबत असतात.याच पाच गोष्ठी खऱ्या
ध्यानाचा पाया आहेत.
‘छंद’ उराशी बाळगून दृढ निश्चय केला
किंवा निर्धार केला कि त्या विषयात आपण
सातत्याने लक्ष केंद्रित केले कि आपला संकल्प पूर्ण होतो . बरीच लोक या पाच
गोष्टीचा मेळ घालत नाहीत म्हणून ते पूर्णत्वाला जात नाहीत .त्या साठी छंद असणे हे
मुळचे कारण होय .स्मृतीला एकत्र आणणे हे फक्त छंदा मार्फत करता येते. ध्यान करीत
असताना आपण कुठेतरी असतो ,म्हणजे छंद आहे पण कुठे तरी भटकत असतो याचा अर्थ असा कि
स्मृती नसते .स्मृती चा अर्थच असा आहे कि विखुरलेले घटक एकत्रित करणे होय .
आपल्या कडे छंद असेल ,आणि स्मृती पण
असेल ,तेंव्हाच आपण समाधी कडे जाऊ शकतो .आपल्याला पाहिजे तेथे मन एकाग्र ठेवणे
म्हणजे ‘समाधी’ होय .स्वसनाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणे ,मग समाधीतून आपण ‘प्रज्ञा’ कडे जातो .तसे पाहता
समाधीच प्रज्ञा कडे घेऊन जाते .मन एकाग्र होते आपण जाणतो आणि ओळखत असतो .थोडक्यात
आपणास खर्या स्वरुपाची माहिती होते .आपण ‘सत्य’ जाणतो ,कसलीच शंका उरत नाही
त्यालाच विपस्सना असे म्हणतात.
हि ‘साधना’ केवळ आणि केवळ बुद्धाना प्राप्त झाली होती...
सिद्धार्थ
वयाच्या सात वर्षापासून मनाच्या शोधात होता आणि त्यानेच एकट्याने मनाचा शोध लाऊन
बोध हि करून घेतला होता हे जगश्रुत आहे .
शनिवार २८,मार्च
२०२०
Monday, August 2, 2021
१०० स्मृतिशताब्दी: अण्णा भाऊ साठे .
वट्टपोतक_जातक_चर्या
वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...
-
नात्यात लग्न एक अभिशाप दिनांक : १७-०४-२०१७ नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक ...
-
दलाली दिनांक : शुक्रवार २०, जून २०१८ दलाली म्हंटल की कित्तेक लोकासमोर परिस्तिथी जन्ने विदिध लोक डोळ्यासमोर दिसतात ,मग बाजार असो ...
-
. हाळी-हांडरगुळी जनावराचा जंगी बाज़ार : २०/११/ 2017 तालुका उदगिर ज़िला लातूर हे मराठवाड़ा विभागातिल बैल बाजारासाठी प्रशिद्ध ...
-
भारतीय शिक्षण प्रणाली बर्याचदा आपनास एखादे आव्हान भेडसावत असते आणि एखादा गहन प्रश्न पडतो उदा : राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (एनसीएफ)...
-
अंधश्रद्धा एक अभिशाप २१/११/२०१७ -२३/११/१७ -29/११/२०१७ .final correction on 08/12/2017 “आई ! आज शनिवार आहे न ग .रस्त्यावर लिंबू मिरची...
-
दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि एस एस सी...
-
शेंगा उकरायला येता का ? भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज ...
-
भल्या पहाटे आम्ही झोपेत असताना बारीक स्वरात माली पाटील मांगवाड्यात हळू आवाजात नासिकेतील स्वरात आवाज करीत असायचा आणि आमची झोप मोड व्ह...
-
स्पर्श एक एहसास है जो बचपन से लेकर अंतिम सांस तक सचेत रहता है। पहला स्पर्श माँ से होता है , जन्म के तुरंत माँ अ...