Friday, May 29, 2020

चीनी भासेचा भाषांतरकार भिक्खु कस्यप मातंग .

चीनी भासेचा भाषांतरकार भिक्खु कस्यप मातंग

 

चीनमध्ये बुद्धाधम्मचा शिरकाव केंव्हा आणि कसा  झाला हे निश्चितपणे  सांगता येणार नाही ,पण असे म्हणतात की एका राजाच्या फौन नावाच्या मंत्र्याने कन्फुसीएसला विचारले की ,’जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे ?’ कन्फुसीएस ने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले की ,पाछिमेच्या देशात राहत असलेला एका स्वर्गीय तत्वज्ञानी माणसाबद्दल मी एकले आहे .या कथेचा संधर्भ देऊन बहुतेक सर्व चीनी बौद्ध असे अनुमान काढतात की ,कन्फुसीएसला बुद्धबदधल माहिती होती. हे त्रिकाल सत्ये आहे .

 

कस्यप मातंग आणि चू-फालीन ई स ६७ मध्ये प्रथम चीनला धम्म प्रसार आणि प्रचारासाथी गेले .

कस्यप हा मातंग बौद्धिस्ट भिक्खु होता . हे बुद्ध साहित्यात अंकित आहे . मातंग ऋषि ,मातंगी ,तिची चांडाळ पुत्रि कृतिका हे सर्व संधर्भ बौद्ध काळात अभिधम्म पिटकात -कथावत्थुत घडलेल्या कथात आढळतात . कस्यप मातंग आणि चू फालीन (धर्मरक्षक )हे दोघे प्रथम यू ची येथे मध्ये आशियातील खाता जवळ भेटले .

कस्यप मातंग हा महान बौद्धधम्म प्रसारक होता आणि चू फालीन हा महान बौद्धधम्म रक्षक होता . या दोघांनी आपसात सल्ला मसलत करून धम्म आणि धम्मा चे पुरुजीवन करण्याचे ठरवले . पांढऱ्या घोड्यावर बसून साठ लाखाहून जास्त शब्द भंडार असलेल्या संस्कृत भासेतील बौद्धधम्म ग्रंथ आणि बौद्ध मूर्ति घेऊन धम्म प्रसारासाठी चीन ला निघून गेले .

कस्यप मातंग आणि चूफालीन या दोन भारतीय बौद्ध धम्म भिकुणी चीनचा  सम्राट मिंग टी  याला भेट दिली ,धम्म प्रसार आणि प्रचार साठी आल्याचे कळवले . सोबत घेऊन गेलेल्या वस्तु म्हणजे ,धम्मग्रंथ आणि गौतम बुद्धाची मूर्ति भेट स्वरूप दिली .

या चीन च्या सम्राटाने कस्यप मातंग आणि चूफालीन यांचा औचित्य पूर्व आणि आदर पूर्वक भव्ये सत्कार केला . सत्कारा नंतर होलू येथील विहारात त्यांची राहण्याची सोय करन्यात आली . येथे वास्तव्यात राहून यांनी धम्मप्रसार आणि प्रचार करणायस सुरुवात केली .

 

कोणत्याही गोस्टिची प्रसिद्धी किंवा प्रचार रीतसर आणि योजना बद्ध आणि अविरत न रोकता करायचा असेल तर तेथील राजदरबारी त्या साहित्याची दखल असायला हवी ,थोडक्यात राजाश्रय हवा आणि तो चीनच्या सम्राटने बहाल केला होता म्हणून इथून बौद्ध धम्माच प्रचार आणि प्रसार करता आला . तीच गत श्रीलंका ,ब्राह्मदेश ,लाओस ,कंबोडिया आणि जपान मध्ये झाली आणि धम्म भरभराटीला आला .

 

राजा अशोकाच्या काळात भारतात तेच झाले ,सम्राट राजा अशोकाने बुद्ध धम्मातील बौद्ध साहित्य शोधून काढून त्याचे पुर्नुथान केले .येवढ्यावर न थांबता ई. स. ३ ऱ्या  शतकात पहिली धम्मसंगीती घेऊन जगभरात धम्माचा प्रसार आणि प्रचार केला . आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र याला श्रीलंकेत प्रचारासाठी पाठवले ,इतीहासात हा सर्वात मोठा धम्मप्रचार आणि प्रसारा साठीचा  दुवा मानला जातो . पण दुर्दैवाने राजा असोकाच्या बृहदत्त या नातू ने त्याचा ब्राह्मण सेनापति पुस्येमित्र शुंग याचेकडून धोक्याने वढ केला आणि स्वतःस राजा महणून अभिषेक करऊन घेतला.

प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की यानेच वैदिक धर्माचे पुनरुज्जीवण केले यज्ञसंस्था परत सुरू केली . नव्याने पुराणे,स्मृति  आणि कांही ब्राह्मण ग्रंथ लिहऊन घेतले. याचा अर्थ परत ब्राह्मणी युग सुरू झाले या युगाची सुरुवात देशात इंग्रज येई पर्येंत सुरूच राहिली . 

सम्राट राजा अशोकाने बुद्ध धम्मातील बौद्ध साहित्य शोधून काढून त्याचे पुनरुज्जीवण केल तो जसा राजाश्रय होता ,तीच बाब कस्यप मातंग आणि चू फा लीन यांचे बाबतीत चीन मध्ये घडली होती ,यांना भक्कम राजाश्रय दिला गेला होता .

 

आता प्रचार आणि प्रसारासाथी ठिकाण निश्चिती लागते ते त्यांना चीनी सम्राटाने  देण्याचे मान्ये केले . त्यांची हो लूयेथील विहारात  राहण्याची सोय ही करण्यात आली लो फू पुढील एक वर्ष काळानंतर ते लो वाइंगशहराच्या पश्चिम दिशेला दरवाजा बाहेर स्वेत अश्वनावाचा भव्ये विहार बांधण्याची राजआज्ञा ही दिली होती . आज हे विहार भारतीय आणि चीनी बौद्ध धम्माचे संगमस्थान म्हणून मानले जाते. या विहारचे आधुनिक नाव व्हाईट होर्स हाऊसअसे संबोधले जाते , लगबघ ३,४५० क्षेत्रफक असलेला विहार आज दिमाखात धम्म देसणाचे स्थान होऊन बसला आहे .त्या काळात इथूनच आशिया आणि दक्षिण पूर्व-आशिया खंडात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रवास सुरू झाला होता .

व्हाईट होर्स हाऊस  येथून महान दार्शनिक बुद्ध भिकु कश्यप मातंगाने बेचाळीस सूत्ताचेचीनी भाषेत भाषांतर केले होते. महणून भिक्खु संघात महान दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मातंगाला आणन्ये साधारण महत्व आहे . याच भाषांतर कार्याने महान दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मातंग ,चीनी भासेचा भाषांतरकार म्हणून बुद्ध साहित्यात प्रसिद्ध आहे.

दार्शनिक बुद्ध भिक्खु कश्यप मतांग याने मिंग टी  सम्राटाच्या अनुमतीने चीन मध्ये बुद्ध धम्माच्या प्रसाराचे काम सुरू केले . आणि तो काळ ई स ६७ चा होता .

वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही धर्माची उन्नती ,विकास आणि वृद्धी हवे असेल तर राजाश्रय खूप महत्वाचा भाग होय आणि नेमके तेच ई स ६७ मध्ये घडले आणि बुद्ध धममच्या प्रसारास चालना मिळाली .

नंतर च्या काळात धम्म प्रसारा आणि आभ्यास करण्यासाठी अनेक भारतीय भिक्खु भारतातून चीन मध्ये गेले आणि चीन मधून भारतात आले . इथून खर्याल अर्थाने आशिया आणि दक्षिण पूर्व-आशिया खंडात बुद्ध धम्माचा प्रचार सुरू झाला . याचे श्रेय भिक्खु कश्यप मातंग याच्या वाट्याला जाते .

तेंव्हा पासून ते आज तागायत बुद्ध धम्म प्राप्ती साठी बुद्धांच्या पवित्र स्थळाचे ,धम्माचे दर्शन घेण्यासाठी अनेक चीनी बुद्ध भिक्खु भारतात येतात .

 

चीनी लोक जंबुद्वीप देशात आज  केळव बुद्धसाधनेसाठी येताना दिसत आहेत .

इतिहासाची पाने पाहत असताना ,सुरवातीच्या काळात चीन देशात बुद्ध त्यांचा धम्म हा सरळ मार्गी गेला न्हवता तो मध्ये- आशियातून चीन देशात गेला होता . तसे पाहता चीनी आणि भारतीय भिक्खुनी विविध माध्यमाद्वारे हजारो भारतीय बौद्ध ग्रंथ प्रती भारतातून चीन मध्ये घेऊन गेल्याचे पुरावे सापडतात .हेच बुद्ध धम्माचा महानतेचे प्रतीक होय .

 

बुद्धानंतर च्या काळात एखाद  दूसरा ग्रंथ जसे मंजुश्रीमूलकल्पसोडला तर एक ही ग्रंथ अस्तीत्वात न्हवता . म्हणून प्राचीन काळी प्रचार आणि प्रसारचे कार्य चीनी भाषेतुन जास्त झाल्याची आणि झाले असल्याची असंख्य पुरावे मिळतात .

संदर्भ :

बुद्धधम्मचे संदेशवाहक भाग :१ तीन चीनी प्रवाशी : मा. शं.मोरे २७ एप्रिल १९८२ 

दीघनिकाय भाग १ - अनुवादक : वसंत धावरे. सुगावा प्रकाशन ,पुणे.१४ एप्रिल १९८८

बुद्ध आणि त्यांचा धम्म अनुवादक : प्रा. देवीदास घोडेस्वार. १३ ऑक्टोबर २०१३बुधवार २७,मे २०२०

 

                                                                            प्रा.बालाजी शिंदे ,नेरूळ -७०६

balajishinde65@gmail.com


1 comment:

  1. The fist and best trasnletter best transactor of Buddhist literature

    ReplyDelete

#लाईफ_वार्निंग_बेल

  #लाईफ_वार्निंग_बेल .. .. .. प्रा. बा.र .शिंदे लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे । इसी महीने मे मेरे परिचय के कर...