Saturday, June 27, 2020

राजर्षी : राजा शाहू महाराज

राजर्षी : राजा शाहू महाराज

हिरे ,माणके ,सोने उधळा ,जयजयकार करा

जय राजर्षी,शाहूराजा ,तुजला हा मुजरा !


-सूर्यकांत खांडेकर  

शाहू तेरा मिशन अधुरा बी एस पी करेगी पुरा –कांशीराम

(कोल्हापूर येथे एतीहासिक आरक्षण चळवळ शताब्दी महोत्सव छ.राजर्षी शाहू महाराज जयंती समारोह .)

हिंदुस्तान च्या प्राचीन इतिहासात विश्वमित्र व जनक या दोघांना ‘राजर्षी’ महणून गौरविले गेले होते . त्यानंतर त्या मालिकेत ‘राजर्षी’ ही पदवी विभूषीत करणारे करविर (कोल्हापूर ) संस्थान चे अधिपति शाहू महराज हे होत . कागल चे अधिपति जयशिंगराव उर्फ आबासाहेब यांचे यशवंतराव उर्फ शाहू महराज हे पुत्र.

आखील भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद नागपुर येथे ३० व ३१ मे  आणि १ जून या प्रमाणे तीन दिवस श्रीमहाराज राजर्षी  शाहू छत्रपती ,सरकार करविर यांच्या आदधेक्षेतखाली मोठ्या थाटात पार पडली . 

एकूण १४ ठराव पास झाले त्यात ठराव  ६ वा ठराव  – प्राथमिक शिक्षण मुलांना आणि मुलींना मोफत व सक्तीचे शक्य तितक्या लवकर सुरू करावे असा होता . 

यामुळे सक्तीच्या शिक्षणाचा फायदा  तोपर्येंत  पास झाला न्हवता  तोपर्यंत हे वरिष्ठ  वर्गाचे लोक सरकारला नावे ठेवीत होते ,परंतु १९१७ साली हा कायदा मुंबई इलाख्यात पास झाला आणि सकतीचे शिक्षण सुरू झाले.
 (मुकनायक मुंबई ,शनिवार १५ जून १९२०). 

मागास जातीचा विकास करण्यासाठी तळमळ नेहमी असे . त्या समाजाला नैसर्गिक हक्काची जाणीव निर्माण करून देण्यासाठी पहिले धाडशी पाऊल उचलले आणि याचे परिणाम कोल्हापुरात न्हवे तर अखिल महाराष्ट्रात ब्राह्मण वर्गात खळबळ उडाली . याच काळात महाराजांनी बहुजनसाठी अनेक उपक्रम राबवले.
 
राखीव जागांचा जाहीरनामा
अस्पृश्यता – निवारण कार्ये आणि इतर कार्य अलौकिक आहेत.
 
महाराजांचे शैक्षणिक कार्य –

मा. फुले यांनी मागासलेल्या दिनदलित अश्या बहुजन समाजाला शिक्षणाची संजीवनी दिली आणि समाजक्रांतीचा आरंभ केला . तोच समजक्रांतीचा वारसा  सांगितलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी चालू ठेवला . बहुजन समाज शहाणा कारायचा असेल तर शिक्षणाची गंगोत्रि खेड्यापाडतील गोरगरिबांच्या झोपडपट्टीत गेली पाहिजे . समाज शिक्षित झाल्याशिवाय चांगले काय आणि वाईट काय हे उमजणार नाही शिक्षण दिल्यानेच बहुजन समजाचा सर्वकष उत्कृष्ठ होईल व त्यातून उत्तम शेतकरी ,शिक्षक दिल्यानेच बहुजन उत्तम व्यापारी ,उत्तम सैनिक निर्माण होतील परिणाम सर्व समाज संपन्न होईल. 
आपल्या राज्यातील प्रजाजनास किमान प्राथमिक शिक्षण तरी मिळाले पाहिजे या एकाच ध्यासातून महाराजा राजर्षी यांनीआपल्या राज्यात ८ सप्टेंबर १९१७ रोजी मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जारी केला . एक स्वातंत्र खाते जारी करून ते स्वतः देखरेख करू लागले यात ‘एड्युकेशन डायरेक्टर ’आणि ‘एड्युकेशन इसन्पेकटर’ या अधिकाऱ्याची  नेमणूक केली . जिथे जागा मिळेल तेथे शाळा सुरू केल्या ,समाजातील संपूर्ण वर्गाला या कार्यक्रमात सहभागी केले  . जे लोक आपली मूल शाळेत पाठवत नाहीत त्यांचेवर दंड बसवला आणि तसे कायदे केले  . तीन दिवसाच्या आत मुलांना शाळेत नाही पाठवले तर दंड वसुलीचा कडक कायदा केला . अगदी खालच्या घटकास शिक्षण मिळावे महणून महाराजांनी अविरत प्रयत्न चालवले .त्या काळी शिक्षणासाठी दरवर्षी १ लाख रुपये खर्च करीत होते . इंग्रज सरकार मात्र महाराष्ट्र ,गुजरात आणि सिंध या अफाट प्रसदेशाच्या मुंबई इलाख्यासाठी शिक्षणाचा १ लाख रुपयेही खर्च करीत नव्हते ,हे ध्यानात घेतले की तुलनात्मक दृष्ट्या महाराजचे शिक्षणावरील महत्व लक्ष्यात येते . 
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून महाराजांनी  कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.ज्या आज त्याची फळे चाखत आहेत . 
वसतिगृह हे त्यांचेच नाव जनक म्हणून पुढे येते ,प्रतेक मूल शिकावे म्हणून अनेक वस्तीगुह काढली . अनेक बोर्डिंग ची स्थापना केली ,जातीस शहाणे केले . विविध जातीची एकूण २१ वस्तीगुह स्थापन केली होती . असे वस्तीगुह काढणारे कोल्हापूर हे देशातील पहिले शहर होते . म्हणून कोल्हापूर हे “Mother of Boarding House”  बनल्याचा सार्थ अभिमान महाराजांना वाटत होता . 
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.
स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले.
खास स्त्री शिक्षिका तयार करण्यासाठी ‘female Training School’ वर रखमाबाई केळकर या नेटीव्ह स्त्रीस शिक्षण अधिकारी महणून नियुक्त केले होते . शाळेत आलेल्या मुलींना बक्षिश योजना जारी केली . पहिल्या दुसऱ्या येणाऱ्या मुलीस आपली कन्या आककासाहेब महाराज व भावनगरच्या महाराणी ‘नंदकूंवर’ यांचे नावे परितोषिक ही जाहीर केले . 
स्त्री हक्कांचेही रक्षण केले 
स्त्रियांच्या शिक्षण प्रसारा प्रमाणे त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी व त्यांचेवर होणार्याक अन्याय ,अत्याचार निवारणासाठी विशेष प्रएत्न केल्याचे दिसून येते . 

१९१७ सालचा विधवा –पुनर्विवाह कायदा ,१९१९ चा अंतरजातीय – विवाह कायदा . बालविवाह विरोध ,अशी अनेक कायदे केले .असा राजा आज होणे नाही . 

प्रा.बालाजी रघुनाथराव शिंदे
नेरूळ ,नवी मुंबई -७०६ 

संधर्भ –
समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू छत्रपती – सौ वसुधा ज पवार ,म.इतिहास प्रबोधिनी ,कोल्हापूर .

बहुजन नायक ,रविवार ४ ते ११ अगस्त २००३ ,संपादक कांशीराम .

प्रबुद्ध भारत ,साप्ताहिक बहुजन । हिताय बहुजन सुखाय । 

मुंबई ,शनिवार ता २८ जुलै १९५६ – अंक २३ वा .

बहिष्कृत भारत आणि मुकनायक ,मुंबई ,शनिवार १५ जून १९२० ,२००८ म शा चरित्र साधने प्रकाशन समिति .

राजर्षी शाहू गौरव ग्रंथ ,२०१६ प्रकाशक म. रा.शि. विभाग सचिवालय ,मुंबई.


No comments:

Post a Comment

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...