Friday, May 29, 2020

महाकवी वामनदादा कर्डक.

महाकवी वामनदादा कर्डक /बी आर antWork

महाराष्ट्रातील  सुप्रसिद्ध लोककवी,गीतकार ,शाहीर, थोर विचारवंत. आपलं संपुर्ण जीवन समता आणि आंबेडकर चळवळीसाठी बहाल केलेले कविश्रेष्ठ वामनदादा कर्डक यांचा आज स्मृती दिन .

१५ ऑगस्ट १९२२ ते १५ मे २००४ हा या वादळवाऱ्याचा जीवनपट..एकूण ८१ वर्ष ९ महीने मिळालेले जीवन सार्थक करून अख्या बुद्धजणांना एका गीतात वेड लाऊन गेलेला महाकवी वामनदादा कार्डक .

लोकांच्या मनीमानसी जे गीत जनमानसात वार्‍यासारखे पसरले आणि ठसविलेले गीत म्हणजे....

" उद्धरली कोटी कुळे,भीमा तुझ्या जन्मामुळे ".

सुरुवातीला चित्रपटाला लोकप्रिय गीते लिहून देणारे आणि हे आपले क्षेत्र नाही, ही सजगता ठेऊन पुढील संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीला अर्पण केले आणि समततेकडे वळले.  

हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला.”  हे सांगते ऐका (निर्माता, निदेशक अनंत माने -१९५९)या चित्रपाटातील गीत आणि चल गं हरणे तुरु तुरू, चिमण्या उडती भुरुभुरूपंचारती (निदेशक दत्ता माने -१९६०) या चित्रपट गीताने महाराष्ट्राला वेढ लावले होते.

आपल्या प्रतिभेला प. पू .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाची जोड देऊन ...

" मनमें उजाला करनेवाला

सुरज हमने पाया है ।

सौ सुरज की किरने सारी

एक ही आंबेडकर में है ।"

वामनदादांच्या  कविता म्हणजे सर्वांगसुंदर जगण्याची कविता आहेत .याच्या कवितेने आंबेडकरी चळवळीतील समता आणि संघर्शित कार्यकर्त्यांना खडबडून जागे केले होते . तो काळच क्रांतीचा होता.

·        तुफानातले दिवे....

·        )मला चीड येत नाही, हाच माझा गुन्हा...

·        )भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते..

·        )तुझीच कमाई आहे ग भीमाई..

·        )जेथे समाज सारा हा एकरूप आहे

·        तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे

 

  .... या प्रेरणेचा वसा जीवननिष्ठा आणि समता म्हणूनच पत्करणारे वामनदादा आपल्या कायमस्वरूपी आठवणीत राहतील.

  ... या अनवट आणि अजरामर अशा गीतांनी वामनदादा आपल्या कायम स्मरणात राहतील.. तृष्णेतल्या विभव तृष्णेने मला मरू दिले नाही, या वामनदादांच्या वाक्यात सारेच जीवनदर्शन आले..!

या महाकवीला विनम्र अभिवादन आणि आदरांजली....

 

वामन कर्डकांना मिळालेले पुरस्कार व सन्मान खालीलप्रमाणे आहेत.

1.   दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप.

2.  महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार.

3.  महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे तीन वर्ष सदस्यत्व.

4.  महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व.

5.  औरंगाबाद येथे पहिला भव्य नागरी सत्कार (१९८७).

6.  प्रा. ऋषिकेश कांबळे संपादित पहिल्या लोकशाहीर वामन कर्डक गौरव अंकाचे प्रकाशन (१९८७).

7.  मधुकर भोळे संपादित वामन दादा कर्डक गौरव ग्रंथाचे प्रकाशन (२००१)

8.  प्रा. डॉ. परशुराम गिमेकर संपादित वामनदादा कर्डक यांची गीत रचनालेख संग्रहाचे प्रकाशन.

9.  नाशिकबुलढाणा येथे नाणेतुला’.

10.परभणी येथे प्रख्यात उर्दू शायर बशर नवाज यांचे सोबत वहीतुला. नंतर या वह्यांचे गरीब मुलांना वाटप करण्यात आले.

11. साहित्य, संस्कृती मंडळाची उत्कृष्ट कविरत्‍नही गौरववृत्ती.

12. युगांतर प्रतिष्ठानतर्फे युगांतर पुरस्कार’ (१९९७).

13. जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा संत नामदेव पुरस्कार

14.मुंबईच्या बौद्ध कलावंत संगीत अकादमीचा भीमस्मृती पुरस्कार

15. भोपाळ येथे ताम्रपट मिळाला..

16.भुसावळ येथे चांदीचे मानपत्र मिळाले.

17.हिंगोली जिल्ह्यातील बसमत येथे संजय मोहड यांनी आयोजित केलेल्या स्वरार्हत संगीत संगीतीया कार्यक्रमात नागरी सत्कार आणि गायन

18. मराठवाडा अस्मितादर्श पुरस्कार

 

या महाकवीला विनम्र अभिवादन आणि आदरांजली.... ( संदर्भ: माझ्या जीवनाचं गाणं ,आत्मकथन.. शब्दांकन- प्रा.रविचंद्र हडसनकर, आंबेडकरवादी महागीतकार वामनदादा कर्डक: डॉ.यशवंत मनोहर)

,आणि विकिपेडिया मराठी )

प्रा.बालाजी शिंदे.

9702158564

balajishinde65@gmail.com


बुद्ध साहित्य का वाचावे ?

13May2020

बुद्ध साहित्य का वाचावे ?/बीआरantWork

भगवान बुद्धाने उपदेशिलेला धम्म त्यांनी नव्याने शोधून कढला नसून ती तत्वे कोणत्याही सुज्ञ व्यक्तीस जाणून घेण्याजोगी होती असा बौद्ध परमपरेचा विकास आहे.

........... #दिघनिकाय भाग १ ( अनुवादक : वसंत धावरे )

बुद्ध साहिती हे भूमिहीन शेतमाजुरा सारख्या कनींगी प्रमाणे आहे . हे साहित्ये जो  वाचेल तो बुद्धिवंत ,विचारवंत आणि सुज्ञ होईल .

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात ( मराठवाड्यात ) ज्वारी साठवून ठेवण्यासाठी एक कारव्या पासून किंवा ओल्या तुराट्या पासून एक #कनिंग तयार करीत असत त्या गोलाकार कनिंगला शेणाने लेप देऊन उन्हात सुकून झाल्यावर त्यात कुटुंबाला वर्षभर पुरेल येवढी ज्वारी भरून ठेवत .कनिंगेला एक समांतर छोटे छिद्र ठेवलेले असायचे आणि त्यात छिद्र बंद करता येईल असे वस्त्र कोंबून ठेवत . गरजे प्रमाणे लागेल तेवढी ज्वारी काढून घेत असत.यातील धान्ये वर्षानी वर्ष खराब होत न्हवते की #वाळवी लागत न्हवती . यात एक टन ज्वारी बसेलअसे मोठ मोठ्या डेरेदार आणि गोलाकार कनिंग तयार करीत होते . उदा:दाखल सांगायचे झाले तर आपल्या घरातील पाणी पिण्याची टाकी असे गृहीत धरू या.

 मराठवाड्यात ही धान्ये किंवा ज्वारी साठवण्याची प्रथा येंशी च्या दशकापर्येंत अस्तीत्वात असावी ? कारण या भागात कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यांची माथी मारलेले . म्हणून त्या वेळी अधिक महत्व असावे .

      बुद्धांचे साहित्याचे तसेच आहे .राजा अशोकाच्या काळात ई सन ३ ऱ्या शतकात पहिली संगीती पर्येंत हे टिपिटक अश्याच स्वरुपात तीन पेटाऱ्यात बंदिस्त होते ,यात #अभिद्धम्मपिटक ,#विनयपिटक आणि #सुत्त्पिटकाचा समावेश होतो .

थोडक्यात एका बाजूला जगभरातील धार्मिक ग्रंथ आणि दुसर्या्  बाजूला बौद्ध साहित्ये ठेवली तर बुद्ध साहित्याची तुलना होऊ  शकत नाही ,म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध साहित्यांचा बारकाईने आणि सखोल अभ्यास करून ,#धम्मप्रवेश केला होता, त्या साहित्याचे आणखी एक महत्व असे आहे की , हे साहित्य एकतर कोण्या  अवतारी ऋषि ची देन नाही ,तर एका महमानवाचे सूत्रबद्ध आणि मानवी कल्याण आणि समतेचे साहित्य आहे . म्हणून बौद्ध साहित्य एक एक  वाचून बुद्धाने सांगितलेल्या समतेच्या शिकवणीला शरणजावे ,#सत्ये जाजून आपला ‘#विवेक आणि  ‘#चेतना सतत जागृत ठेवाव्यात.

प्रा.बालाजी शिंदे.

9702158564

balajishinde65@gmail.com

 


पळस आणि पांगारा

  पळस आणि पांगारा  पळस :  फ्लेम ऑफ फॉरेस्ट ( पळस ,पिवळा ,काळा आणि पांढरा रंगात पाहावयास मिळतो )   ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्प...