About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Tuesday, June 2, 2020

दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना

दहावी ची पूर्व तयारी : कर्णबधिर विद्यार्थांसाठी विशेष सूचना

 

दर वर्षी सर्वसाधारण विद्यार्थ्यां सोबत कर्णबधिर विद्यार्थी हि  एस एस सी परीक्षेला बसत असतात ,या प्रवर्गातील मुलांची संख्या  दर वर्षी वाढत चालली आहे . काही मुले विशेष शाळेतून तर कांही मुले सर्वसाधारण शाळेतून परीक्षेला  बसत असतात . तेंव्हा काही गोष्टी ध्यानात घेणं मह्त्वाच आहे . वेळो वेळी महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,पुणे आणि मुंबई मिळून अश्या मुलांच्या परीक्षे संधर्भात परिपत्रिकात बदल करून नवीन परीपत्रक परीक्षे अगोदर एक महिना प्रकाशित करीत असते . आणि त्या मध्ये विशेष मुलांसाठी सवलती जाहीर करीत असते .

 

कर्णबधिर मुलांत  भाषा विषयाचे आकलन कठीण जाते  , किंवा कमी असते म्हणजे त्यांच्या शाळेतील प्रवेशावर अवलंबून असते . शाळेत जर लवकर प्रवेश मिळाला असेल तर योग्ये यंत्राचा वापर करून ऐकण्याची सवय लावून उचित थेरपी देऊन लवकर भाषा विकास साध्य  करता येतो ,आणि उशिरा  शाळेत प्रवेश मिळाला असेल तर भाषा विकासाला खीळ येतो ,अश्या मुलांसाठी खास सवलत द्यावी लागते .आणि ती शासन दरबारी देऊ केली आहे .

 

यात चार भाषेचा समावेश आहे .एक भाषा अभ्यासावी  लागते ,आणि इतर विषय म्हणजे टंकलेखन ,चित्रलकला ,शिवण काम यासारखे विषय घ्यावे लागतात . शास्त्र विषया  ऐवजी शरीर विज्ञान ,आरोग्य व गृह शास्त्र या सारखे सोप्पे विषय घेऊन  एस एस सी परीक्षेला बसता येते . आणि त्यांचा एस एस सी परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा होतो .

 

सदरील  सूचना  राज्यातील सर्व  शासन मान्य शाळेत  परिपत्रक काढुंन पुरवण्यात येते. हि सवलत मंजूर करून देण्यासाठी फॉर्म क्र १ ते ५ सोबत देण्यात येतो . अश्या स्वरूपाचा फार्म  भरून अपंग संवर्गानुसार संबंधित जिल्हा चित्सालय अथवा शासनाने निर्देशित केलेल्या रुग्णालयात त्यांच्या वैधकीय प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रतिसह त्या त्या शैक्षणिक वर्षात मंडळाकडे ३१ ऑगस्ट पूर्वी मंडळाकडे सादर करावा लागतो . आणि हे बंधनकाकार असते ,कि कोणत्याही अपंग प्रवर्गातील सवलती बाबत मंडळाची पूर्व परवानगी आवश्यक असते . आणि हे परिपत्रक तक्त्यासहित विज्ञार्थी ,पालक ,शाळेचे कर्मचारी ,( शिक्षकेतर व शिक्षक) याची नोंद ठेवण्याचे बंधनकारक आहे .

 

विविध प्रकरच्या फॉर्म्स मध्ये ,फार्म नंबर १ अंध ,फार्म नंबर २ कर्णबधिर -२;डम्ब  फार्म नंबर  ३ अंतर्गत , शारीरिक विकलांग ४,पस्टिक ५फार्म नंबर ४ अंतर्गत लर्निंग विकलांगता ,आणि फार्म नंबर ५ अंतर्गत ऑटिसम या फार्म चा अंतर्भाव आहे . हे सोपस्कार पूर्ण झाल्यावर परीक्षेला बसता येते.

 

मुलांना विषय निवडीचे स्वतंत्र्य देऊन परीक्षेसाठी  पोषक वातावरण निर्माण करून दिले जाते . आणि वरील बाबींची पूर्तता करून झाल्यावर परीक्षेला जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची माहिती पुरवली जाते . जेणे करून चांगल्या प्रकारे परीक्षेत यश संपादन करता यते . परीक्षेला जाण्यापूर्वी काही सूचना जरूर लक्षात ठेवाव्यात :  

 

विशेष : प्रश्न पत्रिकेवर दिलेल्या वेळेपेक्षा ३० मिनिटे अधिकच वेळ दिलेला असतो . या वेळेचा उपयोग सर्व पेपर लिहून झाल्यावर तपासणी साठी वापरण्यात यावा ,लिहलेलं बरोबर आहे का ? ,सर्व प्रश्नाचे उत्तरे लिहली आहेत का ? इत्यादी साठी वापरावा .  

 

घरून निघते वेळी श्रावणयंत्र नीट तपासून कानाला  लावून जावे .

 

परीक्षेचे  ठिकाण ,वेळ याची खात्री करून इच्छित निश्चित स्थळी जावे

 

आपल्या हातात मिळालेली  प्रश पत्रिका आपलीच आहे का ते तपासून पाहावे ,आणि काही शंका असेल तर उपस्तित शिक्षकांना/पर्यवेक्षकाला  विचारून शंकेचे निरसन करून घ्यावे . विषय बदल झाला असेल तर खात्री करून घ्यावी . कर्णबधिरांसाठी असलेल्या विशेष शाळेतून जे विज्ञार्थी एस एस सी परीक्षेला बसले आहेत आणखी काही महत्वाच्या सूचना देणे महत्वाचे आहे .

 

उत्तर पत्रिकेवर स्वछ  आणि सुवाच्च अक्षरात लिहावे ,कुठे पेपर खराब होणार नाही याची काळजी घ्यावी . स्वतःचा क्रमांक मोठ्या अक्षरात व  ठळक लिहावा . हे सर्व करण्यासाठी घरी सराव  करावा लागतो .

 

उत्तर पत्रिकेत खडाखोड करू नये . अक्षर मोठे व दूर दूर व सारख्या अंतरावर लिहावे .

नवीन प्रश्नाचे उत्तर लिहण्यासाठी नवीन पानावर सुरुवात करावी .

 

प्रश व उत्तरचे अंक नीट लिहावेत . पेपर संपूर्ण सोडवावा ,आपल्याला येत असेलली  प्रश सुरुवातीला लिहावे .

 

चुका कमी करण्यासाठी पत्र ,गोस्ट आणि निबंध लिहीत असताना वाक्य लहान तयार करावीत ,जेणेकरून चुका होणार नाहीत . पत्रात स्वताचे नाव घालू नये पत्रातील पत्ता सुवाच्च आणि आटोपशीर असावा . दिलेली गोष्ट लिहीत असताना २-३ वेळा वाचून काढावी .,त्याचे परिच्छेद पाडावेत ,गोष्टीला शीर्षक म्हणजे नाव द्यावे ,नामे ,विशेष नाव लिहावीत ,उदा . राजा ,गाव ,मुलगा ,मुलगी इत्यादी . निबंध लिहीत असताना जो आपल्या आवडीचा आणि माहितीचा असेल तोच लिहावा ,आणि वेळ वाया घलू नये .त्यामुळे वेळ वाचतो व आवडीचाच विषय असल्यामुळे मार्क जास्त मिळण्यास मदत होते .  

 

प्रश्न व उप्र प्रश्नाचे  अंक नीट लिहावेत .

 

भूगोल ,विज्ञान आणि भूमिती ,या मध्ये ठळक अक्षराने व टोकदार पेन्शील ने लिहाव्यात . भूगोल मधील नकाशे सूची रेखीव पद्धतीने लिहावीत . आवशक्य तेथे आकृत्या काढायला विसरू नये ,कारण याचे मार्क सहज मिळत असतात . आकृत्यांवरील सूचना वाचून तशी कृती करावी .

 

अश्या मुलासाठी गृहविज्ञान खूप महत्वाचे आहे . या विभागात करणे द्या याला दोन गुण  असतात . एखादे कारण विचारले असेल तर ते बाजूलाच आकृती काढून नाव द्यावे लागते . आकृती काढल्या मुळे जास्तीचे मार्क जरूर मिळतात . एखादे उदाहरण विचारले असेल आणि आकृती लढण्याचे विचारले नसेल तर जरूर आकृती काढावी ,कारण आकृती वाढल्यावर पर्यवेक्षकाला कळते कि या मुलास प्रश्नाचे पूर्ण आकलन झाले आहे .

 

अर्थशात्र, विज्ञान ,आणि इतिहास भूगोल यातील काही मोठे प्रश्न अधोरेखित करावे ,तसेच गाळलेले  आणि महत्वाचे शब्द अधोरेखित करावे . हे करीत असताना कोठेही लाल शाई ,पेन्शील वापरू नये .

 

प्रशपत्रिका वाचून झाल्यावर अथवा वाचत असताना मुले काही लिहीत असतात ,तसे करता कामा नये .

 

कच्ची गणिते उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूवर लिहावेत . पक्की केल्यावर त्या ठिकाणी x अशी फुल्ली मारावी .

 

परीक्षेला जाताना सर्व वर्ग शिक्षकाने सांगितलेल्या  गोष्टी बरोबर घ्याव्यात ,आणि त्याने दिलेल्या नियमांचे वेळो वेळी पालन करावे

 

या मुलांसाठी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रात्यक्षिक होय , प्रात्यक्षिकात  गृहशात्र ,आरोग्य शास्त्र ,शरीर शास्त्र ,या विषयाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे .  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मोजक्या व नेमक्या वाक्यात द्यावी .उत्तरे  पूर्ण वाक्यात देण्याचा प्रयत्न करावा . त्यासाठी आकृत्यांचा नीट व रोज अभ्यास करावा लागतो . शेवटी आपणास मिळालेल्या अर्ध्यां तासाचा पूर्ण  वापर करावा आणि नीट व सुवाच्च अक्षरात लिहण्याचा प्रयत्न करावा ,यश तुमच्या दारी उभे आहे .

 

विशेष गरज असणाऱ्या (अपंग) विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या सवलती :आणि यात येणारे अपंग संवर्ग :

 

  1. अंध विज्ञार्थी

  2. कर्णबधिर विज्ञार्थी

  3. अस्थिव्यंग विध्यार्थी

  4. बहुविकलांग विध्यार्थी  /(सेरेब्रल पाल्सी)

 

5.            अध्ययन अक्षमता विध्यार्थी

 

6.            स्वमग्न

          ऑटिझमग्रस्त विध्यार्थी

 

क्र

अपंगांचा प्रकार

अपंग कोड क्र.

वेळेची सवलत

सवलती

विषय सवलत

०१

अंध

प्रति तास २०

मिनिटे

१. निवडी प्रमाणे परीक्षा केंद्र दिले जाईल .

२. मंडळाच्या नियमास अधीन राहून आवश्यक्त्यानुसार व मागणी नुसार लेखनिक देनाय्त येईल .

३.आकृती ,नकाशे, आलेख इत्यादी काढण्यापासून सूट देण्यात येईल .

४. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक सौरूपात देण्याची मुभा देण्यात येईल .  

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंकगणित व त्या सोबत कार्यशिक्षण विषयांपैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीरशास्त्र,आरोग्यशाश्त्र व गृहशास्त्र विषय .

६.इतिहास -राज्यशास्त्र व भूगोल अर्थशात्र   

०२

कर्णबधिर

मूकबधिर

३० मिनिटे अधिक वेळ

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते .

विषय

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय अनिवार्य व कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही दोन विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्र ज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप : कार्य शिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०३

अस्थिव्यंग

प्रति तास २० मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. विज्ञार्थी हाताने अपंग आल्यास आकृती नकाशे आलेख इत्यादी काढण्यापासून सूट देण्यात येईल .

३.हाताने अपंग असल्यास लेखनिक देण्यात येईल .

४.शारीरीक विषयात सूट दिली जाते


०४

बहुविकलांग

(सेरेब्रल पाल्सी)

बहू विकलांग १ तास २० मिनिटे.

 

सेरेब्रल पाल्सी

प्रति तास २० मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. उत्तरपत्रिका टाईप करून व किंवा लिहून  देण्याची परवानगी दिली जाते.

३.हाताने अपंग असल्यास लेखनिक देण्यात येईल .

४.शारीरीक विषयात सूट दिली जाते

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय सूट कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही एक  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्र ज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप : कार्य शिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०५

अध्ययन अक्षमता

२५ टक्के जादा वेळ

प्रति तास १५ मिनिटे

१.निवडी प्रमाणे जवळचे परीक्षा केंद्र दिले जाते.

२. आकृती नकाशे इ काढण्यापासून सूट देनाय्त येते .

गणित या विषयात कॅल्कुलेटर वापरता येईल ,पण मोबाइलला चा कॅल्क्युलेटर नसावा .

मंडळाच्या नियमात अधीन राहून आवशक्यतेनुसार व मागणी नुसार लेखनिक देण्यात येईल  

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय ऐवजी कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही एक  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व गृह शाश्त्र विषय .

६.इतिहास राज्यशाश्त्र व भूगोल -अर्थशाश्त्र .

टीप :फक्त डिसकालकुलीया विधायर्त्यांचया ७ वीचे  अंक गणित हा  विषय घेता येईल .

 

कार्यशिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत

०६

स्वमग्न

ऑटिझमग्रस्त

प्रति तास २० मिनिटे

१. ऑटिझमग्रस्त उमेदवार ज्या शाळेत विज्ञार्थी असेल त्या शाळेत त्याच शाळेत परीक्षेची व्यवस्था करण्यात येते किंवा मागणी नुसार जवळच्या शाळेत केंद्र म्हणून दिले जाते .  

 

२. आकृती नकाशे इ काढण्यापासून सूट देनाय्त येते .

 

३. गणित या विषयात कॅल्कुलेटर वापरता येईल ,पण मोबाइलला चा कॅल्क्युलेटर नसावा .

४.४. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक सौरूपात देण्याची मुभा देण्यात येईल .

५. कारक कौशल्याचा विकास न झालेली औतिस्तिक विधायर्त्याना कॉम्पुटर वापरण्याची परवानगी देनयेत येईल . मात्र त्या कॉम्पुटर वर पूर्वीची कोणतीही माहिती असता काम नये .

१. प्रथम भाषा १०० गुण

२. द्वितीय भाषा १०० गुण

३. तृतीय भाषा १०० गुण

किंवा एक भाषा विषय अनिवार्य  व कार्यशिक्षण विषयांपैकी कोणतेही दोन  विषय .

४. गणित किंवा सामान्य गणित किंवा इ. ७ वीचे अंक गणित व त्या सोबत कार्य शिक्षण विषय पैकी कोणताही एक विषय .

५. विज्ञान व तंत्रज्ञान विषय किंवा शरीर शाश्त्र व आरोग्य शस्त्र व गृह शास्त्र  विषय .

६.इतिहास राज्यशास्त्र  व भूगोल -अर्थशास्त्र  .

 

टीप : कार्यशिक्षांतर्गत निवडलेले विषय भिन्न असावेत




प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे

9702158564

balajishinde65@gmail.com 

विस्तार सेवा सहायक (विषेष शिक्षा )

विस्तार सेवा विभाग ,

अली यावर जंग राष्ट्रीय दिव्यांगजन  संस्था ,बांद्रा रिक्लेमेशन ,बांद्रा (प ),मुंबई -४०० ०५०


(सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार )


नात्यात लग्न एक अभिशाप

नात्यात लग्न एक अभिशाप


दिनांक : १७-०४-२०१७

नात्यात लग्न हा जगभरातील लोकसंखेला लागलेला अभिशाप आहे ,त्यात भारतीय संस्कृतीला लाभलेला एक अभिशाप म्हणावे लागेल .नात्यात लग्न करण्याची आदिम काळापासून एक परंपरा आहे ,त्याचे बीजे खूप दूरवर कोरली गेली आहेत.आधुनिक काळात नवीन नवीन संशोधन यामुळे नाते संबंधामुळे त्याचे दूष परिणाम आज जगभर भोगावे लागत आहेत ते म्हणजे आज जगभरात दिसून येत असलेली अपंग बालके ,नाते संबंथ हे अतिशय घातक संबंध सूचित झाले आहेत ,त्याचा परिणाम म्हणजे जन्माला येणारे  अपंग बाळ.सामान्य माणसाला त्याचे काही वाटत जरी नसले तरी ज्या घरात अपंग मुल जन्माला त्याची व्यथा त्या व्यक्ती कडून ऐकलेले बरे ,घरात अपंग मुल जन्माला आल्यावर काय काय उपद्व्याप करावे लागतात ? आणि त्याचे पुनर्वसन किंवा त्यास मुख्य प्रवाहात आणण्य्साठी तारेवरील कसरत करावी लागते.

आपल्या शरीरात असंक्य पेशी आहेत त्यातील गुणसूत्र मिलानावरून त्या त्या प्रकारचे क्रोमोझोम शरीरात वाहून नेले जातात एक्स आणि वाय यातील आई व बाबा कडून येणारे एक्स मधून चार मधून  एकाला अपंग बाळ होण्याची शक्यता असते ,तर आई कडून येणाऱ्या गुणसूत्रात चार गुणसुत्रातून दोन बालकात अपंग बालक होण्याची दाट  श्स्क्यता असते .मुल जन्माला आल्यावर पालकात सम्रंभ असतो. हळू-हळू  मुल वयात येते तेंव्हा त्याची लक्षणे तीव्र जाणवतात .उदाहरणात बहिरे मुल जर जन्मताना रडण्याचा आवाज काढले नाही तर समजावे की ,मुलाच्या एकण्यात दोष आहे ,तीच बाब अंध मुलांच्या बाबतीत म्हणता येईल ,त्यास एखादि  वस्तू डोळ्यासमोर आली तर काहींच प्रतिक्रिया नसेल तर समजा की मुल अंध आहे ,याच बरोबर मुलात काही छुपे आजार उदयास येतात ते आपणास लवकर जाणवत नाहीत ,ही अवस्था बळावल्यास मुळात अनेक प्रकारचे अपंगत्व येण्याची शक्यता असते .त्यास बहुविकलांग असे संबोधले जाते .

  

संशोधनांती असे सिद्ध झाले आहे की ,नात्यात लग्न केल्याने मुल अपंग होण्याची मोठी संभावना असते  ,रक्ताचा गट एक झाल्या कारणाने येणारे मुल अपंग होय शकते मग ते कर्णबधीर असेल ,मतीमंद किंवा अंध असू शकते किंवा अस्थिव्यंग किवा बहुविकलांग असू शकते .जगभरात भारत वगळता युरोप आणि आफ्रिका खंडात भावा सोबत बहिणीचे लग्न लाऊन दिले जाते ,जसा खली उल्लेख केल्या प्रमाणे आज ही फारशी समाज घरातच लग्न करतात जसे भाऊ आणि बहिण यांच्यात विवाह करण्याची खूप काळापासून रूढी परंपरा आहे .फारशी समाजाची ही चुकीची धरणा ही त्या समाजातील लोकसंखेला घटवण्यास कारणीभूत होत आहे . वडिलोपार्जित संपत्ती आपल्या घरात असावी म्हणून ते सख्या बह्वासोबत लग्न करतात . कारण पूर्ण जगभरात फारशी लोकांची संख्या खूप रोडावली आहे .तो धागा पक्सून ही जमत घरात लग्न करीत असल्याचा अहवाल आहे .

 

आत्याच्या मुलीसोबत किंवा मामाच्या मुली सोबत लग्न केल्यावर नात्यातील रक्त गट एक होईन त्यात एक सुत्रता येते आणि रक्ताचा गट एक झाल्यामुळे येणारे मुल अपंग प्रवर्गात जम्माला येते .हा रक्त गट एका कुटुंबाकडून दुसरया कुटुंबाकडे प्रवाहित होत असल्यामुळे लगेच जरी मुल अपंग जन्माला आले नसले तरी ,दुसऱ्या पिढीत ते बाबा किवा आई ला ज्या ठिकाणी लग्न करून दिले असेल त्या ठिकाणी हमखास अपंग मुल जन्माला येते मग ते कोणत्याही परवार्गाचे असो  .

या विषयी आपल्या भारताचा विचार करायचा असेल ते नाते संबंध हे  दृढ होत चालेली बाब आहे ,यामुळे जन्माला येणारे बाळ कोणत्याही अपंगाच्या प्रकारात जन्माला येणाऱ्या प्रवर्गात मोडते. आज मितीला आपण सरास आवती भोवती पाहत आहोत की  बर्याच प्रकारची अपंग बालके जन्माला येत आहेत ,कर्णबधीर ,अस्थीव्यांग,अंध ,मातीन्मंद आणि बहुविकलांग ज्यात एकापेक्षा जास्थ विकलांगता पहावयास मिळते असे त्याचे विविध कारणापैकी एक कारण म्हणजे नात्यात लग्न होय .

नात्यात लग्न जे होतात त्यात हिंदू धर्मात ,मामाच्या मुलीशी ,आत्याच्या मुलीशी , आणि बहिणीच्या मुलीशी आणि जवळच्या नात्यात लग्न करण्याची प्रथा खूप दिवसपासून चालत आलेली आहे ,त्याचा परिणाम अपंग मुल जन्माला येते ते वरील कोणत्याही प्रकारचे असू शकते असे संशोधना अंती शिद्ध झालेले आहे ,मुस्लीम धर्मात ही  ,बहिणीच्या मुलीशी आणि आत्या ,आणि मामा या नाते संबंधात लग्न करण्यची प्रथा आहे .

अनपेक्षित घडून अल्लेला प्रसंग यात भाऊ बहिण ,बाबा -मुलगी , दीर भावजय आणि बालवयात केलेला किवा झालेला अति प्रसंग यातून जर गर्भ धारणा झाली तर अपंग मुल जन्माला येण्याची  शक्यता जास्त बळावते .जर मुलीचे किंवा प्रतिस्पर्ध्याचे वय कमी असेल तर नक्की होणारे मुल अपंग असू  येते . इथे वयाचाही घटक खूप महत्वाचा मानला जातो जो अपंग मुल जन्माला येण्यास कारणीभूत आहे ,पूर्वी च्याकाळी नात्यात लग्न तर करीत असत पण कमी वयात पण लग्न करीत असत त्याचा परिणाम अपंग मुल जम्न्माला येत होते .

अपंग मुल जन्माला येण्याची तशी बरीच करणे आहेत .त्याची वर्गवारी जर केली तर तीन भाग पडता येतील एक जन्माच्या पूर्वी , दुसरा जन्मः आणि तिसरा म्हणजे जन्मानंर .यात वेग वेगळी करणे आसू शकतात .

पण यात अनुवांशिकता  हा सर्वात महत्वाचा घटक आहे .आणि तो म्हणजे नाते संबंध , आदिम काळात विवाह संस्था अस्तित्वात न्हवती तेंव्हा कोणाचे हे कोणासोबत लग्न होत होते , नात्यात लग्न करण्याची पद्धत नसावी ? हळू हळू मानुष्य विकास होत गेला ,वसाहती निर्न्मान झाल्या आणि एक काळ असा आला की विवाह हा नात्यात सुरु झाला .त्याचे कारण असे की एखाद्या अनोळखी व्यक्ती किवा समाजात कसे लग्न करावे ? तर नात्यात लग्न करण्याची प्रथा सुरु झाली असावी ,हळू हळू मानव विकास पावत गेला नि समाजाची  रचना बदलत गेली .ती आजतागायत सामुहिक विवाह पर्येंत पोहचली आहे. पण नात्यात लग्न करण्याची प्रथा कायम ठाण मांडून बसलेली आहे असे म्हणणे वावगे होणार नाही  .

हे असे का होते,याची कारणे जरी वेगळी असली तरी विवाह एक असा खेळ आहे जो आज पर्येंत कोणालाही सुटलेला नाही कारण ही एक सामाजिक संस्था आहे ,एक संस्कृती आहे .आणि पारंपारिक पद्धत आहे .जनन -प्रजनन आणि उत्पतीचा भाग असून  राष्ट्र विक्साचा मूळ पाया ही .जगात जन्म घेणारे बाळ सुधृद हव्हे म्हणून प्रत्येक समाज ,देश झटत असते .तरीही एवढ्या उप्द्य्वातून अपंग मुल जन्माला  आल्या शिवाय राहत नाही .हा नात्यात लग्न करण्याचा अभिशाप आहे .

म्हणून याला एकाच उपाय आहे आणि तो म्हंजे असे लग्न टाळणे होय ,लोकात जनजागृती झाली पाहिजे या साठी वैक्तिक ,सामाजिक संथा आणि शासन संस्थेचा हस्थ्क्सेप खूप महत्वाचा आहे .पूर्वी जेव्हा  गोवर कांजण्या ची साथ येत असे तेंव्हा जनजागृती खूप केली जात असे “देवीचा रोगी कालवा ,आणि हजार रुपय मिळवा “. त्याच पद्धतीने जर अपंग मुल जन्माला येण्यापासून थांबवायचे असेल तर अश्या पद्धतीने लोकात जनजागृती केली पाहिजे ,”नात्यात लग्न टाळा आणि पाच हजार रुपय मिळावा “.

 

आजच्या बदलत्या जगात आणि धावपळीच्या काळात समाजातील गटांनी या बाबीकडे गांभीर्याने पहावयास हवे ,जाती बाहेर जाऊन ,शहराबाहेर जाऊन ,जिथे आपणास योगे स्थळ वाटेल तिथे विवाह केला पाहिजे .ज्या मुळे येणारे मुल सुधृद आणि निरोगी जम्माला येईल .आणि त्याचा परिणाम देश विकासासाठी हातभार लावण्यास मदत होईल ,आणि अपंग बालक जन्माला येण्याची संख्या कमी होईल .

एकंदरीत संपूर्ण भारताचा विचार केला तर उत्तर राज्यातील तुलनेत दक्षिण राज्यातील लोक जवळच्या नात्यात लग्न करण्यास जास्त पसंती देतात .मग अश्या विवाहास का पसंती देण्यात येते ? कारण एकच आहे नाते संबंध ,रुंनुबंध कायम असावे ,आपुलकी हा एवढाच समंध आहे ,मग एखादे मुल अपंग झाल्यावर घरात एक कोठडी का करून ठेवता आले तरी चालेल ? सामजिक भीती पोटी उच्च कुलीन आणि मध्यम वर्गी देखील घरात जन्माला आलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला लपवण्याचा प्रयन करतात .पण आज थे चित्र थोडे बदलून गेले आहे ,जागरूकता आणि  सामजिक जाण  आज अपंग व्यक्तींना मिळत असलेल्या सेवा सुविधा यामुळे मुल समाजाचा घटक  बनत चालले आहे .

सामाज प्रवाहात येण्यासाठी पालक ,शिक्षक आणि सेवा संस्था यांच्या पुढाकाराने ,नात्यात लग्न करण्याचे प्रमाण कमी झाले असून ,अश्या नाते संबंधातून जन्माला येणारे अपंग  मुल दिसत नाही .जरी अपंग मुल जन्माला येत असले तरी त्यांची करणे वेगळी आहेत हे लक्ष्यात  घेण्याची बाब आहे .अश्या संबंध्तून जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवतो आणि वेळ खाऊ आणि खर्चिक असला तरी कुटुंबाचा मानसिक त्रास वाढतो आहे . या सर्व जाचापासून दूर राहण्यासाठी नात्यात विवाह न करणे हे सामाजिक, मानसिक, शारीरिक ,आणि देश हिताच्या दृष्टीने अत्येंत असरदार आहे .

 

शेवटचे अद्यावत


17-04-2017


प्रा. बालाजी रघुनाथराव शिंदे

9702158564

balajishinde65@gmail.com विस्तार सेवा सहायक (विषेष शिक्षा ) विस्तार सेवा विभाग , अली यावर जंग राष्ट्रीय दिव्यांगजन संस्था ,बांद्रा रिक्लेमेशन ,बांद्रा (प ),मुंबई -४०० ०५०

(सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय ,भारत सरकार )



मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...