About Me

My photo
NERUL WEST, MAHARASHTRA, India
Special educator in CWHI

Saturday, June 27, 2020

#डिप्रेशन.

एक लव्ह Matter
सहा वर्षी पूर्वीची गोस्ट आहे ..( आप बिती).

एक माझा मानलेला भाचा डॉ. आहे ,त्याची ही बिती बात आहे....
१९९८ ला मी लातूर सोडले .उच्च शिक्षणासाठी मुंबई चा रस्ता धरला.
एके दिवशी अचानक समोरून आवाज आला ,मामा मी डॉ ...बोलताय .
मी अवाक झालो ,किती वर्षाने मला तिकडून फोन आला होता.
मला आनंद झाला त्यास खुशालीचा वर्तमान विचारला ..
तो क्षणभर न थांबता लगेच मुख्य विषयांवर आला ...त्याच्या मनात खूप गोंधळ जाणवला .
मामा माझे एका मुली सोबत ऑनलाइन अफैर झाले आहे ,मी काय करू ...? तुम्ही मला मार्ग दाखवा.
घाबरला होता .मी धीर दिला आणि त्याला बोलतं केलं ..
मी नेरुळ ला आणि तो लातूर ला .पूर्वी चार स्थळ येऊन गेली आणि कांही जमले नाहो करण काय तर त्याच्या घरा शेजारी ' किन्नराची घरं' .
यनारे स्थळं मुलगी देण्यास घाबरत होती , शेवटी कुठे ही स्थळ जमले नाहीच ..कदाचित ही शेवटची संधी असावी .असे त्याला वाटत होते ..?
मुलगी नवी मुंबईत ,वडील बँकेत चतुर्थ कर्मचारी .
चार दिवसाने परत कॉल आला मामा मला त्याच मुलीसोबत लग्न करायचे आहे .जर हे लग्न नाही जमले तर मी आत्महत्या करून मरून जाईन ..प्रकरण गंभीर होत .
आणि तो पुर्णतः डिप्रेशन मध्ये गेला होता ..?
तुम्ही हे करू शकता .मग रोज कॉल आणि व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क सुरू झाला तो सोयरीक होई पर्यंत.
त्याच्या एकंदरीत फोन कॉल वरून मी अंदाज लावला आणि वेळीच त्यास सतर्क केले .त्याच मुलीसोबत लग्न करून देण्याचे वाचन दिले ...आणि पुढील पर्याय दिला.
मी त्यास धीर दिला असे नको करू आपण मार्ग काढू .तू आई बाबा ना घेऊन ये ,मुंबई ला .
मुलीच्या घरून मला कॉल आला ,मुलाचे घर पाहण्याचा बेत ठरला मी ,मुलीची आई आणि बाबा सेकंड क्लासच्या ट्रेन ने लातूरला गेलो .स्थळ बघुन झाले .मला ते घर नवीन न्हवते ..त्यांना मुंबई ला येण्याचे आमंत्रण देऊन आलो.
तो दिवस आला ,आई बाबा आणि तो माझ्या घरी आले .औपचारिक चर्चा ,चहा घेतल्यावर नंतर आम्ही सर्व मुलीच्या घरी गेलो .ओळखी झाल्या आणि सोयरीक लातूरला ला करण्याचे ठरले .डॉक्टर च्या जीवात जीव आला ..
जुमला जमला लग्नाची तारीख ही निघाली .मी उदगीर ला लग्नाला गेलो ,लग्न छान झाले ...
मी परत घरी ,मुंबई ला आलो .नंतर कधी त्या डॉक्टर ने मला 'मामा' म्हणून कधी विचारले नाही ,की व्हाटसप केला नाही ...आज सहा वर्षे पूर्ण झाली म्हणून आठवण आली .
व्यक्ती ओळख वेळीच करता नाही आली की आपण फसतो. म्हणून व्यक्ती ओळखून मदत करावी .
आज असे वाटते की तो डिप्रेशन मध्ये मुळीच न्हवता .तो नाटक होता ,डाव जिंकण्याचा ! कायम !

No comments:

Post a Comment

मांसाहारी माणसं.

कोण काय खातो याची उठाठेव करत नाहीत मांसाहारी माणसं. कुणी शाकाहारी आहे म्हणून त्याला भाड्याने घर नाकारत नाहीत, मांसाहारी माणसं. आपण मांसाहारी...