About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Thursday, June 17, 2021

आगरकर ,गोपाळ गणेश

*‘देव आकाशतून आले ते परत कधी गेलेच नाहीत?’*
                                                --थोर  समाज सुधारक : गोपाल गणेश आगरकर . 
बुद्धिवादी दृष्टीकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांना फाटा देऊन रूढीवादयावर त्या काळात अंधश्रद्धा गाठीशी धरून कार्य हाती घेणारे कर्ते या यादीत यांचे वरचे स्थान म्हणायला हरकत नाही . धर्म वेड्या लोकांवर  कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या आणि विज्ञान या  निकषांखेरीज अन्य कोणताही निकष त्यांना मान्ये न्हव्ते . 
याच मूळ कारणाने  थोर समाज सुधाकर होत . आज यांचे पुन्ये स्मरण . त्यांचे देवा विषयी ठळक मत होते . नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती.
नितीमत्ता हा त्यांच्या विचारसरणीचा पाया होता . परोपकार, सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती. बुद्धिवाद,आणि त्याचे मूळ हे  व्यक्तिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या सप्त:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे.
महान व्यक्ति चे स्मरण का करावे त्याचे मूळ कारण त्यांनी समाज विकास व  समाजाची केलेली प्रगति आणि त्यांनी केलेलं ‘समतेच’ कार्य याचा धागा धरून स्त्रिया साठी केलेलं समतेचे विचार हा मूळ गाभा होय तेच थोर पुरुष या नामरूपाला शोभून येतात . 
यांना पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर तीळमात्र  विश्वास नव्हता. येवढेच नसून वेदांनी निर्माण क्लेले चार वर्ण ही मान्ये न्हवते ,या  चातुर्वर्ण्य, जातिसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह, ठरवून केलेले विवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. 
मुला-मुलींस समान आणि सक्तीचे करण्यावर त्यांचा भर होता .  शिक्षण हे कौशल्याधारित असावे . शिक्षण हे अभ्यासक्रम व व्यवसायाभिमुख असावे त्याने पुढील काळात त्यांना त्या त्या ठिकाणी कामात तिथे मदत होऊ शकते यावर ते अडून होते . शिक्षनात आचारांचे निर्मूलन करावे. सदाचाराचा प्रसार करावा,बाल वयात मुलात  ज्ञानवृद्धी करावी, मुलांना सत्य शोधकी करण्यावर  भर होता . 
 शिक्षनात नीति मूल्ये जपून  संयमी जीवनामुळे लाभणारे मानसिक  समाधान या होईल असे करावे . 

मानवी जीवनात व्यक्तिस्वातंत्र्यामुळे किती फायदा आणि लाभ होतो ते ठाम पणे सांगत . स्वार्थ आणि स्वैराचार हे समाज हितास कसे बाधक आहेत ते नेहमी म्हणून दाखवत . समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच व्हावी , असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती. 
समाजातील परंपरेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता; त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. कारण ‘जुने गेले मरणा लगुणी’ असे त्यांचे मतं होती . जुन्या रूढी ,परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या सरकार च्या  मदतीने कायदेशीर रीत्या नाहीशा कराव्या, यावर ते ठाम होते.
 ---“ज्या देशातील हजारो पिढ्यांनी अनेक गोष्टीत मोठ्या कष्टाने केलेल्या अनेक सुधारणांचे फळ आपणास आयतेच प्राप्त झाले अशा अनेक देशांतील धर्मांचा, रितीरिवाजांचा व लोकांचा सर्वथैव त्याग करणाऱ्या मनुष्यास खऱ्या सुधारकाची पदवी कधीही शोभणार नाही”, हे त्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहे. (मराठी विश्वकोश – वीरकर )
या देशात केवळ धर्मच नव्हे, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सारासार विचार करून आंधळेपणाने गतानुगतिक वर्तन नाकारून जाणीवपूर्वक योग्य त्या मार्गाची निवड करण्याचा पुरस्कार करणारे आगरकर बुद्धिवादी संत किंवा देव न मानणारे व्यक्ति न्हवते .
खरा मुदा इथे येतो ते असा की बाळ गंगाधर टिळक ( २३ जुलाई १८५६ - १ अगस्त १९२०)यांचे सोबत चे दिवस आणि त्यांच्या पासून वैचारिक मतभेत झाल्यावर निरखून पारखून निघलेले आगरकर (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५) हे कितीतरी पटीने पूर्वी पेक्षा ‘समाज सुधारक’  मतवादि आणि खरे सुधाकर ,म्हणजेच ‘कर्ते सुधाकर’ दिसून येतात ते जीवनाखेर प्रवसा असेतोवर  .  
यांचे विचार तत्कालीन अंधश्रद्ध सामान्यांना समजले नाहीतच. तथापि टिळकांसारख्या सुशिक्षित आणि चिंतनशील व्यक्तींचाही त्यांना पाठिंवा मिळू शकला नाही. हेच यांच्या विचारांचे दुक्ख होय.  
कारण यांना देशा अगोदर समाज आणि समजतील एक एक व्यक्तीचा विकासा अगोदर हवा होता . त्यांचे  लक्ष  जनहित होते . ‘सुधारक (१८८८)’ हे त्यांचे चळवळीचे अस्त्र . त्यांनी चळवळी चे अनेक लेख लिहले या लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. यवढेच नसून खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे आदी प्रकार झाले. अश्या धमक्यांना ते डगमगले नाहीत . ते नेहमी ठणकाउन सांगत की ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, हीच करणे घेऊन किंवा या  भूमिकेतून ते नवे गोपाळ गणेश आगरकर म्हणून उदयास आले . त्यांची याच वेळी बाळ गंगाधर टिळक यांच्या  सोबतची मैत्री ही संपली . 

सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आपल्या हयात असे प्रयंत  चालू ठेवला. ‘सुधारका’ तील अनेक  लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या अनेक  अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते होते . 

स्त्री पुरुष राहणीमन समान असावे आणि त्यांचे पोशाख त्यांच्या आवडीचे असावे असे यावर त्यांचा भर असे . यांनी बर्‍याच  लेखांतून येथील सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या रूढी परंपरा ,शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार केले होते याला इतिहास साक्षी आहे .
समजाच्या उन्नतीसाठी प्रथम व्यक्ति स्वतत्र्य त्यांना अभिप्रेत होत . त्यांना देशाबादधल ही खूप आदर होता हे ही अधोरेखित करण्यासारखे आहे .  
आगरकर ,फुले आंबेडकर ही थोर माणसे ज्या प्रकारे द्वंद्वात्मक परिस्तिठीत सापडली होती , ती ओलांडून आज पुढे आलो आहोत . अशावेळी त्या नेत्यांनी जे योगदान केले त्या विषयी कृतज्ञ असण्याएवजी ‘ अमक्याने तमुक का केले नाही ?’ तमक्या वेळी आमका कुठे होता ?’ असले प्रश्न उपस्थित करून त्यावर निर्थक वाद घालत बसणे ही आत्मवंचना तर होईलच ,परंतु ते आपल्या जाणिवा प्रगल्भ पुरे नसल्याची खूण ठरेल .( सदानंद मोरे ,लोकसत्ता ,एकमेव लोकमान्ये –पा -४३ )
मानवी मनाला सत्सत विवेक बुद्धीला ओळखून मानव सेवा ,समता,स्वातंत्र्य  आणि बंधुता या विचाराने प्रेरित होऊन अखेर प्रयंत त्यांनी  कार्य केले . 
आज त्यांचे स्मृतीस अभिवादन !

*प्रा. बालाजी रघुनाथराव  शिंदे.*

Monday, June 7, 2021

लसाकम चे प्रबोधन

मा बालाजी शिंदे साहेब ,काल दिनांक 6 जून ला तुम्ही विषयाची सुंदर अशी मांडणी केली ,त्याबद्दल तुमचे अभिनंदन 
समाज मंदिर,आणि विहार यामधून शिक्षण कसे देता येईल ,यांचे सुंदर नियोजन तुम्ही मांडले ,
प्राथमिक शिक्षण जेवढे सक्षम रीतीने होईल ,तेवढीच पुढची पिढी सक्षम आणि परीपक्व निघण्यास मदत होईल ,
आज ग्रामीण भागात मातंग समाजाचा विचार केला ,शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे ,
10 वि पर्यंत येता येता सर्व मुले ड्रॉप होतात ,
लोकसंख्येचा विचार जर केला तर ,एक टक्का सुद्धा विद्यार्थी 10 वीच्या पुढे शिक्षण घेत नाही ,
ही अवस्था खूपच वाईट आणि समाज उन्नतीच्या दृष्टीने दयनीय आहे 
डॉक्टर बाबासाहेब यांनी आपणास ,शिका ,संघटित व्हा ,आणि संघर्ष करा ,ही त्रिसूत्री आपणास दिली ,
पण या सूत्राचा विचार आपल्या समाजाने केला नाही ,या सूत्रा पासून आपण दूर राहिल्यामुळे आपला समाज खूप मागे राहिला 
ज्यांनी या सूत्राचा अवलंब केला तो समाज वेगाने पुढे गेला ,
महार समाजाने बाबासाहेब यांनी दिलेल्या सर्व सूत्राचा स्वीकार करून आज उच्च कोटींची पात्रता त्यांनी स्वतः मध्ये निर्माण केली आहे 
कोणे एके काळी महार समाजाची आणि मातंग समाजाची अवस्था एकच होती ,
पण आज काय चित्र दिसते ,महार समाज हा मातंग चे तुलनेत खूप पुढे गेला आहे ,ही जादू केवळ बाबासाहेब यांनी सांगितलेली त्रिसूत्री त्यांनी अंगिकरल्यामुळे झाली ,
आपला समाज केवळ शिक्षणा मुळे मागे राहिला 
आता आपण महार समाजाची बरोबरी कधीही करू शकत नाही ,
आपला समाज शिक्षण न घेता ,आणि बाबासाहेब यांनी दिलेल्या अनेक सवलतीचा लाभ न घेता ,केवळ द्वेष भावनेने महारांचा विरोध करीत आले आहेत ,आणि आजही तेच करतात ,
मांग लोकांना बाबासाहेब आणि बुद्धावर सांगितले तर ते ऐकून घेण्याचे मनस्थितीत नसतात ,ते म्हणतात तेवढे सोडून बाकीचे बोला ,असे म्हणतात ,काय म्हणावे त्यांच्या या आद्यनाला ,
1980 ते 1990 या काळात  
मातंग समाज अण्णा भाऊ मुळे आंबेडकरी विचारा कडे वळत होता ,परंतु येथील मनू वादी लोकांनी ,काही मांग पुढारी याना हाताशी धरून ,आणि त्यांना लालूच देऊन ,मांतग समाजात दुफळी निर्माण केली ,आणी 
समाज फोडला ,त्याची परिणीती ,जे लोक आंबेडकरी विचारा कडे वळत होते ,आणि तशी सुरुवात झाली होती ,त्याला मनू वाद्यांनी खिंडार पाडली ,
त्यामुळे केवळ काही घर भेदी ,पुढारी यांच्यामुळे समाज दिशाहीन झाला आणि समाजाचे मोठे नुकसान झाले ,
शिक्षण हे फार महत्वाचे आहे ,शिक्षणाने च समाजाचा विकास होणार आहे ,
शिंदे साहेब धर्म ही बाब खूपच किचकट आहे ,तिची चिकिसा करणे आणि त्यांचा अभ्यास करणे या गोष्टी मांग लोकांना सध्या तरी कळणे अशक्य वाटते ,म्हणून आपण आता फक्त आणि फक्त केवळ शिक्षण या विषयावरचं मंथन करने उचित वाटते ,
कारण एकदा शिक्षण झाले तर समाज आपोआपच धर्म चिकिसा करेल ,आणि आपले शत्रू आणि मित्र कोण त्यांना कळे ल ,
आपण केलेल्या सूचनांची आता अंमलबजावणी कशी करता येईल त्या दृष्टीने आपण महासंघामार्फत सर्वांनी प्रयन्त करू या 
आपले अध्यक्ष सुजाण आणि या बाबती मध्ये सक्रिय आहेत ,
त्यामुळे आपण मांडलेल्या विषया नुसार ,समाज मंदिर ,आणि विहार ,यामधून 
मुलांना चांगले शिक्षण ,आणि चांगले संस्कार कसे देता येईल या दृष्टीने आपण सर्व जण मिळून प्रयन्त करू या 
पुन्हा एकदा आपले हार्दिक अभिनंदन ,
असेच महासंघाला मार्ग दर्शन करणे ,चालू ठेवा ,आणि योगदान पण असू द्या ,
धन्यवाद 
आपला 
दिगंबर मण्यार 
औरंगाबाद 


मा. मानियर सर ,आपण रविवार दिनांक ०६ ,जून २०२१ रोजी लसाकम महाराष्ट्र  द्वारे आयोजित  घेण्यात आलेल्या *माता रमाई स्मृति दीनांनीम्मित्त  - प्रबोधन शिबीर मालिकेत माझे “समाज मंदिर व विहरातून शिक्षणाचा प्रसार "*  हा विषय घेऊन माझ्या अल्पश्या बुद्धिला झेपेल अशी झेप घेत मातंग समाजातील शिक्षण आणि ते लयास गेलेली मरगळ ,पुन्हा कशी उभी करता येईल याची कारण मीमांसा आणि त्यावर करण्यात येणारी उपाय योजना व व्यवस्था यावर माझा विचार  विशद केला होता .
सध्य स्टीतिथ असलेले विहार आणि समजमंदिर याचा संदर्भ देत विहरातून “बाल शिक्षण याची सुरुवात काशी करता येईल हे संगत असताना ,विहारातून भिकखू संघाने ज्ञान प्राप्ती ,ज्ञांनार्जन  करून एकएक भिकखू ने संघ कसा  मजबूत केला हे जुळते मिळते उदाहरण देत तेच काम लसाकम पुढे कारेल  असे मी अश्या व्यक्त केली .तथागताने दिलेली “शुद्ध आचारणाची शिकवण “ हा मूळ बुद्ध धम्माचा (शिकवणीचा) रस लहान वयात किंवा बालमनावर वयाच्या ५ वर्षाच्या आत जर संस्कारित शिक्षण दिले तर पुढील शालेय शिक्षण घेत असताना त्या बालकास उपयोगी होतील असे माझे मत होते . जगातील कोणतेही बाळ मातृभाषेच्या आधारवरा ( Mother tongue is very important for  Development ot Speech and Language in a critical age. The Critical  age  is most supported tool in entire life of the child “Village Naughty boy  BR Shinde p.21 ) पुढील शिक्षणाची ऊंची गाठते. 
मग घराबाहेर फिरती मुले ,शाळा बाहये आणि शाळेत न जाणारी किंवा मधेच शाळा सोडलेली मुले यांना संगत करून समाज ‘मंदिर व विहरतून’ शिक्षणाचे धडे का देण्यात येऊ नये असे आज मला वाटते . 
या *विहार आणि मंदिर* माध्यमांचा उपयोग करून मुलांत शिक्षण गोडी निर्मित केंद्र का बनू नये असे मला सदैव वाटते . आजच्या अन्र्तराष्ट्रीय शिक्षण प्रणालीत आपली मुले का तग धरत नाहीत ? . पूर्वी शिक्षण घेऊ देत न्हवते ,आज मोफत शिक्षणाची दवंडी पेटत किती महाग केले आहे यावर विचार करण्यात यावा. त्यांच्या शिक्षण प्रक्रियेला कुठे *उट्टी* लागली आहे हे आजच्या धुरीनाणी विचार करून ती *उट्टी* काढणायचे कष्ठ उपसावे अशी माजी विनंती आहे . सांगणायचे तत्पर्ये सामाजशिक्षित लोकांनी संघट्ंना  ,मोर्चे ,जयंती या कार्याला न गुंतवता त्यांना शिक्षणाची ओढ कशी लागेल असे अंनुंबंध अनुबंध करावे . 
बोलत असताना माता ,रमाई ने डॉक्टर बाबासाहेबांना काशी साथ दिली आणि महामानव कसे उदयास आले याचे उदाहरण देऊन ,शिक्षण न घेतलेली व्यक्ति ही *धोंडा* असे सावित्री मायी यांच्या शिक्षणाची व्याख्या मला सांगता आली . 
आपण आणि आपला समाज आज कोणत्या गर्तेत उभा आहे हे विषाद करावे लागले . आज आपण ज्या धर्मात आहोत तिथे आपला विकास कसा खुंटला आहे ,अजून आपण त्या पद्धतीचा का भाग महणून जगतो आहे असे मला वाटते . सोबतचा सकखा भाऊ अंतराष्ट्रीय स्थावर कार्यरत असताना आपण अजून गाव आणि जात समाज सोडलेला नाही अशी माझी खंत आहे . कोणी जैन तर कोणी येशू छायेत जगतो आहे . एक उदाहरण द्यावेसे वाटले ते असे ,एक मांगाची बाई एका रस्त्याने जात असताना तिला भिंतीवर एक बुद्धाची पेंटिग दिसली तेंव्हा पदर पुढे करत ठुमका मारत पुढे गेले आणि कांहीच अंतर पार केली तर तिला एका झाडाखाली एक शेंदूर लावलेला दगड दिसला तिथे पदर बाजूला सारून तिथे खाली वाकून नमस्कार करती झाली . हे कशाचे ध्योतक आहे या वर विचार करावा . 
एके ठिकाणी आगरकर म्हणाले की ‘देवाची कल्पना माणसाचीच’ . “आकाशातून देव येथे कधी आले नाहीत, येथून परत कधी गेले नाहीत .हे आपल्याला माहिती असताना हे बिनदीककीत सोपस्कार करतो आहोत आणि मातंग समाजाने आपले कुळ दैवत अजून शाबूत ठेवले आहे या सारखे समाजाचे दुक्ख काय वेगळे असू शकते ?
लसाकम च्या संपूर्ण पदाअधिकारी वर्गांना अशी विनंती केली की आप -आपल्या विभागातील विहार आणि समाजमंदिरातून *बालशिक्षण वर्ग* कसे सुरू करता येतील याची सूची तयार करून आराखडे तयार करून ते कसे राबवणायचे मनसुबे तयार करावे . पण आज मला अशी खंत वाटते की आपल्या कडे विहार असताना सांजमंदिरा ची गरज का भासली ? हा प्रश्न अनुतारीत राहील. 
अश्या आणि अनेक बाबीवर विषय मांडून शिक्षण हे कसे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध बाल वयात देत असताना तथागत बुद्धांचा सदाचार ,आचरण,धम्माचे धडे कमी वयात पाजवून *बालमन सशक्त* करावे यावर अनेक मान्यवर सदस्याने चर्चा केली. 
प्रा बालाजी शिंदे 
राज्य सचिव लसाकम ,महाराष्ट्र प्रदेश .(नेरूळ ,ठाणे मुंबई -४०० ७०६ )

जयभीम !नमो बुद्धाय !!

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...